हेमंत दिवटे ह्यांनी घेतलेली श्रीधर तिळवे ह्यांची मुलाकात संवाद ६ दिवाळी २००६
१ ग्लोबलायझेशन म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय ? त्याचे चांगले / वाईट परिणाम कोणते ? ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरु आहे असं काहींना वाटत तर मला १९९० च्या आसपास ही प्रक्रिया सुरु होऊन तिचा प्रभावही जाणवू लागला, असं वाटतं ? तुला काय वाटत ?
मानवी संस्कृतीत १९०० नंतर शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी अनेक शोध लावून नव्या नव्या चिन्हवस्तू ( semiodities ) तयार केल्या ह्या चिन्हवस्तूंचे उत्पादन जसे जसे वाढत गेले तसा तसा त्यांचा भोग वा आस्वाद वाढायला लागला , ग्रहण वाढू लागले ह्यातून चिन्हसृष्टीकरण सुरु झाले सुरुवातीचा कालखंड हा काहीसा innovations चा संशोधनाचा होता पण १९७५ नंतर त्याचे उत्पादन व वितरण प्रचंड प्रमाणात वाढले . नवीन आलेला हा चिन्हसृष्टीकरणाचा प्रवाह काही द्रष्ट्यांनी राजकारण्यांनी आधीच ओळखला . १९५५ नंतर अनेक विचारवंतांनी त्याचे निरूपण करायला सुरुवात केली ह्यातूनच सत्तरीच्या दशकात चिन , ब्रिटन वगैरे देशांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला हे उदारीकरण सरकारकेंद्री व सरकारवलंबी होते . ब्रिटनमध्ये त्याला थॅचरिझम असे नाव मिळाले भारतात संशोधनाचा पहिला टप्पा घडलाच नाही पण चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा १९८० नंतर सुरु झाला सिमेंटच्या उदारीकरणाच्या मारुती उद्योगाने टेलिकम्युनिकेशन क्रांतीने त्याची सुरुवात झाली १९८० ते ११९८७ हा तो पहिला टप्पा . ह्याला भारतातील विचारविनिमयाचा टप्पा म्हणता येईल . चिन्हसृष्टीकरण करायचे कि नाही ? उदारीकरण कसे करावे कि करूच नये ? सोवियत युनियनचा पाडाव होऊ झाल्यामुळे समाजवादाचे भवितव्य काय हे ह्या काळातले उग्र प्रश्न ! ह्याच काळात पंजाबमधला दहशतवादाचा प्रश्न अत्यंत व्यापक झाला आणि तो पंजाबी देशीयतेत उदयाला आला त्याला आसामी देशीयतेची साथ मिळाली महाराष्ट्रातही शिवसेना पसरायला सुरुवात झाली देशी चिन्हांचा अस्मिता म्हणून वापर हाही ह्याच काळाचा विशेष मार्गी गोष्टी का, कशी, कुठे , किती, कोणासाठी, आणायच्या हा ह्या काळातला कळीचा प्रश्न होता व प्रयोगही चालू झाले होते .
चिन्हसृष्टीचा दूसरा टप्पा १९८८ पासून सुरु झाला खाजगीकरण हा ह्या काळातील मुख्य मुद्दा ह्या खाजगीकरणामुळे व आधीच्या उदारीकरणामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला शिरकाव मिळाला ह्याला मी चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा मानतो मंडल आयोग , इस्लामी दहशतवाद , राजजन्मभूमीचा प्रश्न हे देशीयतेतून निर्माण झालेले प्रवाह एकीकडे तर खाजगीकरण व उदारीकरणामुळे सुरु झालेले मार्गी प्रवाह दुसरीकडे १९८८ ते १९९५ - ९६ असा हा कालखंड होता . ह्याला आपण चिन्हसृष्टीकरण म्हणू. कारण ह्या काळात आपला प्रचंड भर आयातीवर होता . मार्गी गोष्टींचे देशीकरण घडवणे ह्या काळात चालू झाले
१९९६ पासून मात्र जागतिकीकरणाचा शिरकाव हा शिरकाव न राहता ती हळूहळू सार्वत्रिक वस्तुस्थिती बनायला लागली उदारीकरण ( liberalisation ) खाजगीकरण ( privatisation ) आणि जागतिकीकरण ( globalization ) ( LPG ) ही त्रयी सर्वच चर्चाच्या केंद्रस्थानी आली . जे देशी आहे ते टिकते कि नाही असा प्रश्न अनेकांना सतवायला लागला तर अनेक देशी कंपन्या बहुराष्ट्रीय होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या काही तर प्रचंड यशस्वी झाल्या ह्याला आपण मार्गी आणि देशी ह्यांच्या मिश्रणाचा कालखंड असल्याने मादे चिन्हसृष्टीकरण म्हणू . मादे चिन्हसृष्टीकरणाचा कालखंड अद्यापही चालू आहे . आता चिन्हसृष्टीकरणात आपण निर्यातही करायला लागलोय . आज अनेक देशी गोष्टी ग्लोबल होत जाताना दिसतायत . उदा. आपली साडी
जागतिकीकरण हे ह्या चिन्हसृष्टीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने प्रसरण ह्या प्रक्रियेचा समावेश होतो कुठल्याही देवघेवीत देणे आणि घेणे असते ही देवघेव एकतर प्रचंड सुकाळामुळे निर्माण होते किंवा टोकाच्या दुष्काळामुळे , म्हणजे तुमच्याकडे इतके उत्पादन होते कि ते तुम्हाला जगभर वाटण्यावाचून पर्याय उरत नाही. तुम्ही जी गोष्ट जगाला देऊ पाहता कधी प्रेमाने कधी मार्केटिंग करून तर कधी सक्तीने तर काही वेळा इतका दुष्काळ निर्माण होतो कि आसपासच्या परिसरातून तुम्हाला काहीच घेता येणे शक्य होत नाही अशा वेळी तुमची भूक प्रचंड तीव्र असेल तर तुम्ही घेण्यासाठी परिसर सोडून जगात ती जिथे कुठे मिळते तिथे जाता किंवा ती आयात करता , कधी प्रेमाने मागता तर कधी दादागिरी करून तर कधी मेहनत करून कधी स्वतःचे मार्केटिंग करून ही जी देवघेव आहे ती जेव्हा जागतिक होते तेव्हा तिला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरणातला हा दुष्काळ वा सुकाळ प्रत्येकवेळी नैसर्गिकच असेल असे नाही कधी कधी तो मानवी वा सामाजिकही असू शकतो अनेक स्थलांतरे ही दुष्काळातून होतात अनेकदा आयात करून भूक भागवली जाते दुष्काळ मिटवला जातो तर निर्यात ही अनेकदा सुकाळातून निर्माण होते किंवा कशाच्या तरी बदल्यात ती केली जाते काही लोक इतके स्वभावतः अधाशी व भुकेले असतात कि त्यांना कुठेही दुष्काळच जाणवतो
अनेकदा राजकीय पक्षांना पैशांचा दुष्काळ जाणवल्याने त्यांनी तो दुष्काळ मिटवण्यासाठीही नको असलेली आयात केली आहे नको असलेले उदारीकरण वा खाजगीकरणही केले आहे अनेकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली अनावश्यक खाजगीकरणे आणि उदारीकरणेही केली गेली आहेत आणि कशालाही जागतिकीकरण म्हणून मान्यता देणाऱ्या अडाणी विचारवंतांनी जागतिकीकरण ह्या ब्रॅण्डला भुलून जाऊन ही अनावश्यक खाजगीकरणे व उदारीकरणेही आवाज न काढता स्वीकारली आहेत
उत्पादनाचा एकदा का दुष्काळ निर्माण झाला कि तो भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली जाते कारण दुष्काळाचा अर्थ उत्पादन कमी झाल्याने तोटा असा होतो अशा वेळी ग्राहक संख्या वाढणे व उत्पादन वाढणे हे कंपनी टिकण्यासाठी आवश्यक असते त्यातूनच ती कंपनी खाजगी करावी ही मागणी येते किंवा ती खाजगी कंपनीला विकली जाते काही वेळा कंपन्या इतक्या कमी असतात कि नुसत्या खाजगीकरणाच्या काही होणार नसते मग त्या क्षेत्रात उदारीकरण आणून अनेक कंपन्या आणल्या जातात मग पुढे नुसत्या कंपन्या आणूनही भागत नाही त्यांची संख्या त्यांचे उत्पादन इतके कमी पडते कि बाहेरच्या कंपन्या , बाहेरचे भांडवल आणावे लागते आन मग त्यासाठी जागतिकीकरण अपरिहार्य असते पण जेव्हा देशी कंपन्यांना संधीही न देता थेट बाहेरच्या कंपन्यांना आणले जाते तेव्हा ते जागतिकीकरण विघातक जागतिकीकरण असते एनरॉन हे अशा विघातक जागतिकीकरणाचे उदहारण आहे जी संधी रिलायन्स व टाटांना आता दिलीय ती त्या वेळी दिली असती तर कदाचीत विजेचा प्रश्न इतका चिघळला नसता पांढऱ्या कातडीला भुलून जाण्याची आपली सवय ही अनेकदा विघातक जागतिकीकरणाला आमंत्रण देते काही वेळा देशी कंपन्याच इतक्या बेजबाबदार आणि मुजोरड्या असतात कि त्यांना स्पर्धेचा फटका पडल्याशिवाय त्या सुधारत नाहीत अशा वेळी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून बाहेरच्या कंपन्या आणल्या जातात तेव्हा ते विधायक जागतिकीकरणच असते उदा , ऑटोमोबाईल इंडस्ट्री
जागतिकीकरण चांगले कि वाईट हे त्या त्या परिस्थितीच्या संदर्भ चौकटीत ठरत असते उदाहरणार्थ साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मितीसाठी दार्शनिकता व दर्शनता फार महत्वाची असते भारतात जिला चिन्हसृष्टीय दर्शनता म्हणावी अशी फारशी निर्माण झालेली नाही त्यामुळे संजीव खांडेकरांसारखा कवी जर फ्रेडरिक जेम्सन , कार्ल मार्क्स लाकान ह्यांच्यासारख्या पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या तत्वज्ञानातून काही आयात करून त्यांचा वापर स्वतःच्या कलानिर्मितीसाठी करत असेल तर आपण त्याला ते पूर्ण विघातक आहे असे म्हणून खोड काढू नये . पण त्याचबरोबर श्रीधर तिळवेसारखा एखादा गृहस्थ भारतीय दर्शनातील अनेक संकल्पनांची हवी तशी मोडतोड करून त्यातून भारतीय चिन्हसृष्टीय दर्शनता निर्माण करत असेल तर तो केवळ भारतीय संज्ञा वापरतो म्हणून त्याला मागासलेला समजणे हेही शहरांढळेपणाचे
( गावंढळच्या विरोधी ) लक्षण होय . शक्यता अशीही असू शकते की ते पाश्च्यात्य दर्शन त्याला अत्यंत उथळ पोरकट आणि करिअरिस्ट वाटल्याने तो पुन्हा भारतीय दर्शनाकडे वळला असेल
चिन्हसृष्टीकरण ही प्रतिसृष्टीकरण व त्यातून आलेल्या औद्योगिकीकरणाइतकीच अटळ आणि अपरिहार्य गोष्ट आहे ते खाजगीकरण , उदारीकरण व जागतिकीकरण ह्यांच्यातून साकार होते आहे हे खरे पण प्रत्येक वेळी प्रत्येक पैलू अपरिहार्यच असेल असे नाही उदा. सरकारने स्वतःला खाजगी कंपनी समजून सतत प्रॉफिट मेकिंगच्या भूमिकेत वावरणे हे विघातक खाजगीकरणच मानले पाहिजे किंवा खाजगी उद्योग हे नेहमी स्वर्गच आणतील ह्याही भ्रमात राहण्याचे कारण नाही . ह्याबाबतीत मार्गी , पोटी , देशी, जमाती, ह्याचे समग्र भान राखून सर्वांच्या भल्याचे काय आहे ते पाहिले पाहिजे .
जागतिकीकरणाचा एक थेट फायदा म्हणजे जगभरच्या पर्यायांची उपलब्धता . पण त्यामुळे काही चांगले देशी पर्याय गहाळ तर होत नाहीत ना हे पण पाहायला हवे . मुक्तछंद , सुनीत, मुक्त सुनीत , चांगलीच ; पण अभंग ओवी हे देशी म्हणून वाईटच ही वृत्ती वाईट जगात आपला प्रदेशही येतो ह्याचेही भान आपण बाळगावे . जगाशी चॅटिंग करता करता स्वतःच्या आईबापाशी बायकोपोरांशी , शेजाऱ्यांशी जर धड गप्पा मारता येत नसतील तर त्याचा अर्थ जवळचे वाचवण्यासाठी आपल्याला चष्मा हवा हाच होतो आणि त्याचा अधिक मूलभूत अर्थ आपले डोळे खराब झालेत हाच असतो . १९९५ नंतर जागतिकीकरण हे आपल्या थेट ( विशेषतः शहरात ) घरात घुसले त्यामुळे चिन्हसृष्टीकरणाचं जागतिक स्वरूप आपल्या तोंडावर इतक्या अवाढव्य प्रमाणात आदळलं कि आपण गडबडून गेलो .
विशेषतः मध्यमवर्गाची चौकोनी कुटुंबाची चौकोनी कुटुंबमूल्ये ही नव्याने आलेल्या संपत्तीने लालसेने, उपभोगवादाने , बडेजाववादाने पूर्ण हादरली आणि त्यांनी त्याच्या प्रदर्शनाचा उत्सवही मांडला त्यामुळे वाढदिवसाला पंचारती पुरेशी होईना ग्रीटिंग्ज कार्डेही लागू लागली संपत्ती हे पाप न होता पुण्य झाले त्यामुळे लोक पुण्य कमावण्याऐवजी संपत्ती कमावण्याच्या मागे लागले ह्याकाळातील मध्यमवर्गीय मीडियाने इतका भरवला गेला कि मीडिया म्हणतो तेच खरे असे त्याला वाटू लागले मग मीडिया म्हणाला शीतयुद्ध संपले प्रत्यक्षात शीतयुद्धात अमेरिकेचा शत्रू बदलत होता पण चायना ही मीडियाच्या दृष्टीने क्षुल्लक गोष्ट असल्याने त्याची ताकदच कळली नव्हती आज सरळ अमेरिका विरुद्ध चायना हे युद्ध आकार घेत आहे
१९८० नंतर आलेल्या सांस्कृतिक उदारीकरणाने आणि १९८८ नंतर आलेल्या मंडल आयोगाने ब्राह्मण्यवादाला चांगलेच मोठे आव्हान दिले त्यातून परिघाबाहेर असलेल्या अनेक ओबीसी जाती प्रथमच आपापली ताकद घेऊन आल्या त्यांनी ह्या देशातील राजकारणाची पारंपरिक सूत्रे बदलून टाकली दुर्दैवाने त्यातून जातीयवादही वाढला बहुजनवाद हा प्रथमच भारतीय संस्कृतीत एक ताकदवान पर्याय म्हणून अवतरला. भालचंद्र नेमाडे आनंद यादव नामदेव ढसाळ हे सरळ बहुजनांचे सांस्कृतिक पुढारी म्हणून पुढे आले ब्राम्हण्याला हे सहन होणे शक्य नव्हते
ह्या ब्राह्मण्याने बहुजनांमधल्या ब्राह्मण्य स्वीकारायला सोकावलेल्या काही बहुजनांना हाताशी धरून वेगळेच सांस्कृतिक राजकरण खेळायला सुरुवात केली तर बहुजनांतल्या काही अतिरेकी लोकांनी ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मण अशी उलटचक्री जातीयवादी भूमिका घेऊन प्रागतिक ब्राह्मण्यांना ते केवळ जन्माने ब्राह्मण आहेत ह्या एका गुन्ह्यासाठी झोडपायला सुरुवात केली ह्यातून ह्या काळात वेगळेच सांस्कृतिक तणाव निर्माण झाले. १९८० नंतर जे सांस्कृतिक उदारीकरण झाले त्याचाच हा भाग होता ( cultural liberalisation ) मंडल आयोग ही ह्या सांस्कृतिक उदारीकरणाची केवळ राजकीय परिणती होती .
ह्या बहुजनवादाने जागतिकीकरणाचा सामना अत्यंत अडाणीपणाने केला आणि जागतिकीकरण म्हणजे काही नवा बटू असून आपण बळी आहोत अशी मांडणी करावयास सुरुवात केली ही चूक होती व आहे चिन्हसृष्टीकरण व जागतिकीकरण ह्यांच्यातला रशिया -अमेरिका -लॅटिन अमेरिका -रशिया- यूरोप - पूर्व आशिया अशी भटकली तेव्हाच सुमारे ऐंशी हजार वर्षांपूर्वीच झाली चिन्हसृष्टीकरणातील जागतिकीकरणाची सुरुवात भारतात मात्र १९८० साली झाली मात्र १९८२ ते १९९२ ह्या कालखंडात जागतिकीकरण हे स्पीन गोलंदाजी टाकत होते कारण भारतीय खेळपट्टी तशी होती. १९९२ पासून मात्र जागतिकीकरणाचा फास्ट बोलिंगचा स्पेल सुरु झाला विशेषतः मनमोहनसिंगांनी आपले काम ह्याच वर्षी सुरु केले . तिथूनच जागतिकीकरण उदारीकरण व खाजगीकरणावर अधिक खोल चर्चा सुरु झाली खरेतर जागतिकीकरण ह्या विषयावर मी चारशे पानाचं एक पुस्तक लिहिलंय त्यामुळे त्याच्यावर बोलेन तितकं कमीच !
थोडक्यात काय , तर जागतिकीकरण म्हणजे सर्व महाराष्ट्रीय व राष्ट्रीय सीमा व भिंती कोसळून सृजन उत्पादन वितरण , ग्रहण, उत्सर्जन, शिक्षण , संपादन, जतन , संवेदन , बोधन, निरीक्षण, परीक्षण , निष्कर्षण, मुद्रण , संरक्षण, संघटन , वहन, वितरण, नियमन, दळणवळण वगैरे सर्व क्रियांचे त्यांच्याशी जोडलेल्या मितिकांचे त्यांच्या विशेषांचे जागतिक अवकाशात झालेले प्रसरण होय .
चौथी नवता जागतिकीकरणातील जे सर्व मानवजातीसाठी कल्याणकारी आहे ह्याचे स्वागत करते उदाहरणार्थ उद्या जर एड्सविरोधी लस समज अमेरिकेने शोधली तर ती केवळ अमेरिकन आहे म्हणून तिला विरोध करायचा हे चौथ्या नवतेला मान्य नाही त्यामुळे ती जागतिकीकरणातील विधायक गोष्टींचे स्वागत करते एनरॉनसारख्या विघातक गोष्टींना विरोध करते गरज पडली तर त्यासाठी प्रत्यक्ष लढा उभा करते आणि हे सर्व करताना त्या क्रियांविषयी ती विलक्षण जागृत आणि पूर्ण अवधान बाळगते .
२. तुझ्या आजूबाजूच्या समाजात गेल्या १०-१५ वर्षात झालेले ढोबळ व सूक्ष्म बदल कुठले ?
चिन्हसृष्टीकरण व जागतिकीकरणामुळे ( चीजा हे संक्षिप्त रूप पुढे वापरतो ) झालेले परिणाम हे दुहेरी आहेत
एकतर चिजामुळे ज्याचा प्रचंड फायदा झाला असा एक प्रचंड मोठा सपाट व एकसाची चेहऱ्याचा मोठा मध्यम चिन्हसृष्टीय मध्यमवर्ग म्हणून वर आला ह्या वर्गाकडे चिन्हसृष्टीने निर्माण केलेल्या टेलेफोन , बाईक, कार, कम्प्युटर , क्रेडिट वगैरे कार्ड उत्तम पैसे व त्यातून निर्माण होणारी खरेदीशक्ती अशा अनेक चिन्हवस्तू व चिन्हशक्ती आल्या हा वर्ग चिन्हसृष्टीला ऍक्सेसिबल झाला आणि त्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के झाले त्याची कळत नकळत एक सांस्कृतिक दादागिरीही निर्माण झाली .
याउलट चिजामुळे भुईसपाट झालेल्या नाडला गेलेला एक दुसरा चिन्हदलित वर्गही निर्माण झाला म्हणजे मॉलमुळे ज्या छोट्या दुकानदारांची दुकानदारे भुईसपाट होतायत ते दुकानदार चिन्हदलितच म्हटले पाहिजेत औदिगिकीकरणानेही अनेक पारंपरिक उद्योगधंदे असेच नष्ट केले होते . म्हणजे कापडगिरण्यांमुळे हातांनी कापड बनवणारा विणकरांचा एक मोठा वर्ग नष्ट झाला त्याचप्रमाणे मल्टिनॅशनल कंपन्यांमुळे अनेक छोट्यामोठ्या उद्योगातील कामगार बेकार झाले ज्याच्यावर चीजाचे दुष्परिणाम झाले असा हा वर्ग साधारण ३०% आहे . मी ज्या NNP त राहतो तेथील ८०% वस्ती ही ह्या वर्गाची आहे आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत मी रोज पाहतोय .
भारतात ३० % ते ४० % लोकांचा एक वर्ग असा आहे ज्याला औद्योगिकीकरणाचाच जर फायदा झाला नव्हता तर चिजाचा त्याच्यावर काय परिणाम होणार ? चीजाचे भवितव्य हे ह्या वर्गावर अवलंबून आहे चिजा जर ह्या वर्गाला फायदेशीर ठरले आणि हा वर्ग चिन्हसृष्टीय मध्यमवर्गात दाखल झाला तर चिजा ह्या देशांत यशस्वी होईल अन्यथा ते कोसळून पडेल .
प्रतिसृष्टीय विशीय औद्योगिकीकरणात मध्यमवर्ग कुठल्या वर्गाकडे जाणार ह्यावर भांडवलशाहीचे भवितव्य अवलंबून असायचे आज नेमके उलटे झाले आहे आज हा कोणाच्याच अध्यात मध्यात नसणारा कंगाल व ज्याकाकडे गमावण्यासाठी काहीच नाही असा जो वर्ग आहे तो कोणाकूडे जातो ह्यावर ह्या चीजाचे भवितव्य अवलंबून आहे .
तारीख : ७/८/१८
चीजाने हा वर्ग चीन , जपान ,अमेरिकेत प्रयत्नपूर्वक गिळंकृत केला आणि त्याला चिन्हसृष्टीय मध्यमवर्गात आणले भारतातही हेच घडले तर ती एक संघर्षहीन क्रांती असेल हे घडवण्यासाठी लागणारी संपर्कव्यवस्था व माध्यमक्रांती चिजाकडे आहे हे करण्यासाठी मार्केट ही नैसर्गिक गोष्ट आहे हे पटवणारे एक तर्कशास्त्र सध्या उत्तरआधुनिकतेच्या नावाखाली विकसित होत आहे हीच उत्तरआधुनिकता ब्लाईंड सिडक्शनचे व्हर्च्युअल नमुने आपल्या पुढे सादर करीत आहे जे बेहोश आहेत त्यांना अधिक बेहोश करणे आणि जे धड नाहीत ते जागृतावस्थेत येण्यापूर्वीच त्यांना सिड्यूस करून बेहोशीची चटक लावणे ( लहान मुले ही मुख्य टारगेट ) अशी ही सांस्कृतिक चिन्हशक्ती आहे. त्याचे बरेवाईट परिणाम गेली पंचवीस वर्षे आपण अनुभवतोय .
चिजाने त्या जोरावरच चिन्हसृष्टीय मध्यमवर्ग जो सुरुवातीला केवळ ३ ते ५ % होता तो वाढवत वाढवत ३० ते ४० % केला आणि येत्या दहा वर्षात तो ७० % होऊन ह्या देशाचा मुख्य वर्ग कसा होईल ह्याचा विचार चिजा करते आहे त्या दृष्टीने मार्केट तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे एकदा का तसे झाले कि कम्युनिझमची उरलीसुरली धूळही उडून जाईल त्यामुळेच शोषणासंदर्भात अधिक सावधान होण्याची जबाबदारी कलावंताच्यावर येऊन पडणार आहे
चिजामुळे आपण आकुंचन आणि प्रसरण ह्यामध्ये डोलतो आहे The world is shrinking आणि The world is becoming flat ह्या दोन्ही प्रक्रिया त्यामुळेच घडताना दिसतात पूर्वी भांडवल श्रम वगैरे सर्व गोष्टी solid होत्या आता सर्वच गोष्टी liquid आणि gaseous अशा वेळेला तुमची मुळे धोक्यात येणे अटळ कारण मुळांचा आधार जमिनीची solidity असते तीच गेली तर काय हा प्रश्न अटळ ! liquidity & gaseousity हा चिजाचा एक मूलभूत परिणाम
seduction हे नेहमीच तुम्हाला प्रथम स्तंभित करते त्यासाठी तुम्हाला solidify करते तुम्ही एक प्रकारे स्तंभता ! ताठ होता ! १९८२ - ८७ हा कालखंड हा स्तंभण्याचा कालखंड होता तो एका अर्थाने चिन्हसृष्टीकरणाचा solid अवस्थेचा काळ होता त्यामुळेच संजय गांधीने आणलेल्या खाजगी मोटार मारुती उद्योगाचे काय करायचे ह्याविषयीचा जो गोंधळ होता तो हळूहळू ह्याच काळात सुटून एकंदर उदारीकरणाकडे कल वाढू लागला ह्या काळात संगणक टीव्ही वगैरे गोष्टींनी आपण स्तंभित झालो होतो बाईक्सच्या नवीन मॉडेल्सनीही हीच अवस्था केली होती ह्याच काळात सिमेंटचे उदारीकरण होऊन बांधकामे भरभराटली .
१९८८ नंतरचा कालखंड हा ही solidity संपवण्याचा काळ होता liquidity सुरु झाली सुखस्राव दुःखस्राव असे सगळेच स्त्राव पाझरायला लागले मुख्य म्हणजे टीव्ही बाईक्स वगैरेंमुळे येणारा अपराधभाव गेला व त्याबाबत अभिमान पाझरायला लागला जी solidity कसोशीने सांभाळण्यात आली तिचे विघटन सुरु झाले कारण सर्वत्र liquidity झिरपली १९९५ नंतर आपले विमान हवेत गेलेय ते अद्याप तरी जमिनीवर उतरलेले नाही ही गॅसिअस अवस्था होय गॅस सर्वत्र पसरतो उधळतो पाझरतो नष्ट करतो सॉलिडिटीमध्ये फ्रिक्शन खूप पण त्या फ्रिक्शनमुळे मजाही येते लिक्विडिटीमध्ये फ्रिक्शन संपुष्ठात येते. इथे जो मजा असतो तो वाहण्याचा आणि पाण्यात पडून पोहण्याचा
तारीख : ८/८/१८
गॅसिअसमध्ये तुम्ही टोटल फ्रिक्शनलेस होता इथे तर काठही नाहीसे होतात सॉलिडिटीत इंटरमिक्सींग कमी लिक्विडिटीमध्ये प्रवाह एकमेकांला मिळायला लागतात आणि गॅसिओसिटीमध्ये कशात काय मिसळतंय ते कळणेही मुश्किल होऊन जाते ह्यातूनच सांस्कृतिक सरमिसळीचा मुद्दा ऐरणीवर येतो ह्या सरमिसळीला घाबरलेले लोक मूलतत्ववादाकडे वळतात दहशतवाद हा प्रतिकाराचा आत्यंतिक मार्ग आहे तो आधुनिकही असू शकतो पण मूलतत्त्ववाद हा प्रतिकार नसतो तर घाबरून स्वतःच्या सॉलिड कोषात सॉलिड पायात परतणे असते मूलतत्त्ववादी दहशतवाद हा मार्ग म्हणून वापरू शकतो तर दहशतवाद मूलतत्त्ववादाला साधन म्हणून वापरू शकतो ह्या दोघांची युक्ती ही १९८० नंतरचा एक अजोबोगरीब बदल आहे पंजाब आसाम काश्मीर श्रीलंका पॅलेस्टाईन असे अनेक प्रश्न त्याचा परिणाम आहेत.
liquid अवस्थेत भांडवलही liquid झाले आणि liquid capitalism जन्माला आला लवकरच हा capitalism गॅसिअस होईल आतापर्यंतचा जो कॅपिटॅलिझम होता तो solid capitalism होता पण चिन्हसृष्टीकरणामुळे तो liquid झाला हीच गोष्ट socialism ची आहे आतापर्यंतचा solid socialism होता जगात चिनचा अपवाद वगळता तो सर्वत्र solid राहिला चीनने मात्र चिन्हसृष्टीकरण स्वीकारून liquid socialism चा एक नवा पर्याय पुढे आणला
liquid socialism मध्ये भांडवलाची liquidity सहज स्वीकारली जाते gaseous capitalism व socialism मध्ये आता फार पुढची पावले टाकली जाणार हे उघड आहे अशा वेळेला मार्क्स व आंबेडकरांचा solid socialism कालबाह्य होत जाणे अटळ आहे
तारीख : १०/८/१८
अशा वेळेला state ( राज्य ) ही संस्था liquid होणे अटळ आहे पूर्वी state ह्या शब्दाचा अर्थच मुळात solid state होता ह्यामुळेच liquid state ही संकल्पना स्वीकारणे आपणाला अजूनही शक्य झालेले नाही त्यातूनच solid state आणि liquid capitalism ह्यांच्यात सतत संघर्ष होताना सध्या दिसतोय हे सर्व अमेरिकेमुळे होतय असाही एक गैरसमज झालेला दिसतोय माझ्या मते अमेरिका उद्या पृथ्वीवरून नाहीशी झाली तरी हेच होणार आहे कारण प्रश्न चिन्हसृष्टीकरणाचा आहे अमेरिका ही ह्या चिन्हसृष्टीकरणाचे फक्त नेतृत्व करतेय पण हे नेतृत्वही येत्या पंचवीस वर्षात कोसळून पडणार आहे. चीन आणि युरोपियन समुदाय हे नेतृत्व कास उलथून टाकता येईल ह्याचीच वाट पाहतायत. डॉलरचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे चाललेले प्रयत्न हा ह्या प्रयत्नांचा केवळ एक भाग आहे . हे सगळेच बदल साहित्यावरही प्रभाव टाकतायत .
औद्योगिकीकरणात माणसाचे रूपांतर कमोडिटीत करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला शह म्हणून modern art जन्माला आली अस्तित्ववाद बोकाळला . माणसाला कमोडिटी बनवण्यापासून वाचवणे व त्याला व्यक्तिमत्त्व बहाल करणे हा या ह्या चळवळीचा पाया ही कला subjective झाली कारण subject च धोक्यात आला चिन्हसृष्टीकरणाने माणसाचे रूपांतर सेमिओडीटीत करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सेमिओडिटी ही एकाच वेळी कमोडिटी असते आणि प्रोग्रामही असते. हा प्रोग्राम प्रीप्लान्ड असतो आणि तरीही त्यात विविध पर्यायांची प्रचंड गजबज असते जी माणसाला स्वातंत्र्याचा आणि मौजेचा ठोस आभास देते अशा वेळी कलावंताला फक्त कमोडिटीपासून वाचून किंवा स्वतःचे व्यक्तिमत्त्व शाबूत ठेऊन चालत नाही तर स्वतःला ह्या प्रीप्लान्ड प्रोग्रामपासून वाचवणेही गरजेचे बनते चौथ्या नवतेची कविता हे काम करते आता तिने अधिक पुढे जाणे आवश्यक आहे औद्योगिकीकरणाच्या काळात modern art ला हळूहळू कळून चुकलं की असं नुसतं अस्तित्ववादी व्यक्तिनिष्ठ असून भागणार नाही आणि मग collective consciousness ला महत्व देणारी पर्यायी modern art जगभर पुढे आली आणि तिने postmodern ला जन्म दिला चीजाच्या बाबतीत कळत नकळत आता आपली हीच अवस्था होईल मात्र आपला collective consciousness हा modern असून चालणार नाही तर तो पूर्णपणे नवा व चिन्हसृष्टीकरणाला नीट सामोरा जाणारा हवा सध्या काही back to modern ideology चा उथळ उद्योग करतायत. हे म्हणजे औद्योगिकीकरणाच्या काळातील प्रश्न सोडवण्यासाठी काही लोक संतांच्याकडे जायचे तसाच काहीसा हा प्रकार आहे आसपासचे बदल नीट न कळल्याचे हे लक्षण आहे मुळात ह्या लोकांची ideology ही ideology राहिलेली नाही ती श्रद्धा बनलीये आणि एखादी गोष्ट श्रद्धा बनली कि तुम्ही तिच्या विषयी संशय घेणे हे पाप मानले जाते हे पाप मी वारंवार केल्याने अनेकांची पंचायत झालेली दिसते पण मी माणूसच असा आहे की जो बदलाला नेहमीच तयार असतो
३. तू तुझ्या कवितेत तुझं बदललेलं जग कशा प्रकारे आणलंय ? ते आलंय का ? कवितेत नव्या वस्तूंची साधनांची, कॉम्प्युटरच्या / वेबवर्ल्डसंबंधी गोष्टींची नाव / उल्लेख करून लिहिलेल्या अनेक कविता हल्ली वाचायला मिळतात अशा कवितांबद्दल तुला काय वाटतं ? ह्याच वस्तूंची / गोष्टींची नाव / उल्लेख करून लिहिलेली एखादी चांगली कविता आठवतेय का ?
मी एका अर्थाने चिन्हसृष्टीकरणाचा अखंड कवी आहे . माझ्या स्वतःच्या आयुष्यात १९८२ ते १९८७ हा कालखंड प्रचंड सृजनाचा कालखंड आहे
तारीख : ११/८/१८
ह्या काळात मी साधारण हजार बाराशे कविता , तीस कथा , चार एकांकिका , एक फसलेली कादंबरी , नऊ नाटके एवढे प्रचंड लिखाण केले आहे. पूर्वी मी हा एकदा सांगितला की लोकांचा विश्वास बसायचा नाही . पण डेकॅथलॉन हा संग्रह बाहेर पडल्यापासून लोक तितकासा अविश्वास दाखवत नाहीत. आता डेकॅथलॉन प्लस, डेकॅथलॉन मॅक्झिमम , तू , कोल्हापूर ते मुंबई व्हाया कविता ( ह्यांचा समावेश कदाचित पॉप्युलरतर्फे येऊ घातलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या संग्रहाच्या आगामी दुसऱ्या आवृत्तीत होईल ) कोलाज , आऊट ऑफ थिंग असे कविता संग्रह बाहेर आले की हा कालखंड स्पष्ट होईल
१९८८ ते १९९५ ह्या कालखंडात हे प्रमाण मंदावले . प्रामुख्याने ह्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या कवितांचे जास्त प्रमाण असणारा क. व्ही. हा संग्रह आता बाहेर आलाय माझ्या दृष्टीने ज्यांना मी चिन्हसृष्टीय कविता म्हणतो अशा सातशे साडेसातशे कविता मी लिहिल्या त्या १९८८ ते २००३ ह्या काळात. त्यातील चारशे कविता १९८८ ते १९९५ ह्या काळातील असाव्यात . ह्याशिवाय ह्या काळात मी अफेअर डॉट कॉम नावाची माझ्या दृष्टीने यशस्वी कादंबरी लिहिली . तिचा फायनल ड्राफ्ट मात्र मला तिचा शेवट न आवडल्याने अडून होता . तो मी नुकताच केला. ह्याशिवाय सात नाटके वीस कथा सहा सात एकांकिका , टीकाहरण मधील बरीचशी समीक्षा मी ह्या काळात लिहिली गेलीये .
१९९६ पासून मात्र माझ्या आयुष्यात समीक्षा नको तितकी महत्वाची झाली . १९९६ ते २००३ ह्या काळात मी फक्त साडेतीनशे कविता लिहिल्यात . त्याचे प्रतिनिधित्व स्त्रीवाहिनी ह्या संग्रहात आहे. मी काहीसा झपाटल्यासारखा कविता लिहितो . एकाच झपाट्यात मी दीर्घ कविताही लिहिल्या आहेत ह्या अर्थाने मी अघोरी कवी आहे . मला स्वतःला फारस माग वळून पाहायला आवडत नाही . त्यामुळे केलेले लिखाण प्रकाशित करण्याचाही फारसा उत्साह मला नसायचा, किंबहुना १९९५ पर्यंत ह्या बाबतीत मी निरुत्साही होतो . ह्याला कारण माझा कोल्हापुरातला कडवट अनुभव असावा माझ्या लेखनाची प्रचंड अवहेलना आणि मानखंडना झाल्याने पुढे पुढे मी ते दाखवायचेच बंद केले.
माझ्या प्रचंड लेखनशक्तीमुळे असेल, पण माझ्या आसपासचा जवळ जवळ प्रत्येक बदल माझ्या कवितेत कुठे ना कुठे आलेला आहे . चिन्हसृष्टीकरणाचे तिन्ही कालखंड अनुक्रमे ' डेकॅथलान ' , क.व्ही . आणि स्त्रीवाहिनी ह्या कविता संग्रहात आलेले दिसतील . क. व्ही त जागतिकीकरण हे बाहेर जास्त आहे . स्त्रीवाहिनीत हे जागतिकीकरण थेट घरदारात घुसलेले दिसेल. आता हे मी जाणीवपूर्वक केलय का ? तर जिथे मला ideology चाच प्रतिकार करायचा होता तिथे ते जाणीवपूर्वक आलय पण जवळजवळ ९०% कवितेत ते अजाणताच आलंय .
हे मी कशाप्रकारे आणलंय असं म्हणशील तर सगळ्या प्रकारे !
मी कवितेला आणि आयुष्याला चहुअंगांनी भिडणारा माणूस आहे कविता ही कुठल्यातरी अमुक एका पद्धतीने लिहिता येते ह्यावर माझा विश्वास नाही. डेकॅथलानच्या पहिल्या अर्ध्या भागात मी रोमँटिक आहे तर नंतर देशीवादी व दलित साहित्याच्या प्रभावाखाली होतो .कोलाजमध्ये तर मी कट्टरला कट्टर देशीवादी होतो इतका की हा संग्रह भालचंद्र नेमाड्यांना मी अर्पण करावा डेकॅथलॉन प्लसमध्ये मी अस्तित्ववादी होतो तर डेकॅथलान मॅक्झिमममध्ये पर्यायी आधुनिकवादी ज्याला म्हणतात तसा. ह्या काळात मी दर चार महिन्यांनी काहीतरी नवाच असायचो .
सप्टेंबर १९८७ नंतर मी ह्या साऱ्यातूनच बाहेर पडलो आणि चिन्हसृष्टवादी झालो . १९८८ ला मी मुंबईत राहता येईल का ह्याची चाचपणी केली आणि १९८९ मध्ये राहायलाच आलो. माझ्यातला हा बदल माझ्या कोल्हापूरच्या अनेक मित्रांना आजही आवडत नाही . त्यांच्या मते माझ्या चांगल्या कविता ह्या ८७ पर्यंतच लिहिल्या गेल्या पण मित्रांच्या पेक्षा आपला आतला आवाज काय म्हणतो हे महत्वाचे वाटल्याने मी नवे बदल आत्मसात करत राहिलो.
आता पुढचा प्रश्न तर प्रत्येक काळात प्रतिभा नसलेले काही चलाख लोक असतातच हे चलाख लोक असतातच . हे चलाख लोक कम्प्युटर वगैरे उल्लेख करून कविता लिहिणारच . आपण कि त्यांच्याकडे लक्ष द्यायचे कारण नाही, पण त्याच बरोबर प्रचंड थोर वगैरे असंही कुणी समजू नये . ते एक मशीन आहे. ह्याचे भान बाळगावे. जाहिरातीच्या क्षेत्रातली मशीन्स ही तुमच्या p.c. पेक्षा शंभर पटींनी श्रेष्ठ असतात .
तेव्हा p.c. आला म्हणजे सगळं आलं असं समजण हेही तितकंच वाईट . हल्ली काही मध्यमवर्गीय कवींना आपण पी.सी वापरतो ह्याचाच माज आलाय , म्हणून हे सांगावेसे वाटते . तुमचे स्टेट्स सिम्बॉल हे कवितेत फारसे कामाचे नसते . पाब्लो नेरुदाने मी टाईपरायटरने मुद्दाम जाणीवपूर्वक कविता लिहीत नाही , कारण त्याने मानवी स्पर्श नाहीसा होतो असे म्हंटले होते, तर पी.सी न वापरणे हीही एखाद्या कवीची फार जाणीवपूर्वक केलेली निवड असू शकते .
कवितेबाबत एक मूलभूत गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक अनुभव नवा असतो प्रत्येक क्षण नवा असतो , प्रत्येक क्षणी अवकाश नवा असतो त्यामुळे प्रत्येक कविता ही नवी असते. जोपर्यंत कागदावर काय उमटणार ह्याविषयीचे थ्रिल जिवंत असते तोपर्यत तुम्ही कवी असता ज्यादिवशी हे थ्रिल संपते लिखाणात प्रेडिक्टबिलिटी येते, तुमचा जुनाट मेंदूच स्मरणशक्तीद्वारे तुमची कविता लिहायला लागतो त्या दिवशी तुम्ही कवी म्हणून संपलेले असता.
४ . तुझ्या जगण्याचा कवितेवर व कवितेचा जगण्यावर परिणाम होतोय का ? कशा रीतीने ? तुझ्या दृष्टीने तुझ्या कवितेचं जग कोणतं ? उदाहरणार्थ ? तुझ्या दृष्टीने तुला कवी म्हणून , माणूस म्हणून, मराठी भाषक म्हणून, भारतीय म्हणून, जागतिक ग्लोबल नागरिक म्हणून कुठल्या समस्या आहेत ? त्या समस्यांचा सामना कसा करावा ? काय काय उपाय या समस्यांवर असू शकतात ? नसल्यास का नाहीत ? असल्यास भविष्यात काय करावं ? तू लिहितोय म्हणजे नेमकं काय करतोय ? तुला कविता लिहायची ऊर्जा कुठून मिळते ?
मी कवितेने आतून बाहेरून झपाटलेला मनुष्य आहे . माझ्यात एक लहान मूल आहे ज्याला ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल आहे आणि माझ्यात एक तत्वज्ञ आहे ज्याला जे जे आपल्याला कळलंय ते ते सगळं सांगायचंय . मला वाटते , कविता ही जगातली कदाचित एकमेव गोष्ट असेल जिथे हे लहान मूल आणि तत्वज्ञ एकत्र नांदू शकतात . कविता ही त्यामुळेच अनेकदा लहान मुलाने सांगितलेले तत्वज्ञान असते किंवा तत्वज्ञांचे बालसुलभ कुतूहल व त्यापोटी त्याने घेतलेला शोध असते . कविता ही जीवनाचे असे एक इंटरनेट आहे जिथे माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच वेबसाईट्स एकत्र येऊन मिळतात . सॉलिड, लिक्विड , गॅसिअसचे प्रेशिअस इंटरनेट ! मी एक असा मनुष्य आहे जो असंख्य तुकड्यात विखरून पडलाय , आणि तरीही जो हे सगळे तुकडे कासवांसारखे कवितेच्या पोटात घेऊन आरामात चाललाय .
माझे स्वतःचे जगणे गाव, शहर आणि महानगर अशा तिन्ही अवकाशात फिरत असल्याने ह्या तिन्ही अवकाशांची सरमिसळ माझ्या कवितेत होत असते. ह्यात भरीसभर म्हणून माझ्यावर फुले , आंबेडकरांचा , विशेषतः गौतम बुद्धांचा दार्शनिक पातळीवर सखोल ठसा आहे त्यामुळे दलित अवकाशविषयी मी नको तितका सजग आहे मी जन्माने दलित नसूनही माझे आयुष्य अनेक हालअपेष्टांतून गेल्याने मला दलित साहित्य जेवढे आपले वाटले तेवढे इतर साहित्य वाटले नाही आणि हे सर्व कमी म्हणू की काय , माझ्या घरात आसपास फक्त स्त्रिया . माझ्या आईकडे तर मुलगाच नाही सगळ्या बहिणीच आणि मी ज्या पाटलांच्या घरी जन्मलो तिथेही बायकाच . त्यात पुन्हा भर म्हणजे लहानपणी माझ्या सावळ्याकाळ्या रंगात निळसर झाक होती ( जी पुढे नाहीशी झाली ) .
मग काय होणार ? माझा माझ्या आसपासच्या बायकांनी पार श्रीकृष्ण केला जणू ह्या बायका लाड करण्यासाठी एका पुरुषाची वाटच पाहात होत्या आणि मी जन्मलो ! त्यामुळे स्त्रैण अवकाश हा मला लहानपणापासुन नको तितका उपलब्ध झालाय . ह्या सगळ्या बायकांनी त्यांच्या दृष्टीने मी आदर्श पुरुष व्हावे म्हणून यथेच्छ धडपड केली . त्यामुळे कुस्तीपासून फुटबॉलपर्यंत ज्याला ज्याला पुरुषी टॅग्ज लागला त्या त्या गोष्टी मला करायला लागल्या ह्या सगळ्याच गाववाल्या ! स्त्रीमुक्तीचे वारे तितकेसे न पोचलेले ! त्यामुळे त्यांनी मला व्यवस्थित पुरुष बनवला . माझा स्त्रीवाहिनी हा संग्रह ही ह्या बायकांची देन . त्यांच्यामुळेच मी महानगरातल्या स्त्रिया नीट जोखू शकलो . अनेकांना वाटतं तसा काही तो स्त्रियांच्या नजरेतून लिहिलेला संग्रह नाही . तर माझ्यातच असलेल्या आणि माझ्या आसपासच्या बायकांनी जागे केलेल्या माझ्यातल्या स्त्रीने लिहिलेला तो संग्रह आहे .
मी लोकांशी कमिटमेन्ट असणारा एक कवी आहे . त्यामुळेच मी कुठल्याही संघटनेच्या चरणाशी निष्ठा वाहिल्या नाहीत आणि ज्या संघटना मी जॉईन केल्या तिथे मी प्रमुखच होतो .
१ ग्लोबलायझेशन म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय ? त्याचे चांगले / वाईट परिणाम कोणते ? ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरु आहे असं काहींना वाटत तर मला १९९० च्या आसपास ही प्रक्रिया सुरु होऊन तिचा प्रभावही जाणवू लागला, असं वाटतं ? तुला काय वाटत ?
मानवी संस्कृतीत १९०० नंतर शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी अनेक शोध लावून नव्या नव्या चिन्हवस्तू ( semiodities ) तयार केल्या ह्या चिन्हवस्तूंचे उत्पादन जसे जसे वाढत गेले तसा तसा त्यांचा भोग वा आस्वाद वाढायला लागला , ग्रहण वाढू लागले ह्यातून चिन्हसृष्टीकरण सुरु झाले सुरुवातीचा कालखंड हा काहीसा innovations चा संशोधनाचा होता पण १९७५ नंतर त्याचे उत्पादन व वितरण प्रचंड प्रमाणात वाढले . नवीन आलेला हा चिन्हसृष्टीकरणाचा प्रवाह काही द्रष्ट्यांनी राजकारण्यांनी आधीच ओळखला . १९५५ नंतर अनेक विचारवंतांनी त्याचे निरूपण करायला सुरुवात केली ह्यातूनच सत्तरीच्या दशकात चिन , ब्रिटन वगैरे देशांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला हे उदारीकरण सरकारकेंद्री व सरकारवलंबी होते . ब्रिटनमध्ये त्याला थॅचरिझम असे नाव मिळाले भारतात संशोधनाचा पहिला टप्पा घडलाच नाही पण चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा १९८० नंतर सुरु झाला सिमेंटच्या उदारीकरणाच्या मारुती उद्योगाने टेलिकम्युनिकेशन क्रांतीने त्याची सुरुवात झाली १९८० ते ११९८७ हा तो पहिला टप्पा . ह्याला भारतातील विचारविनिमयाचा टप्पा म्हणता येईल . चिन्हसृष्टीकरण करायचे कि नाही ? उदारीकरण कसे करावे कि करूच नये ? सोवियत युनियनचा पाडाव होऊ झाल्यामुळे समाजवादाचे भवितव्य काय हे ह्या काळातले उग्र प्रश्न ! ह्याच काळात पंजाबमधला दहशतवादाचा प्रश्न अत्यंत व्यापक झाला आणि तो पंजाबी देशीयतेत उदयाला आला त्याला आसामी देशीयतेची साथ मिळाली महाराष्ट्रातही शिवसेना पसरायला सुरुवात झाली देशी चिन्हांचा अस्मिता म्हणून वापर हाही ह्याच काळाचा विशेष मार्गी गोष्टी का, कशी, कुठे , किती, कोणासाठी, आणायच्या हा ह्या काळातला कळीचा प्रश्न होता व प्रयोगही चालू झाले होते .
चिन्हसृष्टीचा दूसरा टप्पा १९८८ पासून सुरु झाला खाजगीकरण हा ह्या काळातील मुख्य मुद्दा ह्या खाजगीकरणामुळे व आधीच्या उदारीकरणामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला शिरकाव मिळाला ह्याला मी चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा मानतो मंडल आयोग , इस्लामी दहशतवाद , राजजन्मभूमीचा प्रश्न हे देशीयतेतून निर्माण झालेले प्रवाह एकीकडे तर खाजगीकरण व उदारीकरणामुळे सुरु झालेले मार्गी प्रवाह दुसरीकडे १९८८ ते १९९५ - ९६ असा हा कालखंड होता . ह्याला आपण चिन्हसृष्टीकरण म्हणू. कारण ह्या काळात आपला प्रचंड भर आयातीवर होता . मार्गी गोष्टींचे देशीकरण घडवणे ह्या काळात चालू झाले
१९९६ पासून मात्र जागतिकीकरणाचा शिरकाव हा शिरकाव न राहता ती हळूहळू सार्वत्रिक वस्तुस्थिती बनायला लागली उदारीकरण ( liberalisation ) खाजगीकरण ( privatisation ) आणि जागतिकीकरण ( globalization ) ( LPG ) ही त्रयी सर्वच चर्चाच्या केंद्रस्थानी आली . जे देशी आहे ते टिकते कि नाही असा प्रश्न अनेकांना सतवायला लागला तर अनेक देशी कंपन्या बहुराष्ट्रीय होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या काही तर प्रचंड यशस्वी झाल्या ह्याला आपण मार्गी आणि देशी ह्यांच्या मिश्रणाचा कालखंड असल्याने मादे चिन्हसृष्टीकरण म्हणू . मादे चिन्हसृष्टीकरणाचा कालखंड अद्यापही चालू आहे . आता चिन्हसृष्टीकरणात आपण निर्यातही करायला लागलोय . आज अनेक देशी गोष्टी ग्लोबल होत जाताना दिसतायत . उदा. आपली साडी
जागतिकीकरण हे ह्या चिन्हसृष्टीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने प्रसरण ह्या प्रक्रियेचा समावेश होतो कुठल्याही देवघेवीत देणे आणि घेणे असते ही देवघेव एकतर प्रचंड सुकाळामुळे निर्माण होते किंवा टोकाच्या दुष्काळामुळे , म्हणजे तुमच्याकडे इतके उत्पादन होते कि ते तुम्हाला जगभर वाटण्यावाचून पर्याय उरत नाही. तुम्ही जी गोष्ट जगाला देऊ पाहता कधी प्रेमाने कधी मार्केटिंग करून तर कधी सक्तीने तर काही वेळा इतका दुष्काळ निर्माण होतो कि आसपासच्या परिसरातून तुम्हाला काहीच घेता येणे शक्य होत नाही अशा वेळी तुमची भूक प्रचंड तीव्र असेल तर तुम्ही घेण्यासाठी परिसर सोडून जगात ती जिथे कुठे मिळते तिथे जाता किंवा ती आयात करता , कधी प्रेमाने मागता तर कधी दादागिरी करून तर कधी मेहनत करून कधी स्वतःचे मार्केटिंग करून ही जी देवघेव आहे ती जेव्हा जागतिक होते तेव्हा तिला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरणातला हा दुष्काळ वा सुकाळ प्रत्येकवेळी नैसर्गिकच असेल असे नाही कधी कधी तो मानवी वा सामाजिकही असू शकतो अनेक स्थलांतरे ही दुष्काळातून होतात अनेकदा आयात करून भूक भागवली जाते दुष्काळ मिटवला जातो तर निर्यात ही अनेकदा सुकाळातून निर्माण होते किंवा कशाच्या तरी बदल्यात ती केली जाते काही लोक इतके स्वभावतः अधाशी व भुकेले असतात कि त्यांना कुठेही दुष्काळच जाणवतो
अनेकदा राजकीय पक्षांना पैशांचा दुष्काळ जाणवल्याने त्यांनी तो दुष्काळ मिटवण्यासाठीही नको असलेली आयात केली आहे नको असलेले उदारीकरण वा खाजगीकरणही केले आहे अनेकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली अनावश्यक खाजगीकरणे आणि उदारीकरणेही केली गेली आहेत आणि कशालाही जागतिकीकरण म्हणून मान्यता देणाऱ्या अडाणी विचारवंतांनी जागतिकीकरण ह्या ब्रॅण्डला भुलून जाऊन ही अनावश्यक खाजगीकरणे व उदारीकरणेही आवाज न काढता स्वीकारली आहेत
उत्पादनाचा एकदा का दुष्काळ निर्माण झाला कि तो भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली जाते कारण दुष्काळाचा अर्थ उत्पादन कमी झाल्याने तोटा असा होतो अशा वेळी ग्राहक संख्या वाढणे व उत्पादन वाढणे हे कंपनी टिकण्यासाठी आवश्यक असते त्यातूनच ती कंपनी खाजगी करावी ही मागणी येते किंवा ती खाजगी कंपनीला विकली जाते काही वेळा कंपन्या इतक्या कमी असतात कि नुसत्या खाजगीकरणाच्या काही होणार नसते मग त्या क्षेत्रात उदारीकरण आणून अनेक कंपन्या आणल्या जातात मग पुढे नुसत्या कंपन्या आणूनही भागत नाही त्यांची संख्या त्यांचे उत्पादन इतके कमी पडते कि बाहेरच्या कंपन्या , बाहेरचे भांडवल आणावे लागते आन मग त्यासाठी जागतिकीकरण अपरिहार्य असते पण जेव्हा देशी कंपन्यांना संधीही न देता थेट बाहेरच्या कंपन्यांना आणले जाते तेव्हा ते जागतिकीकरण विघातक जागतिकीकरण असते एनरॉन हे अशा विघातक जागतिकीकरणाचे उदहारण आहे जी संधी रिलायन्स व टाटांना आता दिलीय ती त्या वेळी दिली असती तर कदाचीत विजेचा प्रश्न इतका चिघळला नसता पांढऱ्या कातडीला भुलून जाण्याची आपली सवय ही अनेकदा विघातक जागतिकीकरणाला आमंत्रण देते काही वेळा देशी कंपन्याच इतक्या बेजबाबदार आणि मुजोरड्या असतात कि त्यांना स्पर्धेचा फटका पडल्याशिवाय त्या सुधारत नाहीत अशा वेळी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून बाहेरच्या कंपन्या आणल्या जातात तेव्हा ते विधायक जागतिकीकरणच असते उदा , ऑटोमोबाईल इंडस्ट्री
जागतिकीकरण चांगले कि वाईट हे त्या त्या परिस्थितीच्या संदर्भ चौकटीत ठरत असते उदाहरणार्थ साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मितीसाठी दार्शनिकता व दर्शनता फार महत्वाची असते भारतात जिला चिन्हसृष्टीय दर्शनता म्हणावी अशी फारशी निर्माण झालेली नाही त्यामुळे संजीव खांडेकरांसारखा कवी जर फ्रेडरिक जेम्सन , कार्ल मार्क्स लाकान ह्यांच्यासारख्या पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या तत्वज्ञानातून काही आयात करून त्यांचा वापर स्वतःच्या कलानिर्मितीसाठी करत असेल तर आपण त्याला ते पूर्ण विघातक आहे असे म्हणून खोड काढू नये . पण त्याचबरोबर श्रीधर तिळवेसारखा एखादा गृहस्थ भारतीय दर्शनातील अनेक संकल्पनांची हवी तशी मोडतोड करून त्यातून भारतीय चिन्हसृष्टीय दर्शनता निर्माण करत असेल तर तो केवळ भारतीय संज्ञा वापरतो म्हणून त्याला मागासलेला समजणे हेही शहरांढळेपणाचे
( गावंढळच्या विरोधी ) लक्षण होय . शक्यता अशीही असू शकते की ते पाश्च्यात्य दर्शन त्याला अत्यंत उथळ पोरकट आणि करिअरिस्ट वाटल्याने तो पुन्हा भारतीय दर्शनाकडे वळला असेल
चिन्हसृष्टीकरण ही प्रतिसृष्टीकरण व त्यातून आलेल्या औद्योगिकीकरणाइतकीच अटळ आणि अपरिहार्य गोष्ट आहे ते खाजगीकरण , उदारीकरण व जागतिकीकरण ह्यांच्यातून साकार होते आहे हे खरे पण प्रत्येक वेळी प्रत्येक पैलू अपरिहार्यच असेल असे नाही उदा. सरकारने स्वतःला खाजगी कंपनी समजून सतत प्रॉफिट मेकिंगच्या भूमिकेत वावरणे हे विघातक खाजगीकरणच मानले पाहिजे किंवा खाजगी उद्योग हे नेहमी स्वर्गच आणतील ह्याही भ्रमात राहण्याचे कारण नाही . ह्याबाबतीत मार्गी , पोटी , देशी, जमाती, ह्याचे समग्र भान राखून सर्वांच्या भल्याचे काय आहे ते पाहिले पाहिजे .
जागतिकीकरणाचा एक थेट फायदा म्हणजे जगभरच्या पर्यायांची उपलब्धता . पण त्यामुळे काही चांगले देशी पर्याय गहाळ तर होत नाहीत ना हे पण पाहायला हवे . मुक्तछंद , सुनीत, मुक्त सुनीत , चांगलीच ; पण अभंग ओवी हे देशी म्हणून वाईटच ही वृत्ती वाईट जगात आपला प्रदेशही येतो ह्याचेही भान आपण बाळगावे . जगाशी चॅटिंग करता करता स्वतःच्या आईबापाशी बायकोपोरांशी , शेजाऱ्यांशी जर धड गप्पा मारता येत नसतील तर त्याचा अर्थ जवळचे वाचवण्यासाठी आपल्याला चष्मा हवा हाच होतो आणि त्याचा अधिक मूलभूत अर्थ आपले डोळे खराब झालेत हाच असतो . १९९५ नंतर जागतिकीकरण हे आपल्या थेट ( विशेषतः शहरात ) घरात घुसले त्यामुळे चिन्हसृष्टीकरणाचं जागतिक स्वरूप आपल्या तोंडावर इतक्या अवाढव्य प्रमाणात आदळलं कि आपण गडबडून गेलो .
विशेषतः मध्यमवर्गाची चौकोनी कुटुंबाची चौकोनी कुटुंबमूल्ये ही नव्याने आलेल्या संपत्तीने लालसेने, उपभोगवादाने , बडेजाववादाने पूर्ण हादरली आणि त्यांनी त्याच्या प्रदर्शनाचा उत्सवही मांडला त्यामुळे वाढदिवसाला पंचारती पुरेशी होईना ग्रीटिंग्ज कार्डेही लागू लागली संपत्ती हे पाप न होता पुण्य झाले त्यामुळे लोक पुण्य कमावण्याऐवजी संपत्ती कमावण्याच्या मागे लागले ह्याकाळातील मध्यमवर्गीय मीडियाने इतका भरवला गेला कि मीडिया म्हणतो तेच खरे असे त्याला वाटू लागले मग मीडिया म्हणाला शीतयुद्ध संपले प्रत्यक्षात शीतयुद्धात अमेरिकेचा शत्रू बदलत होता पण चायना ही मीडियाच्या दृष्टीने क्षुल्लक गोष्ट असल्याने त्याची ताकदच कळली नव्हती आज सरळ अमेरिका विरुद्ध चायना हे युद्ध आकार घेत आहे
१९८० नंतर आलेल्या सांस्कृतिक उदारीकरणाने आणि १९८८ नंतर आलेल्या मंडल आयोगाने ब्राह्मण्यवादाला चांगलेच मोठे आव्हान दिले त्यातून परिघाबाहेर असलेल्या अनेक ओबीसी जाती प्रथमच आपापली ताकद घेऊन आल्या त्यांनी ह्या देशातील राजकारणाची पारंपरिक सूत्रे बदलून टाकली दुर्दैवाने त्यातून जातीयवादही वाढला बहुजनवाद हा प्रथमच भारतीय संस्कृतीत एक ताकदवान पर्याय म्हणून अवतरला. भालचंद्र नेमाडे आनंद यादव नामदेव ढसाळ हे सरळ बहुजनांचे सांस्कृतिक पुढारी म्हणून पुढे आले ब्राम्हण्याला हे सहन होणे शक्य नव्हते
ह्या ब्राह्मण्याने बहुजनांमधल्या ब्राह्मण्य स्वीकारायला सोकावलेल्या काही बहुजनांना हाताशी धरून वेगळेच सांस्कृतिक राजकरण खेळायला सुरुवात केली तर बहुजनांतल्या काही अतिरेकी लोकांनी ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मण अशी उलटचक्री जातीयवादी भूमिका घेऊन प्रागतिक ब्राह्मण्यांना ते केवळ जन्माने ब्राह्मण आहेत ह्या एका गुन्ह्यासाठी झोडपायला सुरुवात केली ह्यातून ह्या काळात वेगळेच सांस्कृतिक तणाव निर्माण झाले. १९८० नंतर जे सांस्कृतिक उदारीकरण झाले त्याचाच हा भाग होता ( cultural liberalisation ) मंडल आयोग ही ह्या सांस्कृतिक उदारीकरणाची केवळ राजकीय परिणती होती .
ह्या बहुजनवादाने जागतिकीकरणाचा सामना अत्यंत अडाणीपणाने केला आणि जागतिकीकरण म्हणजे काही नवा बटू असून आपण बळी आहोत अशी मांडणी करावयास सुरुवात केली ही चूक होती व आहे चिन्हसृष्टीकरण व जागतिकीकरण ह्यांच्यातला रशिया -अमेरिका -लॅटिन अमेरिका -रशिया- यूरोप - पूर्व आशिया अशी भटकली तेव्हाच सुमारे ऐंशी हजार वर्षांपूर्वीच झाली चिन्हसृष्टीकरणातील जागतिकीकरणाची सुरुवात भारतात मात्र १९८० साली झाली मात्र १९८२ ते १९९२ ह्या कालखंडात जागतिकीकरण हे स्पीन गोलंदाजी टाकत होते कारण भारतीय खेळपट्टी तशी होती. १९९२ पासून मात्र जागतिकीकरणाचा फास्ट बोलिंगचा स्पेल सुरु झाला विशेषतः मनमोहनसिंगांनी आपले काम ह्याच वर्षी सुरु केले . तिथूनच जागतिकीकरण उदारीकरण व खाजगीकरणावर अधिक खोल चर्चा सुरु झाली खरेतर जागतिकीकरण ह्या विषयावर मी चारशे पानाचं एक पुस्तक लिहिलंय त्यामुळे त्याच्यावर बोलेन तितकं कमीच !
थोडक्यात काय , तर जागतिकीकरण म्हणजे सर्व महाराष्ट्रीय व राष्ट्रीय सीमा व भिंती कोसळून सृजन उत्पादन वितरण , ग्रहण, उत्सर्जन, शिक्षण , संपादन, जतन , संवेदन , बोधन, निरीक्षण, परीक्षण , निष्कर्षण, मुद्रण , संरक्षण, संघटन , वहन, वितरण, नियमन, दळणवळण वगैरे सर्व क्रियांचे त्यांच्याशी जोडलेल्या मितिकांचे त्यांच्या विशेषांचे जागतिक अवकाशात झालेले प्रसरण होय .
चौथी नवता जागतिकीकरणातील जे सर्व मानवजातीसाठी कल्याणकारी आहे ह्याचे स्वागत करते उदाहरणार्थ उद्या जर एड्सविरोधी लस समज अमेरिकेने शोधली तर ती केवळ अमेरिकन आहे म्हणून तिला विरोध करायचा हे चौथ्या नवतेला मान्य नाही त्यामुळे ती जागतिकीकरणातील विधायक गोष्टींचे स्वागत करते एनरॉनसारख्या विघातक गोष्टींना विरोध करते गरज पडली तर त्यासाठी प्रत्यक्ष लढा उभा करते आणि हे सर्व करताना त्या क्रियांविषयी ती विलक्षण जागृत आणि पूर्ण अवधान बाळगते .
२. तुझ्या आजूबाजूच्या समाजात गेल्या १०-१५ वर्षात झालेले ढोबळ व सूक्ष्म बदल कुठले ?
चिन्हसृष्टीकरण व जागतिकीकरणामुळे ( चीजा हे संक्षिप्त रूप पुढे वापरतो ) झालेले परिणाम हे दुहेरी आहेत
एकतर चिजामुळे ज्याचा प्रचंड फायदा झाला असा एक प्रचंड मोठा सपाट व एकसाची चेहऱ्याचा मोठा मध्यम चिन्हसृष्टीय मध्यमवर्ग म्हणून वर आला ह्या वर्गाकडे चिन्हसृष्टीने निर्माण केलेल्या टेलेफोन , बाईक, कार, कम्प्युटर , क्रेडिट वगैरे कार्ड उत्तम पैसे व त्यातून निर्माण होणारी खरेदीशक्ती अशा अनेक चिन्हवस्तू व चिन्हशक्ती आल्या हा वर्ग चिन्हसृष्टीला ऍक्सेसिबल झाला आणि त्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के झाले त्याची कळत नकळत एक सांस्कृतिक दादागिरीही निर्माण झाली .
याउलट चिजामुळे भुईसपाट झालेल्या नाडला गेलेला एक दुसरा चिन्हदलित वर्गही निर्माण झाला म्हणजे मॉलमुळे ज्या छोट्या दुकानदारांची दुकानदारे भुईसपाट होतायत ते दुकानदार चिन्हदलितच म्हटले पाहिजेत औदिगिकीकरणानेही अनेक पारंपरिक उद्योगधंदे असेच नष्ट केले होते . म्हणजे कापडगिरण्यांमुळे हातांनी कापड बनवणारा विणकरांचा एक मोठा वर्ग नष्ट झाला त्याचप्रमाणे मल्टिनॅशनल कंपन्यांमुळे अनेक छोट्यामोठ्या उद्योगातील कामगार बेकार झाले ज्याच्यावर चीजाचे दुष्परिणाम झाले असा हा वर्ग साधारण ३०% आहे . मी ज्या NNP त राहतो तेथील ८०% वस्ती ही ह्या वर्गाची आहे आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत मी रोज पाहतोय .
भारतात ३० % ते ४० % लोकांचा एक वर्ग असा आहे ज्याला औद्योगिकीकरणाचाच जर फायदा झाला नव्हता तर चिजाचा त्याच्यावर काय परिणाम होणार ? चीजाचे भवितव्य हे ह्या वर्गावर अवलंबून आहे चिजा जर ह्या वर्गाला फायदेशीर ठरले आणि हा वर्ग चिन्हसृष्टीय मध्यमवर्गात दाखल झाला तर चिजा ह्या देशांत यशस्वी होईल अन्यथा ते कोसळून पडेल .
प्रतिसृष्टीय विशीय औद्योगिकीकरणात मध्यमवर्ग कुठल्या वर्गाकडे जाणार ह्यावर भांडवलशाहीचे भवितव्य अवलंबून असायचे आज नेमके उलटे झाले आहे आज हा कोणाच्याच अध्यात मध्यात नसणारा कंगाल व ज्याकाकडे गमावण्यासाठी काहीच नाही असा जो वर्ग आहे तो कोणाकूडे जातो ह्यावर ह्या चीजाचे भवितव्य अवलंबून आहे .
तारीख : ७/८/१८
चीजाने हा वर्ग चीन , जपान ,अमेरिकेत प्रयत्नपूर्वक गिळंकृत केला आणि त्याला चिन्हसृष्टीय मध्यमवर्गात आणले भारतातही हेच घडले तर ती एक संघर्षहीन क्रांती असेल हे घडवण्यासाठी लागणारी संपर्कव्यवस्था व माध्यमक्रांती चिजाकडे आहे हे करण्यासाठी मार्केट ही नैसर्गिक गोष्ट आहे हे पटवणारे एक तर्कशास्त्र सध्या उत्तरआधुनिकतेच्या नावाखाली विकसित होत आहे हीच उत्तरआधुनिकता ब्लाईंड सिडक्शनचे व्हर्च्युअल नमुने आपल्या पुढे सादर करीत आहे जे बेहोश आहेत त्यांना अधिक बेहोश करणे आणि जे धड नाहीत ते जागृतावस्थेत येण्यापूर्वीच त्यांना सिड्यूस करून बेहोशीची चटक लावणे ( लहान मुले ही मुख्य टारगेट ) अशी ही सांस्कृतिक चिन्हशक्ती आहे. त्याचे बरेवाईट परिणाम गेली पंचवीस वर्षे आपण अनुभवतोय .
चिजाने त्या जोरावरच चिन्हसृष्टीय मध्यमवर्ग जो सुरुवातीला केवळ ३ ते ५ % होता तो वाढवत वाढवत ३० ते ४० % केला आणि येत्या दहा वर्षात तो ७० % होऊन ह्या देशाचा मुख्य वर्ग कसा होईल ह्याचा विचार चिजा करते आहे त्या दृष्टीने मार्केट तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे एकदा का तसे झाले कि कम्युनिझमची उरलीसुरली धूळही उडून जाईल त्यामुळेच शोषणासंदर्भात अधिक सावधान होण्याची जबाबदारी कलावंताच्यावर येऊन पडणार आहे
चिजामुळे आपण आकुंचन आणि प्रसरण ह्यामध्ये डोलतो आहे The world is shrinking आणि The world is becoming flat ह्या दोन्ही प्रक्रिया त्यामुळेच घडताना दिसतात पूर्वी भांडवल श्रम वगैरे सर्व गोष्टी solid होत्या आता सर्वच गोष्टी liquid आणि gaseous अशा वेळेला तुमची मुळे धोक्यात येणे अटळ कारण मुळांचा आधार जमिनीची solidity असते तीच गेली तर काय हा प्रश्न अटळ ! liquidity & gaseousity हा चिजाचा एक मूलभूत परिणाम
seduction हे नेहमीच तुम्हाला प्रथम स्तंभित करते त्यासाठी तुम्हाला solidify करते तुम्ही एक प्रकारे स्तंभता ! ताठ होता ! १९८२ - ८७ हा कालखंड हा स्तंभण्याचा कालखंड होता तो एका अर्थाने चिन्हसृष्टीकरणाचा solid अवस्थेचा काळ होता त्यामुळेच संजय गांधीने आणलेल्या खाजगी मोटार मारुती उद्योगाचे काय करायचे ह्याविषयीचा जो गोंधळ होता तो हळूहळू ह्याच काळात सुटून एकंदर उदारीकरणाकडे कल वाढू लागला ह्या काळात संगणक टीव्ही वगैरे गोष्टींनी आपण स्तंभित झालो होतो बाईक्सच्या नवीन मॉडेल्सनीही हीच अवस्था केली होती ह्याच काळात सिमेंटचे उदारीकरण होऊन बांधकामे भरभराटली .
१९८८ नंतरचा कालखंड हा ही solidity संपवण्याचा काळ होता liquidity सुरु झाली सुखस्राव दुःखस्राव असे सगळेच स्त्राव पाझरायला लागले मुख्य म्हणजे टीव्ही बाईक्स वगैरेंमुळे येणारा अपराधभाव गेला व त्याबाबत अभिमान पाझरायला लागला जी solidity कसोशीने सांभाळण्यात आली तिचे विघटन सुरु झाले कारण सर्वत्र liquidity झिरपली १९९५ नंतर आपले विमान हवेत गेलेय ते अद्याप तरी जमिनीवर उतरलेले नाही ही गॅसिअस अवस्था होय गॅस सर्वत्र पसरतो उधळतो पाझरतो नष्ट करतो सॉलिडिटीमध्ये फ्रिक्शन खूप पण त्या फ्रिक्शनमुळे मजाही येते लिक्विडिटीमध्ये फ्रिक्शन संपुष्ठात येते. इथे जो मजा असतो तो वाहण्याचा आणि पाण्यात पडून पोहण्याचा
तारीख : ८/८/१८
गॅसिअसमध्ये तुम्ही टोटल फ्रिक्शनलेस होता इथे तर काठही नाहीसे होतात सॉलिडिटीत इंटरमिक्सींग कमी लिक्विडिटीमध्ये प्रवाह एकमेकांला मिळायला लागतात आणि गॅसिओसिटीमध्ये कशात काय मिसळतंय ते कळणेही मुश्किल होऊन जाते ह्यातूनच सांस्कृतिक सरमिसळीचा मुद्दा ऐरणीवर येतो ह्या सरमिसळीला घाबरलेले लोक मूलतत्ववादाकडे वळतात दहशतवाद हा प्रतिकाराचा आत्यंतिक मार्ग आहे तो आधुनिकही असू शकतो पण मूलतत्त्ववाद हा प्रतिकार नसतो तर घाबरून स्वतःच्या सॉलिड कोषात सॉलिड पायात परतणे असते मूलतत्त्ववादी दहशतवाद हा मार्ग म्हणून वापरू शकतो तर दहशतवाद मूलतत्त्ववादाला साधन म्हणून वापरू शकतो ह्या दोघांची युक्ती ही १९८० नंतरचा एक अजोबोगरीब बदल आहे पंजाब आसाम काश्मीर श्रीलंका पॅलेस्टाईन असे अनेक प्रश्न त्याचा परिणाम आहेत.
liquid अवस्थेत भांडवलही liquid झाले आणि liquid capitalism जन्माला आला लवकरच हा capitalism गॅसिअस होईल आतापर्यंतचा जो कॅपिटॅलिझम होता तो solid capitalism होता पण चिन्हसृष्टीकरणामुळे तो liquid झाला हीच गोष्ट socialism ची आहे आतापर्यंतचा solid socialism होता जगात चिनचा अपवाद वगळता तो सर्वत्र solid राहिला चीनने मात्र चिन्हसृष्टीकरण स्वीकारून liquid socialism चा एक नवा पर्याय पुढे आणला
liquid socialism मध्ये भांडवलाची liquidity सहज स्वीकारली जाते gaseous capitalism व socialism मध्ये आता फार पुढची पावले टाकली जाणार हे उघड आहे अशा वेळेला मार्क्स व आंबेडकरांचा solid socialism कालबाह्य होत जाणे अटळ आहे
तारीख : १०/८/१८
अशा वेळेला state ( राज्य ) ही संस्था liquid होणे अटळ आहे पूर्वी state ह्या शब्दाचा अर्थच मुळात solid state होता ह्यामुळेच liquid state ही संकल्पना स्वीकारणे आपणाला अजूनही शक्य झालेले नाही त्यातूनच solid state आणि liquid capitalism ह्यांच्यात सतत संघर्ष होताना सध्या दिसतोय हे सर्व अमेरिकेमुळे होतय असाही एक गैरसमज झालेला दिसतोय माझ्या मते अमेरिका उद्या पृथ्वीवरून नाहीशी झाली तरी हेच होणार आहे कारण प्रश्न चिन्हसृष्टीकरणाचा आहे अमेरिका ही ह्या चिन्हसृष्टीकरणाचे फक्त नेतृत्व करतेय पण हे नेतृत्वही येत्या पंचवीस वर्षात कोसळून पडणार आहे. चीन आणि युरोपियन समुदाय हे नेतृत्व कास उलथून टाकता येईल ह्याचीच वाट पाहतायत. डॉलरचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे चाललेले प्रयत्न हा ह्या प्रयत्नांचा केवळ एक भाग आहे . हे सगळेच बदल साहित्यावरही प्रभाव टाकतायत .
औद्योगिकीकरणात माणसाचे रूपांतर कमोडिटीत करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला शह म्हणून modern art जन्माला आली अस्तित्ववाद बोकाळला . माणसाला कमोडिटी बनवण्यापासून वाचवणे व त्याला व्यक्तिमत्त्व बहाल करणे हा या ह्या चळवळीचा पाया ही कला subjective झाली कारण subject च धोक्यात आला चिन्हसृष्टीकरणाने माणसाचे रूपांतर सेमिओडीटीत करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सेमिओडिटी ही एकाच वेळी कमोडिटी असते आणि प्रोग्रामही असते. हा प्रोग्राम प्रीप्लान्ड असतो आणि तरीही त्यात विविध पर्यायांची प्रचंड गजबज असते जी माणसाला स्वातंत्र्याचा आणि मौजेचा ठोस आभास देते अशा वेळी कलावंताला फक्त कमोडिटीपासून वाचून किंवा स्वतःचे व्यक्तिमत्त्व शाबूत ठेऊन चालत नाही तर स्वतःला ह्या प्रीप्लान्ड प्रोग्रामपासून वाचवणेही गरजेचे बनते चौथ्या नवतेची कविता हे काम करते आता तिने अधिक पुढे जाणे आवश्यक आहे औद्योगिकीकरणाच्या काळात modern art ला हळूहळू कळून चुकलं की असं नुसतं अस्तित्ववादी व्यक्तिनिष्ठ असून भागणार नाही आणि मग collective consciousness ला महत्व देणारी पर्यायी modern art जगभर पुढे आली आणि तिने postmodern ला जन्म दिला चीजाच्या बाबतीत कळत नकळत आता आपली हीच अवस्था होईल मात्र आपला collective consciousness हा modern असून चालणार नाही तर तो पूर्णपणे नवा व चिन्हसृष्टीकरणाला नीट सामोरा जाणारा हवा सध्या काही back to modern ideology चा उथळ उद्योग करतायत. हे म्हणजे औद्योगिकीकरणाच्या काळातील प्रश्न सोडवण्यासाठी काही लोक संतांच्याकडे जायचे तसाच काहीसा हा प्रकार आहे आसपासचे बदल नीट न कळल्याचे हे लक्षण आहे मुळात ह्या लोकांची ideology ही ideology राहिलेली नाही ती श्रद्धा बनलीये आणि एखादी गोष्ट श्रद्धा बनली कि तुम्ही तिच्या विषयी संशय घेणे हे पाप मानले जाते हे पाप मी वारंवार केल्याने अनेकांची पंचायत झालेली दिसते पण मी माणूसच असा आहे की जो बदलाला नेहमीच तयार असतो
३. तू तुझ्या कवितेत तुझं बदललेलं जग कशा प्रकारे आणलंय ? ते आलंय का ? कवितेत नव्या वस्तूंची साधनांची, कॉम्प्युटरच्या / वेबवर्ल्डसंबंधी गोष्टींची नाव / उल्लेख करून लिहिलेल्या अनेक कविता हल्ली वाचायला मिळतात अशा कवितांबद्दल तुला काय वाटतं ? ह्याच वस्तूंची / गोष्टींची नाव / उल्लेख करून लिहिलेली एखादी चांगली कविता आठवतेय का ?
मी एका अर्थाने चिन्हसृष्टीकरणाचा अखंड कवी आहे . माझ्या स्वतःच्या आयुष्यात १९८२ ते १९८७ हा कालखंड प्रचंड सृजनाचा कालखंड आहे
तारीख : ११/८/१८
ह्या काळात मी साधारण हजार बाराशे कविता , तीस कथा , चार एकांकिका , एक फसलेली कादंबरी , नऊ नाटके एवढे प्रचंड लिखाण केले आहे. पूर्वी मी हा एकदा सांगितला की लोकांचा विश्वास बसायचा नाही . पण डेकॅथलॉन हा संग्रह बाहेर पडल्यापासून लोक तितकासा अविश्वास दाखवत नाहीत. आता डेकॅथलॉन प्लस, डेकॅथलॉन मॅक्झिमम , तू , कोल्हापूर ते मुंबई व्हाया कविता ( ह्यांचा समावेश कदाचित पॉप्युलरतर्फे येऊ घातलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या संग्रहाच्या आगामी दुसऱ्या आवृत्तीत होईल ) कोलाज , आऊट ऑफ थिंग असे कविता संग्रह बाहेर आले की हा कालखंड स्पष्ट होईल
१९८८ ते १९९५ ह्या कालखंडात हे प्रमाण मंदावले . प्रामुख्याने ह्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या कवितांचे जास्त प्रमाण असणारा क. व्ही. हा संग्रह आता बाहेर आलाय माझ्या दृष्टीने ज्यांना मी चिन्हसृष्टीय कविता म्हणतो अशा सातशे साडेसातशे कविता मी लिहिल्या त्या १९८८ ते २००३ ह्या काळात. त्यातील चारशे कविता १९८८ ते १९९५ ह्या काळातील असाव्यात . ह्याशिवाय ह्या काळात मी अफेअर डॉट कॉम नावाची माझ्या दृष्टीने यशस्वी कादंबरी लिहिली . तिचा फायनल ड्राफ्ट मात्र मला तिचा शेवट न आवडल्याने अडून होता . तो मी नुकताच केला. ह्याशिवाय सात नाटके वीस कथा सहा सात एकांकिका , टीकाहरण मधील बरीचशी समीक्षा मी ह्या काळात लिहिली गेलीये .
१९९६ पासून मात्र माझ्या आयुष्यात समीक्षा नको तितकी महत्वाची झाली . १९९६ ते २००३ ह्या काळात मी फक्त साडेतीनशे कविता लिहिल्यात . त्याचे प्रतिनिधित्व स्त्रीवाहिनी ह्या संग्रहात आहे. मी काहीसा झपाटल्यासारखा कविता लिहितो . एकाच झपाट्यात मी दीर्घ कविताही लिहिल्या आहेत ह्या अर्थाने मी अघोरी कवी आहे . मला स्वतःला फारस माग वळून पाहायला आवडत नाही . त्यामुळे केलेले लिखाण प्रकाशित करण्याचाही फारसा उत्साह मला नसायचा, किंबहुना १९९५ पर्यंत ह्या बाबतीत मी निरुत्साही होतो . ह्याला कारण माझा कोल्हापुरातला कडवट अनुभव असावा माझ्या लेखनाची प्रचंड अवहेलना आणि मानखंडना झाल्याने पुढे पुढे मी ते दाखवायचेच बंद केले.
माझ्या प्रचंड लेखनशक्तीमुळे असेल, पण माझ्या आसपासचा जवळ जवळ प्रत्येक बदल माझ्या कवितेत कुठे ना कुठे आलेला आहे . चिन्हसृष्टीकरणाचे तिन्ही कालखंड अनुक्रमे ' डेकॅथलान ' , क.व्ही . आणि स्त्रीवाहिनी ह्या कविता संग्रहात आलेले दिसतील . क. व्ही त जागतिकीकरण हे बाहेर जास्त आहे . स्त्रीवाहिनीत हे जागतिकीकरण थेट घरदारात घुसलेले दिसेल. आता हे मी जाणीवपूर्वक केलय का ? तर जिथे मला ideology चाच प्रतिकार करायचा होता तिथे ते जाणीवपूर्वक आलय पण जवळजवळ ९०% कवितेत ते अजाणताच आलंय .
हे मी कशाप्रकारे आणलंय असं म्हणशील तर सगळ्या प्रकारे !
मी कवितेला आणि आयुष्याला चहुअंगांनी भिडणारा माणूस आहे कविता ही कुठल्यातरी अमुक एका पद्धतीने लिहिता येते ह्यावर माझा विश्वास नाही. डेकॅथलानच्या पहिल्या अर्ध्या भागात मी रोमँटिक आहे तर नंतर देशीवादी व दलित साहित्याच्या प्रभावाखाली होतो .कोलाजमध्ये तर मी कट्टरला कट्टर देशीवादी होतो इतका की हा संग्रह भालचंद्र नेमाड्यांना मी अर्पण करावा डेकॅथलॉन प्लसमध्ये मी अस्तित्ववादी होतो तर डेकॅथलान मॅक्झिमममध्ये पर्यायी आधुनिकवादी ज्याला म्हणतात तसा. ह्या काळात मी दर चार महिन्यांनी काहीतरी नवाच असायचो .
सप्टेंबर १९८७ नंतर मी ह्या साऱ्यातूनच बाहेर पडलो आणि चिन्हसृष्टवादी झालो . १९८८ ला मी मुंबईत राहता येईल का ह्याची चाचपणी केली आणि १९८९ मध्ये राहायलाच आलो. माझ्यातला हा बदल माझ्या कोल्हापूरच्या अनेक मित्रांना आजही आवडत नाही . त्यांच्या मते माझ्या चांगल्या कविता ह्या ८७ पर्यंतच लिहिल्या गेल्या पण मित्रांच्या पेक्षा आपला आतला आवाज काय म्हणतो हे महत्वाचे वाटल्याने मी नवे बदल आत्मसात करत राहिलो.
आता पुढचा प्रश्न तर प्रत्येक काळात प्रतिभा नसलेले काही चलाख लोक असतातच हे चलाख लोक असतातच . हे चलाख लोक कम्प्युटर वगैरे उल्लेख करून कविता लिहिणारच . आपण कि त्यांच्याकडे लक्ष द्यायचे कारण नाही, पण त्याच बरोबर प्रचंड थोर वगैरे असंही कुणी समजू नये . ते एक मशीन आहे. ह्याचे भान बाळगावे. जाहिरातीच्या क्षेत्रातली मशीन्स ही तुमच्या p.c. पेक्षा शंभर पटींनी श्रेष्ठ असतात .
तेव्हा p.c. आला म्हणजे सगळं आलं असं समजण हेही तितकंच वाईट . हल्ली काही मध्यमवर्गीय कवींना आपण पी.सी वापरतो ह्याचाच माज आलाय , म्हणून हे सांगावेसे वाटते . तुमचे स्टेट्स सिम्बॉल हे कवितेत फारसे कामाचे नसते . पाब्लो नेरुदाने मी टाईपरायटरने मुद्दाम जाणीवपूर्वक कविता लिहीत नाही , कारण त्याने मानवी स्पर्श नाहीसा होतो असे म्हंटले होते, तर पी.सी न वापरणे हीही एखाद्या कवीची फार जाणीवपूर्वक केलेली निवड असू शकते .
कवितेबाबत एक मूलभूत गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक अनुभव नवा असतो प्रत्येक क्षण नवा असतो , प्रत्येक क्षणी अवकाश नवा असतो त्यामुळे प्रत्येक कविता ही नवी असते. जोपर्यंत कागदावर काय उमटणार ह्याविषयीचे थ्रिल जिवंत असते तोपर्यत तुम्ही कवी असता ज्यादिवशी हे थ्रिल संपते लिखाणात प्रेडिक्टबिलिटी येते, तुमचा जुनाट मेंदूच स्मरणशक्तीद्वारे तुमची कविता लिहायला लागतो त्या दिवशी तुम्ही कवी म्हणून संपलेले असता.
४ . तुझ्या जगण्याचा कवितेवर व कवितेचा जगण्यावर परिणाम होतोय का ? कशा रीतीने ? तुझ्या दृष्टीने तुझ्या कवितेचं जग कोणतं ? उदाहरणार्थ ? तुझ्या दृष्टीने तुला कवी म्हणून , माणूस म्हणून, मराठी भाषक म्हणून, भारतीय म्हणून, जागतिक ग्लोबल नागरिक म्हणून कुठल्या समस्या आहेत ? त्या समस्यांचा सामना कसा करावा ? काय काय उपाय या समस्यांवर असू शकतात ? नसल्यास का नाहीत ? असल्यास भविष्यात काय करावं ? तू लिहितोय म्हणजे नेमकं काय करतोय ? तुला कविता लिहायची ऊर्जा कुठून मिळते ?
मी कवितेने आतून बाहेरून झपाटलेला मनुष्य आहे . माझ्यात एक लहान मूल आहे ज्याला ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल आहे आणि माझ्यात एक तत्वज्ञ आहे ज्याला जे जे आपल्याला कळलंय ते ते सगळं सांगायचंय . मला वाटते , कविता ही जगातली कदाचित एकमेव गोष्ट असेल जिथे हे लहान मूल आणि तत्वज्ञ एकत्र नांदू शकतात . कविता ही त्यामुळेच अनेकदा लहान मुलाने सांगितलेले तत्वज्ञान असते किंवा तत्वज्ञांचे बालसुलभ कुतूहल व त्यापोटी त्याने घेतलेला शोध असते . कविता ही जीवनाचे असे एक इंटरनेट आहे जिथे माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच वेबसाईट्स एकत्र येऊन मिळतात . सॉलिड, लिक्विड , गॅसिअसचे प्रेशिअस इंटरनेट ! मी एक असा मनुष्य आहे जो असंख्य तुकड्यात विखरून पडलाय , आणि तरीही जो हे सगळे तुकडे कासवांसारखे कवितेच्या पोटात घेऊन आरामात चाललाय .
माझे स्वतःचे जगणे गाव, शहर आणि महानगर अशा तिन्ही अवकाशात फिरत असल्याने ह्या तिन्ही अवकाशांची सरमिसळ माझ्या कवितेत होत असते. ह्यात भरीसभर म्हणून माझ्यावर फुले , आंबेडकरांचा , विशेषतः गौतम बुद्धांचा दार्शनिक पातळीवर सखोल ठसा आहे त्यामुळे दलित अवकाशविषयी मी नको तितका सजग आहे मी जन्माने दलित नसूनही माझे आयुष्य अनेक हालअपेष्टांतून गेल्याने मला दलित साहित्य जेवढे आपले वाटले तेवढे इतर साहित्य वाटले नाही आणि हे सर्व कमी म्हणू की काय , माझ्या घरात आसपास फक्त स्त्रिया . माझ्या आईकडे तर मुलगाच नाही सगळ्या बहिणीच आणि मी ज्या पाटलांच्या घरी जन्मलो तिथेही बायकाच . त्यात पुन्हा भर म्हणजे लहानपणी माझ्या सावळ्याकाळ्या रंगात निळसर झाक होती ( जी पुढे नाहीशी झाली ) .
मग काय होणार ? माझा माझ्या आसपासच्या बायकांनी पार श्रीकृष्ण केला जणू ह्या बायका लाड करण्यासाठी एका पुरुषाची वाटच पाहात होत्या आणि मी जन्मलो ! त्यामुळे स्त्रैण अवकाश हा मला लहानपणापासुन नको तितका उपलब्ध झालाय . ह्या सगळ्या बायकांनी त्यांच्या दृष्टीने मी आदर्श पुरुष व्हावे म्हणून यथेच्छ धडपड केली . त्यामुळे कुस्तीपासून फुटबॉलपर्यंत ज्याला ज्याला पुरुषी टॅग्ज लागला त्या त्या गोष्टी मला करायला लागल्या ह्या सगळ्याच गाववाल्या ! स्त्रीमुक्तीचे वारे तितकेसे न पोचलेले ! त्यामुळे त्यांनी मला व्यवस्थित पुरुष बनवला . माझा स्त्रीवाहिनी हा संग्रह ही ह्या बायकांची देन . त्यांच्यामुळेच मी महानगरातल्या स्त्रिया नीट जोखू शकलो . अनेकांना वाटतं तसा काही तो स्त्रियांच्या नजरेतून लिहिलेला संग्रह नाही . तर माझ्यातच असलेल्या आणि माझ्या आसपासच्या बायकांनी जागे केलेल्या माझ्यातल्या स्त्रीने लिहिलेला तो संग्रह आहे .
मी लोकांशी कमिटमेन्ट असणारा एक कवी आहे . त्यामुळेच मी कुठल्याही संघटनेच्या चरणाशी निष्ठा वाहिल्या नाहीत आणि ज्या संघटना मी जॉईन केल्या तिथे मी प्रमुखच होतो .
No comments:
Post a Comment