सुशांतची आत्महत्या , उत्तराधुनिकता आणि सत्याचे तीन टप्पे श्रीधर तिळवे नाईक
उत्तराधुनिकतेची सुरवात झाली संरचनावादाने आणि त्याचे पहिले सिद्धांतन नित्शेचे होते त्याने सर्वच रचित असते हा सिद्धांत मांडला संरचनावादाने विशेषतः फर्डिनंड द सस्यूरने हा रचित सिद्धांत भाषेला लागू केला आणि क्लॉड लेवी स्ट्राउसने तो संपूर्ण समाजाला लागू केला सामाजिक संस्था ह्याही रचना म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या आणि इतिहासही !
ह्याला शह दिला तो विरचनावादाने हाही सिद्धांत देरिदाने प्रथम भाषिक सिद्धांत म्हणूनच मांडला सरंचनाची विरचना करून त्यातून सत्य शोधण्याचा हा खेळ होता ह्या खेळात अर्थ आणि सत्य सतत विचलित होत असतात हे गृहीतक होते
विज्ञानाने वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधता येते अशी जी मांडणी केली होती तिला हा छेद होता
१९७० नंतर विरचना इतकी टोकाला गेली कि मुळात सत्य नावाचे काही अस्तित्वात असते का असा प्रश्न निर्माण झाला आणि आपल्या हातात सत्य लागत नाही तर सत्याची रचिते आणि विरचिते हातात लागतात असा विचार पुढे येऊ लागला ह्या विचारांचे समकालीन निर्माण म्हणजे पोस्ट्रुथ एज
हा विचार भारतीय परंपरेला नवा नाही नागार्जुनने आणि शंकराचार्यानी असेच काही मांडले आहे आणि पुढे ह्यातून राशोमान सारखा चित्रपट निर्माण झाला आहे
सुशांतसिंगच्या धक्कादायक मृत्यूनंतर पोलिसांनी जे वैज्ञानिक पद्धत वापरून सत्य शोधतात असा विश्वास आहे
सुशांतसिंगने आत्महत्या केली हे सत्य शोधून सादर केले
पण अनेकांना हे पटले नाही आणि अनेकांची अनेक रचिते पुढे आली मीडिया सध्या रचिताला ऍडिक्ट झाला असल्याने रोज एक नवे रचित तो सादर करत असतो सत्य शोधण्यापेक्षा सत्य रचणे ही मीडियाची आवश्यकता बनून गेली आहे साहजिकच रचितांचे एक वातावरण बनवले गेले प्रथम ही आत्महत्या आहे पण ह्या आत्महत्येचे कारण म्हणून
१ फिल्म इंडस्ट्रीतील आप्तवाद
२ रिया चक्रवर्ती
ही दोन प्रमुख कारणे पुढे आणली गेली ह्यामागे जेनुइन दुःख किती , स्वतःच्या अपयशातून आलेली उद्विग्नता किती आणि सायकॉलॉजिकल कोव्हीड झाल्याने आलेली सुरसुरी आणि फुरफुरी किती हे सांगणे कठीण ! ही एक पोस्टमॉडर्न कंडिशन होती आणि तिच्यामागे नवीन आलेल्या चिन्हयुगीय मीडियाचा फार मोठा वाटा होता कुत्रं माणसावर मुतलं तर ती घटना पण माणूस कुत्र्यावर मुतला तर ती न्यूज ही मानसिकता असलेल्या काही पत्रकारांनी गेली काही वर्षे अशी कुत्र्यावर मुतणारी माणसे आणि घटना तयार करायला सुरवात केलीये कारण घटनेला टीआरपी मिळत नाही तर न्यूजला टीआरपी मिळतो हा त्यांना आलेला अनुभव मिडीयाच्या बाहेर बसून टीका करणं फार सोपं प्रत्यक्षात मीडीया चालवणं फार अवघड पूर्वी घटनाच न्यूज असायची आता घटनेत बॉलिवूड टाकावं लागत नाहीतर ऑडियन्स मिळत नाही ह्याला मीडियाचं बॉलीवूडीकरण म्हणतात ह्या मेडिया बॉलिवूडचा सुपरस्टार अर्णब गोस्वामी ज्याला मनमोहन देसाईटाइप आपण काही केलं नाही तर चालणार नाही हे पक्के माहीत आहे तर नासिरुद्दीन शाह रावीशकुमार वा हिंदू जो पॅरलल सिनेमात सुपरस्टार आहे आर्ट सिनेमा म्हणजे ह्यांच्याबाबाहेर राहून पोर्टल वा फेसबुक व्हाटसप वा लिंक वा ग्रुप चालवणारे लोक ज्यांना आपलं पोर्टल आर्टिस्टिक बनवण्याऐवजी पॉप्युलर बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे अपवाद आहेत म्हणजे सुनील तांबे , कीर्तिकुमार शिंदे , येशू पाटील ,अक्षरनामा , वायर , जागल्या ,साधना , सारखे जेन्युईन लोक वा खाती पण हे फार थोडे आहेत आणि बहुतेक डावे आहेत किंवा गांधीवादी
सुशांतच्या प्रकरणाचा आधारच बॉलिवूड असल्याने बॉलीवूडीकरण टोकाला पोहचले आहे ह्यात महेश भट ह्यांनी इस्लाम स्वीकारल्याने हिंदुत्ववादी त्यांच्याविरुद्ध आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीद्वारा त्यांना गोत्यात आणता आलं तर ते हिंदुत्ववाद्यांना हवं आहे महेश भट काय असावेत ह्याचा काल्पनिक अंदाज बांधून मी अडा हॉका बाना सुना ह्या कादंबरीत शंकर भट हे काल्पनिक पात्र मी समांतर नायक म्हणून तयार केले होते ते खरे वाटावे अशा हालचाली महेश भट ह्यांनी केल्याने त्यांच्या बोल्डनेसच्या मुसक्या बांधाव्यात असं अनेकांना वाटतं पाश्च्यात्त्य देशात मुलीचे चुम्बन घेणारा पुरुष टीकेला पात्र होणार नाही पण भारतात महेश भटानी हे केल्याने तो समाजशत्रू वाटणे हे स्वाभाविक आहे कारण चुंबन कामूकच असतं असा भारतीयांचा आग्रह आहे आणि ह्याबाबतचे वैज्ञानिक सत्य भारतीयांच्या बाजूने आहे गालावरची पप्पी कामुक नसते पण चुंबनाविषयी असं म्हणता येणार नाही मुलगी वयात येईपर्यंत चुंबन बापाचं प्रेम असू शकतं (ह्याचीही बापाकडून गॅरेंटी नाहीच ) पण मुलगी वयात आल्यानंतर चुंबन लैंगिकच बनतं त्यामुळे महेश भट सांस्कृतिक शत्रू वाटणे हे नैसर्गिक आहे रियाने सुशांतच्या घरून निघाल्यावर महेश भट ह्यांना फोन केल्याने व्हाटसप केल्याने महेश भटांना टार्गेट करणे सोपे झाले शेवटी मागचे हिशेब चुकते करायचेच होते ते ह्या निमित्ताने चुकते करण्याची संधी मिळाली साहजिकच रिया चक्रवर्ती नावाचे शेपूट दाबले गेले . महेश भट हे बॉलिवूडमधले सर्वात हुशार व्यक्तिमत्व आहे मी एकेकाळी त्यांच्यासाठी चित्रपट लेखन करणार होतो आणि ती फिल्म आशुतोष गोवारीकर डिरेक्ट करणार होता आणि प्लस चॅनेलने १० कि १२ फिल्म्स बनवण्याचा जो घाट घातला होता त्यात ती फिल्म होती त्यावेळीही त्यांची बोल्ड मोरॅलीटी इंडस्ट्रीला झेपत न्हवती शेवटी ते रजनीश ह्यांचे शिष्य होते आजही परिस्थिती बदललीये असं वाटत नाही साहजिकच रिया चक्रवर्तीबरोबरचे त्यांचे फोटो ज्यातले अनेक मॉर्फ केलेले होते लोकांना कन्विन्सिंग वाटले ह्याला जोड मिळाली ती नंतर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाने एनएसडी आणि अंडरवर्ल्ड ह्यांच्यामुळे ह्यांची एंट्री झाली नासिरुद्दीन शाहची ऍक्टिंग तो ड्रग घेत असल्याने लय भारी होते अशी गैरसमजूत असलेल्या महामूर्खांनी ही लत अभिनेत्यांच्यात पसरवली संजय दत्तने तिला ग्लॅमर दिले इxxx खानसारख्यांनी स्टॅबिलिटी मॉडेलिंगने तिचा महापूर निर्माण केला ह्यात सुशांतसिंग राजपूत सापडलाय अशा बातम्या कानावर येत होत्या आणि ह्या अंगाने रियावर आरोप होऊ लागले
ह्या रचितांची खंडने करणे तिच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला असल्याने आवश्यक बनले आणि रिया चक्रवर्तीनें तिच्याविरुद्धच्या रचितांची विरचना करणारी मुलाखत राजदीप सरदेसाई ह्यांना दिली ही एक अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी होती
रियाने सुशांतच्या ड्रग्ज सेवनाविषयीच्या अफवा खऱ्या आहेत असं इन्डायरेक्ट सुचवल्याने ड्र्ग्जमाफिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिला टार्गेट करणार हे उघडच आहे ह्याचबरोबर तिने आप्तवादाला काही भावच दिला नाही फक्त काही इशारे केले त्यामुळे रियाच्या विरचनेची विरचना करणे आवश्यक बनले हे सगळे प्रकरण म्हणजे ज्याला देरिदाने संहितेतून संहिता तयार होणे टेक्सच्युअलायझेशन म्हंटले होते तसे होते संरचना मग विरचना मग त्या वीरचनेची विरचना ह्यातल्या काही वीररचना जोश और ज्वानीसे भरपूर तर काही ररचना र्रर्रर्र करणाऱ्या ऍक करणाऱ्या !
रियाने उपस्थित केलेला एक प्रश्न सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तिने सुशांतला ब्लॉक केल्यावर काय घडले ? जोपर्यंत हे खर्रर्रखुर्रर्र सापडत नाही तोवर सर्व अफवा आहेत प्रश्न इतकाच आहे ह्यातून फाँल्स व्हिक्टीम बनवला जाणार कि खर्राखुर्रा शोधला जाणार ? आणि हा प्रश्न पोस्ट्रुथ आहे सत्य रचित असेल तर पुरावे रचून कुणालाही शिक्षा होणार कि खर्ऱ्याखुर्ऱ्या पुरावाच्या आधारे खरा आरोपी शोधला जाणार ?
माझा ह्या देशातल्या पोलीस आणि तत्सम इन्वेस्टीगेशन एजन्सीजवरचा विश्वास अजूनही उडालेला नाही असं रियाने सांगितले आहे मी तिच्याशी सहमत आहे
पोस्ट्रुथ एजमध्ये सत्य रचित असल्याने सत्य रचलं जातं आणि रचलेल्या सत्याच्या आधाराने सत्ता चालवण्याचा प्रयत्न असतो भारतात हे नवीन नाही भारतात सर्वच ब्राम्हणधर्मी राजवटी ह्या पोस्ट्रुथ होत्याच मुळात धर्म ही संस्थाच पोस्ट्रुथ असते आणि मोक्ष ट्रुथ साहजिकच कुठलेही धर्मराज्य हे स्वभावतः पोस्ट्रुथ असते म्हणून तर सुरवातीच्या काळात शैव जैन बौद्ध दर्शन वा धम्म हा शब्द वापरत होते शिवाने दर्शन तर महावीर बुद्धाने धम्म सांगितलाय धर्म न्हवे धम्माचा अर्थ मोक्षाकडे / कैवल्याकडे /निर्वाणाकडे घेऊन जाणारे दर्शन दुर्देवाने संस्कृतचे प्रभुत्व वाढत गेले तसे ह्यांच्या दर्शनाचाही /धम्माचाही धर्म बनवला गेला आपल्याकडच्या लोकांना हे अजूनही नीट कळत नाही त्यातून बरेच घोळ होतात आणि कधीकधी मुद्दामहून घातले जातात मला आशा आहे कि असे काही पोस्ट्रुथ घोळ ह्या प्रकरणात घातले जाणार नाहीत राजकीय क्रांत्या आणि धर्मराज्ये सर्वात प्रथम स्वतःच्या अपत्यांना खातात फ्रेंच / कम्म्युनिस्ट क्रांतीतला नरसंहार आणि अलीकडे ज्यांनी सत्ता काँग्रेसकडून खेचून आणली ते भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान लोक ज्यात अडवाणी यशवंत सिन्हा वैग्रे येतात ह्यांचे सध्याच्या सत्तेने चालवलेले हाल हे उत्तम उदाहरण आहेत हे सगळेच पायाचे बळी होते कि काय अशीही शंका आहे असे असेल तर पोस्ट ट्रुथ भारतातही ऑन झाले असे म्हणावे लागेल अशा पार्श्वभूमीवर असे काही नाही हे सिद्ध करण्याची सर्वोत्तम संधी ह्या प्रकरणात ह्या सरकारला आहे
माझा स्वतःचा उत्तराधुनिकतेवर विश्वास नाही त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीद्वारे सत्य शोधता येते असा माझा विश्वास आहे मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या आहे असा निर्वाळा दिला होता पण ह्याहून काही वेगळे सत्य असेल आणि वैज्ञानिक इन्वेस्टीगेशगनच्या आधारे ते सिद्ध करणारे पुरावे सादर केले जाणार असतील तर त्यांना स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे
सर्वाधिक जो नैतिक असतो
त्याच्यावर असतात सर्वाधिक कॅमेरे
शस्त्रासारखे रोखलेले
त्याची हत्या होणे गरजेचे असते
कारण तो भ्रष्ट आचाराला धोखा असतो
आणि त्याचे निर्मूलन भ्रष्टाचारी लोकांसाठी
जीवघेणी आवश्यकता असते
तो नैतिक टाचणी असतो
जी टोचत राहते
जिच्यामुळे आपले फुगे फुटतील
अशी फुगेवाल्यांना भीती असते
नैतिक माणूस नकोच असतो कुणाला
आणि म्हणूनच त्याच्या मरणाची सर्व वाट पहात असतात
आणि जेव्हा तो मरत नाही लवकर
असे वाटते तेव्हा तो मारला जातो
गांधींसारखा
नैतिक माणूस थोडाही चुकला कि
त्याची बातमी होते
मीडिया जणू काही आपण खूप नैतिकतेचे पुजारी आहोत
अशा थाटात त्याच्यावर तुटून पडतो
म्हणूनच नैतिक माणसाच्या नावाने
तो चुकला
अशा अफवा पसरत असतात
वारंवार सतत थकत
इतक्या कि
नैतिक माणसाला शेवटी बातम्या साईडलाईन करण्याचे
यंत्र बसवून घ्यावे लागते
किंवा तयार करावे लागतात
नैतिक माणसाची सगळ्या समाजालाच भीती का ?
तो फक्त क्रुसिफाय झाल्यावरच त्याच्यावरती चर्चा का ?
वर्तमानात तो आपले आयुष्य बदलेल
अशी भीती वाटते का
मग बदला ना
होऊन जाऊ दे
एकदा हा अख्खा समाजच नैतिक करून बघूया
बघूया तरी खरोखर अनैतिकतेनेच सिस्टीम चालते
हे सत्य आहे का
चला
बदल घडवूया
स्वतःत आणि जगात
आतल्या भयावर मात करूया
जग बदलूया
चला बदल घडवूया
जग बदलूया
श्रीधर तिळवे नाईक
पहिला आनंदाश्रू उजव्या डोळ्यातून
आणि पहिला दुःखाश्रु डाव्या डोळ्यातून
येतो
म्हणूनच बहुदा डाव्यांना दुःख लवकर कळतं
आता मला कळतंय
मी चुकीच्या डोळ्याने तुला
डोळा मारायला नको होता
उत्तराधुनिकतेची सुरवात झाली संरचनावादाने आणि त्याचे पहिले सिद्धांतन नित्शेचे होते त्याने सर्वच रचित असते हा सिद्धांत मांडला संरचनावादाने विशेषतः फर्डिनंड द सस्यूरने हा रचित सिद्धांत भाषेला लागू केला आणि क्लॉड लेवी स्ट्राउसने तो संपूर्ण समाजाला लागू केला सामाजिक संस्था ह्याही रचना म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या आणि इतिहासही !
ह्याला शह दिला तो विरचनावादाने हाही सिद्धांत देरिदाने प्रथम भाषिक सिद्धांत म्हणूनच मांडला सरंचनाची विरचना करून त्यातून सत्य शोधण्याचा हा खेळ होता ह्या खेळात अर्थ आणि सत्य सतत विचलित होत असतात हे गृहीतक होते
विज्ञानाने वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधता येते अशी जी मांडणी केली होती तिला हा छेद होता
१९७० नंतर विरचना इतकी टोकाला गेली कि मुळात सत्य नावाचे काही अस्तित्वात असते का असा प्रश्न निर्माण झाला आणि आपल्या हातात सत्य लागत नाही तर सत्याची रचिते आणि विरचिते हातात लागतात असा विचार पुढे येऊ लागला ह्या विचारांचे समकालीन निर्माण म्हणजे पोस्ट्रुथ एज
हा विचार भारतीय परंपरेला नवा नाही नागार्जुनने आणि शंकराचार्यानी असेच काही मांडले आहे आणि पुढे ह्यातून राशोमान सारखा चित्रपट निर्माण झाला आहे
सुशांतसिंगच्या धक्कादायक मृत्यूनंतर पोलिसांनी जे वैज्ञानिक पद्धत वापरून सत्य शोधतात असा विश्वास आहे
सुशांतसिंगने आत्महत्या केली हे सत्य शोधून सादर केले
पण अनेकांना हे पटले नाही आणि अनेकांची अनेक रचिते पुढे आली मीडिया सध्या रचिताला ऍडिक्ट झाला असल्याने रोज एक नवे रचित तो सादर करत असतो सत्य शोधण्यापेक्षा सत्य रचणे ही मीडियाची आवश्यकता बनून गेली आहे साहजिकच रचितांचे एक वातावरण बनवले गेले प्रथम ही आत्महत्या आहे पण ह्या आत्महत्येचे कारण म्हणून
१ फिल्म इंडस्ट्रीतील आप्तवाद
२ रिया चक्रवर्ती
ही दोन प्रमुख कारणे पुढे आणली गेली ह्यामागे जेनुइन दुःख किती , स्वतःच्या अपयशातून आलेली उद्विग्नता किती आणि सायकॉलॉजिकल कोव्हीड झाल्याने आलेली सुरसुरी आणि फुरफुरी किती हे सांगणे कठीण ! ही एक पोस्टमॉडर्न कंडिशन होती आणि तिच्यामागे नवीन आलेल्या चिन्हयुगीय मीडियाचा फार मोठा वाटा होता कुत्रं माणसावर मुतलं तर ती घटना पण माणूस कुत्र्यावर मुतला तर ती न्यूज ही मानसिकता असलेल्या काही पत्रकारांनी गेली काही वर्षे अशी कुत्र्यावर मुतणारी माणसे आणि घटना तयार करायला सुरवात केलीये कारण घटनेला टीआरपी मिळत नाही तर न्यूजला टीआरपी मिळतो हा त्यांना आलेला अनुभव मिडीयाच्या बाहेर बसून टीका करणं फार सोपं प्रत्यक्षात मीडीया चालवणं फार अवघड पूर्वी घटनाच न्यूज असायची आता घटनेत बॉलिवूड टाकावं लागत नाहीतर ऑडियन्स मिळत नाही ह्याला मीडियाचं बॉलीवूडीकरण म्हणतात ह्या मेडिया बॉलिवूडचा सुपरस्टार अर्णब गोस्वामी ज्याला मनमोहन देसाईटाइप आपण काही केलं नाही तर चालणार नाही हे पक्के माहीत आहे तर नासिरुद्दीन शाह रावीशकुमार वा हिंदू जो पॅरलल सिनेमात सुपरस्टार आहे आर्ट सिनेमा म्हणजे ह्यांच्याबाबाहेर राहून पोर्टल वा फेसबुक व्हाटसप वा लिंक वा ग्रुप चालवणारे लोक ज्यांना आपलं पोर्टल आर्टिस्टिक बनवण्याऐवजी पॉप्युलर बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे अपवाद आहेत म्हणजे सुनील तांबे , कीर्तिकुमार शिंदे , येशू पाटील ,अक्षरनामा , वायर , जागल्या ,साधना , सारखे जेन्युईन लोक वा खाती पण हे फार थोडे आहेत आणि बहुतेक डावे आहेत किंवा गांधीवादी
सुशांतच्या प्रकरणाचा आधारच बॉलिवूड असल्याने बॉलीवूडीकरण टोकाला पोहचले आहे ह्यात महेश भट ह्यांनी इस्लाम स्वीकारल्याने हिंदुत्ववादी त्यांच्याविरुद्ध आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीद्वारा त्यांना गोत्यात आणता आलं तर ते हिंदुत्ववाद्यांना हवं आहे महेश भट काय असावेत ह्याचा काल्पनिक अंदाज बांधून मी अडा हॉका बाना सुना ह्या कादंबरीत शंकर भट हे काल्पनिक पात्र मी समांतर नायक म्हणून तयार केले होते ते खरे वाटावे अशा हालचाली महेश भट ह्यांनी केल्याने त्यांच्या बोल्डनेसच्या मुसक्या बांधाव्यात असं अनेकांना वाटतं पाश्च्यात्त्य देशात मुलीचे चुम्बन घेणारा पुरुष टीकेला पात्र होणार नाही पण भारतात महेश भटानी हे केल्याने तो समाजशत्रू वाटणे हे स्वाभाविक आहे कारण चुंबन कामूकच असतं असा भारतीयांचा आग्रह आहे आणि ह्याबाबतचे वैज्ञानिक सत्य भारतीयांच्या बाजूने आहे गालावरची पप्पी कामुक नसते पण चुंबनाविषयी असं म्हणता येणार नाही मुलगी वयात येईपर्यंत चुंबन बापाचं प्रेम असू शकतं (ह्याचीही बापाकडून गॅरेंटी नाहीच ) पण मुलगी वयात आल्यानंतर चुंबन लैंगिकच बनतं त्यामुळे महेश भट सांस्कृतिक शत्रू वाटणे हे नैसर्गिक आहे रियाने सुशांतच्या घरून निघाल्यावर महेश भट ह्यांना फोन केल्याने व्हाटसप केल्याने महेश भटांना टार्गेट करणे सोपे झाले शेवटी मागचे हिशेब चुकते करायचेच होते ते ह्या निमित्ताने चुकते करण्याची संधी मिळाली साहजिकच रिया चक्रवर्ती नावाचे शेपूट दाबले गेले . महेश भट हे बॉलिवूडमधले सर्वात हुशार व्यक्तिमत्व आहे मी एकेकाळी त्यांच्यासाठी चित्रपट लेखन करणार होतो आणि ती फिल्म आशुतोष गोवारीकर डिरेक्ट करणार होता आणि प्लस चॅनेलने १० कि १२ फिल्म्स बनवण्याचा जो घाट घातला होता त्यात ती फिल्म होती त्यावेळीही त्यांची बोल्ड मोरॅलीटी इंडस्ट्रीला झेपत न्हवती शेवटी ते रजनीश ह्यांचे शिष्य होते आजही परिस्थिती बदललीये असं वाटत नाही साहजिकच रिया चक्रवर्तीबरोबरचे त्यांचे फोटो ज्यातले अनेक मॉर्फ केलेले होते लोकांना कन्विन्सिंग वाटले ह्याला जोड मिळाली ती नंतर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाने एनएसडी आणि अंडरवर्ल्ड ह्यांच्यामुळे ह्यांची एंट्री झाली नासिरुद्दीन शाहची ऍक्टिंग तो ड्रग घेत असल्याने लय भारी होते अशी गैरसमजूत असलेल्या महामूर्खांनी ही लत अभिनेत्यांच्यात पसरवली संजय दत्तने तिला ग्लॅमर दिले इxxx खानसारख्यांनी स्टॅबिलिटी मॉडेलिंगने तिचा महापूर निर्माण केला ह्यात सुशांतसिंग राजपूत सापडलाय अशा बातम्या कानावर येत होत्या आणि ह्या अंगाने रियावर आरोप होऊ लागले
ह्या रचितांची खंडने करणे तिच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला असल्याने आवश्यक बनले आणि रिया चक्रवर्तीनें तिच्याविरुद्धच्या रचितांची विरचना करणारी मुलाखत राजदीप सरदेसाई ह्यांना दिली ही एक अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी होती
रियाने सुशांतच्या ड्रग्ज सेवनाविषयीच्या अफवा खऱ्या आहेत असं इन्डायरेक्ट सुचवल्याने ड्र्ग्जमाफिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिला टार्गेट करणार हे उघडच आहे ह्याचबरोबर तिने आप्तवादाला काही भावच दिला नाही फक्त काही इशारे केले त्यामुळे रियाच्या विरचनेची विरचना करणे आवश्यक बनले हे सगळे प्रकरण म्हणजे ज्याला देरिदाने संहितेतून संहिता तयार होणे टेक्सच्युअलायझेशन म्हंटले होते तसे होते संरचना मग विरचना मग त्या वीरचनेची विरचना ह्यातल्या काही वीररचना जोश और ज्वानीसे भरपूर तर काही ररचना र्रर्रर्र करणाऱ्या ऍक करणाऱ्या !
रियाने उपस्थित केलेला एक प्रश्न सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तिने सुशांतला ब्लॉक केल्यावर काय घडले ? जोपर्यंत हे खर्रर्रखुर्रर्र सापडत नाही तोवर सर्व अफवा आहेत प्रश्न इतकाच आहे ह्यातून फाँल्स व्हिक्टीम बनवला जाणार कि खर्राखुर्रा शोधला जाणार ? आणि हा प्रश्न पोस्ट्रुथ आहे सत्य रचित असेल तर पुरावे रचून कुणालाही शिक्षा होणार कि खर्ऱ्याखुर्ऱ्या पुरावाच्या आधारे खरा आरोपी शोधला जाणार ?
माझा ह्या देशातल्या पोलीस आणि तत्सम इन्वेस्टीगेशन एजन्सीजवरचा विश्वास अजूनही उडालेला नाही असं रियाने सांगितले आहे मी तिच्याशी सहमत आहे
पोस्ट्रुथ एजमध्ये सत्य रचित असल्याने सत्य रचलं जातं आणि रचलेल्या सत्याच्या आधाराने सत्ता चालवण्याचा प्रयत्न असतो भारतात हे नवीन नाही भारतात सर्वच ब्राम्हणधर्मी राजवटी ह्या पोस्ट्रुथ होत्याच मुळात धर्म ही संस्थाच पोस्ट्रुथ असते आणि मोक्ष ट्रुथ साहजिकच कुठलेही धर्मराज्य हे स्वभावतः पोस्ट्रुथ असते म्हणून तर सुरवातीच्या काळात शैव जैन बौद्ध दर्शन वा धम्म हा शब्द वापरत होते शिवाने दर्शन तर महावीर बुद्धाने धम्म सांगितलाय धर्म न्हवे धम्माचा अर्थ मोक्षाकडे / कैवल्याकडे /निर्वाणाकडे घेऊन जाणारे दर्शन दुर्देवाने संस्कृतचे प्रभुत्व वाढत गेले तसे ह्यांच्या दर्शनाचाही /धम्माचाही धर्म बनवला गेला आपल्याकडच्या लोकांना हे अजूनही नीट कळत नाही त्यातून बरेच घोळ होतात आणि कधीकधी मुद्दामहून घातले जातात मला आशा आहे कि असे काही पोस्ट्रुथ घोळ ह्या प्रकरणात घातले जाणार नाहीत राजकीय क्रांत्या आणि धर्मराज्ये सर्वात प्रथम स्वतःच्या अपत्यांना खातात फ्रेंच / कम्म्युनिस्ट क्रांतीतला नरसंहार आणि अलीकडे ज्यांनी सत्ता काँग्रेसकडून खेचून आणली ते भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान लोक ज्यात अडवाणी यशवंत सिन्हा वैग्रे येतात ह्यांचे सध्याच्या सत्तेने चालवलेले हाल हे उत्तम उदाहरण आहेत हे सगळेच पायाचे बळी होते कि काय अशीही शंका आहे असे असेल तर पोस्ट ट्रुथ भारतातही ऑन झाले असे म्हणावे लागेल अशा पार्श्वभूमीवर असे काही नाही हे सिद्ध करण्याची सर्वोत्तम संधी ह्या प्रकरणात ह्या सरकारला आहे
माझा स्वतःचा उत्तराधुनिकतेवर विश्वास नाही त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीद्वारे सत्य शोधता येते असा माझा विश्वास आहे मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या आहे असा निर्वाळा दिला होता पण ह्याहून काही वेगळे सत्य असेल आणि वैज्ञानिक इन्वेस्टीगेशगनच्या आधारे ते सिद्ध करणारे पुरावे सादर केले जाणार असतील तर त्यांना स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे
सर्वाधिक जो नैतिक असतो
त्याच्यावर असतात सर्वाधिक कॅमेरे
शस्त्रासारखे रोखलेले
त्याची हत्या होणे गरजेचे असते
कारण तो भ्रष्ट आचाराला धोखा असतो
आणि त्याचे निर्मूलन भ्रष्टाचारी लोकांसाठी
जीवघेणी आवश्यकता असते
तो नैतिक टाचणी असतो
जी टोचत राहते
जिच्यामुळे आपले फुगे फुटतील
अशी फुगेवाल्यांना भीती असते
नैतिक माणूस नकोच असतो कुणाला
आणि म्हणूनच त्याच्या मरणाची सर्व वाट पहात असतात
आणि जेव्हा तो मरत नाही लवकर
असे वाटते तेव्हा तो मारला जातो
गांधींसारखा
नैतिक माणूस थोडाही चुकला कि
त्याची बातमी होते
मीडिया जणू काही आपण खूप नैतिकतेचे पुजारी आहोत
अशा थाटात त्याच्यावर तुटून पडतो
म्हणूनच नैतिक माणसाच्या नावाने
तो चुकला
अशा अफवा पसरत असतात
वारंवार सतत थकत
इतक्या कि
नैतिक माणसाला शेवटी बातम्या साईडलाईन करण्याचे
यंत्र बसवून घ्यावे लागते
किंवा तयार करावे लागतात
नैतिक माणसाची सगळ्या समाजालाच भीती का ?
तो फक्त क्रुसिफाय झाल्यावरच त्याच्यावरती चर्चा का ?
वर्तमानात तो आपले आयुष्य बदलेल
अशी भीती वाटते का
मग बदला ना
होऊन जाऊ दे
एकदा हा अख्खा समाजच नैतिक करून बघूया
बघूया तरी खरोखर अनैतिकतेनेच सिस्टीम चालते
हे सत्य आहे का
चला
बदल घडवूया
स्वतःत आणि जगात
आतल्या भयावर मात करूया
जग बदलूया
चला बदल घडवूया
जग बदलूया
श्रीधर तिळवे नाईक
पहिला आनंदाश्रू उजव्या डोळ्यातून
आणि पहिला दुःखाश्रु डाव्या डोळ्यातून
येतो
म्हणूनच बहुदा डाव्यांना दुःख लवकर कळतं
आता मला कळतंय
मी चुकीच्या डोळ्याने तुला
डोळा मारायला नको होता
No comments:
Post a Comment