एक्स्टर्नल रिलेशनशिप : गो मां पवार श्रीधर तिळवे नाईक
गो मा पवारांचं काय करायचं हा प्रश्न मला कधीच सुटला नाही आणि बहुधा त्यांनाही माझं काय करायचं हे कळलं नसावं . गो मांचे नाव मी प्रथम ऐकले ते पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप ह्या चर्चासत्राच्या निमित्ताने ! ह्या चर्चासत्राचे पडसाद त्यावेळी कोल्हापुरातील डाव्या चळवळीत फारच उमटले होते नेमाडेंचा संरक्षक तट ही उपाधी त्यावेळी चंद्रशेखर जहागीरदार व गो मा पवार ह्यांना मिळाली होती
पुढे माझा थेट संबंध आला तो विलास कांबळे आणि राजकुमार यादव ह्या दोन मित्रांच्यामुळे ! मात्र प्रत्यक्षात माझे बोलणे जास्त झाले नाही राजकुमार यादव मला कुठेही न्हेताना "तोंड उचकटणार नसशील तर ये " ह्या अटीवर न्ह्यायचा . त्याकाळात वयाचा जोश जास्त असल्यानं आडवं जाण्याची वृत्ती भरपूर होती वादविवादात खेचायचं आणि युक्तिवादात फसवायचं अशी माझी त्यावेळची स्ट्रॅटेजी असायची आणि त्यात सत्याचा शोध कमी आणि बुद्धीचा अहंकारच जास्त होता तारुण्याचा मूर्खपणा असं आता त्याला म्हणता येईल त्यामुळे पहिल्या मीटिंगमध्ये मी खालमुंडी पाताळधुंडी करत बसून राहिलो . पहिल्या भेटीत मला जर काय आवडलं असेल तर सरांचे शुभ्र हसू . दात मोठे असूनही ते त्यांना इतके शोभत होते कि गोमा म्हणजे त्यांचे ते हसू अशी प्रतिमाच माझ्या डोक्यात बसली होती
पुढे आम्ही विद्यापीठात एक महाकाव्यवाचन ठेवले तेव्हा त्याला त्यांनी पाठिंबाच दिला कोल्हापूर सांगली सातारा आणि सोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाचा कवी कविता वाचून गेला पाहिजे हा आमचा अट्टाहास होता महाराष्ट्रातला त्यावेळचा हा सर्वात मोठा काव्यवाचन सोहळा होता आणि राजकुमार यादवने तो यशस्वीपणे राबून दाखवला होता त्यातूनच पुढे विलासकुमार कांबळेने प्रतिनिधी नावाचा एक काव्यसंग्रह काढला आणि गोमांनी तेव्हा चांगलाच पाठिंबा दिला होता . ह्या इव्हेंटमुळे शिवाजी विद्यापीठाचे कँटीन ह्या एका नव्या अड्ड्याची भर पडली आणि कँटीन जवळचा बसस्टॉप हा पोरींना भेटण्याचा स्पॉट ! शिवाजी विद्यापीठाचे कुरण ही प्रेमीजनांच्या कामशास्त्राची त्यावेळी आद्यशाळा होती आणि अर्थातच ती रात्रीची शाळा होती
बीए झाल्यावर काय करायचे हा प्रश्न होता त्यावेळी फ्यूचरॉलॉजी ह्या विषयात मला रस होता आणि विद्यापीठात हा विषयच न्हवता त्यामुळं मी भविष्याकडून थेट भूतकाळात वळल्याने इतिहासाचा ग्रँज्युएट झालो होतो माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयातले सर्व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले होते आणि पुढे काय करायचे ह्या विचाराने भांबावलेला होतो गोमांनी इतिहासातच पोस्ट ग्रॅज्युएट होण्याचा अत्यंत व्यवहारी सल्ला दिला सगळे देशीवादी प्राध्यापक हे अकादमीक बाबत अत्यंत प्रॅक्टिकल असतात ह्या माझ्या निष्कर्षांची सुरवात गोमांच्यापासून झाली जे जे व्यवहारी ते ते न करण्याचा माझा स्वभाव आणि फ्यूचरॉलॉजीत काय करता येईल ह्याचा अंदाज घेणे आणि तत्सम अनेक कारणे ह्यात मी एक वर्ष बरबाद केले त्यामुळे मी जेव्हा वर्षभराने पुन्हा गोमांच्याकडे गेलो तेव्हा ते चांगलेच भडकले मी माझं टॅलेंट वाया घालवतोय असं त्यांना वाटत होतं
ह्या काळात मी ठामपणे देशीवादाच्या विरुद्ध उभा रहायला लागलो होतो आणि ते त्यामुळे मला बघून खुश होण्याऐवजी अस्वस्थच जास्त व्हायला लागले गावातून आलेल्या सर्वांनी देशीवादी असलंच पाहिजे अशी त्यांची धारणा होती कि काय न कळे ! पुढे नेमाडेंनीही तोच राग आलापला होता . त्याकाळात मी वैयक्तिक आयुष्याबाबत कमालीची गुप्तता पाळत असे मी गोव्यातून आलोय ही गोष्टही कोल्हापूरकरांना मी कधी सांगायचो नाही माझ्या मित्रांनाही मी काही सांगायचो नाही कारण ह्या गोष्टींची काही गरज आहे असं मला वाटत नसे ज्या त्या माणसाशी ज्या त्या गोष्टीबाबत बोलावे हा माझा दंडक होता आणि आजही तो बऱ्यापैकी टिकून आहे साहित्यातल्या लोकांशी साहित्याबाबत शैव साधना करणाऱ्यांशी शैव साहित्याबाबत आणि अंडरवर्ल्डवाल्यांशी अंडरवल्डबाबत ! गोमांशी माझे बोलणे हे प्रामुख्याने त्यावेळी मराठी डिपार्टमेंट आणि साहित्य ह्या सन्दर्भातच असे . त्यांचे व्यंकटेश माडगूळकर प्रेम माझ्यासाठी अनाकलनीय होते ह्याचकाळात त्यांचे लक्ष्य महर्षी शिंद्यांच्याकडे गेले आणि माझ्या मते गोमांचे खरे योगदान ह्या संदर्भात आहे मराठीत महर्षी शिंद्यांना जर कुणी यथोचित न्याय दिला असेल तर तो गोमांनी दिला . बसवेश्वर - फुले - शिंदे -शाहू -गांधी - आंबेडकर हे अस्पृश्यतेविरोधी लढ्याचे षडायतंन आहे असे मी मानतो त्यातील शिंदेच्या कार्याला यथोचित न्याय गोमांनी दिला
मुख्य म्हणजे गांधींच्यावर शिंदेंच्या पडलेल्या प्रभावाचे यथोचित मूल्यमापन त्यांनी केले
फ्यूचरॉलॉजीच्या अभ्यासाच्या कसल्याही शक्यता भारतात नाहीत हे कळल्यावर मी मुकाट्याने मराठी विषयात एमए करायचे निश्चित केले आणि पुन्हा गोमांना भेटलो गोमांचा एकच प्रश्न होता "तुला पुढे प्राध्यापकी करायची आहे काय ? बीएला एक विषय आणि एमेला एक विषय करशील तर तुला प्राध्यापकाची नोकरी मिळणार नाही तेव्हा नीट विचार कर " त्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य नीट न कळल्याने एका सणकीपणात मी मराठीत एमए करायचे निश्चित केले त्यांनी मला ऍडमिशन घ्यायला सांगितले मी घेतले नाही
पुढे आणखी एक वर्ष साधना कायम ठेवत टिवल्याबावल्या करून मी त्यांना भेटलो आणि सांगितले कि मी एम ए करणार आहे तर ते तर्काटलेच
" हेच करायचं होत तर आणखी एक वर्ष का बरबाद केलंस "
मी म्हणालो " एक वर्ष मी वाचवेन "
"कसं "
" मी आठ पेपर द्यायचे म्हणतोय "
त्यांना हा शॉक होता
" तू डिपार्टमेन्टमधून चार पेपर द्यावेस उगाच अतिआत्मविश्वासात काहीही निर्णय घेऊ नकोस "
" जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे "
" बाहेरून आठ पेपर्स "
"हो "
" एकही लेक्चर न ऐकता "
" हो काय फरक पडतो "
" तू एक क्रॅक माणूस आहेस हे ऐकून होतो आता खात्री पटली " त्यांच्या आवाजात विषाद आणि उदासी होती . त्यांना खात्रीच होती कि मी अकादमीक आत्महत्या करतोय
" ठीक आहे " त्यांनी उडवलेले खांदे दीर्घकाळ माझ्या लक्ष्यात राहिले त्यांना माझी काळजी वाटत होती इतिहासाचे पेपर मी केवळ लिहायचा कंटाळा आला म्हणून सोडले अशी त्यावेळी अफवा होती जी चुकीची होती पण त्यांच्यापर्यंत पोहचली होती त्यामुळेही मी मराठीवेळी असं काही पुन्हा करेन अशी भीतीही त्यांना वाटत होती
मग त्यांनी मला क्लार्ककडं पाठवलं मला आता असं वाटतं कि माझं त्यावेळचं वागणं अत्यंत रुड होतं हा कठोरपणा साधनेतून ड्राय झाल्यामुळं आला होता काय ?
पुढे मी आठ पेपर दिले आणि त्यातून एक भलतंच त्रांगडं उदभवलं ते खरं कि खोटं हे मला विद्यापीठानं कधीही सांगितलं नाही हे त्रांगडं युनिवर्सिटी टॉपरचं होतं मी एकाच वर्षी आठ पेपर देऊन तेही बाहेरून कदाचित सर्वाधिक गुण प्राप्त केले असावेत गोमांनी मला बोलावून हे सांगितलं कि असं काहीतरी घडलं आहे पण तुला खरोखरच जास्त मार्क्स आहेत कि नाहीत हे कन्फर्म करतो पण यदाकदाचित हे सत्य असेल तर तू बाहेरून बसल्याने तुला गोल्ड मेडल मिळणार नाही मी म्हणालो ह्याने मला मुळात फरकच पडत नाही ते म्हणाले तुला कशानेच काही फरक पडत नाही पण कल्पना द्यावी म्हणून सांगतोय .
नंतर संजय सुतारनं मला सांगितलं कि त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत तर विलास कांबळेनं मला सांगितलं कि तुला प्रत्यक्षात एक गुण ज्यादा आहे मी ह्यानंतर चौकशीच्या भानगडीत पडलोच नाही अगदी आजतागायत !
पुढे मला फेलोशिप मिळून मी मुंबईत आलो तेव्हा मात्र गोमा आनंदित झाले मी सरोजिनी वैद्यांच्या हाती सुरक्षित आहे ह्याची ग्वाही त्यांनी दिली
पुढे गोमा मला भेटले ते मला पुरस्कार भेटला तेव्हा ! मी पुरस्कार कसा काय स्वीकारला हा त्यांचा प्रश्न होता तेव्हा मी त्यांना म्हणालो कि आयुष्यात एक सरकारी एक खाजगी पुरस्कार स्वीकारून काय वाटतं ते मला बघायचं होतं एका भारतीयला राज्य मिळाला तेव्हा सरकारी मिळाला तेव्हा काय वाटते ते बघितले आणि आता हा खाजगी ह्यानंतर मी पुरस्कार स्वीकारणार नाही माझ्या ह्या उत्तराने त्यांना नेमकं काय वाटले ते कळालं नाही पुरस्कार घेतांना मी केलेलं भाषण लोकांनी पाच मिन्टही ऐकून घेतलं नाही मराठी साहित्याप्रमाणे पुढे कसे राजकीय पक्ष तयार झाले ह्याची थेरी मी मांडत होतो तर ऑडियन्समधून भाषण थांबवाचे नारे सुरु झाले मी भाषण थांबवलं पुढे तेंडुलकरांनी प्रेक्षकांना नवीन लेखक काय म्हणतो हे तुम्ही ऐकायला हवं होतं वैग्रे उपदेश केला
मी सभारंभानंतर गोमांना भेटलो ते आता थकायला लागलेत असं वाटलं त्यांना मी जे बोललो ते अजिबातच आवडले न्हवते मात्र खडे बोल त्यांनी ऐकवले नाहीत
मी पाहिलेले ते शेवटचे गोमा होते महर्षी शिंदेंवरचे काम पूर्ण करूनच मी मरेन असे ते तेव्हा म्हणाले होते त्यांच्या डोक्यात शिंद्यांच्याविषयी बरेच काही होते ते सगळंच पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही मराठी विनोदाला सैद्धांतिक बैठक देण्याचा त्यांचा प्रयत्न असाधारण होता मात्र जीवनातून सहज आलेला विनोद हाच खरा विनोद जसा कोसलातला विनोद त्याउलट विनोदासाठी आलेला विनोद मात्र ते दुय्यम मानत ह्यातला विरोधाभास स्पष्ट होता जर त्यांचा सिद्धांत स्वीकारला तर विनोद हा स्वतंत्र व स्वायत्त वाङ्मयप्रकार म्हणून अधोरेखित होत न्हवता प्रत्यक्षात हास्यात्मिका अस्तित्वात होती व आहे फार्स होता व आहे
गोमा कसे शिकवायचे हे मला माहित नाही कारण त्यांच्या आयुष्यात मी आणि माझ्या आयुष्यात ते कायमच एक्स्टर्नल राहिले डिपार्टमेंट एक पण अस्तित्व एक्स्टर्नल ! हा एक्सटर्नलनेस आता कायमचा सम्पला .
श्रीधर तिळवे नाईक
गो मा पवारांचं काय करायचं हा प्रश्न मला कधीच सुटला नाही आणि बहुधा त्यांनाही माझं काय करायचं हे कळलं नसावं . गो मांचे नाव मी प्रथम ऐकले ते पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप ह्या चर्चासत्राच्या निमित्ताने ! ह्या चर्चासत्राचे पडसाद त्यावेळी कोल्हापुरातील डाव्या चळवळीत फारच उमटले होते नेमाडेंचा संरक्षक तट ही उपाधी त्यावेळी चंद्रशेखर जहागीरदार व गो मा पवार ह्यांना मिळाली होती
पुढे माझा थेट संबंध आला तो विलास कांबळे आणि राजकुमार यादव ह्या दोन मित्रांच्यामुळे ! मात्र प्रत्यक्षात माझे बोलणे जास्त झाले नाही राजकुमार यादव मला कुठेही न्हेताना "तोंड उचकटणार नसशील तर ये " ह्या अटीवर न्ह्यायचा . त्याकाळात वयाचा जोश जास्त असल्यानं आडवं जाण्याची वृत्ती भरपूर होती वादविवादात खेचायचं आणि युक्तिवादात फसवायचं अशी माझी त्यावेळची स्ट्रॅटेजी असायची आणि त्यात सत्याचा शोध कमी आणि बुद्धीचा अहंकारच जास्त होता तारुण्याचा मूर्खपणा असं आता त्याला म्हणता येईल त्यामुळे पहिल्या मीटिंगमध्ये मी खालमुंडी पाताळधुंडी करत बसून राहिलो . पहिल्या भेटीत मला जर काय आवडलं असेल तर सरांचे शुभ्र हसू . दात मोठे असूनही ते त्यांना इतके शोभत होते कि गोमा म्हणजे त्यांचे ते हसू अशी प्रतिमाच माझ्या डोक्यात बसली होती
पुढे आम्ही विद्यापीठात एक महाकाव्यवाचन ठेवले तेव्हा त्याला त्यांनी पाठिंबाच दिला कोल्हापूर सांगली सातारा आणि सोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाचा कवी कविता वाचून गेला पाहिजे हा आमचा अट्टाहास होता महाराष्ट्रातला त्यावेळचा हा सर्वात मोठा काव्यवाचन सोहळा होता आणि राजकुमार यादवने तो यशस्वीपणे राबून दाखवला होता त्यातूनच पुढे विलासकुमार कांबळेने प्रतिनिधी नावाचा एक काव्यसंग्रह काढला आणि गोमांनी तेव्हा चांगलाच पाठिंबा दिला होता . ह्या इव्हेंटमुळे शिवाजी विद्यापीठाचे कँटीन ह्या एका नव्या अड्ड्याची भर पडली आणि कँटीन जवळचा बसस्टॉप हा पोरींना भेटण्याचा स्पॉट ! शिवाजी विद्यापीठाचे कुरण ही प्रेमीजनांच्या कामशास्त्राची त्यावेळी आद्यशाळा होती आणि अर्थातच ती रात्रीची शाळा होती
बीए झाल्यावर काय करायचे हा प्रश्न होता त्यावेळी फ्यूचरॉलॉजी ह्या विषयात मला रस होता आणि विद्यापीठात हा विषयच न्हवता त्यामुळं मी भविष्याकडून थेट भूतकाळात वळल्याने इतिहासाचा ग्रँज्युएट झालो होतो माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयातले सर्व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले होते आणि पुढे काय करायचे ह्या विचाराने भांबावलेला होतो गोमांनी इतिहासातच पोस्ट ग्रॅज्युएट होण्याचा अत्यंत व्यवहारी सल्ला दिला सगळे देशीवादी प्राध्यापक हे अकादमीक बाबत अत्यंत प्रॅक्टिकल असतात ह्या माझ्या निष्कर्षांची सुरवात गोमांच्यापासून झाली जे जे व्यवहारी ते ते न करण्याचा माझा स्वभाव आणि फ्यूचरॉलॉजीत काय करता येईल ह्याचा अंदाज घेणे आणि तत्सम अनेक कारणे ह्यात मी एक वर्ष बरबाद केले त्यामुळे मी जेव्हा वर्षभराने पुन्हा गोमांच्याकडे गेलो तेव्हा ते चांगलेच भडकले मी माझं टॅलेंट वाया घालवतोय असं त्यांना वाटत होतं
ह्या काळात मी ठामपणे देशीवादाच्या विरुद्ध उभा रहायला लागलो होतो आणि ते त्यामुळे मला बघून खुश होण्याऐवजी अस्वस्थच जास्त व्हायला लागले गावातून आलेल्या सर्वांनी देशीवादी असलंच पाहिजे अशी त्यांची धारणा होती कि काय न कळे ! पुढे नेमाडेंनीही तोच राग आलापला होता . त्याकाळात मी वैयक्तिक आयुष्याबाबत कमालीची गुप्तता पाळत असे मी गोव्यातून आलोय ही गोष्टही कोल्हापूरकरांना मी कधी सांगायचो नाही माझ्या मित्रांनाही मी काही सांगायचो नाही कारण ह्या गोष्टींची काही गरज आहे असं मला वाटत नसे ज्या त्या माणसाशी ज्या त्या गोष्टीबाबत बोलावे हा माझा दंडक होता आणि आजही तो बऱ्यापैकी टिकून आहे साहित्यातल्या लोकांशी साहित्याबाबत शैव साधना करणाऱ्यांशी शैव साहित्याबाबत आणि अंडरवर्ल्डवाल्यांशी अंडरवल्डबाबत ! गोमांशी माझे बोलणे हे प्रामुख्याने त्यावेळी मराठी डिपार्टमेंट आणि साहित्य ह्या सन्दर्भातच असे . त्यांचे व्यंकटेश माडगूळकर प्रेम माझ्यासाठी अनाकलनीय होते ह्याचकाळात त्यांचे लक्ष्य महर्षी शिंद्यांच्याकडे गेले आणि माझ्या मते गोमांचे खरे योगदान ह्या संदर्भात आहे मराठीत महर्षी शिंद्यांना जर कुणी यथोचित न्याय दिला असेल तर तो गोमांनी दिला . बसवेश्वर - फुले - शिंदे -शाहू -गांधी - आंबेडकर हे अस्पृश्यतेविरोधी लढ्याचे षडायतंन आहे असे मी मानतो त्यातील शिंदेच्या कार्याला यथोचित न्याय गोमांनी दिला
मुख्य म्हणजे गांधींच्यावर शिंदेंच्या पडलेल्या प्रभावाचे यथोचित मूल्यमापन त्यांनी केले
फ्यूचरॉलॉजीच्या अभ्यासाच्या कसल्याही शक्यता भारतात नाहीत हे कळल्यावर मी मुकाट्याने मराठी विषयात एमए करायचे निश्चित केले आणि पुन्हा गोमांना भेटलो गोमांचा एकच प्रश्न होता "तुला पुढे प्राध्यापकी करायची आहे काय ? बीएला एक विषय आणि एमेला एक विषय करशील तर तुला प्राध्यापकाची नोकरी मिळणार नाही तेव्हा नीट विचार कर " त्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य नीट न कळल्याने एका सणकीपणात मी मराठीत एमए करायचे निश्चित केले त्यांनी मला ऍडमिशन घ्यायला सांगितले मी घेतले नाही
पुढे आणखी एक वर्ष साधना कायम ठेवत टिवल्याबावल्या करून मी त्यांना भेटलो आणि सांगितले कि मी एम ए करणार आहे तर ते तर्काटलेच
" हेच करायचं होत तर आणखी एक वर्ष का बरबाद केलंस "
मी म्हणालो " एक वर्ष मी वाचवेन "
"कसं "
" मी आठ पेपर द्यायचे म्हणतोय "
त्यांना हा शॉक होता
" तू डिपार्टमेन्टमधून चार पेपर द्यावेस उगाच अतिआत्मविश्वासात काहीही निर्णय घेऊ नकोस "
" जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे "
" बाहेरून आठ पेपर्स "
"हो "
" एकही लेक्चर न ऐकता "
" हो काय फरक पडतो "
" तू एक क्रॅक माणूस आहेस हे ऐकून होतो आता खात्री पटली " त्यांच्या आवाजात विषाद आणि उदासी होती . त्यांना खात्रीच होती कि मी अकादमीक आत्महत्या करतोय
" ठीक आहे " त्यांनी उडवलेले खांदे दीर्घकाळ माझ्या लक्ष्यात राहिले त्यांना माझी काळजी वाटत होती इतिहासाचे पेपर मी केवळ लिहायचा कंटाळा आला म्हणून सोडले अशी त्यावेळी अफवा होती जी चुकीची होती पण त्यांच्यापर्यंत पोहचली होती त्यामुळेही मी मराठीवेळी असं काही पुन्हा करेन अशी भीतीही त्यांना वाटत होती
मग त्यांनी मला क्लार्ककडं पाठवलं मला आता असं वाटतं कि माझं त्यावेळचं वागणं अत्यंत रुड होतं हा कठोरपणा साधनेतून ड्राय झाल्यामुळं आला होता काय ?
पुढे मी आठ पेपर दिले आणि त्यातून एक भलतंच त्रांगडं उदभवलं ते खरं कि खोटं हे मला विद्यापीठानं कधीही सांगितलं नाही हे त्रांगडं युनिवर्सिटी टॉपरचं होतं मी एकाच वर्षी आठ पेपर देऊन तेही बाहेरून कदाचित सर्वाधिक गुण प्राप्त केले असावेत गोमांनी मला बोलावून हे सांगितलं कि असं काहीतरी घडलं आहे पण तुला खरोखरच जास्त मार्क्स आहेत कि नाहीत हे कन्फर्म करतो पण यदाकदाचित हे सत्य असेल तर तू बाहेरून बसल्याने तुला गोल्ड मेडल मिळणार नाही मी म्हणालो ह्याने मला मुळात फरकच पडत नाही ते म्हणाले तुला कशानेच काही फरक पडत नाही पण कल्पना द्यावी म्हणून सांगतोय .
नंतर संजय सुतारनं मला सांगितलं कि त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत तर विलास कांबळेनं मला सांगितलं कि तुला प्रत्यक्षात एक गुण ज्यादा आहे मी ह्यानंतर चौकशीच्या भानगडीत पडलोच नाही अगदी आजतागायत !
पुढे मला फेलोशिप मिळून मी मुंबईत आलो तेव्हा मात्र गोमा आनंदित झाले मी सरोजिनी वैद्यांच्या हाती सुरक्षित आहे ह्याची ग्वाही त्यांनी दिली
पुढे गोमा मला भेटले ते मला पुरस्कार भेटला तेव्हा ! मी पुरस्कार कसा काय स्वीकारला हा त्यांचा प्रश्न होता तेव्हा मी त्यांना म्हणालो कि आयुष्यात एक सरकारी एक खाजगी पुरस्कार स्वीकारून काय वाटतं ते मला बघायचं होतं एका भारतीयला राज्य मिळाला तेव्हा सरकारी मिळाला तेव्हा काय वाटते ते बघितले आणि आता हा खाजगी ह्यानंतर मी पुरस्कार स्वीकारणार नाही माझ्या ह्या उत्तराने त्यांना नेमकं काय वाटले ते कळालं नाही पुरस्कार घेतांना मी केलेलं भाषण लोकांनी पाच मिन्टही ऐकून घेतलं नाही मराठी साहित्याप्रमाणे पुढे कसे राजकीय पक्ष तयार झाले ह्याची थेरी मी मांडत होतो तर ऑडियन्समधून भाषण थांबवाचे नारे सुरु झाले मी भाषण थांबवलं पुढे तेंडुलकरांनी प्रेक्षकांना नवीन लेखक काय म्हणतो हे तुम्ही ऐकायला हवं होतं वैग्रे उपदेश केला
मी सभारंभानंतर गोमांना भेटलो ते आता थकायला लागलेत असं वाटलं त्यांना मी जे बोललो ते अजिबातच आवडले न्हवते मात्र खडे बोल त्यांनी ऐकवले नाहीत
मी पाहिलेले ते शेवटचे गोमा होते महर्षी शिंदेंवरचे काम पूर्ण करूनच मी मरेन असे ते तेव्हा म्हणाले होते त्यांच्या डोक्यात शिंद्यांच्याविषयी बरेच काही होते ते सगळंच पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही मराठी विनोदाला सैद्धांतिक बैठक देण्याचा त्यांचा प्रयत्न असाधारण होता मात्र जीवनातून सहज आलेला विनोद हाच खरा विनोद जसा कोसलातला विनोद त्याउलट विनोदासाठी आलेला विनोद मात्र ते दुय्यम मानत ह्यातला विरोधाभास स्पष्ट होता जर त्यांचा सिद्धांत स्वीकारला तर विनोद हा स्वतंत्र व स्वायत्त वाङ्मयप्रकार म्हणून अधोरेखित होत न्हवता प्रत्यक्षात हास्यात्मिका अस्तित्वात होती व आहे फार्स होता व आहे
गोमा कसे शिकवायचे हे मला माहित नाही कारण त्यांच्या आयुष्यात मी आणि माझ्या आयुष्यात ते कायमच एक्स्टर्नल राहिले डिपार्टमेंट एक पण अस्तित्व एक्स्टर्नल ! हा एक्सटर्नलनेस आता कायमचा सम्पला .
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment