राममंदिर आणि मी
राममंदिर आंदोलन सुरु झालं तेव्हापासून माझा त्याबाबतचा प्रवास बदलत गेला आज पाहतो तेव्हा चार टप्पे स्पष्ट दिसतात
१ कट्टर विरोधाचा टप्पा
२ जहाल विरोधाचा टप्पा
३ मवाळ विरोधाचा टप्पा
४ आणि काही महिन्यापूर्वीचा पाठिंबा
माझ्या घऱात बहुजनवादी राजकारणाची परंपरा कित्येक शतकांची आहे त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे काँग्रेसला व फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आणि दाजीबा देसाई वा गोविंद पानसरेंचे (पानसरे आमच्या गल्लीतच रहात होते व अविनाश पानसरे माझा लहानपणचा मित्र होता ) काही काम असले कि शेकाप वा कम्म्युनिस्टांना पाठिंबा हे आमच्या घरात कायमच चालत आलेले !
पण १९८० साली माझ्या घरात प्रथम माझा भाऊ भारत बदलला मग दुसरा भाऊ भूषण व नंतर माझा भाचा जतीन तिघेही शिवसेना सैनिक बनले बाळासाहेब ठाकरे हे जणू ह्यांच्यासाठी देवच ह्यांच्यात मी एकटाच शैव उरलो आर्य संस्कृतीचा अभिमान हा भांडणाचा विषय झाला ह्या पार्श्वभूमीवर शाहबानो प्रकरण घडले आणि माझे वडीलही कधी न्हवे ते काँग्रेसवर दुसऱ्यांदा संतापले आणिबाणीनंतरची काँग्रेसची ही दुसरी मोठी चूक होती पहिली शिखांची हत्या होती ह्यावेळी रामजन्मभूमीचा प्रश्न पुन्हा आणला गेला माझे भाजपवाल्यांना सांगणे होते कि तुम्ही शहाबानो प्रकरणावरून आंदोलन करा पण ह्या प्रकरणावरून भाजपला पाठिंबा मिळेना आणि नेमके ह्याचवेळी रामानंद सागरचे रामायण आले मी ह्या काळात राममंदिराच्या कट्टर विरोधात होतो कारण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला अयोध्येत सापडलेली इन्स्क्रिप्शन्स माहित होती आणि ही इन्स्क्रिप्शन्स गर्जून सांगत होती कि अयोध्येचा पूज्य देव हा शिव आहे नंतर सापडलेल्या इन्स्क्रिप्शन्समध्येही शिवच जास्त होता जर रामायण खरोखरच घडले असते तर अयोध्येत सुरवातीपासूनच रामाची पूजा केली गेली असती पण ज्या अर्थी असे न घडता तिथला मुख्य देव शिवच होता त्याअर्थी रामायण हे काल्पनिक असावे होते असा माझा युक्तिवाद होता ह्या काळात त्यामुळेच मी राम मंदिराला कट्टर विरोध करत होतो
पुढे अडवाणींची रथयात्रा झाली त्या काळावर मी एक कविताही लिहिली होती ह्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा बघून मी जहाल झालो बाबरी मस्जिद पडली माझ्या कादंबरीत ते प्रकरण आलेही होते मग मी ते उडवले कारण अभिजित देशपांडेंकडे प्रत्यक्षदर्शी अनुभव होते ते मला जास्त महत्वाचे वाटले
२०११ ला मी मवाळ झालो कारण खुद्द ओबीसींनीच राममंदिरला दिलेला पाठिंबा ज्यांच्या जीवावर शैवांचे राजकारण उभे होते तेच फिरल्यामुळे आपल्या जहाल भूमिकेला काहीही अर्थ उरलेला नाही असे माझ्या लक्ष्यात आले
आणि काही महिन्यापूर्वी मी पाठिंबा दिला कारण माझ्या सर्वच मुस्लिम मित्रांनी मला सांगितले कि राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे एका मशिदीच्या बदली शांतता असे त्यांचे कारण होते जे मला पटले
माझ्या ह्या चारी अवस्थांवर कविता येत राहिल्या म्हणजे ऑक्टोबर १९८९(चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा ) , वास्तू , रावण (ह्या दोन्ही स्त्रीवाहिनीत ) दंगा (कव्ही ) वैग्रे
आता राममंदिराचा शिलान्यास झाला आहे आमच्या पिढीचे तारुण्य ह्या प्रश्नात वाहून गेले कमावले काय तर एक मंदिर त्याने समाजात नेमका काय फरक पडतो हे आगामी काळात हळूहळू कळेल
श्रीधर तिळवे नाईक
हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि ओशो रजनीशांच्या मृत्यूनंतरच भाजप पक्कड बसवू शकला कारण रजनीशांच्यामुळे परंपरा उत्तरआधुनिकतेकडे सरकत होती पण कर्मठ बनत न्हवती तिला पायबंद घातला तो अमेरिकेतल्या कर्मठ ख्रिश्चनांनी रजनीशपूरम हे एका पोस्टमॉडर्न सिटीचं स्वप्न होतं जे व्हॅटिकन सिटीनं उध्वस्त केलं कारण रजनीशांनी जिझसला मोक्ष मिळाला न्हवता किंबहुना त्याला तो माहीतच न्हवता असं स्पष्ट विधान केलं त्यांनी आतापर्यंत जिझसवर दिलेल्या व्याख्यानांच्या हे विरुद्ध होतं वास्तविक ज्युडायिक धर्माला मोक्ष ही संकल्पनाच माहित नाही तरीही आपल्याकडच्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने उगाच नसलेल्या गोष्टी सांगून सर्वधर्मसमभावाचा खोटा इतिहास रचला हा इतिहास भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक होता आणि काँग्रेसी अजेंड्याला साजेसा होता तो भारतभर पसरला
प्रत्यक्षात भारतात धर्म स्पष्टपणे आर्य , शैव आणि ज्युडायिक अशा प्रकारात वाटले गेले होते ह्याशिवाय जमाती श्रद्धा होत्याच सर्वधर्मसमभावाला धर्म सम लागतात युरोपमध्ये शैव वा आर्य नसल्याने तिथे असे सम होते भारतातही प्राचीन काळात असे सम होते कारण विषम आले न्हवते विषम आले जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला ह्या मुस्लिम व ज्युडायिक राजवटीत ज्युडाइक धर्मांनी धर्मांतर घडवून आपली लोकसंख्या आर्य व शैवांच्या इकवल केली त्यामुळे सर्वधर्मसमभाव हलायला लागला त्याला पर्याय म्हणून धार्मिक सहिष्णुतेचा उद्घोष सुरु झाला अकबर शिवाजी हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक बनले
दुर्देवाने औरंगजेबाच्या कारकिर्दीत धर्मसहिष्णुता पूर्ण हलली आणि पुढे उत्तरपेशवाईत ती रसातळाला गेली
आज अवस्था अशी आहे कि सर्वधर्म सम हा पोकळपणा आहे आर्य सूर धर्म वर्ण जात मानतात अलीकडे विदेशी सर्व्हेत एन आर आय लोकांच्यातही वर्णजातिव्यवस्था अजूनही पाळली जात असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत हे खरे असतील तर मग शिकून आपल्या धार्मिक धारणा बदलत नाहीत हा निष्कर्ष घट्ट होईल शैव असुर आर्य ज्युडायिक वर्णजातिव्यवस्था मानत नाहीत पण अलीकडे त्यांनाही ही बाधा झालेली दिसते लिंगायत धर्मात वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे पण सुदैवाने अजूनही पुरोगामीपणा सम्पलेला नाही ब्राम्हण वैष्णव हिंदू व शैव बौद्ध ह्यांना समान मानणं म्हणजे गोळवलकर आणि आंबेडकर ह्यांना समान मानणं आहे आर्य आणि शैव मोक्ष मानतात ज्युडायिक मानत नाहीत मग हे धर्म समान होणार कसे ?
वस्तुस्थिती अशी आहे कि जगात सर्वधर्मविषमभावच जास्त आहे आणि सामान्य माणसाला तो कळतो पण अंगभूत सहिष्णुतेकडे सर्वांचा कल असल्याने लोक एकत्र नांदत असतात मुद्दा सर्वधर्मसहिष्णुतेचा असतो सर्वधर्मसमभावाचा न्हवे अकबर रणजित शिवाजी हे सर्वधर्मसहिष्णुवादी होते पण बाकीचे न्हवते आणि बाकीचे ९९ टक्के आहेत ह्यातील अकबराची जी दुर्दशा मौलवींनी केली ती इस्लामविषयी जास्त बोलते शेवटी अकबर नास्तिक झाला म्हणून त्याला मरण्यासाठी कैदेत टाकले आणि तो नास्तिक म्हणूनच कैदखान्यात मेला ह्याउलट धर्मसहिष्णुवादी राजवट शिवाजीनंतर संभाजीने आणि पहिल्या बाजीरावापर्यत टिकली होती बाजीराव मस्तानी विवाहाने सर्व समीकरणे फिरवली वास्तविक मस्तानी आणि तिचा मुलगा ह्यांचे धर्मांतर घडवून हा प्रश्न सहज सोडवता आला असता पण हिंदू ब्राम्हणधर्मात धर्मांतराची प्रथा नसल्याने हे घडू शकले नाही कुणाला आपल्या धर्मात घ्यायचे नाही आणि कुणी गेला तर त्याला आत घ्यायचे नाही ही हिंदू ब्राम्हणांची मानसिकता आहे शैवांनी नेहमीच ह्याला कडकडून विरोध केला आहे म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजवटीत नेताजी पालकरचे पुन्हा शैविकरण होऊ शकते जे धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले तेच धाडस पहिल्या बाजीरावाने दाखवायला हवे होते त्याने इतिहास बदलला असता पण पहिल्या बाजीरावाने धाडस दाखवले नाही आणि इतिहास उलटा फिरला मनुस्मृती आणि धर्मशास्त्र राज्यकारभारात घुसले
अनेक लोक अध्यात्मिकतेची ग्वाही देता असतात पण अध्यात्मिकता ही धर्मापेक्षा उंच गोष्ट आहे तिथे सर्वच एका ईश्वराची लेकरे होतात पण धर्मात प्रत्येकाचा ईश्वर वेगळा म्हणून तर त्यांना देव आणि देवता म्हणतात गॉड आणि गॉडेसेस कुणाचा एक कुणाचा अनेक ईश्वर सर्व देवदेवतांचा अंत आहे आणि मोक्ष ईश्वराचा अंत आहे त्या पातळीवरून राज्यशासन चालवायला सर्वानांच मोक्षकुं आणि मुमुक्षु बनवावं लागतं आणि ही दुर्मिळ परिस्थिती असते दारू पिणारे लोकसुद्धा सोमेलिअर परीक्षा पास झाल्यावरच तज्ज्ञ मानतात पण धर्माची गोष्ट आली कि सर्वच तज्ञ हिंदू लोक तर कुठल्याही गोष्टीच अधःपतन घडवण्यात वाकबगार अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा श्रद्धेय होतात आणि विठ्ठलाला जातात
ईश्वराला सुद्धा ह्यांनी देवळात बंदिस्त केला जो मूळ अर्थाने विश्वाचा प्राण होता हिंदूंना धार्मिक बनायचं नसत म्हणून ते अध्यात्मिक व सिद्ध बुद्ध लोकांची पूजा करत बसतात शंकर महावीर बुद्ध ह्यांची एकदा पूजा सुरु केली त्यांना देव बनवलं कि मग त्यांनी सांगितलेले यमनियम किंवा पंचव्रते किंवा पंचशील पाळायची गरजच भासत नाही आपण अशाच लोकांच्यात वावरत असतो आणि अशा लोकांच्यासाठी धर्ममुक्तता अशक्यच बनत जाते आणि म्हणून धर्मनिरपेक्षता फळफळते
साधना करू न इच्छिणाऱ्या लोकांच्या समूहाचीही धर्मनिरपेक्षता गरज बनते मी माझी प्रॉपर्टी सांभाळतो तू तुझी प्रॉपर्टी सांभाळ असाच हा करार असतो आणि प्रॉपर्टी रिलिजियस असते
श्रीधर तिळवे नाईक
राममंदिर आंदोलन सुरु झालं तेव्हापासून माझा त्याबाबतचा प्रवास बदलत गेला आज पाहतो तेव्हा चार टप्पे स्पष्ट दिसतात
१ कट्टर विरोधाचा टप्पा
२ जहाल विरोधाचा टप्पा
३ मवाळ विरोधाचा टप्पा
४ आणि काही महिन्यापूर्वीचा पाठिंबा
माझ्या घऱात बहुजनवादी राजकारणाची परंपरा कित्येक शतकांची आहे त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे काँग्रेसला व फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आणि दाजीबा देसाई वा गोविंद पानसरेंचे (पानसरे आमच्या गल्लीतच रहात होते व अविनाश पानसरे माझा लहानपणचा मित्र होता ) काही काम असले कि शेकाप वा कम्म्युनिस्टांना पाठिंबा हे आमच्या घरात कायमच चालत आलेले !
पण १९८० साली माझ्या घरात प्रथम माझा भाऊ भारत बदलला मग दुसरा भाऊ भूषण व नंतर माझा भाचा जतीन तिघेही शिवसेना सैनिक बनले बाळासाहेब ठाकरे हे जणू ह्यांच्यासाठी देवच ह्यांच्यात मी एकटाच शैव उरलो आर्य संस्कृतीचा अभिमान हा भांडणाचा विषय झाला ह्या पार्श्वभूमीवर शाहबानो प्रकरण घडले आणि माझे वडीलही कधी न्हवे ते काँग्रेसवर दुसऱ्यांदा संतापले आणिबाणीनंतरची काँग्रेसची ही दुसरी मोठी चूक होती पहिली शिखांची हत्या होती ह्यावेळी रामजन्मभूमीचा प्रश्न पुन्हा आणला गेला माझे भाजपवाल्यांना सांगणे होते कि तुम्ही शहाबानो प्रकरणावरून आंदोलन करा पण ह्या प्रकरणावरून भाजपला पाठिंबा मिळेना आणि नेमके ह्याचवेळी रामानंद सागरचे रामायण आले मी ह्या काळात राममंदिराच्या कट्टर विरोधात होतो कारण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला अयोध्येत सापडलेली इन्स्क्रिप्शन्स माहित होती आणि ही इन्स्क्रिप्शन्स गर्जून सांगत होती कि अयोध्येचा पूज्य देव हा शिव आहे नंतर सापडलेल्या इन्स्क्रिप्शन्समध्येही शिवच जास्त होता जर रामायण खरोखरच घडले असते तर अयोध्येत सुरवातीपासूनच रामाची पूजा केली गेली असती पण ज्या अर्थी असे न घडता तिथला मुख्य देव शिवच होता त्याअर्थी रामायण हे काल्पनिक असावे होते असा माझा युक्तिवाद होता ह्या काळात त्यामुळेच मी राम मंदिराला कट्टर विरोध करत होतो
पुढे अडवाणींची रथयात्रा झाली त्या काळावर मी एक कविताही लिहिली होती ह्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा बघून मी जहाल झालो बाबरी मस्जिद पडली माझ्या कादंबरीत ते प्रकरण आलेही होते मग मी ते उडवले कारण अभिजित देशपांडेंकडे प्रत्यक्षदर्शी अनुभव होते ते मला जास्त महत्वाचे वाटले
२०११ ला मी मवाळ झालो कारण खुद्द ओबीसींनीच राममंदिरला दिलेला पाठिंबा ज्यांच्या जीवावर शैवांचे राजकारण उभे होते तेच फिरल्यामुळे आपल्या जहाल भूमिकेला काहीही अर्थ उरलेला नाही असे माझ्या लक्ष्यात आले
आणि काही महिन्यापूर्वी मी पाठिंबा दिला कारण माझ्या सर्वच मुस्लिम मित्रांनी मला सांगितले कि राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे एका मशिदीच्या बदली शांतता असे त्यांचे कारण होते जे मला पटले
माझ्या ह्या चारी अवस्थांवर कविता येत राहिल्या म्हणजे ऑक्टोबर १९८९(चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा ) , वास्तू , रावण (ह्या दोन्ही स्त्रीवाहिनीत ) दंगा (कव्ही ) वैग्रे
आता राममंदिराचा शिलान्यास झाला आहे आमच्या पिढीचे तारुण्य ह्या प्रश्नात वाहून गेले कमावले काय तर एक मंदिर त्याने समाजात नेमका काय फरक पडतो हे आगामी काळात हळूहळू कळेल
श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षता
, धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम ९ श्रीधर तिळवे
आधुनिक युगात औद्योगिकता सेट झाल्यावर जे चमत्कार पूर्वी देव करायचे ते तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष करून दाखवायला सुरवात केली औद्योगिकता न झेपणाऱ्या लोकांनी ईश्वर सोडला नाही खरा पण बर्ट्रांड रसेलने ह्या लोकांचे सगळे युक्तिवाद व्हाय आय एम नॉट अ ख्रिश्चन ह्या नावाचा एक ग्रंथ लिहून खोडून काढले गॉड इज डेड म्हणणाऱ्या फ्रेडरिक नित्शेने सुरु केलेल्या प्रतिसृष्टीय नास्तिकवादाचे हे पुढचे पाऊल होते भारतीय संस्कृतीतील तिसऱ्या उपसंस्कृतीला म्हणजेच ज्युडायिक धर्मांना हा धक्का होता मात्र आपल्या आर्य व शैव बांधवांच्याप्रमाणे त्यांनीही हा धक्का पचवला मात्र स्टॅलीन व माओच्या आधुनिक राजवटीत झालेले अत्याचार पुढे आले आणि धर्ममुक्त राजवटी किती नृशंस होऊ शकतात ते जगाला कळाले ह्यातून साम्यवादी धर्ममुक्त चळवळींना चांगलाच सेट बॅक बसला आणि संपूर्ण युरोप बॅकस्टेजवर गेला ह्यातूनच १९५० पासून धर्माची उत्तराधुनिक मांडणी सुरु झाली ह्याचा एक फायदा भारताला झाला आतापर्यंतचे ओरिएंटॅलिस्ट वैदिक ब्राम्हण व वैष्णव धर्मात अडकून होते साठोत्तरी ओरिएंटॅलिस्ट लोकांनी भारतातल्या स्थानिक धर्मांचा व पंथाचा अभ्यास सुरु केला ह्यातूनच वारकरी आणि खंडोबा ज्योतिबा ह्यांच्या अभ्यासाची प्रथा सुरु झाली व तिने मराठी साहित्याला देशी पाठबळ पुरवले
ह्याला प्रतिक्रिया म्हणून मार्गी संस्कृतीत १९६० नंतर साहजिकच आजच्या काळातील मार्गी धर्माची मांडणी कशी करावी ह्या दिशेने मंथन सुरु झाले अणि भारतात ओशो रजनीश हयांनी जगातल्या सर्व धार्मिक मार्गी परंपरा नव्याने मांडल्या प्राचीन मार्गी संहितामधून आधुनिक संहिता निर्माण करण्याचा हा प्रयत्न मस्त होता नवीन पिढीला ह्या निमित्ताने आपल्या मार्गी परंपरेची नव्याने ओळख झाली साठोत्तरीच्या ऍडव्हान्स मार्गी धार्मिकतेचे प्रतीक म्हणजे ओशो रजनीश होय
राजनीशांच्यामुळे अनेकांना जे कृष्णमूर्तींच्या आधुनिक ज्ञानप्रधान मोक्षतेचे जे आकर्षणे होते ते संपले वं ओशोंचा अराजकी उत्तराधुनिक धर्म सेटल झाला भारतीय पुन्हा एकदा मोक्षाकडून मार्गी धर्माकडे सरकले हे परंपरेचे कमबॅक होते ह्याचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते साहित्यिकही कुलवृत्तांत व हिंदू लिहू लागले आपण परंपरेत लिहितो ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट बनली आणि चौथ्या नवतेच्या क्रांतिकारकांचा ९० टक्के वेळ परंपरेशी झगडण्यात जाऊ लागला
अस्तित्ववादाचे दोन जनक होते एक होता किर्केगार्द जो ईश्वर तर्कशुद्ध नसल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणत होता तर दुसरा नित्शे गॉड इज डेड म्हणत होता भारतीयांनी किर्केगार्द निवडला त्यामुळे इल्लोजिकल विचार करणाऱ्या ब्राम्हणांच्या झुंडशाहीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पुरोगामी ब्राम्हण आदर गमावू लागले घरात होणाऱ्या कर्मकांडांना गोतावळ्यात प्रसिद्धी मिळायला लागली १२ व्या शतकातला बंगाली वैश्यांचा सत्यनारायण आपली पूजा भारतभरातल्या सर्व आणि अर्थात मराठी ऑफिसेसमध्येही मिरवू लागला भक्तिवेदांत मुंबईकर बनला
हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि ओशो रजनीशांच्या मृत्यूनंतरच भाजप पक्कड बसवू शकला कारण रजनीशांच्यामुळे परंपरा उत्तरआधुनिकतेकडे सरकत होती पण कर्मठ बनत न्हवती तिला पायबंद घातला तो अमेरिकेतल्या कर्मठ ख्रिश्चनांनी रजनीशपूरम हे एका पोस्टमॉडर्न सिटीचं स्वप्न होतं जे व्हॅटिकन सिटीनं उध्वस्त केलं कारण रजनीशांनी जिझसला मोक्ष मिळाला न्हवता किंबहुना त्याला तो माहीतच न्हवता असं स्पष्ट विधान केलं त्यांनी आतापर्यंत जिझसवर दिलेल्या व्याख्यानांच्या हे विरुद्ध होतं वास्तविक ज्युडायिक धर्माला मोक्ष ही संकल्पनाच माहित नाही तरीही आपल्याकडच्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने उगाच नसलेल्या गोष्टी सांगून सर्वधर्मसमभावाचा खोटा इतिहास रचला हा इतिहास भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक होता आणि काँग्रेसी अजेंड्याला साजेसा होता तो भारतभर पसरला
प्रत्यक्षात भारतात धर्म स्पष्टपणे आर्य , शैव आणि ज्युडायिक अशा प्रकारात वाटले गेले होते ह्याशिवाय जमाती श्रद्धा होत्याच सर्वधर्मसमभावाला धर्म सम लागतात युरोपमध्ये शैव वा आर्य नसल्याने तिथे असे सम होते भारतातही प्राचीन काळात असे सम होते कारण विषम आले न्हवते विषम आले जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला ह्या मुस्लिम व ज्युडायिक राजवटीत ज्युडाइक धर्मांनी धर्मांतर घडवून आपली लोकसंख्या आर्य व शैवांच्या इकवल केली त्यामुळे सर्वधर्मसमभाव हलायला लागला त्याला पर्याय म्हणून धार्मिक सहिष्णुतेचा उद्घोष सुरु झाला अकबर शिवाजी हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक बनले
दुर्देवाने औरंगजेबाच्या कारकिर्दीत धर्मसहिष्णुता पूर्ण हलली आणि पुढे उत्तरपेशवाईत ती रसातळाला गेली
आज अवस्था अशी आहे कि सर्वधर्म सम हा पोकळपणा आहे आर्य सूर धर्म वर्ण जात मानतात अलीकडे विदेशी सर्व्हेत एन आर आय लोकांच्यातही वर्णजातिव्यवस्था अजूनही पाळली जात असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत हे खरे असतील तर मग शिकून आपल्या धार्मिक धारणा बदलत नाहीत हा निष्कर्ष घट्ट होईल शैव असुर आर्य ज्युडायिक वर्णजातिव्यवस्था मानत नाहीत पण अलीकडे त्यांनाही ही बाधा झालेली दिसते लिंगायत धर्मात वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे पण सुदैवाने अजूनही पुरोगामीपणा सम्पलेला नाही ब्राम्हण वैष्णव हिंदू व शैव बौद्ध ह्यांना समान मानणं म्हणजे गोळवलकर आणि आंबेडकर ह्यांना समान मानणं आहे आर्य आणि शैव मोक्ष मानतात ज्युडायिक मानत नाहीत मग हे धर्म समान होणार कसे ?
वस्तुस्थिती अशी आहे कि जगात सर्वधर्मविषमभावच जास्त आहे आणि सामान्य माणसाला तो कळतो पण अंगभूत सहिष्णुतेकडे सर्वांचा कल असल्याने लोक एकत्र नांदत असतात मुद्दा सर्वधर्मसहिष्णुतेचा असतो सर्वधर्मसमभावाचा न्हवे अकबर रणजित शिवाजी हे सर्वधर्मसहिष्णुवादी होते पण बाकीचे न्हवते आणि बाकीचे ९९ टक्के आहेत ह्यातील अकबराची जी दुर्दशा मौलवींनी केली ती इस्लामविषयी जास्त बोलते शेवटी अकबर नास्तिक झाला म्हणून त्याला मरण्यासाठी कैदेत टाकले आणि तो नास्तिक म्हणूनच कैदखान्यात मेला ह्याउलट धर्मसहिष्णुवादी राजवट शिवाजीनंतर संभाजीने आणि पहिल्या बाजीरावापर्यत टिकली होती बाजीराव मस्तानी विवाहाने सर्व समीकरणे फिरवली वास्तविक मस्तानी आणि तिचा मुलगा ह्यांचे धर्मांतर घडवून हा प्रश्न सहज सोडवता आला असता पण हिंदू ब्राम्हणधर्मात धर्मांतराची प्रथा नसल्याने हे घडू शकले नाही कुणाला आपल्या धर्मात घ्यायचे नाही आणि कुणी गेला तर त्याला आत घ्यायचे नाही ही हिंदू ब्राम्हणांची मानसिकता आहे शैवांनी नेहमीच ह्याला कडकडून विरोध केला आहे म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजवटीत नेताजी पालकरचे पुन्हा शैविकरण होऊ शकते जे धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले तेच धाडस पहिल्या बाजीरावाने दाखवायला हवे होते त्याने इतिहास बदलला असता पण पहिल्या बाजीरावाने धाडस दाखवले नाही आणि इतिहास उलटा फिरला मनुस्मृती आणि धर्मशास्त्र राज्यकारभारात घुसले
अनेक लोक अध्यात्मिकतेची ग्वाही देता असतात पण अध्यात्मिकता ही धर्मापेक्षा उंच गोष्ट आहे तिथे सर्वच एका ईश्वराची लेकरे होतात पण धर्मात प्रत्येकाचा ईश्वर वेगळा म्हणून तर त्यांना देव आणि देवता म्हणतात गॉड आणि गॉडेसेस कुणाचा एक कुणाचा अनेक ईश्वर सर्व देवदेवतांचा अंत आहे आणि मोक्ष ईश्वराचा अंत आहे त्या पातळीवरून राज्यशासन चालवायला सर्वानांच मोक्षकुं आणि मुमुक्षु बनवावं लागतं आणि ही दुर्मिळ परिस्थिती असते दारू पिणारे लोकसुद्धा सोमेलिअर परीक्षा पास झाल्यावरच तज्ज्ञ मानतात पण धर्माची गोष्ट आली कि सर्वच तज्ञ हिंदू लोक तर कुठल्याही गोष्टीच अधःपतन घडवण्यात वाकबगार अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा श्रद्धेय होतात आणि विठ्ठलाला जातात
ईश्वराला सुद्धा ह्यांनी देवळात बंदिस्त केला जो मूळ अर्थाने विश्वाचा प्राण होता हिंदूंना धार्मिक बनायचं नसत म्हणून ते अध्यात्मिक व सिद्ध बुद्ध लोकांची पूजा करत बसतात शंकर महावीर बुद्ध ह्यांची एकदा पूजा सुरु केली त्यांना देव बनवलं कि मग त्यांनी सांगितलेले यमनियम किंवा पंचव्रते किंवा पंचशील पाळायची गरजच भासत नाही आपण अशाच लोकांच्यात वावरत असतो आणि अशा लोकांच्यासाठी धर्ममुक्तता अशक्यच बनत जाते आणि म्हणून धर्मनिरपेक्षता फळफळते
साधना करू न इच्छिणाऱ्या लोकांच्या समूहाचीही धर्मनिरपेक्षता गरज बनते मी माझी प्रॉपर्टी सांभाळतो तू तुझी प्रॉपर्टी सांभाळ असाच हा करार असतो आणि प्रॉपर्टी रिलिजियस असते
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment