Thursday, 17 September 2020

 ऑरगॅझम फिके पडत चाललेत 

किक अपंग होतीये 

अचानक एकाकी 

प्रॉमिथिअस पळून चाललाय 

त्याने लावलेल्या आगीतून 

स्क्रियाबीन मोडून पडलेला पियानो पाहतोय 

मेलेल्या सिम्फनीतून 


गुलाबांच्यातल्या भावविजा व्हिसा मिळवून पसार 

कोवळ्या आवाजांचे पालनपोषण कठीण असतं 

हे काय आपणाला ठाऊक न्हवतं ?


अडथळे फुटलेल्या ग्लासासारखे दुखवतायत 

सुरवात जखमांच्यापासून आणि शेवट रक्तसमर्थनात 


ग्रेस नसलेली काँग्रेस सर्व शरीरभर 


तीव्र शांततेचे स्फोट भाषा शोधतायत कि शिव्या ?


सगळं दफन झालेलं पुन्हा पुन्हा नव्या आरोपांची भाषा घेऊन 

नात्यांचे शेवट असे जीवघेणे का होतात ?


मुलायमता तर दोन्ही पार्ट्यांना हवी होती 

मग कठीण कठीणचे पालुपद का ?


सगळंच क्रुसिफाय केल्याशिवाय 

जिझस जन्मणार नाही 

ही श्रद्धा 

कि अंधश्रद्धा ?


रक्ताला वसाहत लागते 

नवे जीन्स तयार करण्यासाठी 

तुला माझ्यापासून मुक्त असलेले जीन्स हवे आहेत का ?


मग सांग कि तसं 


फुफुसं झिरो होत चाललेत प्रेमात 

वासना दर्जाहीन झालेत 


क्वालिटी सम्भोग होत नाहीयेत 


शरीर परत मागण्याचा हक्क जसा तुला आहे 

तसा मलाही 


शिळेपणाच्या धुळीत होणाऱ्या भेटी 

धुळवड कशा होतील 


धुडगूस हमखास लॉटरी लागणारे 

आताशा अनलकी झालेत 


आवश्यकता संबंधविच्छेदाची सूरी घेऊन समोरून येतीये 


मरताना माझा गळा मी गाता ठेवतोय 

एनी ऑब्जेक्शन ?

==============================

बर्फात अडकून राजहंस मेले 

लोक म्हणाले ते योग्य जागी गेले 

=========================


अध्यात्म पोलिटिकल पार्टीत उभं नसतं 

एव्हढी तुम्हाला अक्कल आहे 

हे मी गृहीत धरलंय 


तुम्हांलाच ह्याचं राजकीय भांडवल 

मला नामोहरण करण्यासाठी करायचं असेल तर 

तुम्ही ते करायला स्वतंत्र आहे 


जिथे अख्खा निसर्गच माणसाने राजकीय आणि आर्थिक बनवलाय 

तिथे मनुष्याला राजकीय बनवण्याचे कारखाने ऑन असणे अटळच 

तुमचा प्रॉब्लेम एकच 

माझी कॉस्मिक वीज तुम्ही तुमच्या पोलिटिकल कारखान्यात 

कैद करू शकणार नाही 


अराजकीय असणं आणि नि:राजकीय असणं ह्यातला फरक 

तुम्हाला युरोपात बसून कळणार नाही 


तेव्हा निहीलिस्टिक म्हणा हिंदुत्ववादी म्हणा शैववादी म्हणा 

मी त्याने बाद होणार नाही 


ब्रह्मांड नॉट आउट आहे 

तुम्ही नॉकआऊट करू शकणार नाही 


मी ब्रह्मांडाचा पार्टनर आहे 


बॉलिंग करत रहा 


जोवर ब्रह्मांड स्वतः मला रनआऊट करत नाही 

तोवर 


श्रीधर तिळवे नाईक 








Monday, 31 August 2020

सुशांतची आत्महत्या , उत्तराधुनिकता आणि सत्याचे तीन टप्पे श्रीधर तिळवे नाईक
उत्तराधुनिकतेची सुरवात झाली संरचनावादाने आणि त्याचे पहिले सिद्धांतन नित्शेचे होते त्याने सर्वच रचित असते हा सिद्धांत मांडला संरचनावादाने विशेषतः फर्डिनंड द सस्यूरने हा रचित सिद्धांत भाषेला लागू केला आणि क्लॉड लेवी स्ट्राउसने तो संपूर्ण समाजाला लागू केला सामाजिक संस्था ह्याही रचना म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या आणि इतिहासही !

ह्याला शह दिला तो विरचनावादाने हाही सिद्धांत देरिदाने प्रथम भाषिक सिद्धांत म्हणूनच मांडला सरंचनाची विरचना करून त्यातून सत्य शोधण्याचा हा खेळ होता ह्या खेळात अर्थ आणि सत्य सतत विचलित होत असतात हे गृहीतक होते

विज्ञानाने वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधता येते अशी जी मांडणी केली होती तिला हा छेद होता

१९७० नंतर विरचना इतकी टोकाला गेली कि मुळात सत्य नावाचे काही अस्तित्वात असते का असा प्रश्न निर्माण झाला आणि आपल्या हातात सत्य लागत नाही तर सत्याची रचिते आणि विरचिते हातात लागतात असा विचार पुढे येऊ लागला ह्या विचारांचे समकालीन निर्माण म्हणजे पोस्ट्रुथ एज

हा विचार भारतीय परंपरेला नवा नाही नागार्जुनने आणि शंकराचार्यानी असेच काही मांडले आहे आणि पुढे ह्यातून राशोमान सारखा चित्रपट निर्माण झाला आहे

सुशांतसिंगच्या धक्कादायक मृत्यूनंतर पोलिसांनी जे वैज्ञानिक पद्धत वापरून सत्य शोधतात असा विश्वास आहे
सुशांतसिंगने आत्महत्या केली हे सत्य शोधून सादर केले

पण अनेकांना हे पटले नाही आणि अनेकांची अनेक रचिते पुढे आली मीडिया सध्या रचिताला ऍडिक्ट झाला असल्याने  रोज एक नवे रचित तो सादर करत असतो सत्य शोधण्यापेक्षा सत्य रचणे ही मीडियाची आवश्यकता बनून गेली आहे साहजिकच रचितांचे एक वातावरण बनवले गेले प्रथम ही आत्महत्या आहे पण ह्या आत्महत्येचे कारण म्हणून
१ फिल्म इंडस्ट्रीतील आप्तवाद
२ रिया चक्रवर्ती

ही दोन प्रमुख कारणे पुढे आणली गेली ह्यामागे जेनुइन दुःख किती  , स्वतःच्या अपयशातून आलेली उद्विग्नता किती आणि सायकॉलॉजिकल कोव्हीड झाल्याने आलेली सुरसुरी आणि फुरफुरी किती हे सांगणे कठीण ! ही एक पोस्टमॉडर्न कंडिशन होती आणि तिच्यामागे नवीन आलेल्या चिन्हयुगीय मीडियाचा फार मोठा वाटा होता कुत्रं माणसावर मुतलं तर ती घटना पण माणूस कुत्र्यावर मुतला तर ती न्यूज ही मानसिकता असलेल्या काही पत्रकारांनी गेली काही वर्षे अशी कुत्र्यावर मुतणारी माणसे आणि घटना तयार करायला सुरवात केलीये कारण घटनेला टीआरपी मिळत नाही तर न्यूजला टीआरपी मिळतो हा त्यांना आलेला  अनुभव मिडीयाच्या बाहेर बसून टीका करणं फार सोपं प्रत्यक्षात मीडीया चालवणं फार अवघड पूर्वी घटनाच न्यूज असायची आता घटनेत बॉलिवूड टाकावं लागत नाहीतर ऑडियन्स मिळत नाही ह्याला मीडियाचं बॉलीवूडीकरण म्हणतात ह्या मेडिया बॉलिवूडचा सुपरस्टार अर्णब गोस्वामी ज्याला मनमोहन देसाईटाइप आपण काही केलं नाही तर चालणार नाही हे पक्के माहीत आहे तर नासिरुद्दीन शाह रावीशकुमार वा हिंदू जो  पॅरलल सिनेमात सुपरस्टार आहे आर्ट सिनेमा म्हणजे ह्यांच्याबाबाहेर राहून पोर्टल वा फेसबुक व्हाटसप वा लिंक वा ग्रुप  चालवणारे लोक ज्यांना आपलं पोर्टल आर्टिस्टिक बनवण्याऐवजी पॉप्युलर बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे अपवाद आहेत म्हणजे सुनील तांबे , कीर्तिकुमार शिंदे , येशू पाटील ,अक्षरनामा , वायर , जागल्या ,साधना , सारखे जेन्युईन लोक वा खाती  पण हे फार थोडे आहेत आणि बहुतेक डावे आहेत किंवा गांधीवादी

सुशांतच्या प्रकरणाचा आधारच बॉलिवूड असल्याने बॉलीवूडीकरण टोकाला पोहचले आहे ह्यात महेश भट ह्यांनी इस्लाम स्वीकारल्याने हिंदुत्ववादी त्यांच्याविरुद्ध आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीद्वारा त्यांना गोत्यात आणता आलं तर ते हिंदुत्ववाद्यांना हवं आहे महेश भट काय असावेत ह्याचा काल्पनिक अंदाज बांधून मी अडा हॉका बाना सुना ह्या कादंबरीत शंकर भट हे काल्पनिक पात्र मी समांतर नायक म्हणून तयार केले होते ते खरे वाटावे अशा हालचाली महेश भट ह्यांनी केल्याने त्यांच्या बोल्डनेसच्या मुसक्या बांधाव्यात असं अनेकांना वाटतं पाश्च्यात्त्य देशात मुलीचे चुम्बन घेणारा पुरुष टीकेला पात्र होणार नाही पण भारतात महेश भटानी हे केल्याने तो समाजशत्रू वाटणे हे स्वाभाविक आहे कारण चुंबन कामूकच असतं असा भारतीयांचा आग्रह आहे आणि ह्याबाबतचे वैज्ञानिक सत्य भारतीयांच्या बाजूने आहे गालावरची पप्पी कामुक नसते पण चुंबनाविषयी असं म्हणता येणार नाही मुलगी वयात येईपर्यंत चुंबन बापाचं प्रेम असू शकतं (ह्याचीही बापाकडून गॅरेंटी नाहीच ) पण मुलगी वयात आल्यानंतर चुंबन लैंगिकच बनतं त्यामुळे महेश भट सांस्कृतिक शत्रू वाटणे हे नैसर्गिक आहे रियाने सुशांतच्या घरून निघाल्यावर महेश भट ह्यांना फोन केल्याने व्हाटसप केल्याने महेश भटांना टार्गेट करणे सोपे झाले शेवटी मागचे हिशेब चुकते करायचेच होते ते ह्या निमित्ताने चुकते करण्याची संधी मिळाली साहजिकच  रिया चक्रवर्ती नावाचे शेपूट दाबले गेले . महेश भट हे बॉलिवूडमधले सर्वात हुशार व्यक्तिमत्व आहे मी एकेकाळी त्यांच्यासाठी चित्रपट लेखन करणार होतो आणि ती फिल्म आशुतोष गोवारीकर डिरेक्ट करणार होता आणि प्लस चॅनेलने १० कि १२ फिल्म्स बनवण्याचा जो घाट घातला होता त्यात ती फिल्म होती त्यावेळीही त्यांची बोल्ड मोरॅलीटी इंडस्ट्रीला झेपत न्हवती शेवटी ते रजनीश ह्यांचे शिष्य होते आजही परिस्थिती बदललीये असं वाटत नाही साहजिकच रिया चक्रवर्तीबरोबरचे त्यांचे फोटो ज्यातले अनेक मॉर्फ केलेले होते लोकांना कन्विन्सिंग वाटले ह्याला जोड मिळाली ती नंतर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाने एनएसडी आणि अंडरवर्ल्ड ह्यांच्यामुळे ह्यांची एंट्री झाली नासिरुद्दीन शाहची ऍक्टिंग तो ड्रग घेत असल्याने लय भारी होते अशी गैरसमजूत असलेल्या महामूर्खांनी ही लत अभिनेत्यांच्यात पसरवली संजय दत्तने तिला ग्लॅमर दिले इxxx  खानसारख्यांनी स्टॅबिलिटी मॉडेलिंगने तिचा महापूर निर्माण केला ह्यात सुशांतसिंग राजपूत सापडलाय अशा बातम्या कानावर येत होत्या आणि ह्या अंगाने रियावर आरोप होऊ लागले

ह्या  रचितांची खंडने करणे तिच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला असल्याने आवश्यक बनले आणि रिया चक्रवर्तीनें तिच्याविरुद्धच्या  रचितांची विरचना करणारी मुलाखत राजदीप सरदेसाई ह्यांना दिली ही एक अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी होती

रियाने सुशांतच्या ड्रग्ज सेवनाविषयीच्या अफवा  खऱ्या आहेत असं इन्डायरेक्ट सुचवल्याने ड्र्ग्जमाफिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिला टार्गेट करणार हे उघडच आहे ह्याचबरोबर तिने आप्तवादाला काही भावच दिला नाही फक्त काही इशारे केले त्यामुळे रियाच्या  विरचनेची विरचना करणे आवश्यक बनले हे सगळे प्रकरण म्हणजे ज्याला  देरिदाने संहितेतून संहिता तयार होणे टेक्सच्युअलायझेशन म्हंटले होते तसे होते संरचना मग विरचना मग त्या वीरचनेची विरचना ह्यातल्या काही वीररचना जोश और ज्वानीसे भरपूर तर काही ररचना र्रर्रर्र करणाऱ्या ऍक करणाऱ्या  !

रियाने  उपस्थित केलेला एक प्रश्न  सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तिने सुशांतला ब्लॉक केल्यावर काय घडले ? जोपर्यंत हे खर्रर्रखुर्रर्र सापडत नाही तोवर सर्व अफवा आहेत प्रश्न इतकाच आहे ह्यातून फाँल्स व्हिक्टीम बनवला जाणार कि खर्राखुर्रा शोधला जाणार ? आणि हा प्रश्न पोस्ट्रुथ आहे सत्य रचित असेल तर पुरावे रचून कुणालाही शिक्षा होणार कि खर्ऱ्याखुर्ऱ्या पुरावाच्या आधारे खरा आरोपी शोधला जाणार ?

माझा ह्या देशातल्या पोलीस आणि तत्सम इन्वेस्टीगेशन एजन्सीजवरचा विश्वास अजूनही उडालेला नाही असं रियाने सांगितले आहे मी तिच्याशी सहमत आहे

पोस्ट्रुथ एजमध्ये सत्य रचित असल्याने सत्य रचलं जातं आणि रचलेल्या सत्याच्या आधाराने सत्ता चालवण्याचा प्रयत्न असतो भारतात हे नवीन नाही  भारतात सर्वच ब्राम्हणधर्मी राजवटी ह्या पोस्ट्रुथ होत्याच मुळात धर्म ही संस्थाच पोस्ट्रुथ असते आणि मोक्ष ट्रुथ साहजिकच कुठलेही धर्मराज्य हे स्वभावतः पोस्ट्रुथ असते म्हणून तर सुरवातीच्या काळात शैव जैन बौद्ध दर्शन वा धम्म हा शब्द वापरत होते शिवाने दर्शन तर  महावीर बुद्धाने धम्म सांगितलाय धर्म न्हवे धम्माचा अर्थ मोक्षाकडे / कैवल्याकडे /निर्वाणाकडे घेऊन जाणारे दर्शन दुर्देवाने संस्कृतचे प्रभुत्व वाढत गेले तसे ह्यांच्या दर्शनाचाही /धम्माचाही धर्म बनवला गेला आपल्याकडच्या लोकांना हे अजूनही नीट कळत नाही त्यातून बरेच घोळ होतात आणि कधीकधी मुद्दामहून घातले जातात मला आशा आहे कि असे काही पोस्ट्रुथ घोळ ह्या प्रकरणात घातले जाणार नाहीत राजकीय क्रांत्या  आणि धर्मराज्ये सर्वात प्रथम स्वतःच्या अपत्यांना खातात फ्रेंच / कम्म्युनिस्ट क्रांतीतला नरसंहार आणि अलीकडे ज्यांनी सत्ता काँग्रेसकडून खेचून आणली ते भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान लोक ज्यात अडवाणी यशवंत सिन्हा  वैग्रे येतात ह्यांचे सध्याच्या सत्तेने चालवलेले हाल हे उत्तम उदाहरण आहेत हे सगळेच पायाचे बळी होते कि काय अशीही शंका आहे असे असेल तर पोस्ट ट्रुथ भारतातही ऑन झाले असे म्हणावे लागेल अशा पार्श्वभूमीवर असे काही नाही हे सिद्ध करण्याची सर्वोत्तम संधी ह्या प्रकरणात ह्या सरकारला आहे

माझा स्वतःचा उत्तराधुनिकतेवर विश्वास नाही त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीद्वारे सत्य शोधता येते असा माझा विश्वास आहे मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या आहे असा निर्वाळा दिला होता पण ह्याहून काही वेगळे सत्य असेल आणि वैज्ञानिक इन्वेस्टीगेशगनच्या आधारे ते सिद्ध करणारे पुरावे सादर केले जाणार असतील तर त्यांना स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे


सर्वाधिक जो नैतिक असतो
त्याच्यावर असतात सर्वाधिक कॅमेरे
शस्त्रासारखे रोखलेले

त्याची हत्या होणे गरजेचे असते
कारण तो भ्रष्ट आचाराला धोखा असतो
आणि त्याचे निर्मूलन भ्रष्टाचारी लोकांसाठी
जीवघेणी आवश्यकता असते

तो नैतिक टाचणी असतो
जी टोचत राहते
जिच्यामुळे आपले फुगे फुटतील
अशी फुगेवाल्यांना भीती असते

नैतिक माणूस नकोच असतो कुणाला
आणि म्हणूनच त्याच्या मरणाची सर्व वाट पहात असतात
आणि जेव्हा तो  मरत नाही लवकर
असे वाटते  तेव्हा  तो  मारला जातो
गांधींसारखा

नैतिक माणूस थोडाही चुकला कि
त्याची बातमी होते
मीडिया जणू काही आपण खूप नैतिकतेचे पुजारी आहोत
अशा थाटात त्याच्यावर तुटून पडतो

म्हणूनच नैतिक माणसाच्या नावाने
तो चुकला
अशा अफवा पसरत असतात
वारंवार सतत थकत
इतक्या कि
नैतिक माणसाला शेवटी बातम्या साईडलाईन करण्याचे
यंत्र बसवून घ्यावे लागते
किंवा तयार करावे लागतात

नैतिक माणसाची सगळ्या समाजालाच भीती का ?

तो फक्त क्रुसिफाय झाल्यावरच त्याच्यावरती चर्चा का ?

वर्तमानात तो आपले आयुष्य बदलेल
अशी भीती वाटते का

मग बदला ना
होऊन जाऊ दे

एकदा हा अख्खा समाजच नैतिक करून बघूया

बघूया तरी खरोखर अनैतिकतेनेच सिस्टीम चालते
हे सत्य आहे का

चला
बदल घडवूया
स्वतःत आणि जगात

आतल्या भयावर मात करूया
जग बदलूया

चला बदल घडवूया
जग बदलूया

श्रीधर तिळवे नाईक

पहिला आनंदाश्रू उजव्या डोळ्यातून
आणि पहिला दुःखाश्रु डाव्या डोळ्यातून
येतो

म्हणूनच बहुदा डाव्यांना दुःख लवकर कळतं

आता मला कळतंय
मी चुकीच्या डोळ्याने तुला
डोळा मारायला नको होता






Wednesday, 5 August 2020

राममंदिर आणि मी

राममंदिर आंदोलन सुरु झालं तेव्हापासून माझा त्याबाबतचा प्रवास बदलत गेला आज पाहतो तेव्हा चार टप्पे स्पष्ट दिसतात
१ कट्टर विरोधाचा टप्पा
२ जहाल विरोधाचा टप्पा
३ मवाळ विरोधाचा टप्पा
४ आणि काही महिन्यापूर्वीचा पाठिंबा

माझ्या घऱात बहुजनवादी राजकारणाची परंपरा कित्येक शतकांची आहे त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे काँग्रेसला व फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आणि दाजीबा देसाई वा गोविंद पानसरेंचे (पानसरे आमच्या गल्लीतच रहात होते व अविनाश पानसरे माझा लहानपणचा मित्र होता ) काही काम असले कि शेकाप वा कम्म्युनिस्टांना पाठिंबा हे आमच्या घरात कायमच चालत आलेले !

पण १९८० साली माझ्या घरात प्रथम माझा भाऊ भारत बदलला मग दुसरा भाऊ भूषण व नंतर माझा भाचा जतीन तिघेही शिवसेना सैनिक बनले बाळासाहेब ठाकरे हे जणू ह्यांच्यासाठी देवच ह्यांच्यात मी एकटाच शैव उरलो आर्य संस्कृतीचा अभिमान हा भांडणाचा विषय झाला ह्या पार्श्वभूमीवर शाहबानो प्रकरण घडले आणि माझे वडीलही कधी न्हवे ते काँग्रेसवर दुसऱ्यांदा संतापले आणिबाणीनंतरची काँग्रेसची ही दुसरी मोठी चूक होती पहिली शिखांची हत्या होती ह्यावेळी रामजन्मभूमीचा प्रश्न पुन्हा आणला गेला माझे भाजपवाल्यांना सांगणे होते कि तुम्ही शहाबानो प्रकरणावरून आंदोलन करा पण ह्या प्रकरणावरून भाजपला  पाठिंबा मिळेना आणि नेमके ह्याचवेळी रामानंद सागरचे रामायण आले मी ह्या काळात राममंदिराच्या कट्टर विरोधात होतो कारण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला अयोध्येत सापडलेली इन्स्क्रिप्शन्स माहित होती आणि ही इन्स्क्रिप्शन्स गर्जून सांगत होती कि अयोध्येचा पूज्य देव हा शिव आहे नंतर सापडलेल्या इन्स्क्रिप्शन्समध्येही शिवच जास्त होता जर रामायण खरोखरच घडले असते तर अयोध्येत सुरवातीपासूनच रामाची पूजा केली गेली असती पण ज्या अर्थी असे न घडता तिथला मुख्य देव शिवच होता त्याअर्थी रामायण हे काल्पनिक असावे होते असा माझा युक्तिवाद होता ह्या काळात त्यामुळेच मी राम मंदिराला कट्टर विरोध करत होतो

पुढे अडवाणींची रथयात्रा झाली त्या काळावर मी एक कविताही लिहिली होती ह्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा बघून मी जहाल झालो बाबरी मस्जिद पडली माझ्या कादंबरीत ते प्रकरण आलेही होते मग मी ते उडवले कारण अभिजित देशपांडेंकडे प्रत्यक्षदर्शी अनुभव होते ते मला जास्त महत्वाचे वाटले

२०११ ला मी मवाळ झालो कारण खुद्द ओबीसींनीच राममंदिरला दिलेला पाठिंबा ज्यांच्या जीवावर शैवांचे राजकारण उभे होते तेच फिरल्यामुळे आपल्या जहाल भूमिकेला काहीही अर्थ उरलेला नाही असे माझ्या लक्ष्यात आले

आणि काही महिन्यापूर्वी मी पाठिंबा दिला कारण माझ्या सर्वच मुस्लिम मित्रांनी मला सांगितले कि राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे एका मशिदीच्या बदली शांतता असे त्यांचे कारण होते जे मला पटले

माझ्या ह्या चारी अवस्थांवर कविता येत राहिल्या म्हणजे ऑक्टोबर १९८९(चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा  ) , वास्तू , रावण (ह्या दोन्ही स्त्रीवाहिनीत ) दंगा (कव्ही ) वैग्रे


आता राममंदिराचा शिलान्यास झाला आहे आमच्या पिढीचे तारुण्य ह्या प्रश्नात वाहून गेले कमावले काय तर एक मंदिर त्याने समाजात नेमका काय फरक पडतो हे आगामी काळात हळूहळू कळेल

श्रीधर तिळवे नाईक




धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम   श्रीधर तिळवे

आधुनिक युगात औद्योगिकता सेट झाल्यावर जे चमत्कार पूर्वी देव करायचे ते तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष करून दाखवायला सुरवात केली औद्योगिकता झेपणाऱ्या लोकांनी ईश्वर सोडला नाही खरा पण बर्ट्रांड रसेलने ह्या लोकांचे सगळे युक्तिवाद व्हाय आय एम नॉट ख्रिश्चन ह्या नावाचा एक ग्रंथ लिहून खोडून काढले गॉड इज डेड म्हणणाऱ्या फ्रेडरिक नित्शेने सुरु केलेल्या प्रतिसृष्टीय  नास्तिकवादाचे हे पुढचे पाऊल होते भारतीय संस्कृतीतील तिसऱ्या उपसंस्कृतीला म्हणजेच ज्युडायिक धर्मांना हा धक्का होता मात्र आपल्या आर्य शैव बांधवांच्याप्रमाणे त्यांनीही हा धक्का पचवला मात्र स्टॅलीन माओच्या आधुनिक राजवटीत झालेले अत्याचार पुढे आले आणि धर्ममुक्त राजवटी  किती नृशंस होऊ शकतात ते जगाला कळाले ह्यातून साम्यवादी धर्ममुक्त चळवळींना चांगलाच सेट बॅक बसला आणि संपूर्ण युरोप बॅकस्टेजवर गेला ह्यातूनच १९५० पासून धर्माची उत्तराधुनिक मांडणी सुरु झाली ह्याचा एक फायदा भारताला झाला आतापर्यंतचे ओरिएंटॅलिस्ट वैदिक ब्राम्हण व वैष्णव धर्मात अडकून होते साठोत्तरी ओरिएंटॅलिस्ट लोकांनी भारतातल्या स्थानिक धर्मांचा व पंथाचा अभ्यास सुरु केला ह्यातूनच वारकरी आणि खंडोबा ज्योतिबा ह्यांच्या अभ्यासाची प्रथा सुरु झाली व तिने मराठी साहित्याला देशी पाठबळ पुरवले 

ह्याला प्रतिक्रिया म्हणून मार्गी संस्कृतीत १९६० नंतर साहजिकच आजच्या काळातील मार्गी धर्माची मांडणी कशी करावी ह्या दिशेने मंथन  सुरु झाले अणि भारतात ओशो रजनीश हयांनी जगातल्या सर्व धार्मिक मार्गी परंपरा नव्याने मांडल्या प्राचीन मार्गी संहितामधून  आधुनिक संहिता निर्माण करण्याचा हा प्रयत्न मस्त होता नवीन पिढीला ह्या निमित्ताने आपल्या मार्गी परंपरेची नव्याने ओळख झाली साठोत्तरीच्या ऍडव्हान्स मार्गी धार्मिकतेचे प्रतीक म्हणजे ओशो रजनीश होय 

राजनीशांच्यामुळे अनेकांना जे कृष्णमूर्तींच्या आधुनिक  ज्ञानप्रधान मोक्षतेचे जे आकर्षणे होते ते  संपले वं ओशोंचा अराजकी  उत्तराधुनिक धर्म सेटल झाला भारतीय पुन्हा एकदा मोक्षाकडून मार्गी धर्माकडे सरकले हे परंपरेचे कमबॅक होते ह्याचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते साहित्यिकही कुलवृत्तांत हिंदू लिहू लागले आपण परंपरेत लिहितो ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट बनली आणि चौथ्या नवतेच्या क्रांतिकारकांचा ९० टक्के वेळ परंपरेशी झगडण्यात जाऊ लागला

अस्तित्ववादाचे दोन जनक होते एक होता किर्केगार्द जो ईश्वर तर्कशुद्ध नसल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणत होता तर दुसरा नित्शे गॉड इज डेड म्हणत होता भारतीयांनी किर्केगार्द निवडला त्यामुळे इल्लोजिकल विचार करणाऱ्या ब्राम्हणांच्या झुंडशाहीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पुरोगामी ब्राम्हण आदर गमावू लागले घरात होणाऱ्या कर्मकांडांना गोतावळ्यात  प्रसिद्धी मिळायला लागली १२ व्या शतकातला बंगाली वैश्यांचा सत्यनारायण आपली पूजा भारतभरातल्या सर्व आणि अर्थात मराठी ऑफिसेसमध्येही मिरवू लागला भक्तिवेदांत मुंबईकर बनला


हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि ओशो रजनीशांच्या मृत्यूनंतरच भाजप पक्कड बसवू शकला कारण रजनीशांच्यामुळे परंपरा उत्तरआधुनिकतेकडे सरकत होती पण कर्मठ बनत न्हवती तिला पायबंद घातला तो अमेरिकेतल्या कर्मठ ख्रिश्चनांनी रजनीशपूरम हे एका पोस्टमॉडर्न सिटीचं स्वप्न होतं जे व्हॅटिकन सिटीनं उध्वस्त केलं कारण रजनीशांनी जिझसला मोक्ष मिळाला न्हवता किंबहुना त्याला तो माहीतच न्हवता असं स्पष्ट विधान केलं त्यांनी आतापर्यंत जिझसवर दिलेल्या व्याख्यानांच्या हे विरुद्ध होतं वास्तविक ज्युडायिक धर्माला मोक्ष ही संकल्पनाच माहित नाही तरीही आपल्याकडच्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने उगाच नसलेल्या गोष्टी सांगून सर्वधर्मसमभावाचा खोटा इतिहास रचला हा इतिहास भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक होता आणि काँग्रेसी अजेंड्याला साजेसा होता तो भारतभर पसरला

प्रत्यक्षात भारतात धर्म स्पष्टपणे  आर्य , शैव आणि ज्युडायिक अशा प्रकारात वाटले गेले होते ह्याशिवाय जमाती श्रद्धा होत्याच सर्वधर्मसमभावाला धर्म सम लागतात युरोपमध्ये शैव वा  आर्य नसल्याने तिथे असे सम होते  भारतातही प्राचीन काळात असे सम होते कारण विषम आले न्हवते विषम आले जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला ह्या मुस्लिम व  ज्युडायिक राजवटीत ज्युडाइक धर्मांनी धर्मांतर घडवून आपली लोकसंख्या आर्य व शैवांच्या इकवल केली त्यामुळे सर्वधर्मसमभाव हलायला लागला त्याला पर्याय म्हणून धार्मिक सहिष्णुतेचा उद्घोष सुरु झाला अकबर शिवाजी हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक बनले


दुर्देवाने औरंगजेबाच्या कारकिर्दीत धर्मसहिष्णुता पूर्ण हलली आणि पुढे उत्तरपेशवाईत ती रसातळाला गेली

आज अवस्था अशी आहे कि  सर्वधर्म सम हा पोकळपणा आहे आर्य सूर धर्म वर्ण जात मानतात अलीकडे विदेशी सर्व्हेत एन आर आय लोकांच्यातही वर्णजातिव्यवस्था अजूनही पाळली जात असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत हे खरे असतील तर मग शिकून आपल्या धार्मिक धारणा बदलत नाहीत हा निष्कर्ष घट्ट होईल शैव असुर आर्य ज्युडायिक वर्णजातिव्यवस्था मानत नाहीत पण अलीकडे त्यांनाही ही बाधा झालेली दिसते लिंगायत धर्मात वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे पण सुदैवाने अजूनही पुरोगामीपणा सम्पलेला नाही ब्राम्हण वैष्णव हिंदू व शैव बौद्ध ह्यांना समान मानणं म्हणजे गोळवलकर आणि आंबेडकर ह्यांना समान मानणं आहे आर्य आणि शैव मोक्ष मानतात ज्युडायिक मानत नाहीत मग हे धर्म समान होणार कसे ?

वस्तुस्थिती अशी आहे कि जगात सर्वधर्मविषमभावच जास्त आहे आणि सामान्य माणसाला तो कळतो पण अंगभूत सहिष्णुतेकडे सर्वांचा कल असल्याने लोक एकत्र नांदत असतात मुद्दा सर्वधर्मसहिष्णुतेचा असतो  सर्वधर्मसमभावाचा न्हवे अकबर रणजित शिवाजी हे सर्वधर्मसहिष्णुवादी होते पण बाकीचे न्हवते आणि बाकीचे ९९ टक्के आहेत ह्यातील अकबराची जी दुर्दशा मौलवींनी केली ती इस्लामविषयी जास्त बोलते शेवटी अकबर नास्तिक झाला म्हणून त्याला मरण्यासाठी कैदेत टाकले आणि तो नास्तिक म्हणूनच कैदखान्यात मेला ह्याउलट धर्मसहिष्णुवादी राजवट शिवाजीनंतर संभाजीने आणि पहिल्या बाजीरावापर्यत टिकली होती बाजीराव मस्तानी विवाहाने सर्व समीकरणे फिरवली वास्तविक मस्तानी आणि तिचा मुलगा ह्यांचे धर्मांतर घडवून हा प्रश्न सहज सोडवता आला असता पण हिंदू ब्राम्हणधर्मात धर्मांतराची प्रथा नसल्याने हे घडू शकले नाही कुणाला आपल्या धर्मात घ्यायचे नाही आणि कुणी गेला तर त्याला आत घ्यायचे नाही ही हिंदू ब्राम्हणांची  मानसिकता आहे शैवांनी नेहमीच ह्याला कडकडून विरोध केला आहे म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजवटीत नेताजी पालकरचे पुन्हा शैविकरण होऊ शकते जे धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले तेच धाडस पहिल्या बाजीरावाने दाखवायला हवे होते त्याने इतिहास बदलला असता पण पहिल्या बाजीरावाने धाडस दाखवले नाही आणि इतिहास उलटा फिरला मनुस्मृती आणि धर्मशास्त्र राज्यकारभारात घुसले

अनेक लोक अध्यात्मिकतेची ग्वाही देता असतात पण अध्यात्मिकता ही धर्मापेक्षा उंच गोष्ट आहे तिथे सर्वच एका ईश्वराची लेकरे होतात पण धर्मात प्रत्येकाचा ईश्वर वेगळा म्हणून तर त्यांना देव आणि देवता  म्हणतात गॉड आणि गॉडेसेस कुणाचा एक कुणाचा अनेक ईश्वर सर्व देवदेवतांचा अंत आहे आणि मोक्ष ईश्वराचा अंत आहे त्या पातळीवरून राज्यशासन चालवायला सर्वानांच मोक्षकुं आणि मुमुक्षु बनवावं लागतं आणि ही दुर्मिळ परिस्थिती असते दारू पिणारे लोकसुद्धा सोमेलिअर परीक्षा पास झाल्यावरच तज्ज्ञ मानतात पण धर्माची गोष्ट आली कि सर्वच तज्ञ हिंदू लोक तर कुठल्याही गोष्टीच अधःपतन घडवण्यात वाकबगार अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा श्रद्धेय होतात आणि विठ्ठलाला जातात

ईश्वराला सुद्धा ह्यांनी देवळात बंदिस्त केला जो  मूळ अर्थाने विश्वाचा प्राण होता हिंदूंना धार्मिक बनायचं नसत म्हणून ते अध्यात्मिक व सिद्ध बुद्ध लोकांची पूजा करत बसतात शंकर महावीर बुद्ध ह्यांची एकदा पूजा सुरु केली त्यांना देव बनवलं कि मग त्यांनी सांगितलेले यमनियम किंवा पंचव्रते किंवा पंचशील पाळायची गरजच भासत नाही आपण अशाच लोकांच्यात वावरत असतो आणि  अशा लोकांच्यासाठी धर्ममुक्तता अशक्यच बनत जाते आणि म्हणून धर्मनिरपेक्षता फळफळते 

साधना करू न इच्छिणाऱ्या लोकांच्या समूहाचीही धर्मनिरपेक्षता गरज बनते मी माझी प्रॉपर्टी सांभाळतो तू तुझी प्रॉपर्टी सांभाळ असाच हा करार असतो आणि प्रॉपर्टी रिलिजियस असते


श्रीधर तिळवे नाईक












Monday, 23 September 2019

फ़िल्मका स्क्रिप्ट श्रीधर तिलवे नाइक 
सीन नो ओने

प्लेस  : रास्ता     रस्तेका घर कश्मीर                                                                            समय सुबह ९
कैरक्टर्स किरदार : लड़की टीव्ही न्यूज रीडर

(एक लड़की रस्ते पे खड़ी   है कश्मीर का रास्ता 
हम देखते है लड़की टेलीविजन देख रही है  न्यूज रीडर न्यूज पढ़ रही हैं


                                                                    न्यूज़ रीडर  :

कश्मीर में नरेंद्र मोदी और अमित शाह ने  जो फैसला किया है उस  फैसलेसे  कहा जाता है की कुछ आतकवादी संघठन सख्त नाराज है  खबर ये भी  है लशकर ए इस्लामके कुछ आतंकवादी कश्मीरमें  दाखिल हो चुके है 
कश्मीर का क्या होगा  अब कोई नहीं जनता
कट टू



या तो हमें पाकिस्तान निगलेगा याइनदिअ अगर इन दोनों  ने नहीं निगला तो छनि निगलेगा

कट टू

सिन २

समय :९,२५                                                                                                         प्लेस  :हीरोइन का घर /
किरदार :

लड़की अपने घर का ताला खोलती  है कही से खूंखार आतंकवादी घर में एंट्री  करते है
           
                                                               फिरोज मुख्य आतंकवादी
                                               (लड़की के कनपट्टी पर गन  रखकर  : )

खामोश आवाज नहीं चाहिए वर्ना हमेशा -हमेशा के लिए खामोश कर दूँगा

लड़की डर जाती है  टेरेरिस्ट गन निकलते है लड़की चुपके से कोड नंबर  डायल करती है
तीन  आर्मी के जवान घुसते  है और आतंकवादियोंका खात्मा करते है इन  जवानो में एक फिल्म का हीरो भी है

                                                                              हीरो
अच्छा है कश्मीर में कोई इंडियन  भी है

                                                                               लड़की 
बाकि सब क्या पाकिस्तानी है  ?

                                                                            हीरो 
यहाँ तो पता ही नहीं चलता कौन इंडियन  है और कौन पाकिस्तानी हैं

                                                                                लड़की
हम तो  कश्मीरीही रहना  चाहते थे

                                                                                 हीरो

तो फिर हमें क्यों बुलाया ?

                                                                               लड़की

जब आसपास सारे  चॉइस बुरे हो तो सबसे कम  बुरे को चुनना परता
सीन नो ४ कश्मीर मार्किट समय सुबह दस बजे  हीरोइन एप्पल खरीद रही है अचानक पिचि पलट कर देखती है आतंकवादी है उह उस





सीन नंबर  ५



प्लेस :कश्मीर की सुनशान जगह शायद जंगल                                                                 समय १० : २० मि

किरदार लड़की हीरो आंतकवादी नंबर ७

लड़की  चकमा देती एक ऐसी जगह छुप  जाती है जहाँ घनेरा जंगल हैं ऊपर देखती हैं  तो सांप  है अचानक एक हात आता   है  हात हीरो का है सांप निकालके फेंक देता है |

लड़की को शूट करे   इससे पहले हीरो आतंकवादी को शूट करता है |  अचानक हीरो को रोने की आवाज सुनाई देती है वो  पिछे  मुड़  कर देखता  है वो  रो रही है उसका बुरखा उड़ चुका हैं  |

हीरोको फ्लैशबैक याद आता हैं और पता चलता हैं की साँप निकालते समय साथसाथ बुर्खाभी उदा उड़ा दिया था
                                                        हीरो  :
ऐसा कौन सा  पहाड़ टुटा है जो रो रही हो

                                                   हीरोइन :
मैंने सोचा था अपने शोहरकोही अपनी सूरत दिखाउंगी और तुम तो हमारे मजहबकेभी नहीं हो
(रोते हुए  निकल जाती है )

ये उसे तकता रहता हैं

सॉंग नंबर  १

तेरा रहता हैं इंतजार माशा अल्लाह
मुझे हो गया है  प्यार माशाअल्लाह

तुम मिलोगी  न मिलोगी
ये तय है प्यार हो  गया
दिल जो जीने की वजह है
अब वो तुम्हारा हो गया

तू इंकार कर या इकरार माशाअल्लाह
मुझे हो गया है  प्यार माशाअल्लाह
मुझे हो गया है  प्यार माशाअल्लाह

मैंने छुआ भी नहीं तूने टच किया
मेरे  खामोशी  को  खामोश किया
जो बंदा रहता था हमेशा परेशां
उसे  हमेशाकेलिए मदहोश किया

दिल फूल बने या हो तारतार माशाअल्लाह
मुझे हो गया है  प्यार माशाअल्लाह

































करता है 

Sunday, 26 May 2019

एक्स्टर्नल रिलेशनशिप : गो मां पवार श्रीधर तिळवे नाईक

गो मा पवारांचं काय करायचं हा प्रश्न मला कधीच सुटला नाही आणि बहुधा त्यांनाही माझं काय करायचं हे कळलं नसावं . गो मांचे नाव मी प्रथम ऐकले ते पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी साहित्य प्रेरणा  आणि स्वरूप ह्या चर्चासत्राच्या निमित्ताने ! ह्या चर्चासत्राचे पडसाद त्यावेळी कोल्हापुरातील डाव्या चळवळीत फारच उमटले होते नेमाडेंचा संरक्षक तट ही उपाधी त्यावेळी चंद्रशेखर जहागीरदार व गो मा पवार ह्यांना मिळाली होती

पुढे माझा थेट संबंध आला तो विलास कांबळे आणि राजकुमार यादव ह्या दोन मित्रांच्यामुळे ! मात्र प्रत्यक्षात माझे बोलणे जास्त झाले नाही राजकुमार यादव मला कुठेही न्हेताना "तोंड उचकटणार नसशील तर ये " ह्या अटीवर न्ह्यायचा . त्याकाळात वयाचा जोश जास्त असल्यानं आडवं जाण्याची वृत्ती भरपूर होती वादविवादात खेचायचं आणि युक्तिवादात फसवायचं अशी माझी त्यावेळची स्ट्रॅटेजी असायची आणि त्यात सत्याचा शोध कमी आणि बुद्धीचा अहंकारच जास्त होता तारुण्याचा मूर्खपणा असं आता त्याला म्हणता येईल त्यामुळे पहिल्या मीटिंगमध्ये मी खालमुंडी पाताळधुंडी करत बसून राहिलो . पहिल्या भेटीत मला जर काय आवडलं असेल तर सरांचे शुभ्र हसू . दात मोठे असूनही ते त्यांना इतके शोभत होते कि गोमा म्हणजे त्यांचे ते हसू अशी प्रतिमाच माझ्या डोक्यात बसली होती

पुढे आम्ही विद्यापीठात एक महाकाव्यवाचन ठेवले तेव्हा त्याला त्यांनी पाठिंबाच दिला कोल्हापूर सांगली सातारा आणि सोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाचा कवी कविता वाचून गेला पाहिजे हा आमचा अट्टाहास होता महाराष्ट्रातला त्यावेळचा हा सर्वात मोठा काव्यवाचन सोहळा होता आणि राजकुमार यादवने तो यशस्वीपणे राबून दाखवला होता त्यातूनच पुढे विलासकुमार कांबळेने प्रतिनिधी नावाचा एक काव्यसंग्रह काढला आणि गोमांनी तेव्हा चांगलाच पाठिंबा दिला होता . ह्या इव्हेंटमुळे शिवाजी विद्यापीठाचे कँटीन ह्या एका नव्या अड्ड्याची भर पडली आणि कँटीन जवळचा  बसस्टॉप हा पोरींना भेटण्याचा स्पॉट ! शिवाजी विद्यापीठाचे कुरण ही प्रेमीजनांच्या कामशास्त्राची त्यावेळी आद्यशाळा होती आणि अर्थातच ती रात्रीची शाळा होती

बीए झाल्यावर काय करायचे हा प्रश्न होता त्यावेळी फ्यूचरॉलॉजी ह्या विषयात मला रस होता आणि विद्यापीठात हा विषयच न्हवता त्यामुळं मी भविष्याकडून थेट भूतकाळात वळल्याने इतिहासाचा ग्रँज्युएट झालो होतो माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयातले सर्व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले होते आणि पुढे काय करायचे ह्या विचाराने भांबावलेला होतो गोमांनी  इतिहासातच पोस्ट ग्रॅज्युएट होण्याचा अत्यंत व्यवहारी सल्ला दिला सगळे देशीवादी प्राध्यापक हे अकादमीक बाबत अत्यंत प्रॅक्टिकल असतात ह्या माझ्या निष्कर्षांची सुरवात गोमांच्यापासून झाली जे जे व्यवहारी ते ते न करण्याचा माझा स्वभाव आणि फ्यूचरॉलॉजीत काय करता येईल ह्याचा अंदाज घेणे आणि तत्सम अनेक कारणे ह्यात मी एक वर्ष बरबाद केले त्यामुळे मी जेव्हा वर्षभराने पुन्हा गोमांच्याकडे गेलो तेव्हा ते चांगलेच भडकले मी माझं टॅलेंट वाया घालवतोय असं त्यांना वाटत होतं

ह्या काळात मी ठामपणे देशीवादाच्या विरुद्ध उभा रहायला लागलो होतो आणि ते त्यामुळे मला बघून खुश होण्याऐवजी अस्वस्थच जास्त व्हायला लागले गावातून आलेल्या सर्वांनी देशीवादी असलंच पाहिजे अशी त्यांची धारणा होती कि काय न कळे ! पुढे नेमाडेंनीही तोच राग आलापला होता . त्याकाळात मी वैयक्तिक आयुष्याबाबत कमालीची गुप्तता पाळत असे मी गोव्यातून आलोय ही गोष्टही कोल्हापूरकरांना मी कधी सांगायचो नाही माझ्या मित्रांनाही मी काही सांगायचो नाही कारण ह्या गोष्टींची काही गरज आहे असं मला वाटत नसे ज्या त्या माणसाशी ज्या त्या गोष्टीबाबत बोलावे हा माझा दंडक होता आणि आजही तो बऱ्यापैकी टिकून आहे साहित्यातल्या लोकांशी साहित्याबाबत शैव साधना करणाऱ्यांशी शैव साहित्याबाबत आणि अंडरवर्ल्डवाल्यांशी अंडरवल्डबाबत  ! गोमांशी माझे बोलणे हे प्रामुख्याने त्यावेळी मराठी डिपार्टमेंट आणि साहित्य ह्या सन्दर्भातच असे . त्यांचे व्यंकटेश माडगूळकर प्रेम माझ्यासाठी अनाकलनीय होते ह्याचकाळात त्यांचे लक्ष्य महर्षी शिंद्यांच्याकडे गेले आणि माझ्या मते गोमांचे खरे योगदान ह्या संदर्भात आहे मराठीत महर्षी शिंद्यांना जर कुणी यथोचित न्याय दिला असेल तर तो गोमांनी दिला . बसवेश्वर - फुले - शिंदे -शाहू  -गांधी - आंबेडकर हे अस्पृश्यतेविरोधी लढ्याचे षडायतंन  आहे असे मी मानतो त्यातील शिंदेच्या कार्याला यथोचित न्याय गोमांनी दिला
मुख्य म्हणजे गांधींच्यावर शिंदेंच्या पडलेल्या प्रभावाचे यथोचित मूल्यमापन त्यांनी केले

फ्यूचरॉलॉजीच्या अभ्यासाच्या कसल्याही शक्यता भारतात नाहीत हे कळल्यावर मी मुकाट्याने मराठी विषयात एमए करायचे निश्चित केले आणि पुन्हा गोमांना भेटलो गोमांचा एकच प्रश्न होता "तुला पुढे प्राध्यापकी करायची आहे काय ? बीएला एक विषय आणि एमेला एक विषय करशील तर तुला प्राध्यापकाची नोकरी मिळणार नाही तेव्हा नीट विचार कर " त्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य नीट न कळल्याने एका सणकीपणात मी मराठीत एमए करायचे निश्चित केले त्यांनी मला ऍडमिशन घ्यायला सांगितले मी घेतले नाही

पुढे आणखी एक वर्ष साधना कायम ठेवत टिवल्याबावल्या करून मी त्यांना भेटलो आणि सांगितले कि मी एम ए करणार आहे तर ते तर्काटलेच
 " हेच करायचं होत तर आणखी एक वर्ष का बरबाद केलंस "
मी म्हणालो " एक वर्ष मी वाचवेन "
"कसं "
" मी आठ पेपर द्यायचे म्हणतोय "
त्यांना हा शॉक होता
" तू डिपार्टमेन्टमधून चार पेपर द्यावेस उगाच अतिआत्मविश्वासात काहीही निर्णय घेऊ नकोस "
" जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे "
" बाहेरून आठ पेपर्स "
"हो "
" एकही लेक्चर न ऐकता "
" हो काय फरक पडतो "
" तू एक क्रॅक माणूस आहेस हे ऐकून होतो आता खात्री पटली " त्यांच्या आवाजात विषाद आणि उदासी होती . त्यांना खात्रीच होती कि मी अकादमीक आत्महत्या करतोय
" ठीक आहे " त्यांनी उडवलेले खांदे दीर्घकाळ माझ्या लक्ष्यात राहिले त्यांना माझी काळजी वाटत होती इतिहासाचे पेपर मी केवळ लिहायचा कंटाळा आला म्हणून सोडले अशी त्यावेळी अफवा होती जी चुकीची होती पण त्यांच्यापर्यंत पोहचली होती त्यामुळेही मी मराठीवेळी असं काही पुन्हा करेन अशी भीतीही त्यांना वाटत होती

मग त्यांनी मला क्लार्ककडं पाठवलं मला आता असं वाटतं कि माझं त्यावेळचं वागणं अत्यंत रुड होतं हा कठोरपणा साधनेतून ड्राय झाल्यामुळं आला होता काय ?

पुढे मी आठ पेपर दिले आणि त्यातून एक भलतंच त्रांगडं उदभवलं ते खरं कि खोटं हे मला विद्यापीठानं कधीही सांगितलं नाही हे त्रांगडं युनिवर्सिटी टॉपरचं होतं मी एकाच वर्षी आठ पेपर देऊन तेही बाहेरून कदाचित सर्वाधिक गुण प्राप्त केले असावेत गोमांनी मला बोलावून हे सांगितलं कि असं काहीतरी घडलं आहे पण तुला खरोखरच जास्त मार्क्स आहेत कि नाहीत हे कन्फर्म करतो पण यदाकदाचित हे सत्य असेल तर तू बाहेरून बसल्याने तुला गोल्ड मेडल मिळणार नाही मी म्हणालो ह्याने मला मुळात फरकच पडत नाही ते म्हणाले तुला कशानेच काही फरक पडत नाही पण कल्पना द्यावी म्हणून सांगतोय .

नंतर संजय सुतारनं मला सांगितलं कि त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत तर विलास कांबळेनं मला सांगितलं कि तुला प्रत्यक्षात एक गुण ज्यादा आहे मी ह्यानंतर चौकशीच्या भानगडीत पडलोच नाही अगदी आजतागायत !

पुढे मला फेलोशिप मिळून मी मुंबईत आलो तेव्हा मात्र गोमा आनंदित झाले मी सरोजिनी वैद्यांच्या हाती सुरक्षित आहे ह्याची ग्वाही त्यांनी दिली

पुढे गोमा मला भेटले ते मला पुरस्कार भेटला तेव्हा ! मी पुरस्कार कसा काय स्वीकारला हा त्यांचा प्रश्न होता तेव्हा मी त्यांना म्हणालो कि आयुष्यात एक सरकारी एक खाजगी पुरस्कार स्वीकारून काय वाटतं ते मला बघायचं होतं एका भारतीयला राज्य मिळाला तेव्हा सरकारी मिळाला तेव्हा काय वाटते ते बघितले आणि आता हा खाजगी ह्यानंतर मी पुरस्कार स्वीकारणार नाही माझ्या ह्या उत्तराने त्यांना नेमकं काय वाटले ते कळालं नाही पुरस्कार घेतांना मी केलेलं भाषण लोकांनी पाच मिन्टही ऐकून घेतलं नाही मराठी साहित्याप्रमाणे पुढे कसे राजकीय पक्ष तयार झाले ह्याची थेरी मी मांडत होतो तर ऑडियन्समधून भाषण थांबवाचे नारे सुरु झाले मी भाषण थांबवलं पुढे तेंडुलकरांनी प्रेक्षकांना नवीन लेखक काय म्हणतो हे तुम्ही ऐकायला हवं होतं वैग्रे उपदेश केला

मी सभारंभानंतर गोमांना भेटलो ते आता थकायला लागलेत असं वाटलं त्यांना मी जे बोललो ते अजिबातच आवडले न्हवते मात्र खडे बोल त्यांनी ऐकवले नाहीत

मी पाहिलेले ते शेवटचे गोमा होते महर्षी शिंदेंवरचे काम पूर्ण करूनच मी मरेन असे ते तेव्हा म्हणाले होते त्यांच्या डोक्यात शिंद्यांच्याविषयी बरेच काही होते ते सगळंच पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही मराठी विनोदाला सैद्धांतिक बैठक देण्याचा त्यांचा प्रयत्न असाधारण होता मात्र जीवनातून सहज आलेला विनोद हाच खरा विनोद जसा कोसलातला विनोद त्याउलट विनोदासाठी आलेला विनोद मात्र ते दुय्यम मानत ह्यातला विरोधाभास स्पष्ट होता जर त्यांचा सिद्धांत स्वीकारला तर विनोद हा स्वतंत्र व स्वायत्त वाङ्मयप्रकार म्हणून अधोरेखित होत न्हवता प्रत्यक्षात हास्यात्मिका अस्तित्वात होती व आहे फार्स होता व आहे

गोमा कसे शिकवायचे हे मला माहित नाही कारण त्यांच्या आयुष्यात मी आणि माझ्या आयुष्यात ते कायमच एक्स्टर्नल राहिले डिपार्टमेंट एक पण अस्तित्व एक्स्टर्नल  ! हा एक्सटर्नलनेस आता कायमचा सम्पला .

श्रीधर तिळवे नाईक












Sunday, 12 August 2018

दिलीप चित्रे गेले तेव्हा


                                   दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला दुःखद फीलिंगही होते . 


                                       आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे  तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता  संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता. मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा एकत्र आग्रह धरा किंवा देशीवादावर टीका करून मराठी ही जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे हे स्वीकारा चित्रे हे ह्यातील काहीही करत नव्हते, त्यांना मराठी संस्कृतीचे इंग्रजी प्रवर्तक व्हायचे होते आणि इंग्रजी संस्कृतीचे मराठी प्रवर्तक 
( ब्रिटिश नव्हे ) भारतीय माणसाच्या दुभंगलेपणाचे ते टिपिकल उदाहरण होते इंग्रजीतून ते भारतीय संस्कृतीच्या  मार्गी धारेला समृद्ध करत होते  तर मराठीतून ते मराठीपणा , मराठीच्या मराठी ओळखी ( marathi identity ) चा शोध घेत होते

                                       १८०० ते १९४७ ह्या कालखंडात युरोपियन लोकांनी भारतीय संस्कृती अनेक जागी पंक्चर केली आणि १८०० ते १९४७ साली सारे भारतीय विचारवंत भारताचे स्वातंत्र्य , भारताची भारत म्हणून ओळख भारत नावाच्या राष्ट्राची शक्यता ह्या राष्ट्राच्या नवनिर्माणाचा आराखडा ह्यासारख्या अनेक विचारप्रणालीनिष्ठ संदर्भात झोकून देऊन काम करू लागले . परलोकावरची भारतीय नजर हटवून इहलोकनिष्ठ विचारप्रणालीचा पाया ह्या काळातच घातला गेला ह्या काळातील भारतीय अध्यात्मही परलोकाला प्राधान्य देणारे नव्हते ह्या सगळ्या गोष्टींचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते. त्यातून साहित्यात धर्माच्या दादागिरीला विरोध करून नव्या अध्यात्माचा पुरस्कार करणारा नवा  अध्यात्मवाद , विज्ञानाला प्रमाण मानणारा सौदर्यवाद , नुसत्या वास्तवाची मांडणी करून काय होणार हे वास्तव बदलले पाहिजे आणि भाषिक कृतीने ह्या बदलाच्या प्रकियेला हातभार लावला पाहिजे असं मानणारा परिवर्तनवाद असे चार प्रवाह उदयाला आले दिलीप चित्रे ह्यांची जडणघडण ह्या चार प्रवाहात झाली मात्र ह्या चारही प्रवाहांशी त्यांचे तितकेसे कलावंत म्हणून पटले नाही सृष्टीयतेचा बुद्धीवाद हा हळूहळू यांत्रिकी होत गेला आणि १८५० नंतर जे नवे विज्ञान व तंत्रज्ञान जन्माला आले त्याने  ह्या पारंपरिक विज्ञानाला आव्हान द्यायला सुरुवात केली हळूहळू विज्ञानाचे महत्व कमी होऊन तंत्रज्ञानाची वाढ व्हायला लागली प्रतिसृष्टीचा प्रचंड पसारा सर्वत्र अवतरायला लागला आणि  क्रयवस्तूंचे प्रचंड ढिगारे मानवी अस्तित्वावर आदळायला लागले क्रयवस्तूचे  नवे संरचन शोधणारे संशोधक नव्या नव्या क्रयवस्तू शोधायला लागले आणि ह्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेऊन नव्या नव्या कलावस्तू जन्माला घालणारे कलावंतही कळत नकळत वाढू लागले कला ही प्रथमच इंडस्ट्री बनली तर कलावस्तू ही प्रॉडक्ट बनली कमोडिटी बनली पहिली कमोडिटीचे संशोधक हे स्वतःचे आयुष्य पणाला लावून निर्मिती करत होते त्यांची पॅशन अजोड होती त्यातील एडिसनसारखे संशोधक तर फिनॉमिना होते साहित्यात ह्याच जातकुळीचे काही लेखक व चित्रकार झाले
चित्रे हे ह्या जातकुळीतील देशी अस्तित्ववादी लेखक होते जरी त्यांची सुरवात युरोपियन अस्तित्ववादापासून झाली होती मात्र कोसलानंतर नेमाडेंनी जशी आधुनिकतेकडे पाठ फिरवली तशी त्यांनी पाठ फिरवली नाही ते आणि अरुण कोलटकर ह्यांनी नेमाडे ह्यांचा कट्टर देशीवाद आणि सत्यकथेचा आधुनिकवाद ह्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतःच्या अस्तित्ववादी आशयाने आणि अतिवास्तववादी अभिव्यक्तीने व्यवस्थित पेलला एका अर्थाने हा मराठी आधुनिकतेचा शोध होता आणि चित्रे मी हा शोध करावा म्हणून माझ्याकडे सातत्याने आग्रह धरून होते माझे म्हणणे असे होते कि हे मिशन देशीवाद्यांचे आहे आणि त्यांनीच ते पूर्ण केले पाहिजे माझा आग्रह चौथ्या नवतेचा आहे आणि तो आजन्म राहणार ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि साहित्य हे काही गणिती  हिशेबाने बदलत नाही
ह्यावर माझे म्हणणे असे होते कि साहित्यातला प्रत्येक हिशेब हा नवतेने सुरु होतो मग हा हिशेब गणिती असो वा नसो . माझा दुसरा प्रश्न  असा होता  कि देशी आधुनिकतेचा शोध शब्दवेधची मंडळी घेतायत सौष्ठव  वा अभिधा ह्यांनी  हे काम का करावे  पुढे अभिधाने आपली भूमिका बदलली आणि शब्दवेध प्रमाणेच सर्वसमावेशक म्हणजेच सर्वांनाच सामावून घेण्याची भूमिका घेतली जी चित्र्यांच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत होती आणि पुढे सौष्ठवची क्रांतिकारी भूमिका ही मागे पडत गेली आणि काळाने आणि मराठी संस्कृतीने लोकप्रियतेची आणि मान्यतेची मोहर ही शब्दवेध आणि अभिधानानंतर ह्यांच्यावर उमटवून चित्रे हे माझ्यापेक्षा द्रष्टे होते व मी हटवादी आणि  हेकेखोर असल्याचे सिद्ध केले चित्रे ज्या निष्ठेने अभिधानंतरच्या मागे उभे राहिले ते नक्कीच काबिलेतारीफ होते पुढे दोनहजारोत्तर पिढी शब्धवेध , खेळ आणि  अभिधानंतरच्या वळचणीला जाऊन उभी राहिली आणि मी च्यू असल्याचे सिद्ध झाले  हा चित्र्यांचा मोठाच विजय होता अर्थात तरीही मी माझा आग्रह सोडला न्हवता आणि नाहीये . माणसाने संपूर्ण जग वा संस्कृती जरी त्याच्या विरोधात गेले तरी स्वतःला पटलेली भूमिका सोडता कामा नये असे मला वाटते अशावेळी  एकट्याने स्वतःची पायवाट तुडवत जावे लागणे अटळ असते मी ती आजही तुडवतो आहेच

                   चित्र्यांचे साहित्य समजून कसे घ्यायचे हा एक विलक्षण कूटप्रश्न आहे मी टिकाहरण लिहिले तेव्हा दूधपिता बच्चा असलो तरी मी चित्र्यांच्याविषयी त्यात जे लिहिले होते ते चित्र्यांना चांगलेच झोंबले होते त्यांनी टीकाहरण वाचून चक्क रात्री फोन केला होता आणि माझी खरडपट्टी काढली होती वास्तविक त्यात काही चांगली निरीक्षणेही होती म्हणजे चित्रे हे मराठीतील बाईच्या शरीरात नाक खुपसणारे पहिले कवी आहेत वैग्रे पण मी केलेली टीकाच त्यांना जास्त झोंबली होती मी काही बदल करून मगच टीकाहरण प्रकाशित करावे असा त्यांचा सल्ला होता जो मी धुडकावला पुढे आणखी एका कवीने तेच सांगितले एकंदरच त्यामुळे वातावरण गढूळ होत गेले आणि पुस्तक पॉप्युलरकडून सतीश पाध्येंच्या शब्दवेल प्रकाशनाकडे द्यायची वेळ आली . अर्थात तरीही माझी चित्र्यांच्या कवितेविषयीची आस्था कमी झाली नाही . आणि चित्रेही "तू मराठी आधुनिकतेची नवी मांडणी करू शकतोस तू ती कर " हे सांगायचे थांबले नाहीत माझे स्वतःचे लक्ष्य कायमच चौथ्या नवतेकडे असल्याने चित्र्यांना होकार देणे मला शक्यच न्हवते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीकडे नीट पाहता येईल असे वाटते

                  मराठीच्या साहित्यशास्त्राची नवी ओळख निर्माण करायची असेल तर ज्ञानेश्वर , चक्रधर , नामदेव , एकनाथ ह्या चारही कवींच्या तंत्रशास्त्राची जडणघडण नीट तपासायला लागते ह्यातील ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे चित्र्यांचे फेव्हरेट होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे साहित्यशास्त्र हे ज्ञानेश्वरवादी होते ज्ञानेश्वर हे प्रज्ञा आणि भाव ह्यांचा समतोल साधत लिखाण करत कधी ज्ञानेश्वरीसारखे प्रज्ञालक्ष्यी तर कधी अभंगासारखे भावलक्ष्यी लिहीत ते प्रतीकांच्या भाषेत खूपदा बोलत आणि ही प्रतीके मोगरा , कावळा , चोळी अशी अत्यंत मराठी होती ज्ञानेश्वरी हे त्यांचे मोक्षापूर्वीचे लिखाण असल्याने त्यात परंपरेचे आदेश प्रमाण मानण्याची वृत्ती जास्त आहे तर अनुभवामृतमध्ये मोक्ष मिळाल्यानंतरचा शैववाद झळाळताना दिसतो अभंगात मात्र त्यांना विठाई ही स्थानिक देवता केंद्रीभूत करावीशी वाटली हे शैवीझमला धरूनच होते एका अर्थाने कृष्ण , शिव आणि विठ्ठल ही ट्रिनिटी त्यांनी वारकऱ्यांना दिली असे म्हणता येईल प्रत्यक्षात वारकऱ्यांनी शिव बाजूला काढून विठ्ठल कृष्णरुप  करून वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते पूर्णच हिंदू झाले ही हिंदू ओळख विठ्ठलामुळे एका अर्थाने मराठी ओळख बनत गेली

बा सि मर्ढेकरांनी ओवी हा फॉर्म इतका जबरदस्त रीतीने वापरला कि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरवादाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण झाले असे आपण म्हणू शकतो मात्र मर्ढेकरांचा ज्ञानेश्वरवाद अनुभवामृताकडे फारसा वळलाच नाही आणि त्यामुळे चित्र्यांना चांगलीच संधी प्राप्त झाली चित्रेंनी शक्तीवर खूप कविता लिहिल्या विंदा करंदीकरांनी अनुभवामृताचे केलेलं अर्वाचिनीकरण चित्र्यांच्या कवितेत चांगलेच फळले एका अर्थाने स्वतःच्या काव्यगुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा होती त्यांचे गद्य मात्र एका अर्थाने काश्मिरी शैवागमच्या परंपरेला गद्य रूप कसे द्यायचे ह्याचा वस्तुपाठ होता हे गद्य एका अर्थाने मराठीचे साहित्यिक शक्तीपीठ आहे दुर्देवाने त्याची ताकद भुक्कड मराठी समीक्षकांना ओळखता आली नाही हे शक्तीपीठ निर्माण करताना त्यांना जी अविष्कारवादी शैली सापडली तिचे मूळ फ़्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि जर्मन एक्सप्रेशनिस्ट ह्यांच्यात होते ज्याचा प्रभाव ओक्टोव्हिया पाझ वर पडला होता आणि पाझचा प्रभाव चित्र्यांच्यावर पडला .

नामदेव हा मराठीतील पहिला वास्तववादी वारकरी कवी होय भाव आणि वास्तव ह्याची त्याने घातलेली अप्रतिम सांगड नामदेववाद निर्माण करती झाली आणि ह्या नामदेववादाला तुकारामाच्या रूपाने महारूप सापडले कवीने त्याचे जगणे , त्या जगण्याची जीवनशैली , जगण्यासाठी तो करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायाची हत्यारे आणि त्या व्यवसायाची व्यवसायशैली स्वतःच्या कवितेत जशीच्या तशी उमटवावी ही नामदेवाची दीक्षा चित्र्यांना कळली तरी फारशी फळली नाही  ह्याचे कारण ते करत असलेले व्यवसाय तितकेशे ठाम न्हवते शिवाय चित्र्यांना वास्तववादाचे थोडेसे वावडे होते त्यामुळेच नामदेववादी असलेल्या संत तुकारामांचे ते कवी म्हणून अफाट कौतुक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या कवितेचा वास्तववादी पिंड त्यांनी आपल्या कवितेत जोपासला नाही ह्याबाबतीत ते अखेरपर्यंत ज्ञानेश्वरवादीच राहिले १९८० नंतर मात्र देशीवादी ग्रामीण कविंनी वास्तवनिष्ठ नामदेववाद आपल्या कवितेत अक्षरशः उत्सवासारखा साजरा केला

एकनाथवाद हा मराठीत कधीच आदराचा विषय न्हवता कारण एकनाथांची तंत्रता आणि प्रायोगिकता आत्मसात करून कविता लिहिणे हे अनेकांना कृत्रिम वाटते प्रत्यक्षात कविता पुढे जाते ती प्रायोगिकतेमुळे ! एकनाथवादाला जर तुकारामासारखा कोणी महारूप देणारा कवी लाभला असता तर कदाचित मराठींचे काव्यशास्त्र अधिक समृद्ध झाले असते मराठीला त्यामुळे एकनाथवादाची दीक्षा मिळायला विंदा करंदीकर उगवण्याची वाट बघायला लागली विंदांनी एकनाथवादाचे आधुनिकीकरण केले आणि प्रयोगधर्मी कविता लिहिली . एकनाथांची नावड असणाऱ्या लोकांनी  त्यामुळे एकनाथांची आणि नंतर करंदीकरांची टर उडवणे हे स्वाभाविक होते विशेषतः नेमाडे आणि कधीकधी चित्रेही ! पुढे  अरुण कोलटकरांनी एकनाथवाद किती अस्सल रूपात प्रयोगधर्मी होऊ शकतो ह्याचे अनेक अस्सल नमुने पेश केले हे एकनाथवादाचे केवळ पुनर्जीवन न्हवते तर नवा देह जन्माला घालणे होते आणि हा देह एकनाथांपेक्षा अधिक जिवंत आणि रसरशीत होता त्यामुळे नेमाड्यांनाही स्वतःचे करंदीकरांच्याविषयीचे मत काही प्रमाणात बदलून घ्यावे लागले विंदा करंदीकरांना आपला वारस अरुण कोलटकराच्या रूपात जिवंतपणीच सापडावा ह्याला काव्यभाग्यच म्हंटले पाहिजे

चक्रधरवाद स्वतःच्या मठात कैद झाल्याने अनेक शतके गायब झाला तरी नेमाडेंच्या रूपाने जेव्हा त्याला वारस सापडला तेव्हा तो सर्वाधिक झळाळला ह्याचे कारण त्याचे गद्यवैपुल्य ! चक्रधरवादाचे गद्यावरचे प्रेम मराठीत नेमाडेंच्या रूपाने फळले चित्र्यांच्या गद्यावर चक्रधरवादाचा काहीच फरक झाला नाही कारण मी गायब असलेला चक्रधरी वास्तववाद त्यांच्या मीधर्मीपणाला मानवणे शक्यच न्हवते

थोडक्यात काय चित्र्यांनी तुकारामाच्या नावाने कितीही गळा काढला तरी प्रत्यक्षात त्यांची कविता ही ज्ञानेश्वरवादीच राहिली आणि काही अपवादात्मक कवितांत त्यांनी एकनाथवादी प्रयोगधर्मीता प्रकट केली असली तरी कोलटकरांच्याप्रमाणे तो कधीच त्यांचा पिंड झाला नाही त्यांचे अभंगही ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांचा योग्य समतोल आहे 





 चित्रेंनी मराठी कवितेला काय दिले ?
१ मराठीच्या अध्यात्मिक परंपरा आधुनिकतेच्या संदर्भात कशा पेलायच्या हे त्यांनी शिकवले कोलटकरांचे अध्यात्म हे मला कधीही सखोल संवेदनशीलतेचे वाटलेले नाही फक्त त्यांचे रॅपर आकर्षक असल्याने ते ताबडतोब डोळ्यात भरते त्यातला ढोबळपणा सहजासहजी लक्ष्यात येत नाही चित्र्यांचे संवेदनांचे उत्सव आणि जल्लोष हे सर्व सूक्ष्म आंदोलनांना पेलत जातात कोलटकर बॉलीवूड संगीताप्रमाणे आहेत तर  चित्रे शास्त्रीय गायकाने एखादी बंदिश मांडत जावी तसे जातात कोलटकर फटाके फोडत जातात तर चित्रे दिवे लावत जातात चित्र्यांना प्रत्येक कोना आणि कोपरा उजळवून टाकायचा असतो कोलटकर फटाका फोडून क्षणभरासाठी अख्खी खोली उजळवून टाकतात आणि त्याचा परिणाम लगेच होतो







Friday, 10 August 2018

हेमंत दिवटे ह्यांनी घेतलेली श्रीधर तिळवे ह्यांची मुलाकात संवाद ६ दिवाळी २००६

                                                   १   ग्लोबलायझेशन  म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय ? त्याचे चांगले / वाईट परिणाम कोणते ? ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरु आहे असं काहींना वाटत तर मला १९९० च्या आसपास ही प्रक्रिया सुरु होऊन तिचा प्रभावही जाणवू लागला, असं वाटतं ? तुला काय वाटत ?

                         मानवी संस्कृतीत १९०० नंतर शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी अनेक शोध लावून नव्या नव्या चिन्हवस्तू ( semiodities ) तयार केल्या ह्या चिन्हवस्तूंचे उत्पादन जसे जसे वाढत गेले तसा तसा त्यांचा भोग वा आस्वाद वाढायला लागला , ग्रहण वाढू लागले ह्यातून चिन्हसृष्टीकरण  सुरु झाले सुरुवातीचा कालखंड हा काहीसा innovations चा संशोधनाचा होता पण १९७५ नंतर त्याचे उत्पादन व वितरण प्रचंड प्रमाणात वाढले . नवीन आलेला हा चिन्हसृष्टीकरणाचा प्रवाह काही द्रष्ट्यांनी राजकारण्यांनी आधीच ओळखला . १९५५ नंतर अनेक विचारवंतांनी त्याचे निरूपण करायला सुरुवात केली ह्यातूनच सत्तरीच्या दशकात चिन , ब्रिटन वगैरे देशांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला हे उदारीकरण सरकारकेंद्री व सरकारवलंबी होते . ब्रिटनमध्ये त्याला थॅचरिझम असे नाव मिळाले भारतात  संशोधनाचा पहिला टप्पा घडलाच नाही पण चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा १९८० नंतर सुरु झाला सिमेंटच्या उदारीकरणाच्या मारुती उद्योगाने टेलिकम्युनिकेशन क्रांतीने त्याची सुरुवात झाली १९८० ते ११९८७ हा तो पहिला टप्पा . ह्याला भारतातील विचारविनिमयाचा टप्पा म्हणता येईल . चिन्हसृष्टीकरण करायचे कि नाही ? उदारीकरण कसे करावे कि करूच नये ? सोवियत युनियनचा पाडाव होऊ झाल्यामुळे समाजवादाचे भवितव्य काय हे ह्या काळातले उग्र प्रश्न ! ह्याच काळात पंजाबमधला दहशतवादाचा प्रश्न अत्यंत व्यापक झाला आणि तो पंजाबी देशीयतेत उदयाला आला त्याला आसामी देशीयतेची साथ मिळाली महाराष्ट्रातही शिवसेना पसरायला सुरुवात झाली देशी चिन्हांचा अस्मिता म्हणून वापर हाही ह्याच काळाचा विशेष मार्गी गोष्टी का, कशी, कुठे , किती, कोणासाठी, आणायच्या हा ह्या काळातला कळीचा प्रश्न होता व प्रयोगही चालू  झाले होते .


                                                   चिन्हसृष्टीचा दूसरा टप्पा १९८८ पासून सुरु झाला खाजगीकरण हा ह्या काळातील मुख्य मुद्दा ह्या खाजगीकरणामुळे व आधीच्या उदारीकरणामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला शिरकाव मिळाला ह्याला मी चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा मानतो मंडल आयोग , इस्लामी दहशतवाद , राजजन्मभूमीचा प्रश्न हे देशीयतेतून निर्माण झालेले प्रवाह एकीकडे तर खाजगीकरण व उदारीकरणामुळे सुरु झालेले मार्गी प्रवाह दुसरीकडे १९८८ ते १९९५ - ९६ असा हा कालखंड होता . ह्याला आपण चिन्हसृष्टीकरण म्हणू. कारण ह्या काळात आपला प्रचंड भर आयातीवर होता . मार्गी गोष्टींचे देशीकरण घडवणे ह्या काळात चालू झाले

                           १९९६ पासून मात्र जागतिकीकरणाचा शिरकाव हा शिरकाव न राहता ती हळूहळू सार्वत्रिक वस्तुस्थिती बनायला लागली उदारीकरण ( liberalisation ) खाजगीकरण ( privatisation ) आणि जागतिकीकरण ( globalization ) ( LPG ) ही त्रयी सर्वच चर्चाच्या केंद्रस्थानी आली . जे देशी आहे ते टिकते कि नाही असा प्रश्न अनेकांना सतवायला लागला तर अनेक देशी कंपन्या बहुराष्ट्रीय होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या काही तर प्रचंड यशस्वी झाल्या ह्याला आपण मार्गी आणि देशी ह्यांच्या मिश्रणाचा कालखंड असल्याने मादे चिन्हसृष्टीकरण म्हणू . मादे चिन्हसृष्टीकरणाचा कालखंड अद्यापही चालू आहे . आता चिन्हसृष्टीकरणात आपण निर्यातही करायला लागलोय . आज अनेक देशी गोष्टी ग्लोबल होत जाताना दिसतायत . उदा. आपली साडी

                           जागतिकीकरण हे ह्या चिन्हसृष्टीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने प्रसरण ह्या प्रक्रियेचा समावेश होतो कुठल्याही देवघेवीत देणे आणि घेणे असते ही देवघेव एकतर प्रचंड सुकाळामुळे निर्माण होते किंवा टोकाच्या दुष्काळामुळे , म्हणजे तुमच्याकडे इतके उत्पादन होते कि ते तुम्हाला जगभर वाटण्यावाचून पर्याय उरत नाही. तुम्ही जी गोष्ट जगाला देऊ पाहता कधी प्रेमाने कधी मार्केटिंग करून तर कधी सक्तीने तर काही वेळा इतका दुष्काळ निर्माण होतो कि आसपासच्या परिसरातून तुम्हाला काहीच घेता येणे शक्य होत नाही अशा वेळी तुमची भूक प्रचंड तीव्र असेल तर तुम्ही घेण्यासाठी परिसर सोडून जगात  ती जिथे कुठे मिळते तिथे जाता किंवा ती आयात करता , कधी प्रेमाने मागता तर कधी दादागिरी करून तर कधी मेहनत करून कधी स्वतःचे मार्केटिंग करून ही जी देवघेव आहे ती जेव्हा जागतिक होते तेव्हा तिला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरणातला हा दुष्काळ वा  सुकाळ प्रत्येकवेळी नैसर्गिकच असेल असे नाही कधी कधी तो मानवी वा सामाजिकही असू शकतो अनेक स्थलांतरे ही दुष्काळातून होतात अनेकदा आयात करून  भूक भागवली जाते दुष्काळ मिटवला जातो तर निर्यात ही अनेकदा सुकाळातून निर्माण होते किंवा कशाच्या तरी बदल्यात ती केली जाते काही लोक इतके स्वभावतः अधाशी व भुकेले असतात कि त्यांना कुठेही दुष्काळच जाणवतो

                             अनेकदा राजकीय पक्षांना पैशांचा दुष्काळ जाणवल्याने त्यांनी तो दुष्काळ मिटवण्यासाठीही नको असलेली आयात केली आहे नको असलेले उदारीकरण वा खाजगीकरणही केले आहे अनेकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली अनावश्यक खाजगीकरणे आणि उदारीकरणेही केली गेली आहेत आणि कशालाही जागतिकीकरण म्हणून मान्यता देणाऱ्या अडाणी विचारवंतांनी जागतिकीकरण ह्या ब्रॅण्डला भुलून जाऊन ही अनावश्यक खाजगीकरणे व उदारीकरणेही आवाज न काढता स्वीकारली आहेत

                           उत्पादनाचा एकदा का दुष्काळ निर्माण झाला कि तो भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली जाते कारण दुष्काळाचा अर्थ उत्पादन कमी झाल्याने तोटा असा होतो अशा वेळी ग्राहक संख्या वाढणे व उत्पादन वाढणे हे कंपनी टिकण्यासाठी  आवश्यक असते त्यातूनच ती कंपनी खाजगी करावी ही मागणी येते किंवा ती खाजगी कंपनीला विकली जाते काही वेळा कंपन्या इतक्या कमी असतात कि नुसत्या खाजगीकरणाच्या काही होणार नसते मग त्या क्षेत्रात उदारीकरण आणून अनेक कंपन्या आणल्या जातात मग पुढे नुसत्या कंपन्या आणूनही भागत नाही त्यांची संख्या त्यांचे उत्पादन इतके कमी पडते कि बाहेरच्या कंपन्या , बाहेरचे भांडवल आणावे लागते आन मग त्यासाठी जागतिकीकरण अपरिहार्य असते पण जेव्हा देशी कंपन्यांना संधीही न देता थेट बाहेरच्या कंपन्यांना आणले जाते तेव्हा ते जागतिकीकरण विघातक जागतिकीकरण असते एनरॉन हे अशा विघातक जागतिकीकरणाचे उदहारण आहे जी संधी रिलायन्स व टाटांना आता दिलीय ती त्या वेळी दिली असती तर कदाचीत  विजेचा प्रश्न इतका चिघळला नसता पांढऱ्या कातडीला भुलून जाण्याची आपली सवय ही अनेकदा विघातक जागतिकीकरणाला आमंत्रण देते काही वेळा देशी कंपन्याच इतक्या बेजबाबदार आणि मुजोरड्या असतात कि त्यांना स्पर्धेचा फटका पडल्याशिवाय त्या सुधारत नाहीत अशा वेळी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून बाहेरच्या कंपन्या आणल्या जातात तेव्हा ते विधायक जागतिकीकरणच असते उदा , ऑटोमोबाईल इंडस्ट्री

                                जागतिकीकरण चांगले कि वाईट हे त्या त्या परिस्थितीच्या संदर्भ चौकटीत ठरत असते उदाहरणार्थ साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मितीसाठी दार्शनिकता व दर्शनता फार महत्वाची असते भारतात जिला चिन्हसृष्टीय दर्शनता म्हणावी अशी फारशी निर्माण झालेली नाही त्यामुळे संजीव खांडेकरांसारखा कवी जर फ्रेडरिक जेम्सन , कार्ल मार्क्स लाकान ह्यांच्यासारख्या पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या तत्वज्ञानातून काही आयात करून त्यांचा वापर स्वतःच्या कलानिर्मितीसाठी करत असेल तर आपण त्याला ते पूर्ण विघातक आहे असे म्हणून खोड काढू नये . पण त्याचबरोबर श्रीधर तिळवेसारखा एखादा गृहस्थ भारतीय दर्शनातील अनेक संकल्पनांची हवी तशी मोडतोड करून त्यातून भारतीय चिन्हसृष्टीय दर्शनता  निर्माण करत असेल तर तो केवळ भारतीय संज्ञा वापरतो म्हणून त्याला मागासलेला समजणे हेही शहरांढळेपणाचे
( गावंढळच्या विरोधी ) लक्षण होय . शक्यता अशीही असू शकते की ते पाश्च्यात्य दर्शन त्याला अत्यंत उथळ पोरकट आणि करिअरिस्ट वाटल्याने तो पुन्हा भारतीय दर्शनाकडे वळला असेल  

                              चिन्हसृष्टीकरण  ही  प्रतिसृष्टीकरण  व  त्यातून  आलेल्या औद्योगिकीकरणाइतकीच  अटळ  आणि  अपरिहार्य  गोष्ट  आहे  ते  खाजगीकरण ,  उदारीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातून  साकार  होते  आहे  हे  खरे  पण  प्रत्येक  वेळी  प्रत्येक  पैलू  अपरिहार्यच  असेल  असे  नाही  उदा.  सरकारने स्वतःला  खाजगी  कंपनी  समजून  सतत  प्रॉफिट  मेकिंगच्या  भूमिकेत  वावरणे  हे  विघातक  खाजगीकरणच  मानले पाहिजे  किंवा  खाजगी  उद्योग  हे  नेहमी  स्वर्गच  आणतील  ह्याही  भ्रमात  राहण्याचे  कारण  नाही .  ह्याबाबतीत  मार्गी ,  पोटी ,  देशी,  जमाती,  ह्याचे  समग्र  भान  राखून  सर्वांच्या  भल्याचे  काय  आहे   ते  पाहिले  पाहिजे .

                                          जागतिकीकरणाचा  एक  थेट  फायदा  म्हणजे  जगभरच्या   पर्यायांची उपलब्धता . पण  त्यामुळे  काही  चांगले  देशी  पर्याय  गहाळ  तर  होत  नाहीत  ना  हे  पण  पाहायला  हवे . मुक्तछंद , सुनीत,  मुक्त  सुनीत , चांगलीच ; पण  अभंग  ओवी  हे  देशी  म्हणून  वाईटच  ही  वृत्ती  वाईट  जगात  आपला  प्रदेशही  येतो  ह्याचेही  भान  आपण  बाळगावे .  जगाशी  चॅटिंग  करता  करता  स्वतःच्या  आईबापाशी  बायकोपोरांशी , शेजाऱ्यांशी  जर  धड  गप्पा  मारता  येत  नसतील  तर  त्याचा  अर्थ  जवळचे  वाचवण्यासाठी  आपल्याला  चष्मा  हवा  हाच  होतो  आणि  त्याचा  अधिक  मूलभूत  अर्थ  आपले  डोळे  खराब  झालेत  हाच  असतो .  १९९५  नंतर  जागतिकीकरण  हे  आपल्या  थेट (  विशेषतः  शहरात  )  घरात  घुसले  त्यामुळे  चिन्हसृष्टीकरणाचं  जागतिक  स्वरूप  आपल्या  तोंडावर  इतक्या  अवाढव्य प्रमाणात  आदळलं  कि  आपण  गडबडून  गेलो .

                                    विशेषतः  मध्यमवर्गाची  चौकोनी  कुटुंबाची  चौकोनी  कुटुंबमूल्ये  ही  नव्याने  आलेल्या  संपत्तीने   लालसेने,  उपभोगवादाने , बडेजाववादाने  पूर्ण  हादरली  आणि  त्यांनी  त्याच्या  प्रदर्शनाचा  उत्सवही मांडला  त्यामुळे  वाढदिवसाला  पंचारती  पुरेशी  होईना  ग्रीटिंग्ज  कार्डेही  लागू  लागली   संपत्ती  हे  पाप  न  होता  पुण्य  झाले  त्यामुळे  लोक  पुण्य  कमावण्याऐवजी  संपत्ती  कमावण्याच्या  मागे  लागले  ह्याकाळातील  मध्यमवर्गीय  मीडियाने  इतका  भरवला  गेला  कि  मीडिया  म्हणतो  तेच  खरे  असे  त्याला  वाटू  लागले  मग  मीडिया  म्हणाला  शीतयुद्ध  संपले  प्रत्यक्षात  शीतयुद्धात  अमेरिकेचा  शत्रू  बदलत होता  पण  चायना  ही  मीडियाच्या  दृष्टीने  क्षुल्लक  गोष्ट  असल्याने  त्याची  ताकदच  कळली  नव्हती  आज  सरळ  अमेरिका  विरुद्ध चायना  हे  युद्ध  आकार  घेत  आहे

                                      १९८०   नंतर  आलेल्या  सांस्कृतिक  उदारीकरणाने  आणि  १९८८  नंतर  आलेल्या  मंडल  आयोगाने  ब्राह्मण्यवादाला  चांगलेच  मोठे आव्हान  दिले  त्यातून  परिघाबाहेर  असलेल्या  अनेक  ओबीसी  जाती  प्रथमच  आपापली  ताकद  घेऊन  आल्या  त्यांनी  ह्या  देशातील  राजकारणाची  पारंपरिक सूत्रे  बदलून  टाकली  दुर्दैवाने  त्यातून  जातीयवादही  वाढला  बहुजनवाद  हा प्रथमच भारतीय   संस्कृतीत  एक   ताकदवान   पर्याय   म्हणून  अवतरला. भालचंद्र  नेमाडे  आनंद  यादव  नामदेव  ढसाळ   हे सरळ  बहुजनांचे  सांस्कृतिक  पुढारी  म्हणून  पुढे  आले  ब्राम्हण्याला  हे  सहन   होणे  शक्य  नव्हते

                                       ह्या  ब्राह्मण्याने  बहुजनांमधल्या  ब्राह्मण्य  स्वीकारायला  सोकावलेल्या  काही  बहुजनांना  हाताशी  धरून  वेगळेच  सांस्कृतिक  राजकरण  खेळायला  सुरुवात  केली  तर  बहुजनांतल्या  काही  अतिरेकी  लोकांनी  ब्राह्मण्य  म्हणजे  ब्राह्मण  अशी  उलटचक्री  जातीयवादी  भूमिका  घेऊन  प्रागतिक  ब्राह्मण्यांना  ते  केवळ  जन्माने  ब्राह्मण  आहेत  ह्या  एका  गुन्ह्यासाठी  झोडपायला  सुरुवात  केली  ह्यातून  ह्या  काळात वेगळेच  सांस्कृतिक  तणाव  निर्माण  झाले. १९८०  नंतर  जे  सांस्कृतिक  उदारीकरण  झाले  त्याचाच  हा भाग   होता  (  cultural   liberalisation  )  मंडल आयोग  ही  ह्या  सांस्कृतिक  उदारीकरणाची  केवळ  राजकीय  परिणती  होती .

                                        ह्या  बहुजनवादाने  जागतिकीकरणाचा  सामना  अत्यंत  अडाणीपणाने  केला  आणि  जागतिकीकरण   म्हणजे  काही  नवा  बटू  असून  आपण  बळी आहोत  अशी  मांडणी  करावयास  सुरुवात  केली  ही  चूक  होती  व   आहे  चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातला  रशिया -अमेरिका -लॅटिन  अमेरिका -रशिया- यूरोप - पूर्व  आशिया  अशी  भटकली  तेव्हाच  सुमारे  ऐंशी  हजार  वर्षांपूर्वीच  झाली  चिन्हसृष्टीकरणातील  जागतिकीकरणाची  सुरुवात  भारतात  मात्र  १९८०  साली  झाली  मात्र  १९८२  ते  १९९२  ह्या  कालखंडात  जागतिकीकरण  हे  स्पीन  गोलंदाजी  टाकत  होते  कारण  भारतीय  खेळपट्टी  तशी  होती.  १९९२  पासून  मात्र  जागतिकीकरणाचा  फास्ट  बोलिंगचा  स्पेल  सुरु   झाला  विशेषतः  मनमोहनसिंगांनी  आपले  काम  ह्याच  वर्षी  सुरु  केले .  तिथूनच  जागतिकीकरण  उदारीकरण  व  खाजगीकरणावर  अधिक  खोल  चर्चा  सुरु  झाली  खरेतर  जागतिकीकरण  ह्या  विषयावर  मी  चारशे  पानाचं  एक  पुस्तक  लिहिलंय  त्यामुळे  त्याच्यावर  बोलेन  तितकं  कमीच  !

                                        थोडक्यात  काय ,  तर  जागतिकीकरण  म्हणजे  सर्व  महाराष्ट्रीय  व  राष्ट्रीय  सीमा  व  भिंती  कोसळून  सृजन  उत्पादन  वितरण , ग्रहण,  उत्सर्जन,  शिक्षण , संपादन,  जतन , संवेदन , बोधन, निरीक्षण, परीक्षण , निष्कर्षण, मुद्रण , संरक्षण, संघटन , वहन, वितरण, नियमन,  दळणवळण वगैरे  सर्व  क्रियांचे  त्यांच्याशी  जोडलेल्या   मितिकांचे  त्यांच्या  विशेषांचे  जागतिक  अवकाशात  झालेले  प्रसरण  होय .

                                        चौथी  नवता  जागतिकीकरणातील  जे  सर्व  मानवजातीसाठी  कल्याणकारी  आहे  ह्याचे  स्वागत  करते  उदाहरणार्थ  उद्या  जर  एड्सविरोधी   लस  समज  अमेरिकेने  शोधली  तर  ती  केवळ  अमेरिकन  आहे   म्हणून  तिला  विरोध  करायचा   हे  चौथ्या  नवतेला  मान्य  नाही  त्यामुळे  ती  जागतिकीकरणातील  विधायक  गोष्टींचे  स्वागत  करते  एनरॉनसारख्या  विघातक  गोष्टींना  विरोध  करते  गरज पडली  तर  त्यासाठी  प्रत्यक्ष  लढा  उभा  करते  आणि  हे  सर्व  करताना  त्या  क्रियांविषयी  ती  विलक्षण  जागृत  आणि  पूर्ण  अवधान  बाळगते  .

  २. तुझ्या  आजूबाजूच्या  समाजात  गेल्या  १०-१५  वर्षात  झालेले  ढोबळ  व  सूक्ष्म  बदल  कुठले  ?  

                                        चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरणामुळे  (  चीजा  हे संक्षिप्त  रूप  पुढे  वापरतो ) झालेले  परिणाम  हे  दुहेरी  आहेत

                                        एकतर  चिजामुळे  ज्याचा  प्रचंड  फायदा  झाला  असा  एक  प्रचंड  मोठा   सपाट  व  एकसाची  चेहऱ्याचा  मोठा  मध्यम  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  म्हणून  वर  आला  ह्या  वर्गाकडे  चिन्हसृष्टीने  निर्माण  केलेल्या  टेलेफोन , बाईक, कार, कम्प्युटर , क्रेडिट  वगैरे  कार्ड  उत्तम पैसे  व त्यातून  निर्माण  होणारी  खरेदीशक्ती  अशा  अनेक  चिन्हवस्तू  व  चिन्हशक्ती  आल्या  हा  वर्ग  चिन्हसृष्टीला  ऍक्सेसिबल  झाला  आणि  त्याचे  प्रमाण  ३० ते ४०  टक्के झाले  त्याची  कळत नकळत  एक सांस्कृतिक  दादागिरीही  निर्माण  झाली .

                                       याउलट  चिजामुळे  भुईसपाट  झालेल्या  नाडला  गेलेला  एक  दुसरा  चिन्हदलित  वर्गही  निर्माण  झाला  म्हणजे  मॉलमुळे  ज्या छोट्या  दुकानदारांची  दुकानदारे  भुईसपाट  होतायत  ते  दुकानदार  चिन्हदलितच  म्हटले  पाहिजेत  औदिगिकीकरणानेही  अनेक  पारंपरिक  उद्योगधंदे  असेच  नष्ट  केले  होते . म्हणजे  कापडगिरण्यांमुळे  हातांनी  कापड  बनवणारा  विणकरांचा   एक  मोठा  वर्ग  नष्ट  झाला  त्याचप्रमाणे  मल्टिनॅशनल  कंपन्यांमुळे  अनेक   छोट्यामोठ्या  उद्योगातील  कामगार  बेकार  झाले  ज्याच्यावर  चीजाचे  दुष्परिणाम  झाले  असा  हा  वर्ग  साधारण  ३०%  आहे  .  मी  ज्या  NNP  त  राहतो  तेथील  ८०% वस्ती  ही  ह्या  वर्गाची  आहे  आणि  त्यांच्या  कुटुंबाची  झालेली  वाताहत  मी  रोज  पाहतोय .

                                             भारतात  ३० %  ते  ४० %  लोकांचा  एक  वर्ग  असा  आहे  ज्याला  औद्योगिकीकरणाचाच  जर  फायदा  झाला   नव्हता  तर  चिजाचा  त्याच्यावर  काय  परिणाम  होणार  ?  चीजाचे  भवितव्य  हे  ह्या  वर्गावर  अवलंबून   आहे  चिजा  जर  ह्या  वर्गाला   फायदेशीर  ठरले  आणि  हा  वर्ग  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात   दाखल  झाला  तर  चिजा  ह्या देशांत  यशस्वी  होईल  अन्यथा  ते  कोसळून  पडेल .

                                                                   प्रतिसृष्टीय  विशीय  औद्योगिकीकरणात  मध्यमवर्ग  कुठल्या   वर्गाकडे जाणार  ह्यावर  भांडवलशाहीचे  भवितव्य  अवलंबून  असायचे  आज  नेमके  उलटे  झाले  आहे आज  हा  कोणाच्याच  अध्यात मध्यात   नसणारा  कंगाल  व  ज्याकाकडे  गमावण्यासाठी  काहीच  नाही  असा  जो  वर्ग  आहे  तो  कोणाकूडे  जातो  ह्यावर  ह्या  चीजाचे  भवितव्य  अवलंबून  आहे . 

तारीख : ७/८/१८

                                                                  चीजाने  हा  वर्ग  चीन , जपान ,अमेरिकेत  प्रयत्नपूर्वक  गिळंकृत  केला  आणि  त्याला  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात  आणले  भारतातही  हेच  घडले  तर  ती  एक  संघर्षहीन  क्रांती  असेल  हे  घडवण्यासाठी  लागणारी  संपर्कव्यवस्था  व  माध्यमक्रांती  चिजाकडे  आहे  हे  करण्यासाठी  मार्केट  ही  नैसर्गिक  गोष्ट  आहे  हे  पटवणारे   एक  तर्कशास्त्र  सध्या  उत्तरआधुनिकतेच्या  नावाखाली  विकसित   होत  आहे  हीच  उत्तरआधुनिकता  ब्लाईंड  सिडक्शनचे  व्हर्च्युअल  नमुने  आपल्या  पुढे  सादर  करीत  आहे  जे  बेहोश  आहेत  त्यांना  अधिक  बेहोश  करणे  आणि  जे  धड  नाहीत  ते  जागृतावस्थेत  येण्यापूर्वीच  त्यांना  सिड्यूस  करून  बेहोशीची  चटक  लावणे  (  लहान  मुले  ही  मुख्य  टारगेट  )  अशी  ही  सांस्कृतिक चिन्हशक्ती  आहे.  त्याचे  बरेवाईट  परिणाम  गेली  पंचवीस  वर्षे  आपण  अनुभवतोय .

                                                             चिजाने  त्या  जोरावरच  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  जो   सुरुवातीला   केवळ  ३  ते  ५ %  होता  तो  वाढवत  वाढवत  ३०  ते  ४० %  केला  आणि   येत्या  दहा  वर्षात  तो  ७० %  होऊन  ह्या  देशाचा  मुख्य  वर्ग  कसा  होईल  ह्याचा  विचार   चिजा  करते  आहे   त्या  दृष्टीने  मार्केट  तळागाळात  पोचवण्याचा  प्रयत्न  चालू  आहे  एकदा  का  तसे  झाले  कि  कम्युनिझमची  उरलीसुरली  धूळही  उडून  जाईल  त्यामुळेच  शोषणासंदर्भात  अधिक  सावधान  होण्याची  जबाबदारी  कलावंताच्यावर  येऊन  पडणार  आहे

                                                            चिजामुळे  आपण  आकुंचन  आणि  प्रसरण  ह्यामध्ये  डोलतो  आहे  The  world  is  shrinking  आणि  The  world  is  becoming  flat  ह्या  दोन्ही  प्रक्रिया  त्यामुळेच  घडताना  दिसतात  पूर्वी  भांडवल  श्रम  वगैरे  सर्व  गोष्टी  solid  होत्या  आता  सर्वच  गोष्टी  liquid  आणि  gaseous    अशा  वेळेला  तुमची  मुळे  धोक्यात  येणे  अटळ  कारण  मुळांचा  आधार  जमिनीची  solidity  असते  तीच  गेली  तर  काय  हा  प्रश्न  अटळ  !  liquidity  &  gaseousity   हा  चिजाचा  एक  मूलभूत  परिणाम

                                                          seduction   हे  नेहमीच  तुम्हाला  प्रथम  स्तंभित  करते  त्यासाठी  तुम्हाला  solidify   करते  तुम्ही  एक  प्रकारे स्तंभता !  ताठ  होता  !  १९८२ - ८७  हा  कालखंड  हा  स्तंभण्याचा   कालखंड  होता  तो  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  solid   अवस्थेचा  काळ  होता  त्यामुळेच  संजय  गांधीने  आणलेल्या  खाजगी  मोटार  मारुती  उद्योगाचे  काय  करायचे  ह्याविषयीचा  जो  गोंधळ  होता  तो  हळूहळू  ह्याच  काळात  सुटून  एकंदर  उदारीकरणाकडे  कल  वाढू  लागला  ह्या  काळात  संगणक  टीव्ही  वगैरे  गोष्टींनी  आपण स्तंभित  झालो  होतो  बाईक्सच्या  नवीन  मॉडेल्सनीही  हीच  अवस्था  केली  होती  ह्याच  काळात  सिमेंटचे  उदारीकरण  होऊन  बांधकामे  भरभराटली .

                                                           १९८८  नंतरचा  कालखंड  हा   ही  solidity  संपवण्याचा  काळ  होता  liquidity सुरु  झाली  सुखस्राव  दुःखस्राव  असे  सगळेच  स्त्राव  पाझरायला  लागले  मुख्य  म्हणजे टीव्ही  बाईक्स  वगैरेंमुळे  येणारा  अपराधभाव  गेला  व  त्याबाबत  अभिमान  पाझरायला  लागला जी  solidity  कसोशीने  सांभाळण्यात  आली  तिचे  विघटन  सुरु  झाले  कारण  सर्वत्र  liquidity  झिरपली  १९९५  नंतर  आपले  विमान  हवेत  गेलेय  ते  अद्याप  तरी  जमिनीवर  उतरलेले  नाही ही गॅसिअस  अवस्था  होय  गॅस  सर्वत्र  पसरतो  उधळतो  पाझरतो  नष्ट  करतो  सॉलिडिटीमध्ये  फ्रिक्शन  खूप  पण  त्या  फ्रिक्शनमुळे  मजाही  येते  लिक्विडिटीमध्ये  फ्रिक्शन  संपुष्ठात  येते. इथे  जो  मजा असतो  तो  वाहण्याचा आणि पाण्यात  पडून पोहण्याचा

तारीख :  ८/८/१८

                                                        गॅसिअसमध्ये   तुम्ही  टोटल फ्रिक्शनलेस  होता  इथे  तर  काठही  नाहीसे  होतात  सॉलिडिटीत  इंटरमिक्सींग  कमी  लिक्विडिटीमध्ये   प्रवाह  एकमेकांला  मिळायला  लागतात  आणि  गॅसिओसिटीमध्ये  कशात  काय  मिसळतंय  ते  कळणेही  मुश्किल  होऊन  जाते  ह्यातूनच  सांस्कृतिक  सरमिसळीचा   मुद्दा  ऐरणीवर  येतो  ह्या  सरमिसळीला  घाबरलेले  लोक  मूलतत्ववादाकडे   वळतात  दहशतवाद  हा  प्रतिकाराचा  आत्यंतिक  मार्ग  आहे  तो  आधुनिकही  असू  शकतो  पण  मूलतत्त्ववाद  हा  प्रतिकार  नसतो  तर  घाबरून  स्वतःच्या  सॉलिड  कोषात  सॉलिड  पायात  परतणे  असते  मूलतत्त्ववादी  दहशतवाद  हा  मार्ग  म्हणून  वापरू  शकतो  तर  दहशतवाद  मूलतत्त्ववादाला  साधन  म्हणून  वापरू  शकतो  ह्या  दोघांची  युक्ती  ही  १९८०  नंतरचा  एक  अजोबोगरीब  बदल  आहे  पंजाब  आसाम  काश्मीर  श्रीलंका   पॅलेस्टाईन  असे  अनेक  प्रश्न  त्याचा  परिणाम  आहेत.

                                                         liquid  अवस्थेत  भांडवलही  liquid  झाले  आणि  liquid   capitalism   जन्माला  आला  लवकरच  हा  capitalism  गॅसिअस  होईल  आतापर्यंतचा  जो  कॅपिटॅलिझम  होता  तो  solid  capitalism  होता  पण  चिन्हसृष्टीकरणामुळे  तो  liquid  झाला  हीच  गोष्ट  socialism   ची  आहे  आतापर्यंतचा  solid  socialism  होता  जगात  चिनचा  अपवाद  वगळता  तो  सर्वत्र  solid  राहिला चीनने  मात्र  चिन्हसृष्टीकरण  स्वीकारून liquid  socialism  चा  एक   नवा  पर्याय  पुढे  आणला
liquid  socialism  मध्ये  भांडवलाची  liquidity सहज  स्वीकारली  जाते  gaseous  capitalism   व  socialism मध्ये  आता  फार  पुढची  पावले  टाकली  जाणार  हे  उघड  आहे  अशा  वेळेला  मार्क्स  व  आंबेडकरांचा  solid  socialism  कालबाह्य  होत  जाणे  अटळ  आहे

तारीख :  १०/८/१८

                                                                    अशा  वेळेला  state ( राज्य ) ही  संस्था  liquid  होणे  अटळ  आहे  पूर्वी  state  ह्या  शब्दाचा  अर्थच  मुळात  solid  state  होता  ह्यामुळेच  liquid  state  ही  संकल्पना  स्वीकारणे  आपणाला  अजूनही  शक्य  झालेले  नाही  त्यातूनच  solid  state  आणि  liquid  capitalism  ह्यांच्यात  सतत  संघर्ष  होताना  सध्या  दिसतोय  हे  सर्व  अमेरिकेमुळे  होतय  असाही  एक  गैरसमज  झालेला  दिसतोय  माझ्या  मते  अमेरिका  उद्या  पृथ्वीवरून  नाहीशी  झाली  तरी  हेच  होणार  आहे  कारण  प्रश्न  चिन्हसृष्टीकरणाचा  आहे  अमेरिका  ही  ह्या  चिन्हसृष्टीकरणाचे  फक्त  नेतृत्व  करतेय पण  हे  नेतृत्वही येत्या  पंचवीस  वर्षात  कोसळून  पडणार  आहे.  चीन  आणि  युरोपियन  समुदाय  हे  नेतृत्व  कास  उलथून  टाकता  येईल  ह्याचीच  वाट  पाहतायत.  डॉलरचे  महत्त्व  संपुष्टात  आणण्याचे  चाललेले  प्रयत्न  हा  ह्या  प्रयत्नांचा  केवळ  एक  भाग  आहे .  हे  सगळेच  बदल  साहित्यावरही  प्रभाव  टाकतायत .

                                                              औद्योगिकीकरणात  माणसाचे  रूपांतर  कमोडिटीत  करण्याचा  प्रयत्न  केला  गेला.  त्याला  शह  म्हणून  modern  art  जन्माला  आली  अस्तित्ववाद  बोकाळला .  माणसाला  कमोडिटी  बनवण्यापासून  वाचवणे  व  त्याला  व्यक्तिमत्त्व  बहाल   करणे  हा या ह्या  चळवळीचा  पाया  ही  कला  subjective  झाली  कारण  subject  च  धोक्यात  आला  चिन्हसृष्टीकरणाने  माणसाचे  रूपांतर  सेमिओडीटीत  करण्याचा  प्रयत्न  चालवलेला  आहे  सेमिओडिटी  ही  एकाच  वेळी  कमोडिटी  असते  आणि  प्रोग्रामही  असते.  हा  प्रोग्राम  प्रीप्लान्ड  असतो  आणि  तरीही  त्यात  विविध  पर्यायांची  प्रचंड  गजबज  असते  जी  माणसाला  स्वातंत्र्याचा  आणि  मौजेचा  ठोस  आभास  देते  अशा  वेळी   कलावंताला  फक्त  कमोडिटीपासून  वाचून  किंवा  स्वतःचे  व्यक्तिमत्त्व  शाबूत  ठेऊन  चालत  नाही  तर  स्वतःला  ह्या  प्रीप्लान्ड  प्रोग्रामपासून  वाचवणेही  गरजेचे  बनते  चौथ्या  नवतेची  कविता  हे  काम  करते  आता  तिने  अधिक  पुढे  जाणे  आवश्यक  आहे  औद्योगिकीकरणाच्या  काळात  modern  art  ला  हळूहळू  कळून  चुकलं  की  असं  नुसतं  अस्तित्ववादी  व्यक्तिनिष्ठ  असून  भागणार  नाही  आणि  मग  collective  consciousness  ला  महत्व  देणारी  पर्यायी  modern  art  जगभर  पुढे  आली  आणि  तिने  postmodern  ला  जन्म  दिला  चीजाच्या  बाबतीत  कळत  नकळत  आता  आपली  हीच  अवस्था  होईल  मात्र  आपला  collective  consciousness  हा  modern  असून  चालणार  नाही  तर  तो  पूर्णपणे  नवा  व  चिन्हसृष्टीकरणाला  नीट  सामोरा  जाणारा  हवा  सध्या  काही  back  to  modern  ideology  चा  उथळ उद्योग  करतायत.  हे  म्हणजे  औद्योगिकीकरणाच्या  काळातील  प्रश्न  सोडवण्यासाठी  काही  लोक  संतांच्याकडे  जायचे  तसाच  काहीसा  हा   प्रकार  आहे  आसपासचे  बदल  नीट  न  कळल्याचे  हे  लक्षण  आहे  मुळात  ह्या  लोकांची  ideology  ही   ideology  राहिलेली  नाही  ती  श्रद्धा   बनलीये  आणि  एखादी  गोष्ट  श्रद्धा  बनली  कि  तुम्ही  तिच्या  विषयी  संशय  घेणे  हे  पाप  मानले  जाते  हे  पाप  मी  वारंवार  केल्याने  अनेकांची  पंचायत  झालेली  दिसते  पण  मी  माणूसच  असा  आहे  की  जो  बदलाला  नेहमीच  तयार  असतो

३.  तू  तुझ्या  कवितेत  तुझं  बदललेलं  जग  कशा  प्रकारे  आणलंय  ?  ते  आलंय  का  ?  कवितेत  नव्या  वस्तूंची  साधनांची, कॉम्प्युटरच्या / वेबवर्ल्डसंबंधी  गोष्टींची  नाव /  उल्लेख  करून  लिहिलेल्या  अनेक  कविता  हल्ली  वाचायला  मिळतात  अशा  कवितांबद्दल  तुला  काय  वाटतं ?  ह्याच  वस्तूंची /  गोष्टींची  नाव / उल्लेख  करून  लिहिलेली  एखादी  चांगली  कविता  आठवतेय  का  ?

                                               मी  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  अखंड  कवी  आहे .  माझ्या  स्वतःच्या  आयुष्यात  १९८२  ते  १९८७  हा  कालखंड  प्रचंड  सृजनाचा  कालखंड  आहे     

तारीख  :  ११/८/१८

                                                                    ह्या  काळात  मी  साधारण  हजार  बाराशे  कविता ,  तीस  कथा  , चार  एकांकिका , एक फसलेली   कादंबरी , नऊ  नाटके  एवढे  प्रचंड  लिखाण  केले  आहे. पूर्वी   मी  हा  एकदा  सांगितला  की  लोकांचा  विश्वास  बसायचा  नाही .  पण  डेकॅथलॉन  हा  संग्रह  बाहेर  पडल्यापासून  लोक  तितकासा  अविश्वास  दाखवत  नाहीत.  आता  डेकॅथलॉन  प्लस, डेकॅथलॉन मॅक्झिमम ,  तू ,  कोल्हापूर  ते  मुंबई  व्हाया  कविता  (  ह्यांचा  समावेश  कदाचित  पॉप्युलरतर्फे येऊ  घातलेल्या एका  भारतीय  विद्यार्थ्यांचे  उद्गार ह्या  संग्रहाच्या  आगामी  दुसऱ्या  आवृत्तीत  होईल  ) कोलाज ,  आऊट  ऑफ  थिंग असे  कविता  संग्रह  बाहेर  आले  की  हा  कालखंड  स्पष्ट होईल 

                                                                   १९८८  ते  १९९५  ह्या  कालखंडात  हे  प्रमाण  मंदावले .  प्रामुख्याने  ह्या  कालखंडात  लिहिल्या  गेलेल्या  कवितांचे  जास्त  प्रमाण  असणारा  क. व्ही. हा   संग्रह  आता  बाहेर  आलाय  माझ्या  दृष्टीने  ज्यांना  मी  चिन्हसृष्टीय  कविता  म्हणतो  अशा  सातशे  साडेसातशे  कविता  मी  लिहिल्या  त्या  १९८८  ते  २००३  ह्या  काळात.  त्यातील  चारशे  कविता  १९८८  ते  १९९५  ह्या  काळातील  असाव्यात .  ह्याशिवाय  ह्या  काळात  मी  अफेअर  डॉट  कॉम  नावाची  माझ्या  दृष्टीने  यशस्वी  कादंबरी  लिहिली .  तिचा  फायनल  ड्राफ्ट  मात्र  मला  तिचा  शेवट  न  आवडल्याने  अडून  होता .  तो  मी  नुकताच  केला.  ह्याशिवाय  सात  नाटके  वीस  कथा  सहा  सात  एकांकिका ,  टीकाहरण  मधील  बरीचशी समीक्षा  मी  ह्या  काळात  लिहिली  गेलीये .


                                                                   १९९६  पासून  मात्र  माझ्या  आयुष्यात  समीक्षा  नको  तितकी  महत्वाची  झाली . १९९६  ते  २००३  ह्या  काळात  मी  फक्त  साडेतीनशे  कविता  लिहिल्यात .  त्याचे  प्रतिनिधित्व  स्त्रीवाहिनी  ह्या  संग्रहात  आहे. मी  काहीसा  झपाटल्यासारखा  कविता  लिहितो .  एकाच  झपाट्यात  मी  दीर्घ  कविताही  लिहिल्या  आहेत  ह्या  अर्थाने  मी  अघोरी  कवी  आहे . मला  स्वतःला  फारस  माग  वळून  पाहायला  आवडत  नाही .  त्यामुळे  केलेले  लिखाण  प्रकाशित  करण्याचाही  फारसा   उत्साह  मला  नसायचा,  किंबहुना  १९९५   पर्यंत  ह्या  बाबतीत  मी  निरुत्साही  होतो . ह्याला  कारण  माझा  कोल्हापुरातला  कडवट  अनुभव  असावा माझ्या  लेखनाची  प्रचंड  अवहेलना  आणि  मानखंडना  झाल्याने  पुढे पुढे  मी  ते  दाखवायचेच  बंद  केले.

                                                                 माझ्या  प्रचंड  लेखनशक्तीमुळे  असेल, पण  माझ्या  आसपासचा  जवळ जवळ  प्रत्येक  बदल  माझ्या  कवितेत  कुठे  ना  कुठे  आलेला  आहे . चिन्हसृष्टीकरणाचे  तिन्ही  कालखंड   अनुक्रमे  ' डेकॅथलान ' , क.व्ही . आणि  स्त्रीवाहिनी  ह्या  कविता  संग्रहात  आलेले  दिसतील . क. व्ही त  जागतिकीकरण  हे  बाहेर  जास्त  आहे . स्त्रीवाहिनीत  हे  जागतिकीकरण  थेट  घरदारात  घुसलेले  दिसेल. आता  हे  मी  जाणीवपूर्वक  केलय  का ?  तर  जिथे  मला  ideology  चाच  प्रतिकार  करायचा  होता  तिथे  ते  जाणीवपूर्वक  आलय  पण  जवळजवळ  ९०% कवितेत  ते  अजाणताच  आलंय .

                                                               हे  मी  कशाप्रकारे  आणलंय  असं  म्हणशील  तर  सगळ्या  प्रकारे !
मी  कवितेला  आणि  आयुष्याला  चहुअंगांनी  भिडणारा  माणूस  आहे  कविता  ही  कुठल्यातरी  अमुक  एका  पद्धतीने  लिहिता  येते  ह्यावर  माझा  विश्वास  नाही.  डेकॅथलानच्या  पहिल्या   अर्ध्या   भागात मी  रोमँटिक  आहे  तर  नंतर  देशीवादी  व  दलित  साहित्याच्या  प्रभावाखाली  होतो .कोलाजमध्ये  तर  मी  कट्टरला  कट्टर  देशीवादी  होतो  इतका  की  हा  संग्रह  भालचंद्र  नेमाड्यांना मी  अर्पण  करावा  डेकॅथलॉन   प्लसमध्ये  मी  अस्तित्ववादी  होतो  तर  डेकॅथलान  मॅक्झिमममध्ये  पर्यायी  आधुनिकवादी  ज्याला  म्हणतात  तसा.  ह्या  काळात  मी  दर  चार  महिन्यांनी  काहीतरी  नवाच  असायचो . 


                                                               सप्टेंबर  १९८७  नंतर  मी  ह्या  साऱ्यातूनच  बाहेर  पडलो  आणि  चिन्हसृष्टवादी  झालो . १९८८  ला  मी  मुंबईत  राहता  येईल  का  ह्याची  चाचपणी  केली  आणि  १९८९   मध्ये राहायलाच  आलो.  माझ्यातला  हा  बदल  माझ्या  कोल्हापूरच्या  अनेक  मित्रांना  आजही  आवडत  नाही . त्यांच्या  मते   माझ्या  चांगल्या  कविता  ह्या  ८७  पर्यंतच  लिहिल्या  गेल्या  पण  मित्रांच्या  पेक्षा  आपला  आतला  आवाज  काय  म्हणतो हे  महत्वाचे  वाटल्याने  मी  नवे  बदल   आत्मसात  करत  राहिलो. 

                                                             आता  पुढचा  प्रश्न  तर  प्रत्येक  काळात  प्रतिभा  नसलेले  काही  चलाख  लोक  असतातच  हे  चलाख  लोक असतातच . हे  चलाख  लोक कम्प्युटर  वगैरे  उल्लेख  करून  कविता  लिहिणारच .  आपण  कि  त्यांच्याकडे  लक्ष  द्यायचे  कारण  नाही,  पण  त्याच  बरोबर  प्रचंड  थोर  वगैरे  असंही  कुणी  समजू  नये . ते  एक  मशीन  आहे. ह्याचे  भान  बाळगावे.  जाहिरातीच्या  क्षेत्रातली  मशीन्स  ही तुमच्या  p.c. पेक्षा  शंभर  पटींनी  श्रेष्ठ  असतात .

                                                             तेव्हा  p.c.  आला   म्हणजे  सगळं  आलं  असं  समजण हेही  तितकंच  वाईट .  हल्ली  काही  मध्यमवर्गीय  कवींना  आपण  पी.सी  वापरतो  ह्याचाच  माज  आलाय , म्हणून   हे  सांगावेसे  वाटते .  तुमचे स्टेट्स  सिम्बॉल हे  कवितेत  फारसे  कामाचे  नसते . पाब्लो  नेरुदाने  मी  टाईपरायटरने  मुद्दाम  जाणीवपूर्वक  कविता  लिहीत  नाही , कारण त्याने  मानवी  स्पर्श नाहीसा  होतो असे  म्हंटले  होते,  तर  पी.सी  न  वापरणे  हीही  एखाद्या  कवीची  फार  जाणीवपूर्वक  केलेली  निवड  असू  शकते .

                                                            कवितेबाबत  एक  मूलभूत  गोष्ट  आपण  सर्वांनी  लक्षात  घ्यायला  हवी.  प्रत्येक  अनुभव  नवा  असतो प्रत्येक  क्षण  नवा  असतो ,  प्रत्येक  क्षणी  अवकाश  नवा  असतो त्यामुळे  प्रत्येक  कविता  ही  नवी  असते. जोपर्यंत  कागदावर  काय  उमटणार  ह्याविषयीचे  थ्रिल  जिवंत  असते  तोपर्यत  तुम्ही  कवी  असता  ज्यादिवशी  हे  थ्रिल संपते  लिखाणात  प्रेडिक्टबिलिटी  येते, तुमचा  जुनाट  मेंदूच  स्मरणशक्तीद्वारे  तुमची  कविता  लिहायला  लागतो त्या  दिवशी  तुम्ही  कवी  म्हणून  संपलेले  असता.


४ . तुझ्या  जगण्याचा  कवितेवर  व  कवितेचा  जगण्यावर  परिणाम  होतोय  का ? कशा  रीतीने  ? तुझ्या  दृष्टीने  तुझ्या  कवितेचं  जग  कोणतं  ?  उदाहरणार्थ ? तुझ्या  दृष्टीने  तुला  कवी  म्हणून ,  माणूस म्हणून, मराठी  भाषक म्हणून, भारतीय  म्हणून, जागतिक  ग्लोबल  नागरिक  म्हणून  कुठल्या  समस्या  आहेत ? त्या  समस्यांचा  सामना  कसा  करावा ? काय  काय  उपाय  या  समस्यांवर  असू  शकतात ? नसल्यास  का  नाहीत ? असल्यास  भविष्यात  काय  करावं ?  तू  लिहितोय  म्हणजे  नेमकं काय  करतोय ? तुला  कविता  लिहायची  ऊर्जा कुठून  मिळते  ? 

                                                              मी  कवितेने  आतून  बाहेरून  झपाटलेला  मनुष्य  आहे . माझ्यात  एक  लहान  मूल  आहे  ज्याला  ह्या  जगातल्या  प्रत्येक  गोष्टीविषयी  कुतूहल  आहे  आणि   माझ्यात  एक  तत्वज्ञ  आहे ज्याला  जे  जे  आपल्याला  कळलंय  ते  ते  सगळं  सांगायचंय . मला  वाटते , कविता  ही जगातली  कदाचित  एकमेव  गोष्ट  असेल  जिथे  हे  लहान  मूल  आणि  तत्वज्ञ  एकत्र  नांदू  शकतात . कविता  ही त्यामुळेच  अनेकदा   लहान  मुलाने  सांगितलेले  तत्वज्ञान  असते  किंवा  तत्वज्ञांचे  बालसुलभ  कुतूहल  व  त्यापोटी  त्याने  घेतलेला  शोध असते . कविता  ही  जीवनाचे  असे  एक  इंटरनेट  आहे  जिथे  माझ्या आयुष्यातल्या  सगळ्याच  वेबसाईट्स  एकत्र   येऊन  मिळतात . सॉलिड, लिक्विड , गॅसिअसचे  प्रेशिअस  इंटरनेट !  मी  एक  असा  मनुष्य  आहे  जो  असंख्य  तुकड्यात  विखरून  पडलाय ,  आणि  तरीही  जो हे  सगळे  तुकडे  कासवांसारखे  कवितेच्या  पोटात  घेऊन  आरामात  चाललाय .

                                                               माझे  स्वतःचे  जगणे  गाव, शहर आणि  महानगर अशा  तिन्ही  अवकाशात  फिरत  असल्याने  ह्या  तिन्ही  अवकाशांची  सरमिसळ  माझ्या  कवितेत  होत  असते. ह्यात   भरीसभर  म्हणून   माझ्यावर  फुले ,  आंबेडकरांचा ,  विशेषतः  गौतम  बुद्धांचा  दार्शनिक  पातळीवर  सखोल  ठसा  आहे  त्यामुळे  दलित  अवकाशविषयी  मी  नको  तितका  सजग  आहे  मी  जन्माने  दलित  नसूनही  माझे  आयुष्य  अनेक  हालअपेष्टांतून  गेल्याने  मला  दलित  साहित्य  जेवढे  आपले  वाटले  तेवढे  इतर  साहित्य  वाटले  नाही  आणि  हे  सर्व  कमी  म्हणू  की  काय ,  माझ्या  घरात  आसपास  फक्त  स्त्रिया .  माझ्या  आईकडे  तर  मुलगाच  नाही  सगळ्या  बहिणीच  आणि  मी  ज्या  पाटलांच्या  घरी  जन्मलो  तिथेही  बायकाच . त्यात  पुन्हा  भर  म्हणजे  लहानपणी  माझ्या  सावळ्याकाळ्या  रंगात  निळसर  झाक  होती  ( जी  पुढे  नाहीशी  झाली  ) .

                                                                मग  काय होणार ? माझा  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  पार   श्रीकृष्ण  केला  जणू  ह्या  बायका  लाड  करण्यासाठी  एका  पुरुषाची  वाटच  पाहात  होत्या  आणि  मी  जन्मलो !  त्यामुळे  स्त्रैण  अवकाश  हा  मला  लहानपणापासुन  नको  तितका  उपलब्ध  झालाय . ह्या  सगळ्या  बायकांनी  त्यांच्या  दृष्टीने  मी  आदर्श  पुरुष  व्हावे  म्हणून  यथेच्छ  धडपड  केली .  त्यामुळे  कुस्तीपासून  फुटबॉलपर्यंत  ज्याला  ज्याला  पुरुषी  टॅग्ज  लागला त्या  त्या  गोष्टी  मला  करायला  लागल्या  ह्या  सगळ्याच  गाववाल्या !  स्त्रीमुक्तीचे  वारे  तितकेसे  न पोचलेले !   त्यामुळे  त्यांनी  मला  व्यवस्थित  पुरुष  बनवला . माझा  स्त्रीवाहिनी  हा  संग्रह  ही  ह्या  बायकांची  देन . त्यांच्यामुळेच  मी  महानगरातल्या  स्त्रिया  नीट  जोखू  शकलो . अनेकांना  वाटतं   तसा  काही  तो  स्त्रियांच्या  नजरेतून  लिहिलेला  संग्रह  नाही .  तर  माझ्यातच  असलेल्या  आणि  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  जागे  केलेल्या  माझ्यातल्या  स्त्रीने  लिहिलेला  तो  संग्रह  आहे .    

                                                             मी  लोकांशी  कमिटमेन्ट  असणारा  एक   कवी  आहे . त्यामुळेच  मी  कुठल्याही  संघटनेच्या  चरणाशी   निष्ठा  वाहिल्या  नाहीत  आणि  ज्या  संघटना  मी  जॉईन  केल्या  तिथे  मी  प्रमुखच  होतो .