Sunday, 12 August 2018

दिलीप चित्रे गेले तेव्हा


                                   दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला दुःखद फीलिंगही होते . 


                                       आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे  तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता  संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता. मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा एकत्र आग्रह धरा किंवा देशीवादावर टीका करून मराठी ही जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे हे स्वीकारा चित्रे हे ह्यातील काहीही करत नव्हते, त्यांना मराठी संस्कृतीचे इंग्रजी प्रवर्तक व्हायचे होते आणि इंग्रजी संस्कृतीचे मराठी प्रवर्तक 
( ब्रिटिश नव्हे ) भारतीय माणसाच्या दुभंगलेपणाचे ते टिपिकल उदाहरण होते इंग्रजीतून ते भारतीय संस्कृतीच्या  मार्गी धारेला समृद्ध करत होते  तर मराठीतून ते मराठीपणा , मराठीच्या मराठी ओळखी ( marathi identity ) चा शोध घेत होते

                                       १८०० ते १९४७ ह्या कालखंडात युरोपियन लोकांनी भारतीय संस्कृती अनेक जागी पंक्चर केली आणि १८०० ते १९४७ साली सारे भारतीय विचारवंत भारताचे स्वातंत्र्य , भारताची भारत म्हणून ओळख भारत नावाच्या राष्ट्राची शक्यता ह्या राष्ट्राच्या नवनिर्माणाचा आराखडा ह्यासारख्या अनेक विचारप्रणालीनिष्ठ संदर्भात झोकून देऊन काम करू लागले . परलोकावरची भारतीय नजर हटवून इहलोकनिष्ठ विचारप्रणालीचा पाया ह्या काळातच घातला गेला ह्या काळातील भारतीय अध्यात्मही परलोकाला प्राधान्य देणारे नव्हते ह्या सगळ्या गोष्टींचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते. त्यातून साहित्यात धर्माच्या दादागिरीला विरोध करून नव्या अध्यात्माचा पुरस्कार करणारा नवा  अध्यात्मवाद , विज्ञानाला प्रमाण मानणारा सौदर्यवाद , नुसत्या वास्तवाची मांडणी करून काय होणार हे वास्तव बदलले पाहिजे आणि भाषिक कृतीने ह्या बदलाच्या प्रकियेला हातभार लावला पाहिजे असं मानणारा परिवर्तनवाद असे चार प्रवाह उदयाला आले दिलीप चित्रे ह्यांची जडणघडण ह्या चार प्रवाहात झाली मात्र ह्या चारही प्रवाहांशी त्यांचे तितकेसे कलावंत म्हणून पटले नाही सृष्टीयतेचा बुद्धीवाद हा हळूहळू यांत्रिकी होत गेला आणि १८५० नंतर जे नवे विज्ञान व तंत्रज्ञान जन्माला आले त्याने  ह्या पारंपरिक विज्ञानाला आव्हान द्यायला सुरुवात केली हळूहळू विज्ञानाचे महत्व कमी होऊन तंत्रज्ञानाची वाढ व्हायला लागली प्रतिसृष्टीचा प्रचंड पसारा सर्वत्र अवतरायला लागला आणि  क्रयवस्तूंचे प्रचंड ढिगारे मानवी अस्तित्वावर आदळायला लागले क्रयवस्तूचे  नवे संरचन शोधणारे संशोधक नव्या नव्या क्रयवस्तू शोधायला लागले आणि ह्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेऊन नव्या नव्या कलावस्तू जन्माला घालणारे कलावंतही कळत नकळत वाढू लागले कला ही प्रथमच इंडस्ट्री बनली तर कलावस्तू ही प्रॉडक्ट बनली कमोडिटी बनली पहिली कमोडिटीचे संशोधक हे स्वतःचे आयुष्य पणाला लावून निर्मिती करत होते त्यांची पॅशन अजोड होती त्यातील एडिसनसारखे संशोधक तर फिनॉमिना होते साहित्यात ह्याच जातकुळीचे काही लेखक व चित्रकार झाले
चित्रे हे ह्या जातकुळीतील देशी अस्तित्ववादी लेखक होते जरी त्यांची सुरवात युरोपियन अस्तित्ववादापासून झाली होती मात्र कोसलानंतर नेमाडेंनी जशी आधुनिकतेकडे पाठ फिरवली तशी त्यांनी पाठ फिरवली नाही ते आणि अरुण कोलटकर ह्यांनी नेमाडे ह्यांचा कट्टर देशीवाद आणि सत्यकथेचा आधुनिकवाद ह्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतःच्या अस्तित्ववादी आशयाने आणि अतिवास्तववादी अभिव्यक्तीने व्यवस्थित पेलला एका अर्थाने हा मराठी आधुनिकतेचा शोध होता आणि चित्रे मी हा शोध करावा म्हणून माझ्याकडे सातत्याने आग्रह धरून होते माझे म्हणणे असे होते कि हे मिशन देशीवाद्यांचे आहे आणि त्यांनीच ते पूर्ण केले पाहिजे माझा आग्रह चौथ्या नवतेचा आहे आणि तो आजन्म राहणार ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि साहित्य हे काही गणिती  हिशेबाने बदलत नाही
ह्यावर माझे म्हणणे असे होते कि साहित्यातला प्रत्येक हिशेब हा नवतेने सुरु होतो मग हा हिशेब गणिती असो वा नसो . माझा दुसरा प्रश्न  असा होता  कि देशी आधुनिकतेचा शोध शब्दवेधची मंडळी घेतायत सौष्ठव  वा अभिधा ह्यांनी  हे काम का करावे  पुढे अभिधाने आपली भूमिका बदलली आणि शब्दवेध प्रमाणेच सर्वसमावेशक म्हणजेच सर्वांनाच सामावून घेण्याची भूमिका घेतली जी चित्र्यांच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत होती आणि पुढे सौष्ठवची क्रांतिकारी भूमिका ही मागे पडत गेली आणि काळाने आणि मराठी संस्कृतीने लोकप्रियतेची आणि मान्यतेची मोहर ही शब्दवेध आणि अभिधानानंतर ह्यांच्यावर उमटवून चित्रे हे माझ्यापेक्षा द्रष्टे होते व मी हटवादी आणि  हेकेखोर असल्याचे सिद्ध केले चित्रे ज्या निष्ठेने अभिधानंतरच्या मागे उभे राहिले ते नक्कीच काबिलेतारीफ होते पुढे दोनहजारोत्तर पिढी शब्धवेध , खेळ आणि  अभिधानंतरच्या वळचणीला जाऊन उभी राहिली आणि मी च्यू असल्याचे सिद्ध झाले  हा चित्र्यांचा मोठाच विजय होता अर्थात तरीही मी माझा आग्रह सोडला न्हवता आणि नाहीये . माणसाने संपूर्ण जग वा संस्कृती जरी त्याच्या विरोधात गेले तरी स्वतःला पटलेली भूमिका सोडता कामा नये असे मला वाटते अशावेळी  एकट्याने स्वतःची पायवाट तुडवत जावे लागणे अटळ असते मी ती आजही तुडवतो आहेच

                   चित्र्यांचे साहित्य समजून कसे घ्यायचे हा एक विलक्षण कूटप्रश्न आहे मी टिकाहरण लिहिले तेव्हा दूधपिता बच्चा असलो तरी मी चित्र्यांच्याविषयी त्यात जे लिहिले होते ते चित्र्यांना चांगलेच झोंबले होते त्यांनी टीकाहरण वाचून चक्क रात्री फोन केला होता आणि माझी खरडपट्टी काढली होती वास्तविक त्यात काही चांगली निरीक्षणेही होती म्हणजे चित्रे हे मराठीतील बाईच्या शरीरात नाक खुपसणारे पहिले कवी आहेत वैग्रे पण मी केलेली टीकाच त्यांना जास्त झोंबली होती मी काही बदल करून मगच टीकाहरण प्रकाशित करावे असा त्यांचा सल्ला होता जो मी धुडकावला पुढे आणखी एका कवीने तेच सांगितले एकंदरच त्यामुळे वातावरण गढूळ होत गेले आणि पुस्तक पॉप्युलरकडून सतीश पाध्येंच्या शब्दवेल प्रकाशनाकडे द्यायची वेळ आली . अर्थात तरीही माझी चित्र्यांच्या कवितेविषयीची आस्था कमी झाली नाही . आणि चित्रेही "तू मराठी आधुनिकतेची नवी मांडणी करू शकतोस तू ती कर " हे सांगायचे थांबले नाहीत माझे स्वतःचे लक्ष्य कायमच चौथ्या नवतेकडे असल्याने चित्र्यांना होकार देणे मला शक्यच न्हवते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीकडे नीट पाहता येईल असे वाटते

                  मराठीच्या साहित्यशास्त्राची नवी ओळख निर्माण करायची असेल तर ज्ञानेश्वर , चक्रधर , नामदेव , एकनाथ ह्या चारही कवींच्या तंत्रशास्त्राची जडणघडण नीट तपासायला लागते ह्यातील ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे चित्र्यांचे फेव्हरेट होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे साहित्यशास्त्र हे ज्ञानेश्वरवादी होते ज्ञानेश्वर हे प्रज्ञा आणि भाव ह्यांचा समतोल साधत लिखाण करत कधी ज्ञानेश्वरीसारखे प्रज्ञालक्ष्यी तर कधी अभंगासारखे भावलक्ष्यी लिहीत ते प्रतीकांच्या भाषेत खूपदा बोलत आणि ही प्रतीके मोगरा , कावळा , चोळी अशी अत्यंत मराठी होती ज्ञानेश्वरी हे त्यांचे मोक्षापूर्वीचे लिखाण असल्याने त्यात परंपरेचे आदेश प्रमाण मानण्याची वृत्ती जास्त आहे तर अनुभवामृतमध्ये मोक्ष मिळाल्यानंतरचा शैववाद झळाळताना दिसतो अभंगात मात्र त्यांना विठाई ही स्थानिक देवता केंद्रीभूत करावीशी वाटली हे शैवीझमला धरूनच होते एका अर्थाने कृष्ण , शिव आणि विठ्ठल ही ट्रिनिटी त्यांनी वारकऱ्यांना दिली असे म्हणता येईल प्रत्यक्षात वारकऱ्यांनी शिव बाजूला काढून विठ्ठल कृष्णरुप  करून वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते पूर्णच हिंदू झाले ही हिंदू ओळख विठ्ठलामुळे एका अर्थाने मराठी ओळख बनत गेली

बा सि मर्ढेकरांनी ओवी हा फॉर्म इतका जबरदस्त रीतीने वापरला कि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरवादाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण झाले असे आपण म्हणू शकतो मात्र मर्ढेकरांचा ज्ञानेश्वरवाद अनुभवामृताकडे फारसा वळलाच नाही आणि त्यामुळे चित्र्यांना चांगलीच संधी प्राप्त झाली चित्रेंनी शक्तीवर खूप कविता लिहिल्या विंदा करंदीकरांनी अनुभवामृताचे केलेलं अर्वाचिनीकरण चित्र्यांच्या कवितेत चांगलेच फळले एका अर्थाने स्वतःच्या काव्यगुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा होती त्यांचे गद्य मात्र एका अर्थाने काश्मिरी शैवागमच्या परंपरेला गद्य रूप कसे द्यायचे ह्याचा वस्तुपाठ होता हे गद्य एका अर्थाने मराठीचे साहित्यिक शक्तीपीठ आहे दुर्देवाने त्याची ताकद भुक्कड मराठी समीक्षकांना ओळखता आली नाही हे शक्तीपीठ निर्माण करताना त्यांना जी अविष्कारवादी शैली सापडली तिचे मूळ फ़्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि जर्मन एक्सप्रेशनिस्ट ह्यांच्यात होते ज्याचा प्रभाव ओक्टोव्हिया पाझ वर पडला होता आणि पाझचा प्रभाव चित्र्यांच्यावर पडला .

नामदेव हा मराठीतील पहिला वास्तववादी वारकरी कवी होय भाव आणि वास्तव ह्याची त्याने घातलेली अप्रतिम सांगड नामदेववाद निर्माण करती झाली आणि ह्या नामदेववादाला तुकारामाच्या रूपाने महारूप सापडले कवीने त्याचे जगणे , त्या जगण्याची जीवनशैली , जगण्यासाठी तो करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायाची हत्यारे आणि त्या व्यवसायाची व्यवसायशैली स्वतःच्या कवितेत जशीच्या तशी उमटवावी ही नामदेवाची दीक्षा चित्र्यांना कळली तरी फारशी फळली नाही  ह्याचे कारण ते करत असलेले व्यवसाय तितकेशे ठाम न्हवते शिवाय चित्र्यांना वास्तववादाचे थोडेसे वावडे होते त्यामुळेच नामदेववादी असलेल्या संत तुकारामांचे ते कवी म्हणून अफाट कौतुक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या कवितेचा वास्तववादी पिंड त्यांनी आपल्या कवितेत जोपासला नाही ह्याबाबतीत ते अखेरपर्यंत ज्ञानेश्वरवादीच राहिले १९८० नंतर मात्र देशीवादी ग्रामीण कविंनी वास्तवनिष्ठ नामदेववाद आपल्या कवितेत अक्षरशः उत्सवासारखा साजरा केला

एकनाथवाद हा मराठीत कधीच आदराचा विषय न्हवता कारण एकनाथांची तंत्रता आणि प्रायोगिकता आत्मसात करून कविता लिहिणे हे अनेकांना कृत्रिम वाटते प्रत्यक्षात कविता पुढे जाते ती प्रायोगिकतेमुळे ! एकनाथवादाला जर तुकारामासारखा कोणी महारूप देणारा कवी लाभला असता तर कदाचित मराठींचे काव्यशास्त्र अधिक समृद्ध झाले असते मराठीला त्यामुळे एकनाथवादाची दीक्षा मिळायला विंदा करंदीकर उगवण्याची वाट बघायला लागली विंदांनी एकनाथवादाचे आधुनिकीकरण केले आणि प्रयोगधर्मी कविता लिहिली . एकनाथांची नावड असणाऱ्या लोकांनी  त्यामुळे एकनाथांची आणि नंतर करंदीकरांची टर उडवणे हे स्वाभाविक होते विशेषतः नेमाडे आणि कधीकधी चित्रेही ! पुढे  अरुण कोलटकरांनी एकनाथवाद किती अस्सल रूपात प्रयोगधर्मी होऊ शकतो ह्याचे अनेक अस्सल नमुने पेश केले हे एकनाथवादाचे केवळ पुनर्जीवन न्हवते तर नवा देह जन्माला घालणे होते आणि हा देह एकनाथांपेक्षा अधिक जिवंत आणि रसरशीत होता त्यामुळे नेमाड्यांनाही स्वतःचे करंदीकरांच्याविषयीचे मत काही प्रमाणात बदलून घ्यावे लागले विंदा करंदीकरांना आपला वारस अरुण कोलटकराच्या रूपात जिवंतपणीच सापडावा ह्याला काव्यभाग्यच म्हंटले पाहिजे

चक्रधरवाद स्वतःच्या मठात कैद झाल्याने अनेक शतके गायब झाला तरी नेमाडेंच्या रूपाने जेव्हा त्याला वारस सापडला तेव्हा तो सर्वाधिक झळाळला ह्याचे कारण त्याचे गद्यवैपुल्य ! चक्रधरवादाचे गद्यावरचे प्रेम मराठीत नेमाडेंच्या रूपाने फळले चित्र्यांच्या गद्यावर चक्रधरवादाचा काहीच फरक झाला नाही कारण मी गायब असलेला चक्रधरी वास्तववाद त्यांच्या मीधर्मीपणाला मानवणे शक्यच न्हवते

थोडक्यात काय चित्र्यांनी तुकारामाच्या नावाने कितीही गळा काढला तरी प्रत्यक्षात त्यांची कविता ही ज्ञानेश्वरवादीच राहिली आणि काही अपवादात्मक कवितांत त्यांनी एकनाथवादी प्रयोगधर्मीता प्रकट केली असली तरी कोलटकरांच्याप्रमाणे तो कधीच त्यांचा पिंड झाला नाही त्यांचे अभंगही ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांचा योग्य समतोल आहे 





 चित्रेंनी मराठी कवितेला काय दिले ?
१ मराठीच्या अध्यात्मिक परंपरा आधुनिकतेच्या संदर्भात कशा पेलायच्या हे त्यांनी शिकवले कोलटकरांचे अध्यात्म हे मला कधीही सखोल संवेदनशीलतेचे वाटलेले नाही फक्त त्यांचे रॅपर आकर्षक असल्याने ते ताबडतोब डोळ्यात भरते त्यातला ढोबळपणा सहजासहजी लक्ष्यात येत नाही चित्र्यांचे संवेदनांचे उत्सव आणि जल्लोष हे सर्व सूक्ष्म आंदोलनांना पेलत जातात कोलटकर बॉलीवूड संगीताप्रमाणे आहेत तर  चित्रे शास्त्रीय गायकाने एखादी बंदिश मांडत जावी तसे जातात कोलटकर फटाके फोडत जातात तर चित्रे दिवे लावत जातात चित्र्यांना प्रत्येक कोना आणि कोपरा उजळवून टाकायचा असतो कोलटकर फटाका फोडून क्षणभरासाठी अख्खी खोली उजळवून टाकतात आणि त्याचा परिणाम लगेच होतो







Friday, 10 August 2018

हेमंत दिवटे ह्यांनी घेतलेली श्रीधर तिळवे ह्यांची मुलाकात संवाद ६ दिवाळी २००६

                                                   १   ग्लोबलायझेशन  म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय ? त्याचे चांगले / वाईट परिणाम कोणते ? ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरु आहे असं काहींना वाटत तर मला १९९० च्या आसपास ही प्रक्रिया सुरु होऊन तिचा प्रभावही जाणवू लागला, असं वाटतं ? तुला काय वाटत ?

                         मानवी संस्कृतीत १९०० नंतर शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी अनेक शोध लावून नव्या नव्या चिन्हवस्तू ( semiodities ) तयार केल्या ह्या चिन्हवस्तूंचे उत्पादन जसे जसे वाढत गेले तसा तसा त्यांचा भोग वा आस्वाद वाढायला लागला , ग्रहण वाढू लागले ह्यातून चिन्हसृष्टीकरण  सुरु झाले सुरुवातीचा कालखंड हा काहीसा innovations चा संशोधनाचा होता पण १९७५ नंतर त्याचे उत्पादन व वितरण प्रचंड प्रमाणात वाढले . नवीन आलेला हा चिन्हसृष्टीकरणाचा प्रवाह काही द्रष्ट्यांनी राजकारण्यांनी आधीच ओळखला . १९५५ नंतर अनेक विचारवंतांनी त्याचे निरूपण करायला सुरुवात केली ह्यातूनच सत्तरीच्या दशकात चिन , ब्रिटन वगैरे देशांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला हे उदारीकरण सरकारकेंद्री व सरकारवलंबी होते . ब्रिटनमध्ये त्याला थॅचरिझम असे नाव मिळाले भारतात  संशोधनाचा पहिला टप्पा घडलाच नाही पण चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा १९८० नंतर सुरु झाला सिमेंटच्या उदारीकरणाच्या मारुती उद्योगाने टेलिकम्युनिकेशन क्रांतीने त्याची सुरुवात झाली १९८० ते ११९८७ हा तो पहिला टप्पा . ह्याला भारतातील विचारविनिमयाचा टप्पा म्हणता येईल . चिन्हसृष्टीकरण करायचे कि नाही ? उदारीकरण कसे करावे कि करूच नये ? सोवियत युनियनचा पाडाव होऊ झाल्यामुळे समाजवादाचे भवितव्य काय हे ह्या काळातले उग्र प्रश्न ! ह्याच काळात पंजाबमधला दहशतवादाचा प्रश्न अत्यंत व्यापक झाला आणि तो पंजाबी देशीयतेत उदयाला आला त्याला आसामी देशीयतेची साथ मिळाली महाराष्ट्रातही शिवसेना पसरायला सुरुवात झाली देशी चिन्हांचा अस्मिता म्हणून वापर हाही ह्याच काळाचा विशेष मार्गी गोष्टी का, कशी, कुठे , किती, कोणासाठी, आणायच्या हा ह्या काळातला कळीचा प्रश्न होता व प्रयोगही चालू  झाले होते .


                                                   चिन्हसृष्टीचा दूसरा टप्पा १९८८ पासून सुरु झाला खाजगीकरण हा ह्या काळातील मुख्य मुद्दा ह्या खाजगीकरणामुळे व आधीच्या उदारीकरणामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला शिरकाव मिळाला ह्याला मी चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा मानतो मंडल आयोग , इस्लामी दहशतवाद , राजजन्मभूमीचा प्रश्न हे देशीयतेतून निर्माण झालेले प्रवाह एकीकडे तर खाजगीकरण व उदारीकरणामुळे सुरु झालेले मार्गी प्रवाह दुसरीकडे १९८८ ते १९९५ - ९६ असा हा कालखंड होता . ह्याला आपण चिन्हसृष्टीकरण म्हणू. कारण ह्या काळात आपला प्रचंड भर आयातीवर होता . मार्गी गोष्टींचे देशीकरण घडवणे ह्या काळात चालू झाले

                           १९९६ पासून मात्र जागतिकीकरणाचा शिरकाव हा शिरकाव न राहता ती हळूहळू सार्वत्रिक वस्तुस्थिती बनायला लागली उदारीकरण ( liberalisation ) खाजगीकरण ( privatisation ) आणि जागतिकीकरण ( globalization ) ( LPG ) ही त्रयी सर्वच चर्चाच्या केंद्रस्थानी आली . जे देशी आहे ते टिकते कि नाही असा प्रश्न अनेकांना सतवायला लागला तर अनेक देशी कंपन्या बहुराष्ट्रीय होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या काही तर प्रचंड यशस्वी झाल्या ह्याला आपण मार्गी आणि देशी ह्यांच्या मिश्रणाचा कालखंड असल्याने मादे चिन्हसृष्टीकरण म्हणू . मादे चिन्हसृष्टीकरणाचा कालखंड अद्यापही चालू आहे . आता चिन्हसृष्टीकरणात आपण निर्यातही करायला लागलोय . आज अनेक देशी गोष्टी ग्लोबल होत जाताना दिसतायत . उदा. आपली साडी

                           जागतिकीकरण हे ह्या चिन्हसृष्टीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने प्रसरण ह्या प्रक्रियेचा समावेश होतो कुठल्याही देवघेवीत देणे आणि घेणे असते ही देवघेव एकतर प्रचंड सुकाळामुळे निर्माण होते किंवा टोकाच्या दुष्काळामुळे , म्हणजे तुमच्याकडे इतके उत्पादन होते कि ते तुम्हाला जगभर वाटण्यावाचून पर्याय उरत नाही. तुम्ही जी गोष्ट जगाला देऊ पाहता कधी प्रेमाने कधी मार्केटिंग करून तर कधी सक्तीने तर काही वेळा इतका दुष्काळ निर्माण होतो कि आसपासच्या परिसरातून तुम्हाला काहीच घेता येणे शक्य होत नाही अशा वेळी तुमची भूक प्रचंड तीव्र असेल तर तुम्ही घेण्यासाठी परिसर सोडून जगात  ती जिथे कुठे मिळते तिथे जाता किंवा ती आयात करता , कधी प्रेमाने मागता तर कधी दादागिरी करून तर कधी मेहनत करून कधी स्वतःचे मार्केटिंग करून ही जी देवघेव आहे ती जेव्हा जागतिक होते तेव्हा तिला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरणातला हा दुष्काळ वा  सुकाळ प्रत्येकवेळी नैसर्गिकच असेल असे नाही कधी कधी तो मानवी वा सामाजिकही असू शकतो अनेक स्थलांतरे ही दुष्काळातून होतात अनेकदा आयात करून  भूक भागवली जाते दुष्काळ मिटवला जातो तर निर्यात ही अनेकदा सुकाळातून निर्माण होते किंवा कशाच्या तरी बदल्यात ती केली जाते काही लोक इतके स्वभावतः अधाशी व भुकेले असतात कि त्यांना कुठेही दुष्काळच जाणवतो

                             अनेकदा राजकीय पक्षांना पैशांचा दुष्काळ जाणवल्याने त्यांनी तो दुष्काळ मिटवण्यासाठीही नको असलेली आयात केली आहे नको असलेले उदारीकरण वा खाजगीकरणही केले आहे अनेकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली अनावश्यक खाजगीकरणे आणि उदारीकरणेही केली गेली आहेत आणि कशालाही जागतिकीकरण म्हणून मान्यता देणाऱ्या अडाणी विचारवंतांनी जागतिकीकरण ह्या ब्रॅण्डला भुलून जाऊन ही अनावश्यक खाजगीकरणे व उदारीकरणेही आवाज न काढता स्वीकारली आहेत

                           उत्पादनाचा एकदा का दुष्काळ निर्माण झाला कि तो भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली जाते कारण दुष्काळाचा अर्थ उत्पादन कमी झाल्याने तोटा असा होतो अशा वेळी ग्राहक संख्या वाढणे व उत्पादन वाढणे हे कंपनी टिकण्यासाठी  आवश्यक असते त्यातूनच ती कंपनी खाजगी करावी ही मागणी येते किंवा ती खाजगी कंपनीला विकली जाते काही वेळा कंपन्या इतक्या कमी असतात कि नुसत्या खाजगीकरणाच्या काही होणार नसते मग त्या क्षेत्रात उदारीकरण आणून अनेक कंपन्या आणल्या जातात मग पुढे नुसत्या कंपन्या आणूनही भागत नाही त्यांची संख्या त्यांचे उत्पादन इतके कमी पडते कि बाहेरच्या कंपन्या , बाहेरचे भांडवल आणावे लागते आन मग त्यासाठी जागतिकीकरण अपरिहार्य असते पण जेव्हा देशी कंपन्यांना संधीही न देता थेट बाहेरच्या कंपन्यांना आणले जाते तेव्हा ते जागतिकीकरण विघातक जागतिकीकरण असते एनरॉन हे अशा विघातक जागतिकीकरणाचे उदहारण आहे जी संधी रिलायन्स व टाटांना आता दिलीय ती त्या वेळी दिली असती तर कदाचीत  विजेचा प्रश्न इतका चिघळला नसता पांढऱ्या कातडीला भुलून जाण्याची आपली सवय ही अनेकदा विघातक जागतिकीकरणाला आमंत्रण देते काही वेळा देशी कंपन्याच इतक्या बेजबाबदार आणि मुजोरड्या असतात कि त्यांना स्पर्धेचा फटका पडल्याशिवाय त्या सुधारत नाहीत अशा वेळी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून बाहेरच्या कंपन्या आणल्या जातात तेव्हा ते विधायक जागतिकीकरणच असते उदा , ऑटोमोबाईल इंडस्ट्री

                                जागतिकीकरण चांगले कि वाईट हे त्या त्या परिस्थितीच्या संदर्भ चौकटीत ठरत असते उदाहरणार्थ साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मितीसाठी दार्शनिकता व दर्शनता फार महत्वाची असते भारतात जिला चिन्हसृष्टीय दर्शनता म्हणावी अशी फारशी निर्माण झालेली नाही त्यामुळे संजीव खांडेकरांसारखा कवी जर फ्रेडरिक जेम्सन , कार्ल मार्क्स लाकान ह्यांच्यासारख्या पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या तत्वज्ञानातून काही आयात करून त्यांचा वापर स्वतःच्या कलानिर्मितीसाठी करत असेल तर आपण त्याला ते पूर्ण विघातक आहे असे म्हणून खोड काढू नये . पण त्याचबरोबर श्रीधर तिळवेसारखा एखादा गृहस्थ भारतीय दर्शनातील अनेक संकल्पनांची हवी तशी मोडतोड करून त्यातून भारतीय चिन्हसृष्टीय दर्शनता  निर्माण करत असेल तर तो केवळ भारतीय संज्ञा वापरतो म्हणून त्याला मागासलेला समजणे हेही शहरांढळेपणाचे
( गावंढळच्या विरोधी ) लक्षण होय . शक्यता अशीही असू शकते की ते पाश्च्यात्य दर्शन त्याला अत्यंत उथळ पोरकट आणि करिअरिस्ट वाटल्याने तो पुन्हा भारतीय दर्शनाकडे वळला असेल  

                              चिन्हसृष्टीकरण  ही  प्रतिसृष्टीकरण  व  त्यातून  आलेल्या औद्योगिकीकरणाइतकीच  अटळ  आणि  अपरिहार्य  गोष्ट  आहे  ते  खाजगीकरण ,  उदारीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातून  साकार  होते  आहे  हे  खरे  पण  प्रत्येक  वेळी  प्रत्येक  पैलू  अपरिहार्यच  असेल  असे  नाही  उदा.  सरकारने स्वतःला  खाजगी  कंपनी  समजून  सतत  प्रॉफिट  मेकिंगच्या  भूमिकेत  वावरणे  हे  विघातक  खाजगीकरणच  मानले पाहिजे  किंवा  खाजगी  उद्योग  हे  नेहमी  स्वर्गच  आणतील  ह्याही  भ्रमात  राहण्याचे  कारण  नाही .  ह्याबाबतीत  मार्गी ,  पोटी ,  देशी,  जमाती,  ह्याचे  समग्र  भान  राखून  सर्वांच्या  भल्याचे  काय  आहे   ते  पाहिले  पाहिजे .

                                          जागतिकीकरणाचा  एक  थेट  फायदा  म्हणजे  जगभरच्या   पर्यायांची उपलब्धता . पण  त्यामुळे  काही  चांगले  देशी  पर्याय  गहाळ  तर  होत  नाहीत  ना  हे  पण  पाहायला  हवे . मुक्तछंद , सुनीत,  मुक्त  सुनीत , चांगलीच ; पण  अभंग  ओवी  हे  देशी  म्हणून  वाईटच  ही  वृत्ती  वाईट  जगात  आपला  प्रदेशही  येतो  ह्याचेही  भान  आपण  बाळगावे .  जगाशी  चॅटिंग  करता  करता  स्वतःच्या  आईबापाशी  बायकोपोरांशी , शेजाऱ्यांशी  जर  धड  गप्पा  मारता  येत  नसतील  तर  त्याचा  अर्थ  जवळचे  वाचवण्यासाठी  आपल्याला  चष्मा  हवा  हाच  होतो  आणि  त्याचा  अधिक  मूलभूत  अर्थ  आपले  डोळे  खराब  झालेत  हाच  असतो .  १९९५  नंतर  जागतिकीकरण  हे  आपल्या  थेट (  विशेषतः  शहरात  )  घरात  घुसले  त्यामुळे  चिन्हसृष्टीकरणाचं  जागतिक  स्वरूप  आपल्या  तोंडावर  इतक्या  अवाढव्य प्रमाणात  आदळलं  कि  आपण  गडबडून  गेलो .

                                    विशेषतः  मध्यमवर्गाची  चौकोनी  कुटुंबाची  चौकोनी  कुटुंबमूल्ये  ही  नव्याने  आलेल्या  संपत्तीने   लालसेने,  उपभोगवादाने , बडेजाववादाने  पूर्ण  हादरली  आणि  त्यांनी  त्याच्या  प्रदर्शनाचा  उत्सवही मांडला  त्यामुळे  वाढदिवसाला  पंचारती  पुरेशी  होईना  ग्रीटिंग्ज  कार्डेही  लागू  लागली   संपत्ती  हे  पाप  न  होता  पुण्य  झाले  त्यामुळे  लोक  पुण्य  कमावण्याऐवजी  संपत्ती  कमावण्याच्या  मागे  लागले  ह्याकाळातील  मध्यमवर्गीय  मीडियाने  इतका  भरवला  गेला  कि  मीडिया  म्हणतो  तेच  खरे  असे  त्याला  वाटू  लागले  मग  मीडिया  म्हणाला  शीतयुद्ध  संपले  प्रत्यक्षात  शीतयुद्धात  अमेरिकेचा  शत्रू  बदलत होता  पण  चायना  ही  मीडियाच्या  दृष्टीने  क्षुल्लक  गोष्ट  असल्याने  त्याची  ताकदच  कळली  नव्हती  आज  सरळ  अमेरिका  विरुद्ध चायना  हे  युद्ध  आकार  घेत  आहे

                                      १९८०   नंतर  आलेल्या  सांस्कृतिक  उदारीकरणाने  आणि  १९८८  नंतर  आलेल्या  मंडल  आयोगाने  ब्राह्मण्यवादाला  चांगलेच  मोठे आव्हान  दिले  त्यातून  परिघाबाहेर  असलेल्या  अनेक  ओबीसी  जाती  प्रथमच  आपापली  ताकद  घेऊन  आल्या  त्यांनी  ह्या  देशातील  राजकारणाची  पारंपरिक सूत्रे  बदलून  टाकली  दुर्दैवाने  त्यातून  जातीयवादही  वाढला  बहुजनवाद  हा प्रथमच भारतीय   संस्कृतीत  एक   ताकदवान   पर्याय   म्हणून  अवतरला. भालचंद्र  नेमाडे  आनंद  यादव  नामदेव  ढसाळ   हे सरळ  बहुजनांचे  सांस्कृतिक  पुढारी  म्हणून  पुढे  आले  ब्राम्हण्याला  हे  सहन   होणे  शक्य  नव्हते

                                       ह्या  ब्राह्मण्याने  बहुजनांमधल्या  ब्राह्मण्य  स्वीकारायला  सोकावलेल्या  काही  बहुजनांना  हाताशी  धरून  वेगळेच  सांस्कृतिक  राजकरण  खेळायला  सुरुवात  केली  तर  बहुजनांतल्या  काही  अतिरेकी  लोकांनी  ब्राह्मण्य  म्हणजे  ब्राह्मण  अशी  उलटचक्री  जातीयवादी  भूमिका  घेऊन  प्रागतिक  ब्राह्मण्यांना  ते  केवळ  जन्माने  ब्राह्मण  आहेत  ह्या  एका  गुन्ह्यासाठी  झोडपायला  सुरुवात  केली  ह्यातून  ह्या  काळात वेगळेच  सांस्कृतिक  तणाव  निर्माण  झाले. १९८०  नंतर  जे  सांस्कृतिक  उदारीकरण  झाले  त्याचाच  हा भाग   होता  (  cultural   liberalisation  )  मंडल आयोग  ही  ह्या  सांस्कृतिक  उदारीकरणाची  केवळ  राजकीय  परिणती  होती .

                                        ह्या  बहुजनवादाने  जागतिकीकरणाचा  सामना  अत्यंत  अडाणीपणाने  केला  आणि  जागतिकीकरण   म्हणजे  काही  नवा  बटू  असून  आपण  बळी आहोत  अशी  मांडणी  करावयास  सुरुवात  केली  ही  चूक  होती  व   आहे  चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातला  रशिया -अमेरिका -लॅटिन  अमेरिका -रशिया- यूरोप - पूर्व  आशिया  अशी  भटकली  तेव्हाच  सुमारे  ऐंशी  हजार  वर्षांपूर्वीच  झाली  चिन्हसृष्टीकरणातील  जागतिकीकरणाची  सुरुवात  भारतात  मात्र  १९८०  साली  झाली  मात्र  १९८२  ते  १९९२  ह्या  कालखंडात  जागतिकीकरण  हे  स्पीन  गोलंदाजी  टाकत  होते  कारण  भारतीय  खेळपट्टी  तशी  होती.  १९९२  पासून  मात्र  जागतिकीकरणाचा  फास्ट  बोलिंगचा  स्पेल  सुरु   झाला  विशेषतः  मनमोहनसिंगांनी  आपले  काम  ह्याच  वर्षी  सुरु  केले .  तिथूनच  जागतिकीकरण  उदारीकरण  व  खाजगीकरणावर  अधिक  खोल  चर्चा  सुरु  झाली  खरेतर  जागतिकीकरण  ह्या  विषयावर  मी  चारशे  पानाचं  एक  पुस्तक  लिहिलंय  त्यामुळे  त्याच्यावर  बोलेन  तितकं  कमीच  !

                                        थोडक्यात  काय ,  तर  जागतिकीकरण  म्हणजे  सर्व  महाराष्ट्रीय  व  राष्ट्रीय  सीमा  व  भिंती  कोसळून  सृजन  उत्पादन  वितरण , ग्रहण,  उत्सर्जन,  शिक्षण , संपादन,  जतन , संवेदन , बोधन, निरीक्षण, परीक्षण , निष्कर्षण, मुद्रण , संरक्षण, संघटन , वहन, वितरण, नियमन,  दळणवळण वगैरे  सर्व  क्रियांचे  त्यांच्याशी  जोडलेल्या   मितिकांचे  त्यांच्या  विशेषांचे  जागतिक  अवकाशात  झालेले  प्रसरण  होय .

                                        चौथी  नवता  जागतिकीकरणातील  जे  सर्व  मानवजातीसाठी  कल्याणकारी  आहे  ह्याचे  स्वागत  करते  उदाहरणार्थ  उद्या  जर  एड्सविरोधी   लस  समज  अमेरिकेने  शोधली  तर  ती  केवळ  अमेरिकन  आहे   म्हणून  तिला  विरोध  करायचा   हे  चौथ्या  नवतेला  मान्य  नाही  त्यामुळे  ती  जागतिकीकरणातील  विधायक  गोष्टींचे  स्वागत  करते  एनरॉनसारख्या  विघातक  गोष्टींना  विरोध  करते  गरज पडली  तर  त्यासाठी  प्रत्यक्ष  लढा  उभा  करते  आणि  हे  सर्व  करताना  त्या  क्रियांविषयी  ती  विलक्षण  जागृत  आणि  पूर्ण  अवधान  बाळगते  .

  २. तुझ्या  आजूबाजूच्या  समाजात  गेल्या  १०-१५  वर्षात  झालेले  ढोबळ  व  सूक्ष्म  बदल  कुठले  ?  

                                        चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरणामुळे  (  चीजा  हे संक्षिप्त  रूप  पुढे  वापरतो ) झालेले  परिणाम  हे  दुहेरी  आहेत

                                        एकतर  चिजामुळे  ज्याचा  प्रचंड  फायदा  झाला  असा  एक  प्रचंड  मोठा   सपाट  व  एकसाची  चेहऱ्याचा  मोठा  मध्यम  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  म्हणून  वर  आला  ह्या  वर्गाकडे  चिन्हसृष्टीने  निर्माण  केलेल्या  टेलेफोन , बाईक, कार, कम्प्युटर , क्रेडिट  वगैरे  कार्ड  उत्तम पैसे  व त्यातून  निर्माण  होणारी  खरेदीशक्ती  अशा  अनेक  चिन्हवस्तू  व  चिन्हशक्ती  आल्या  हा  वर्ग  चिन्हसृष्टीला  ऍक्सेसिबल  झाला  आणि  त्याचे  प्रमाण  ३० ते ४०  टक्के झाले  त्याची  कळत नकळत  एक सांस्कृतिक  दादागिरीही  निर्माण  झाली .

                                       याउलट  चिजामुळे  भुईसपाट  झालेल्या  नाडला  गेलेला  एक  दुसरा  चिन्हदलित  वर्गही  निर्माण  झाला  म्हणजे  मॉलमुळे  ज्या छोट्या  दुकानदारांची  दुकानदारे  भुईसपाट  होतायत  ते  दुकानदार  चिन्हदलितच  म्हटले  पाहिजेत  औदिगिकीकरणानेही  अनेक  पारंपरिक  उद्योगधंदे  असेच  नष्ट  केले  होते . म्हणजे  कापडगिरण्यांमुळे  हातांनी  कापड  बनवणारा  विणकरांचा   एक  मोठा  वर्ग  नष्ट  झाला  त्याचप्रमाणे  मल्टिनॅशनल  कंपन्यांमुळे  अनेक   छोट्यामोठ्या  उद्योगातील  कामगार  बेकार  झाले  ज्याच्यावर  चीजाचे  दुष्परिणाम  झाले  असा  हा  वर्ग  साधारण  ३०%  आहे  .  मी  ज्या  NNP  त  राहतो  तेथील  ८०% वस्ती  ही  ह्या  वर्गाची  आहे  आणि  त्यांच्या  कुटुंबाची  झालेली  वाताहत  मी  रोज  पाहतोय .

                                             भारतात  ३० %  ते  ४० %  लोकांचा  एक  वर्ग  असा  आहे  ज्याला  औद्योगिकीकरणाचाच  जर  फायदा  झाला   नव्हता  तर  चिजाचा  त्याच्यावर  काय  परिणाम  होणार  ?  चीजाचे  भवितव्य  हे  ह्या  वर्गावर  अवलंबून   आहे  चिजा  जर  ह्या  वर्गाला   फायदेशीर  ठरले  आणि  हा  वर्ग  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात   दाखल  झाला  तर  चिजा  ह्या देशांत  यशस्वी  होईल  अन्यथा  ते  कोसळून  पडेल .

                                                                   प्रतिसृष्टीय  विशीय  औद्योगिकीकरणात  मध्यमवर्ग  कुठल्या   वर्गाकडे जाणार  ह्यावर  भांडवलशाहीचे  भवितव्य  अवलंबून  असायचे  आज  नेमके  उलटे  झाले  आहे आज  हा  कोणाच्याच  अध्यात मध्यात   नसणारा  कंगाल  व  ज्याकाकडे  गमावण्यासाठी  काहीच  नाही  असा  जो  वर्ग  आहे  तो  कोणाकूडे  जातो  ह्यावर  ह्या  चीजाचे  भवितव्य  अवलंबून  आहे . 

तारीख : ७/८/१८

                                                                  चीजाने  हा  वर्ग  चीन , जपान ,अमेरिकेत  प्रयत्नपूर्वक  गिळंकृत  केला  आणि  त्याला  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात  आणले  भारतातही  हेच  घडले  तर  ती  एक  संघर्षहीन  क्रांती  असेल  हे  घडवण्यासाठी  लागणारी  संपर्कव्यवस्था  व  माध्यमक्रांती  चिजाकडे  आहे  हे  करण्यासाठी  मार्केट  ही  नैसर्गिक  गोष्ट  आहे  हे  पटवणारे   एक  तर्कशास्त्र  सध्या  उत्तरआधुनिकतेच्या  नावाखाली  विकसित   होत  आहे  हीच  उत्तरआधुनिकता  ब्लाईंड  सिडक्शनचे  व्हर्च्युअल  नमुने  आपल्या  पुढे  सादर  करीत  आहे  जे  बेहोश  आहेत  त्यांना  अधिक  बेहोश  करणे  आणि  जे  धड  नाहीत  ते  जागृतावस्थेत  येण्यापूर्वीच  त्यांना  सिड्यूस  करून  बेहोशीची  चटक  लावणे  (  लहान  मुले  ही  मुख्य  टारगेट  )  अशी  ही  सांस्कृतिक चिन्हशक्ती  आहे.  त्याचे  बरेवाईट  परिणाम  गेली  पंचवीस  वर्षे  आपण  अनुभवतोय .

                                                             चिजाने  त्या  जोरावरच  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  जो   सुरुवातीला   केवळ  ३  ते  ५ %  होता  तो  वाढवत  वाढवत  ३०  ते  ४० %  केला  आणि   येत्या  दहा  वर्षात  तो  ७० %  होऊन  ह्या  देशाचा  मुख्य  वर्ग  कसा  होईल  ह्याचा  विचार   चिजा  करते  आहे   त्या  दृष्टीने  मार्केट  तळागाळात  पोचवण्याचा  प्रयत्न  चालू  आहे  एकदा  का  तसे  झाले  कि  कम्युनिझमची  उरलीसुरली  धूळही  उडून  जाईल  त्यामुळेच  शोषणासंदर्भात  अधिक  सावधान  होण्याची  जबाबदारी  कलावंताच्यावर  येऊन  पडणार  आहे

                                                            चिजामुळे  आपण  आकुंचन  आणि  प्रसरण  ह्यामध्ये  डोलतो  आहे  The  world  is  shrinking  आणि  The  world  is  becoming  flat  ह्या  दोन्ही  प्रक्रिया  त्यामुळेच  घडताना  दिसतात  पूर्वी  भांडवल  श्रम  वगैरे  सर्व  गोष्टी  solid  होत्या  आता  सर्वच  गोष्टी  liquid  आणि  gaseous    अशा  वेळेला  तुमची  मुळे  धोक्यात  येणे  अटळ  कारण  मुळांचा  आधार  जमिनीची  solidity  असते  तीच  गेली  तर  काय  हा  प्रश्न  अटळ  !  liquidity  &  gaseousity   हा  चिजाचा  एक  मूलभूत  परिणाम

                                                          seduction   हे  नेहमीच  तुम्हाला  प्रथम  स्तंभित  करते  त्यासाठी  तुम्हाला  solidify   करते  तुम्ही  एक  प्रकारे स्तंभता !  ताठ  होता  !  १९८२ - ८७  हा  कालखंड  हा  स्तंभण्याचा   कालखंड  होता  तो  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  solid   अवस्थेचा  काळ  होता  त्यामुळेच  संजय  गांधीने  आणलेल्या  खाजगी  मोटार  मारुती  उद्योगाचे  काय  करायचे  ह्याविषयीचा  जो  गोंधळ  होता  तो  हळूहळू  ह्याच  काळात  सुटून  एकंदर  उदारीकरणाकडे  कल  वाढू  लागला  ह्या  काळात  संगणक  टीव्ही  वगैरे  गोष्टींनी  आपण स्तंभित  झालो  होतो  बाईक्सच्या  नवीन  मॉडेल्सनीही  हीच  अवस्था  केली  होती  ह्याच  काळात  सिमेंटचे  उदारीकरण  होऊन  बांधकामे  भरभराटली .

                                                           १९८८  नंतरचा  कालखंड  हा   ही  solidity  संपवण्याचा  काळ  होता  liquidity सुरु  झाली  सुखस्राव  दुःखस्राव  असे  सगळेच  स्त्राव  पाझरायला  लागले  मुख्य  म्हणजे टीव्ही  बाईक्स  वगैरेंमुळे  येणारा  अपराधभाव  गेला  व  त्याबाबत  अभिमान  पाझरायला  लागला जी  solidity  कसोशीने  सांभाळण्यात  आली  तिचे  विघटन  सुरु  झाले  कारण  सर्वत्र  liquidity  झिरपली  १९९५  नंतर  आपले  विमान  हवेत  गेलेय  ते  अद्याप  तरी  जमिनीवर  उतरलेले  नाही ही गॅसिअस  अवस्था  होय  गॅस  सर्वत्र  पसरतो  उधळतो  पाझरतो  नष्ट  करतो  सॉलिडिटीमध्ये  फ्रिक्शन  खूप  पण  त्या  फ्रिक्शनमुळे  मजाही  येते  लिक्विडिटीमध्ये  फ्रिक्शन  संपुष्ठात  येते. इथे  जो  मजा असतो  तो  वाहण्याचा आणि पाण्यात  पडून पोहण्याचा

तारीख :  ८/८/१८

                                                        गॅसिअसमध्ये   तुम्ही  टोटल फ्रिक्शनलेस  होता  इथे  तर  काठही  नाहीसे  होतात  सॉलिडिटीत  इंटरमिक्सींग  कमी  लिक्विडिटीमध्ये   प्रवाह  एकमेकांला  मिळायला  लागतात  आणि  गॅसिओसिटीमध्ये  कशात  काय  मिसळतंय  ते  कळणेही  मुश्किल  होऊन  जाते  ह्यातूनच  सांस्कृतिक  सरमिसळीचा   मुद्दा  ऐरणीवर  येतो  ह्या  सरमिसळीला  घाबरलेले  लोक  मूलतत्ववादाकडे   वळतात  दहशतवाद  हा  प्रतिकाराचा  आत्यंतिक  मार्ग  आहे  तो  आधुनिकही  असू  शकतो  पण  मूलतत्त्ववाद  हा  प्रतिकार  नसतो  तर  घाबरून  स्वतःच्या  सॉलिड  कोषात  सॉलिड  पायात  परतणे  असते  मूलतत्त्ववादी  दहशतवाद  हा  मार्ग  म्हणून  वापरू  शकतो  तर  दहशतवाद  मूलतत्त्ववादाला  साधन  म्हणून  वापरू  शकतो  ह्या  दोघांची  युक्ती  ही  १९८०  नंतरचा  एक  अजोबोगरीब  बदल  आहे  पंजाब  आसाम  काश्मीर  श्रीलंका   पॅलेस्टाईन  असे  अनेक  प्रश्न  त्याचा  परिणाम  आहेत.

                                                         liquid  अवस्थेत  भांडवलही  liquid  झाले  आणि  liquid   capitalism   जन्माला  आला  लवकरच  हा  capitalism  गॅसिअस  होईल  आतापर्यंतचा  जो  कॅपिटॅलिझम  होता  तो  solid  capitalism  होता  पण  चिन्हसृष्टीकरणामुळे  तो  liquid  झाला  हीच  गोष्ट  socialism   ची  आहे  आतापर्यंतचा  solid  socialism  होता  जगात  चिनचा  अपवाद  वगळता  तो  सर्वत्र  solid  राहिला चीनने  मात्र  चिन्हसृष्टीकरण  स्वीकारून liquid  socialism  चा  एक   नवा  पर्याय  पुढे  आणला
liquid  socialism  मध्ये  भांडवलाची  liquidity सहज  स्वीकारली  जाते  gaseous  capitalism   व  socialism मध्ये  आता  फार  पुढची  पावले  टाकली  जाणार  हे  उघड  आहे  अशा  वेळेला  मार्क्स  व  आंबेडकरांचा  solid  socialism  कालबाह्य  होत  जाणे  अटळ  आहे

तारीख :  १०/८/१८

                                                                    अशा  वेळेला  state ( राज्य ) ही  संस्था  liquid  होणे  अटळ  आहे  पूर्वी  state  ह्या  शब्दाचा  अर्थच  मुळात  solid  state  होता  ह्यामुळेच  liquid  state  ही  संकल्पना  स्वीकारणे  आपणाला  अजूनही  शक्य  झालेले  नाही  त्यातूनच  solid  state  आणि  liquid  capitalism  ह्यांच्यात  सतत  संघर्ष  होताना  सध्या  दिसतोय  हे  सर्व  अमेरिकेमुळे  होतय  असाही  एक  गैरसमज  झालेला  दिसतोय  माझ्या  मते  अमेरिका  उद्या  पृथ्वीवरून  नाहीशी  झाली  तरी  हेच  होणार  आहे  कारण  प्रश्न  चिन्हसृष्टीकरणाचा  आहे  अमेरिका  ही  ह्या  चिन्हसृष्टीकरणाचे  फक्त  नेतृत्व  करतेय पण  हे  नेतृत्वही येत्या  पंचवीस  वर्षात  कोसळून  पडणार  आहे.  चीन  आणि  युरोपियन  समुदाय  हे  नेतृत्व  कास  उलथून  टाकता  येईल  ह्याचीच  वाट  पाहतायत.  डॉलरचे  महत्त्व  संपुष्टात  आणण्याचे  चाललेले  प्रयत्न  हा  ह्या  प्रयत्नांचा  केवळ  एक  भाग  आहे .  हे  सगळेच  बदल  साहित्यावरही  प्रभाव  टाकतायत .

                                                              औद्योगिकीकरणात  माणसाचे  रूपांतर  कमोडिटीत  करण्याचा  प्रयत्न  केला  गेला.  त्याला  शह  म्हणून  modern  art  जन्माला  आली  अस्तित्ववाद  बोकाळला .  माणसाला  कमोडिटी  बनवण्यापासून  वाचवणे  व  त्याला  व्यक्तिमत्त्व  बहाल   करणे  हा या ह्या  चळवळीचा  पाया  ही  कला  subjective  झाली  कारण  subject  च  धोक्यात  आला  चिन्हसृष्टीकरणाने  माणसाचे  रूपांतर  सेमिओडीटीत  करण्याचा  प्रयत्न  चालवलेला  आहे  सेमिओडिटी  ही  एकाच  वेळी  कमोडिटी  असते  आणि  प्रोग्रामही  असते.  हा  प्रोग्राम  प्रीप्लान्ड  असतो  आणि  तरीही  त्यात  विविध  पर्यायांची  प्रचंड  गजबज  असते  जी  माणसाला  स्वातंत्र्याचा  आणि  मौजेचा  ठोस  आभास  देते  अशा  वेळी   कलावंताला  फक्त  कमोडिटीपासून  वाचून  किंवा  स्वतःचे  व्यक्तिमत्त्व  शाबूत  ठेऊन  चालत  नाही  तर  स्वतःला  ह्या  प्रीप्लान्ड  प्रोग्रामपासून  वाचवणेही  गरजेचे  बनते  चौथ्या  नवतेची  कविता  हे  काम  करते  आता  तिने  अधिक  पुढे  जाणे  आवश्यक  आहे  औद्योगिकीकरणाच्या  काळात  modern  art  ला  हळूहळू  कळून  चुकलं  की  असं  नुसतं  अस्तित्ववादी  व्यक्तिनिष्ठ  असून  भागणार  नाही  आणि  मग  collective  consciousness  ला  महत्व  देणारी  पर्यायी  modern  art  जगभर  पुढे  आली  आणि  तिने  postmodern  ला  जन्म  दिला  चीजाच्या  बाबतीत  कळत  नकळत  आता  आपली  हीच  अवस्था  होईल  मात्र  आपला  collective  consciousness  हा  modern  असून  चालणार  नाही  तर  तो  पूर्णपणे  नवा  व  चिन्हसृष्टीकरणाला  नीट  सामोरा  जाणारा  हवा  सध्या  काही  back  to  modern  ideology  चा  उथळ उद्योग  करतायत.  हे  म्हणजे  औद्योगिकीकरणाच्या  काळातील  प्रश्न  सोडवण्यासाठी  काही  लोक  संतांच्याकडे  जायचे  तसाच  काहीसा  हा   प्रकार  आहे  आसपासचे  बदल  नीट  न  कळल्याचे  हे  लक्षण  आहे  मुळात  ह्या  लोकांची  ideology  ही   ideology  राहिलेली  नाही  ती  श्रद्धा   बनलीये  आणि  एखादी  गोष्ट  श्रद्धा  बनली  कि  तुम्ही  तिच्या  विषयी  संशय  घेणे  हे  पाप  मानले  जाते  हे  पाप  मी  वारंवार  केल्याने  अनेकांची  पंचायत  झालेली  दिसते  पण  मी  माणूसच  असा  आहे  की  जो  बदलाला  नेहमीच  तयार  असतो

३.  तू  तुझ्या  कवितेत  तुझं  बदललेलं  जग  कशा  प्रकारे  आणलंय  ?  ते  आलंय  का  ?  कवितेत  नव्या  वस्तूंची  साधनांची, कॉम्प्युटरच्या / वेबवर्ल्डसंबंधी  गोष्टींची  नाव /  उल्लेख  करून  लिहिलेल्या  अनेक  कविता  हल्ली  वाचायला  मिळतात  अशा  कवितांबद्दल  तुला  काय  वाटतं ?  ह्याच  वस्तूंची /  गोष्टींची  नाव / उल्लेख  करून  लिहिलेली  एखादी  चांगली  कविता  आठवतेय  का  ?

                                               मी  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  अखंड  कवी  आहे .  माझ्या  स्वतःच्या  आयुष्यात  १९८२  ते  १९८७  हा  कालखंड  प्रचंड  सृजनाचा  कालखंड  आहे     

तारीख  :  ११/८/१८

                                                                    ह्या  काळात  मी  साधारण  हजार  बाराशे  कविता ,  तीस  कथा  , चार  एकांकिका , एक फसलेली   कादंबरी , नऊ  नाटके  एवढे  प्रचंड  लिखाण  केले  आहे. पूर्वी   मी  हा  एकदा  सांगितला  की  लोकांचा  विश्वास  बसायचा  नाही .  पण  डेकॅथलॉन  हा  संग्रह  बाहेर  पडल्यापासून  लोक  तितकासा  अविश्वास  दाखवत  नाहीत.  आता  डेकॅथलॉन  प्लस, डेकॅथलॉन मॅक्झिमम ,  तू ,  कोल्हापूर  ते  मुंबई  व्हाया  कविता  (  ह्यांचा  समावेश  कदाचित  पॉप्युलरतर्फे येऊ  घातलेल्या एका  भारतीय  विद्यार्थ्यांचे  उद्गार ह्या  संग्रहाच्या  आगामी  दुसऱ्या  आवृत्तीत  होईल  ) कोलाज ,  आऊट  ऑफ  थिंग असे  कविता  संग्रह  बाहेर  आले  की  हा  कालखंड  स्पष्ट होईल 

                                                                   १९८८  ते  १९९५  ह्या  कालखंडात  हे  प्रमाण  मंदावले .  प्रामुख्याने  ह्या  कालखंडात  लिहिल्या  गेलेल्या  कवितांचे  जास्त  प्रमाण  असणारा  क. व्ही. हा   संग्रह  आता  बाहेर  आलाय  माझ्या  दृष्टीने  ज्यांना  मी  चिन्हसृष्टीय  कविता  म्हणतो  अशा  सातशे  साडेसातशे  कविता  मी  लिहिल्या  त्या  १९८८  ते  २००३  ह्या  काळात.  त्यातील  चारशे  कविता  १९८८  ते  १९९५  ह्या  काळातील  असाव्यात .  ह्याशिवाय  ह्या  काळात  मी  अफेअर  डॉट  कॉम  नावाची  माझ्या  दृष्टीने  यशस्वी  कादंबरी  लिहिली .  तिचा  फायनल  ड्राफ्ट  मात्र  मला  तिचा  शेवट  न  आवडल्याने  अडून  होता .  तो  मी  नुकताच  केला.  ह्याशिवाय  सात  नाटके  वीस  कथा  सहा  सात  एकांकिका ,  टीकाहरण  मधील  बरीचशी समीक्षा  मी  ह्या  काळात  लिहिली  गेलीये .


                                                                   १९९६  पासून  मात्र  माझ्या  आयुष्यात  समीक्षा  नको  तितकी  महत्वाची  झाली . १९९६  ते  २००३  ह्या  काळात  मी  फक्त  साडेतीनशे  कविता  लिहिल्यात .  त्याचे  प्रतिनिधित्व  स्त्रीवाहिनी  ह्या  संग्रहात  आहे. मी  काहीसा  झपाटल्यासारखा  कविता  लिहितो .  एकाच  झपाट्यात  मी  दीर्घ  कविताही  लिहिल्या  आहेत  ह्या  अर्थाने  मी  अघोरी  कवी  आहे . मला  स्वतःला  फारस  माग  वळून  पाहायला  आवडत  नाही .  त्यामुळे  केलेले  लिखाण  प्रकाशित  करण्याचाही  फारसा   उत्साह  मला  नसायचा,  किंबहुना  १९९५   पर्यंत  ह्या  बाबतीत  मी  निरुत्साही  होतो . ह्याला  कारण  माझा  कोल्हापुरातला  कडवट  अनुभव  असावा माझ्या  लेखनाची  प्रचंड  अवहेलना  आणि  मानखंडना  झाल्याने  पुढे पुढे  मी  ते  दाखवायचेच  बंद  केले.

                                                                 माझ्या  प्रचंड  लेखनशक्तीमुळे  असेल, पण  माझ्या  आसपासचा  जवळ जवळ  प्रत्येक  बदल  माझ्या  कवितेत  कुठे  ना  कुठे  आलेला  आहे . चिन्हसृष्टीकरणाचे  तिन्ही  कालखंड   अनुक्रमे  ' डेकॅथलान ' , क.व्ही . आणि  स्त्रीवाहिनी  ह्या  कविता  संग्रहात  आलेले  दिसतील . क. व्ही त  जागतिकीकरण  हे  बाहेर  जास्त  आहे . स्त्रीवाहिनीत  हे  जागतिकीकरण  थेट  घरदारात  घुसलेले  दिसेल. आता  हे  मी  जाणीवपूर्वक  केलय  का ?  तर  जिथे  मला  ideology  चाच  प्रतिकार  करायचा  होता  तिथे  ते  जाणीवपूर्वक  आलय  पण  जवळजवळ  ९०% कवितेत  ते  अजाणताच  आलंय .

                                                               हे  मी  कशाप्रकारे  आणलंय  असं  म्हणशील  तर  सगळ्या  प्रकारे !
मी  कवितेला  आणि  आयुष्याला  चहुअंगांनी  भिडणारा  माणूस  आहे  कविता  ही  कुठल्यातरी  अमुक  एका  पद्धतीने  लिहिता  येते  ह्यावर  माझा  विश्वास  नाही.  डेकॅथलानच्या  पहिल्या   अर्ध्या   भागात मी  रोमँटिक  आहे  तर  नंतर  देशीवादी  व  दलित  साहित्याच्या  प्रभावाखाली  होतो .कोलाजमध्ये  तर  मी  कट्टरला  कट्टर  देशीवादी  होतो  इतका  की  हा  संग्रह  भालचंद्र  नेमाड्यांना मी  अर्पण  करावा  डेकॅथलॉन   प्लसमध्ये  मी  अस्तित्ववादी  होतो  तर  डेकॅथलान  मॅक्झिमममध्ये  पर्यायी  आधुनिकवादी  ज्याला  म्हणतात  तसा.  ह्या  काळात  मी  दर  चार  महिन्यांनी  काहीतरी  नवाच  असायचो . 


                                                               सप्टेंबर  १९८७  नंतर  मी  ह्या  साऱ्यातूनच  बाहेर  पडलो  आणि  चिन्हसृष्टवादी  झालो . १९८८  ला  मी  मुंबईत  राहता  येईल  का  ह्याची  चाचपणी  केली  आणि  १९८९   मध्ये राहायलाच  आलो.  माझ्यातला  हा  बदल  माझ्या  कोल्हापूरच्या  अनेक  मित्रांना  आजही  आवडत  नाही . त्यांच्या  मते   माझ्या  चांगल्या  कविता  ह्या  ८७  पर्यंतच  लिहिल्या  गेल्या  पण  मित्रांच्या  पेक्षा  आपला  आतला  आवाज  काय  म्हणतो हे  महत्वाचे  वाटल्याने  मी  नवे  बदल   आत्मसात  करत  राहिलो. 

                                                             आता  पुढचा  प्रश्न  तर  प्रत्येक  काळात  प्रतिभा  नसलेले  काही  चलाख  लोक  असतातच  हे  चलाख  लोक असतातच . हे  चलाख  लोक कम्प्युटर  वगैरे  उल्लेख  करून  कविता  लिहिणारच .  आपण  कि  त्यांच्याकडे  लक्ष  द्यायचे  कारण  नाही,  पण  त्याच  बरोबर  प्रचंड  थोर  वगैरे  असंही  कुणी  समजू  नये . ते  एक  मशीन  आहे. ह्याचे  भान  बाळगावे.  जाहिरातीच्या  क्षेत्रातली  मशीन्स  ही तुमच्या  p.c. पेक्षा  शंभर  पटींनी  श्रेष्ठ  असतात .

                                                             तेव्हा  p.c.  आला   म्हणजे  सगळं  आलं  असं  समजण हेही  तितकंच  वाईट .  हल्ली  काही  मध्यमवर्गीय  कवींना  आपण  पी.सी  वापरतो  ह्याचाच  माज  आलाय , म्हणून   हे  सांगावेसे  वाटते .  तुमचे स्टेट्स  सिम्बॉल हे  कवितेत  फारसे  कामाचे  नसते . पाब्लो  नेरुदाने  मी  टाईपरायटरने  मुद्दाम  जाणीवपूर्वक  कविता  लिहीत  नाही , कारण त्याने  मानवी  स्पर्श नाहीसा  होतो असे  म्हंटले  होते,  तर  पी.सी  न  वापरणे  हीही  एखाद्या  कवीची  फार  जाणीवपूर्वक  केलेली  निवड  असू  शकते .

                                                            कवितेबाबत  एक  मूलभूत  गोष्ट  आपण  सर्वांनी  लक्षात  घ्यायला  हवी.  प्रत्येक  अनुभव  नवा  असतो प्रत्येक  क्षण  नवा  असतो ,  प्रत्येक  क्षणी  अवकाश  नवा  असतो त्यामुळे  प्रत्येक  कविता  ही  नवी  असते. जोपर्यंत  कागदावर  काय  उमटणार  ह्याविषयीचे  थ्रिल  जिवंत  असते  तोपर्यत  तुम्ही  कवी  असता  ज्यादिवशी  हे  थ्रिल संपते  लिखाणात  प्रेडिक्टबिलिटी  येते, तुमचा  जुनाट  मेंदूच  स्मरणशक्तीद्वारे  तुमची  कविता  लिहायला  लागतो त्या  दिवशी  तुम्ही  कवी  म्हणून  संपलेले  असता.


४ . तुझ्या  जगण्याचा  कवितेवर  व  कवितेचा  जगण्यावर  परिणाम  होतोय  का ? कशा  रीतीने  ? तुझ्या  दृष्टीने  तुझ्या  कवितेचं  जग  कोणतं  ?  उदाहरणार्थ ? तुझ्या  दृष्टीने  तुला  कवी  म्हणून ,  माणूस म्हणून, मराठी  भाषक म्हणून, भारतीय  म्हणून, जागतिक  ग्लोबल  नागरिक  म्हणून  कुठल्या  समस्या  आहेत ? त्या  समस्यांचा  सामना  कसा  करावा ? काय  काय  उपाय  या  समस्यांवर  असू  शकतात ? नसल्यास  का  नाहीत ? असल्यास  भविष्यात  काय  करावं ?  तू  लिहितोय  म्हणजे  नेमकं काय  करतोय ? तुला  कविता  लिहायची  ऊर्जा कुठून  मिळते  ? 

                                                              मी  कवितेने  आतून  बाहेरून  झपाटलेला  मनुष्य  आहे . माझ्यात  एक  लहान  मूल  आहे  ज्याला  ह्या  जगातल्या  प्रत्येक  गोष्टीविषयी  कुतूहल  आहे  आणि   माझ्यात  एक  तत्वज्ञ  आहे ज्याला  जे  जे  आपल्याला  कळलंय  ते  ते  सगळं  सांगायचंय . मला  वाटते , कविता  ही जगातली  कदाचित  एकमेव  गोष्ट  असेल  जिथे  हे  लहान  मूल  आणि  तत्वज्ञ  एकत्र  नांदू  शकतात . कविता  ही त्यामुळेच  अनेकदा   लहान  मुलाने  सांगितलेले  तत्वज्ञान  असते  किंवा  तत्वज्ञांचे  बालसुलभ  कुतूहल  व  त्यापोटी  त्याने  घेतलेला  शोध असते . कविता  ही  जीवनाचे  असे  एक  इंटरनेट  आहे  जिथे  माझ्या आयुष्यातल्या  सगळ्याच  वेबसाईट्स  एकत्र   येऊन  मिळतात . सॉलिड, लिक्विड , गॅसिअसचे  प्रेशिअस  इंटरनेट !  मी  एक  असा  मनुष्य  आहे  जो  असंख्य  तुकड्यात  विखरून  पडलाय ,  आणि  तरीही  जो हे  सगळे  तुकडे  कासवांसारखे  कवितेच्या  पोटात  घेऊन  आरामात  चाललाय .

                                                               माझे  स्वतःचे  जगणे  गाव, शहर आणि  महानगर अशा  तिन्ही  अवकाशात  फिरत  असल्याने  ह्या  तिन्ही  अवकाशांची  सरमिसळ  माझ्या  कवितेत  होत  असते. ह्यात   भरीसभर  म्हणून   माझ्यावर  फुले ,  आंबेडकरांचा ,  विशेषतः  गौतम  बुद्धांचा  दार्शनिक  पातळीवर  सखोल  ठसा  आहे  त्यामुळे  दलित  अवकाशविषयी  मी  नको  तितका  सजग  आहे  मी  जन्माने  दलित  नसूनही  माझे  आयुष्य  अनेक  हालअपेष्टांतून  गेल्याने  मला  दलित  साहित्य  जेवढे  आपले  वाटले  तेवढे  इतर  साहित्य  वाटले  नाही  आणि  हे  सर्व  कमी  म्हणू  की  काय ,  माझ्या  घरात  आसपास  फक्त  स्त्रिया .  माझ्या  आईकडे  तर  मुलगाच  नाही  सगळ्या  बहिणीच  आणि  मी  ज्या  पाटलांच्या  घरी  जन्मलो  तिथेही  बायकाच . त्यात  पुन्हा  भर  म्हणजे  लहानपणी  माझ्या  सावळ्याकाळ्या  रंगात  निळसर  झाक  होती  ( जी  पुढे  नाहीशी  झाली  ) .

                                                                मग  काय होणार ? माझा  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  पार   श्रीकृष्ण  केला  जणू  ह्या  बायका  लाड  करण्यासाठी  एका  पुरुषाची  वाटच  पाहात  होत्या  आणि  मी  जन्मलो !  त्यामुळे  स्त्रैण  अवकाश  हा  मला  लहानपणापासुन  नको  तितका  उपलब्ध  झालाय . ह्या  सगळ्या  बायकांनी  त्यांच्या  दृष्टीने  मी  आदर्श  पुरुष  व्हावे  म्हणून  यथेच्छ  धडपड  केली .  त्यामुळे  कुस्तीपासून  फुटबॉलपर्यंत  ज्याला  ज्याला  पुरुषी  टॅग्ज  लागला त्या  त्या  गोष्टी  मला  करायला  लागल्या  ह्या  सगळ्याच  गाववाल्या !  स्त्रीमुक्तीचे  वारे  तितकेसे  न पोचलेले !   त्यामुळे  त्यांनी  मला  व्यवस्थित  पुरुष  बनवला . माझा  स्त्रीवाहिनी  हा  संग्रह  ही  ह्या  बायकांची  देन . त्यांच्यामुळेच  मी  महानगरातल्या  स्त्रिया  नीट  जोखू  शकलो . अनेकांना  वाटतं   तसा  काही  तो  स्त्रियांच्या  नजरेतून  लिहिलेला  संग्रह  नाही .  तर  माझ्यातच  असलेल्या  आणि  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  जागे  केलेल्या  माझ्यातल्या  स्त्रीने  लिहिलेला  तो  संग्रह  आहे .    

                                                             मी  लोकांशी  कमिटमेन्ट  असणारा  एक   कवी  आहे . त्यामुळेच  मी  कुठल्याही  संघटनेच्या  चरणाशी   निष्ठा  वाहिल्या  नाहीत  आणि  ज्या  संघटना  मी  जॉईन  केल्या  तिथे  मी  प्रमुखच  होतो .
                                                   


























































































Wednesday, 7 February 2018


नास्तिकांचा पवित्र ग्रंथ श्रीधर तिळवे नाईक

 निंदा करू  नका
आणि चुकीची निंदा तर अजिबात करू नका

कोणी तुमची निंदा करत असेल
तर तिच्यात तथ्थ आहे का ते पहा
आणि तथ्थ असेल तर स्वतःला सुधारा
आणि तथ्थ नसेल
तर निंदकाला वस्तुस्थिती समजवा
तरीही त्याला निंदाच पसंत असेल
तर तुमचा मार्ग त्याला भिडणार नाही
ह्याची काळजी घ्या

१६३)
वाईट टोपण नावांनी बोलवू नका
शिव्या अजिबात देऊ  नका
चिडवू नका चेष्टा करू नका
नसलेले  सद्गुण वा दोष चिकटवू नका
उगाचच कुणाच्या परिस्थितीला हसू नका
मदत करा
आणि मदत करता येत नसेल तर
किमान जे मदत करतायत त्यांना
किंवा जी मदत होतीये तिला
थांबवू  नका


१६४)
कुणाची गुपिते शोधू नको
माहीत झाली तर फोडू नको
कुणावरही पाळत ठेऊ नको
कुणाची हेरगिरी करू नको
आणि कुणाचीही  पाठीमागे निंदा करू नको

गुप्ततेत मजा येते
पण अंतिमतः ही मजा सजा बनते

१६५)
जे नेहमी वाकडेच बोलतात
आणि जे सदोदित दोष काढतात

जे पैश्याने माणसाला मोजतात
आणि जे  झोपेतही
सर्वत्र  पैसे मोजतात /योजतात
आणि माणसांना पैसे मिळवण्याचे साधन समजतात
ते स्वतःसाठी दुःख तयार करत आहेत
त्यांना चिकटू नकोस
उलथून दुःखात पडशील

१६६)
देहदंड देणारे सोडले
तर जे माणसाला मारतात
ते स्वतःलाही मारतात
आणि मानवजातीलाही

जे माणसाला वाचवतात
ते स्वतःलाही वाचवतात
आणि मानवजातीलाही

१६७)
देहदंड देणाऱ्या कायदानिष्ठ माणसांनो
देहदंड  देण्याआधी
दहा वेळा साकल्याने विचार करा

जर देहदंड देऊन एका अपराध्याला
काही माणसांचे प्राण वाचतील
तर आणि तरच
देहदंड द्या

जर  तो अपराधी माणसाचे प्राण घेणार नाही
ह्याची खात्री त्याच्या वर्तनावरून वाटत असेल
तर त्याला जन्मठेप द्या

केवळ कायद्याने सत्ता हाती दिलीये
म्हणून कुणाचाही प्राण
अविवेकाने घेऊ नका

१६८)
जगात केऑस आहे  आणि ऑर्डरही
केऑसने गोंधळू नको
आणि  ऑर्डर आवळू नको

स्वतःसाठी सुव्यवस्था निर्माण कर
मात्र अवधान असू दे
कि केऑस कधीही
ही सुव्यवस्था भंग करू शकतो

सर्वच शक्यता माणसाला दिसत नाही
ज्या दिसतात त्या ही सर्व त्याला
नियंत्रणात आणता येत नाहीत
आणि ज्या नियंत्रित होतात
त्याही कायमस्वरूपी नियंत्रित नसतात

अशावेळी  घाबरू वा गोंधळू नको
माणसाचे वैभव फक्त
सुव्यवस्थेत  नाही
तर तो अव्यवस्था कशी हाताळतो
त्या  हाताळणीतही  आहे

१६९)
जे नियतीवर वा नियतत्वावर
विश्वास ठेवतात
ते नियतीचा बैल होऊन
नियतीत बुडतात

हे जग शक्यतांचे आहे
आणि त्यात  कार्यकारणभाव
हा केवळ संभाव्यता आहे

ईश्वर ही निश्चतीकरणाची
माणसाला लागलेली
घाण हमीसवय आहे

तिच्यात अडकशील
तर निराशेत अडकशील

कशाचीही हमी देऊ नको
कशाचीही हमी घेऊ नको

मात्र जे आहे
जिथे आहे जसे आहे
साजरे कर

१७०)
बोलताना
जो समोर आहे वा जे समोर आहेत
त्यांच्याशीच बोल

जे तुझ्यापुढे उपस्थित  नाहीत
त्यांच्या अनुपस्थितीत
त्यांच्या विषयी चांगले किंवा वाईट
काहीही बोलू नको

तरीही बोलावे लागले
तर चांगलेच बोल
आणि त्यांच्या अनुपस्थितीत
त्यांच्याविषयी चांगले  बोलता येत
नसेल तर, निंदा करू  नको
मौन  पाळ

जे उपस्थित आहेत
त्यांच्याशी चांगले बोल
टीका /निंदा सहन करण्याची क्षमता
सर्वाकडे नसते
तेव्हा निंदा वा टीका नको
कुठे चुकतय ते  समजावून सांग
यदाकदाचित टीका करणे भाग असेल
तर ती चांगल्या भाषेत कर
व सौम्यपणाने कर

टीकेने मनुष्य स्वतःचे दोष वा चूक
सुधारत नसेल
तर मनुष्य बदल
त्याच्याऐवजी पर्यायी मनुष्य निवड

पर्याय उपलब्ध  नसेल तर
अधिक पैसे देऊन काम पूर्ण कर

गोड बोलून काम पूर्ण कर

तरीही काम अपूर्ण ठेवले जात असेल
तर पर्यायी काम निवड पर्याय निवड
आणि पर्यायी काम  शक्य नसेल तर
काम ताटकळत ठेव
समोरचा माणूस सुधारे तोवर

तरीही काम पूर्ण केले जात  नसेल
तर काम बंद  कर

१७१)
वाईटाच्या नादी लागू नको
कोणी वाईट असेल तर त्याला भजू नको

वाईटालाही
त्याच्या योग्य  वाटाइतपत पोहचव
त्याचा हक्क मारू  नको

सूड घेऊ नको
तो धगधगत असेल
तर क्षमा कर

जो क्षमा करतो
तो सूडातून मुक्त होतो

१७२)
भांडण असेल
तर वाटाघाटी कर
समेट  कर
तोडगा   काढ

कुठलेच भांडण चिरंतन नसते
तोडग्याची वा समेटाची वाट बघ

१७३)
इतरांच्या दोषांना क्षमा कर
स्वतःतील दोष काढून टाक

स्वभावजन्य जनुकीय दोष असतील
तर त्यांचे अवधान  राख
ते उसळून
काही गिळणार नाहीत ना
ह्याची काळजी घे

मनुष्य स्वतःच्या दोषांपासून
स्वतःचा  पुतळा बनवतो
पण त्याचे सद्गुण
त्याचे पुतळेपण नाहीसे करून
त्याला जिवंत बनवतात

१७४)
तू मनुष्य आहेस
आणि मनुष्य नेहमीच फायद्यात असतो
तू मनुष्य नसतास
तर तुझे हे अणुरेणू
कुठेतरी धूळ खात पडले नसते काय

पण त्यांच्यात जीव आला
आणि  ते फायद्यात आले

जर मनुष्य बनून
तुझे अणुरेणू फायद्यात आले असतील
तर तूही फायद्यात आला  नाहीस का

दगडाला दुःख होत नाही जखम होत नाही
कारण तो मनुष्य नाही

तू मनुष्य आहेस
मग दरिद्री अस वा रोगी अस
दुःखी अस वा जखमी अस
फायद्यातच आहेस

आपण जिवंत आहोत
हा ह्या  जगातील सर्वात मोठा
फायदा  नाही काय

जिवंत असणे हेच तुझे खरे भांडवल
आणि तुझे श्वास
दिनरात्र फायदा आहे

१७५)
खोटे बोलणाऱ्याचे ऐकू नको
गॉसिप करणाऱ्याचे  ऐकू नको
चकाट्या पिटणाऱ्याचे  ऐकू नको
टवाळी करणाऱ्याचे  ऐकू नको
दांभिक बोलणाऱ्याचे  ऐकू नको
चहाड्या करणाऱ्याचे  ऐकू नको

ह्या गोष्टी अंतिमतः
मेंदूला मंदत्व  देतात
आणि जगण्याची गति मंद करतात

१७६)
ईश्वर नाही
आणि सैतानही नाही
तुमच्या तृष्णा आहेत
भुका आहेत निकडी आहेत
वासना आहेत कामना आहेत

त्याच सुख देतात
त्याच दुःख देतात

त्यांच्यापासून कितीही पळालास तरी
त्या तुझ्या आत असल्याने
तुझा पाठलाग करतील
जोवर जगण्याची वासना आहे
तोवर मरण्याचे भय आहे

तुला ह्या दोन्हीतून
वाटचाल करायचीये

त्यांचा द्वेष नको करू
फक्त त्या जश्या  आहेत
तश्या स्वीकार
त्यांना सैतान समजून
त्यांचा द्वेष करशील
तर काहीही सुख न कमावता
आत्मद्वेष कमावशील
पापाच्या खोट्या चिखलात
अकारण लोळशील

तेव्हा त्यांचा दुस्वास नको करू
उलट त्या आहेत तश्या स्वीकार

१७७)
पैसे देताना
समोरच्याची पैस घेतले म्हणून सही घे
शक्यतो व्याज लावू नको
विशेषतः मित्र वा नातेवाईक असेल तर

अनोळखी असेल तर
कमीत कमी व्याज लाव
दिलेले पैसे वसूल कर
पण वसुली अयोग्य मार्गाने
वसूल करू नकोस

समोरच्याची पैसे परत करण्याची
क्षमता नसेल
तर त्याला काही साईड काम दे
आणि त्यातून पैसे वसूल कर

मात्र जे पैसे दान म्हणून देशील
ते पैसे मागू नको
दानाचा हिशेब ठेव
आणि ज्यांना दान देशिल
त्यांच्याकडून पावती घे

पारदर्शकता
पैश्याच्या व्यवहाराचा
प्राण आहे
ती कागदावर कायदेशीर बनव

१७८)
पैसे वाढतील
तसे दान वाढवत जा
मात्र  दान
पैश्यात शक्यतो नको
ज्याला अन्न गरजेचे असेल
त्याला अन्न दे
नागड्याला वस्त्र
बेघराला घर
वा भाडयाचे घर
रुग्णाचे हॉस्पिटलचे बिल
निरक्षर व अशिक्षिताला शिक्षण
व शिक्षणाचा सारा खर्च

सक्षम बेकाराला नोकरी दे
वा व्यवसाय करू पाहणाऱ्याला
कमीत कमी व्याजाने भांडवल

आळश्याला श्रम करायला लाव
अकुशलला कौशल्य शिकव

१७७)
तुझ्या आईवडिलांनी, पूर्वजांनी
तू जन्माला येण्याआधीच
तुझा मेंदू तुझी अक्कल
ईश्वराकडे गहाण टाकली

आजही तिला सोडण्याऐवजी
तू ईश्वराची वेठबिगारी करतो आहेस

तू प्राचीन दासापेक्षा
मूर्ख नाहीस काय ?
प्राचीन गुलामांचा मालक
निदान अस्तित्वात होता
त्याला शरीर होते

तुझा मालक तर अस्तित्वातही नाहीये
आणि तरी तू त्याच्याकडे गहाण आहेस

स्वतंत्र हो
आणि ह्या वेठबिगारीपासून
मुक्ति मिळव

१८०)
एकाच चवीचे अन्न
कंटाळा आणते
स्त्रीपुरुष संबंधातील एकच शरीर
कंटाळा आणते
एका घरातील रहिवासीपण
कंटाळा आणते
एकाच विषयाचे शिक्षण
कंटाळा आणते
एकाच प्रकारचा व्यायाम
कंटाळा आणतो

मन  तोचतोचपणाला कंटाळते
आणि विविधतेला घारबते

तोचतोचपनात शाश्वती असते सवय असते
विविधतेत दुसरी शक्यता

कुठलीही शक्यता लवकरच संपण्याची शक्यता असते

तेव्हा विविधतेसाठी
काय पणाला लावतोयस
ह्याचा विचार कर

जग न संपणाऱ्या शक्यतांचे
जाळे आहे
आणि साऱ्या शक्यता चाखण्याची शक्यता
तुझ्या मर्यादित आयुष्यात
दूरुनवयानेही नाही

तेव्हा विविधतेतही कुठेतरी थांबावेच
लागणार आहे
त्या  थांब्याचा नीट विचार कर

क्षणभंगुर विविधता
आणि अमर तोचतोचपणा
ह्यातील निवडीचा पेच
ज्याला त्यालाच सोडवावा लागतो
आणि तो सोडवताना
कंटाळा विविधतेकडे  ढकलत असतो

तेव्हा स्वतःचा पिंड नीट ओळख
आणि मगच आयुष्य पणाला लाव

१८१)
जर इतरांपेक्षा तुला
निसर्गाने जास्त काही दिले आहे
तर त्याचा अभिमान बाळगू नकोस
कारण ते कमावण्यासाठी
तू काहीच केलेले नाहीस

जर निसर्गाने तुला इतरांपेक्षा
काही  कमी दिले असेल
तर त्याचाही न्यूनगंड बाळगू नकोस
कारण ते नसण्यासाठी
तू जबाबदार नाहीस

१८२)
काटकसरी हो
पण कंजूस  होऊ नको

मदत कर
पण उधळपट्टी करू नको

आवश्यक असेल
तिथे तुझ्या  मदतीचा हात पोहचव

जो बुडत असेल त्याला वाचव

१८३)
जे फक्त संग्रह करतात
आणि वाटत नाहीत
जे फक्त साठा करतात
पण लोकांत वितरण करत नाहीत
ते माणुसकीचे गुन्हेगार आहेत

१८४)
परलोकातल्या काल्पनिक सोन्यापेक्षा
इहलोकातील  खरे पितळ
हे जास्त मूल्यवान आहे

परलोकाची स्वप्ने पहाण्यापेक्षा
इहलोकातील तुझी स्वप्ने साकार कर
मात्र ती साकारताना
इतरांची  स्वप्ने  साकारायला मदत  कर
किमान त्यांना दुखावू नकोस

१८५)
तू ज्यांना मदत केलीस
ते सारेच परतफेड करणार नाहीत
उपकाराबदली सर्वच उपकार करतील
असे नाही
पण तरीही मदत कर उपकार कर
कारण जेव्हा तुला मदत लागेल
तेव्हा त्यांच्यावर तू उपकार केलेस
वा ज्यांना तू मदत केलीस
त्यापैकीच कोणी तुला मदत करेल
करोडो स्पर्म (sperm) सोडशील
तर त्यातील एक ते पाच सहा फळतील
उरलेले सर्व गायब होतील

तेव्हा मदत अनेकदा कर अनेकांना कर
आणि एखादी फळली तरी
ती फळवणाऱ्याचे आभार मान

१८६)
कुणाचाही वारसा हक्क बुडवू नको
कुणाचाही योग्य वाटा
देताना चुकू नको

ज्यांना जन्मजात
वारसा हक्क मिळालेला नाही
त्यांना तो सरकारमार्फत मिळवून दे
वा स्वतः त्यांना मदत कर

ज्यांचे आईबाप निर्धन  आहेत
त्यांना
त्यांच्या आईबापांच्या निर्धनतेची
शिक्षा मिळणार  नाही
ह्याची काळजी घे

संधी सर्वांनाच मिळायला हवी
आणि ती सर्वांना समानतेने
मिळायला हवी

ज्यांना संधी नाकारली गेलीये
त्यांच्यासाठी संधी तयार कर
आणि जे संधी देऊनही
स्वतःच्या आळसापोटी
व्यसनाधीनतेपोटी
अनाचारापोटी
वाईट सवयींपोटी
तिला वाया घालवतात
त्यांचा सार्वजनिक निषेध कर
आणि त्यांना सुधारगृहात पाठवून दे

१८७)
सर्वांना सारख्याच जागी पोहचता येत नाही
सर्वांना समान उंची गाठता येत नाही
सर्वांनाच  सर्वत्र विस्तारता येत नाही

मात्र ज्याला ज्या जागी पोहचायचे आहे
त्याला त्या जागी पोहचण्याची संधी हवी
ज्याला जी उंची गाठायची आहे
त्याला ती गाठायची  संधी हवी
ज्याला स्वतःचा जो विस्तार करायचा आहे
त्याला तो विस्तार करण्याची संधी हवी

जे अल्पसंतुष्ट आहेत
त्यांना अल्पसंतुष्ट राहण्याचे स्वातंत्र्य हवे

ज्यांना स्पर्धेच्या बाहेर रहायचे असेल
त्यांना स्पर्धेच्या बाहेर राहण्याची मोकळीक हवी

समान आकाराचे ठोकळे
कुरूप दिसतात
विविध आकारांची मांदियाळी
श्रीमंत दिसते

१८८)
माणसे संतंतीसाठी काहीही करू शकतात
म्हणूनच संतंतीला जन्म दे
मात्र तिच्या प्रेमात इतका आंधळा होऊ नको
कि इतरांच्या संतंतीचे त्याने नुकसान होईल

स्वतःच्या संतंतीचे भले कर
पण इतरांच्या संतंतीचे वाईट न करता

१८९)
शेजाऱ्यावर प्रेम कर
पण शेजारी चुकीचे वागत असेल
तर गोड शब्दात त्याची चूकही दाखव

तो गुन्हेगार असेल
तर पोलिसांना तसा रिपोर्ट दे

आणि चांगला असेल
तर त्याला नातेवाईकाचा दर्जा दे
शक्य असेल तेवढी मदत कर

१९०)
म्हातारपण कुणाला चुकले ?
तुलाही ते अटळपणे   येणार आहे

सर्वच म्हातारपण शहाणे नसते
आणि सर्वच म्हातारपण अनुभवी नसते
मात्र ज्या म्हातारपणाजवळ अनुभव आहे
शहाणपण आहे
त्याच्याकडून  जरूर शिक

जे खडूस  वा विक्षप्त असेल
त्यांना क्षमा कर
व सांभाळ

म्हातारपण असहाय्य व दुर्बल असते
त्यांना सहाय्य दे बल दे

तुला हे माहीत आहे का
उष्ण पदार्थ त्याच्यापेक्षा कमी उष्ण पदार्थाला
स्वतःची उष्णता  देऊ शकतो
पण कमी उष्णता असणारा पदार्थ
त्याची उष्णता जास्त उष्णता असलेल्या
पदार्थाला देऊ शकत नाही

सूर्य पृथ्वीला उष्णता  देऊ शकतो
पण पृथ्वी सूर्याला उष्णता देऊ शकत नाही

एक दिवस असा येईल
तुझी उष्णता तुझ्या मुलांपेक्षा कमी होईल
तेव्हा मुले उष्णता घेत नाहीत
म्हणून शोक करू नकोस
मात्र ते उष्णता देत असतील
तर ती आनंदाने घे
आणि तुझ्या कमी उष्णतेची ऊब
त्यांना दे

तुझी कमी उष्णतेची नातवंडे जन्मतील
तुझी उष्णता त्यांची गरज असेल
त्यांना ती उष्णता दे

हा उष्णतेचा प्रवाह
पिढी दर पिढी
चालता ठेव
***
















Friday, 19 January 2018

श्रीधर तिळवे ह्यांच्या जुन्या  कविता

वेदनांना माझ्या अंत नाही
मी अद्याप बनलो संत नाही

मृत्यूचे शोक करू तरी कसे
तीे  मेलेली  मी जिवंत नाही

कळ्या शिशिरात वारलेल्या
माझ्या नशिबी वसंत नाही

माझ्या जखमांचा वास तुझ्या
नाकात काळजा पर्यंत नाही

सोळाव्या  वर्षी शेवटचा विझलो
आणि तू म्हणतेस हा अंत नाही

श्रीधर तिळवे नाईक
***

उदासीचा प्रचंड  माहौल
झुरळासारखा उत्ताणा माझ्या काळजात पडलेला

निराशेच्या  मुंग्या जमतायत
आणि मेलेलो नाही म्हणून उलटपावली  जातायत

समाजाचे मांजर येतं खेळतं
पण खात नाही

कावळा फक्त पैल तो काऊ कोकताहे
म्हणत माझ्या रक्तात  लोळतो
आणि उडून जातो

गिधाड्याच्या दृष्टीने ही छोटी शिकार आहे

माझे असंख्य दोरांनी बांधलेले हात
 काळजात डोळे खोपून
झुरळ पाहतायत

मला कळतंय
आता मलाच  पॉझिटिव झालं पाहिजे

मी आनंदाचं एक कडवं गातोय

झुरळं अचानक सुलट  होऊन खिडकीकडे उडत चाललंय

माझ्या रक्तापासुन हत्ती तयार होतोय

मी सित्कारतोय
आणि आख्ख जंगल परततय
माझ्या देहात


***

मी तुला ब्लेमही करणार नाही
आणि तुझ्यावर
क्लेमही करणार नाही

माझ्या वाढीचा ठेका
तू थोडाच कधी घेतला होतास ?

माझ्या निर्वाणाची गॅरन्टी
तू थोडीच माझ्या मेंदूवर लिहिली होतीस  ?

मी एक बेवारस माल आहे
ज्याला स्वतःची  एक्स्पायरी डेट माहीत नाही
आणि ज्याला  कालातीत व्हायचं आहे

मी फक्त वाट  पाहतो आहे
तुझ्या कस्टमरनेसची

तू कधीतरी  कस्टमर  म्हणून येशील
आणि मला कंझ्युम करशील

तोवर हे मायेचे  गोडाऊन
आणि हा मालवटा
***

कुणाला हवा असतो कडका माणूस

मित्रांना  हवी असतात
करीअर बनवणारी मैत्रय स्टेशने

त्यांना कायम भीती
माझी जबाबदारी त्यांच्यावर पडेल

मला त्यांचीही दया येते कधीकधी

मी तर केवळ स्वतःच्या कष्टावर  जगलो
ती ही क्षमता संपली
कि आरश्यात जाऊन मरेन

प्रश्न इतकाच
तू माझ्या त्या मरणाची वाट पाहतो आहेस का ?

पैसे  संपले
उत्पन्नाचे सोर्स आटले

भिक्षा मागायलाही हातात त्राण नाही उरले
पुरता कफल्लक झालो

देहात निर्वाणप्राप्तीच्या प्रयत्नांनी  राख आहे

ती उडाली
की झालोच स्मशानयोगी
***

वॉर
          वर
वीर
          बन
वरवरचा
खोलात
          वधू आहे
          वध आहे
बुडून
          वर आलास
                  तर
तरलास
                  तर
शांतता आहे
शांती आहे
श्यानपत्ती आहे
जिचा आकार
बुडबुड्याएवढा आहे

वॉर, वीर, वर
नको असेल तर
खोली नाही बोली नाही
चोळी नाही चळवळ नाही
चाळवाचाळव नाही
चाळण नाही

फक्त मुकी मुक्ती आहे
आवाज हव्या असणाऱ्या
व्हाईस कल्चरमधून
साज हव्या असणाऱ्या
नॉईजकल्चरपासून

जी पलायन नाही
जी लायन  बनणेही नाही

जी सर्वत्र असणे आहे
जे बनणे, डसणे, बनवणे, फसणे, कसणे, घासणे, तासणे, पुसणे,
बसणे, रुसणे, वसणे, हसणे, वगैरे वगैरे
जन्मास घालते
पाळते
आणि नाहीसे करते

शिव
***

कैसा जहाँ  मैंने  पाया है
मेरे आगे मेरा साया है

सूरज  और धरतीका रोमान्स
दिननेही रातको बुलाया है

हर जालका ये   नजारा हैं मकड़ीने
खुदसेभी बड़ा जाल बिछाया है

मिट्टीके सिवा चाँदपे कुछ नहीं
उसे खूबसूरत दूरिने बनाया है.

हमे तो मिट्टीपे हमेशा गरूर था
पानीनेभी समुंदरमे ब्रम्हांड बनाया है

मुझे तो कहीभी खुदा मिला नही
उसे लाओ जिसने ये झूठ बताया है

जिन्दगी औरत है औरत ही रहेगी
न कहो औरतोंने हमे सताया है

इस चीनी डॉलको डीपली समझो
जो दाया है वही इसमे समझो बाया है

गर्म होते तो शायद अच्छा होता
उनके कोल्डनेसने हमे जलाया है
***

खायाला काही ना काही  धाडतोसच
प्यायला  काही ना काही सांडतोसच

पण ह्याने समाधान मानायला
मी थोडाच गृहस्थ आहे

मला हवी आहे
संपूर्ण मुक्ती

तिच्याविना सर्व काही वाळवंट आहे

तिच्यासाठी तर मी नद्या वाळत घातल्या
पावसाळे सुकवले
जंगल बोनसाय करून देहात  कुंडवले

माझ्या रक्तात पेपरमिंटच्या गोळ्या सोडणे बंद  कर

देणारच असशिल तर
तो तुझा तिसरा  डोळा
माझ्या दोन डोळ्यांच्या मध्ये निर्माण कर

तू दर्शन देत नाहीस
तिसरा डोळा देतोस
हे त्यानेच सिद्ध होईल
महादेवा
***

आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही  पर्याय \
तू ठेवला नाहीयेस माझ्यासमोर

दुःखे असावीत
पण इतकीही नव्हे कि
जखमांतून जखमा उगवाव्यात

यातना असाव्यात
पण इतक्याही नव्हेत कि
अश्रूत बर्फ सापडावा

मला जगायचं होतं
एक प्रामाणिक पारदर्शक आयुष्य
पण प्रत्येकवेळी तू माझे हात
क्रिमीनल केलेस

मला हवी होती  हातभर सेटलमेन्ट
पण तू तर माझी बोटेच छाटून
त्यांची बिर्याणी बनवलीस

संघर्षालाही कंटाळलो आता
माझ्या रक्ताची भुकटी होऊन
त्याची राख उडतीये हवेत

माझ्या श्वासांची लाकडे होऊन
ती जळतायत फुफ्फुसात

थकलो रे बाबा
तुझ्या मागे धावून  धावून  थकलो

मोक्षाचा बोजवारा उडाला

निर्वाणाचा हळदीघाट होऊन
तो उलटापालटा झाला

निघतो आता
माझ्यासारखा किरकोळ भक्त
वाया गेला म्हणून
तुला काय फरक पडणाराय

उडव माझे मुंडके
आणि माझ्या दुःखाची तलवार
तुझ्यात म्यान  कर

त्यांना पुनर्जन्म नको
***

कधीही जाऊ शकतो
शक्यता ताणवू शकतो

कपाटीत उभा यम
कुठवर लपवू शकतो

चेहरा पाहून संपला ?
हात  मिळवू शकतो

शेवटचा श्वास  हा
आयुष्य उभारू शकतो

बेरीज करत जगलो
वजाबाकी टाळू  शकतो ?
***

आयुष्यात सर्व बाजूंनी हरलोय म्हणून काय झालं
श्वासात वारा शिल्लक नाही म्हणून काय झालं
कवितेसाठी कागद फडफडेनासा झालायं म्हणून काय झालं

मी अद्याप जिवंत आहे
संत बनण्यासाठीची  माझी सांत कोशिश
अजून ताजी  आहे

खरंच आहे की सर्व दिशांनी माझ्यावर वार केला
आभाळाने माझ्या डोक्यावरचा पाऊस गोठवला
पृथ्वीने पायात जागा शोधून शोधून सुया कोंबल्या

पण माझ्या हृदयात ठोके अजून रक्त गोळा करतायत
वाफ झालेले पाणी अश्रू बनण्यासाठी का होईना
माझ्या डोळ्यात परततंय

मला सोडून तुम्ही चालते होताय
व्हा

एक दिवस असा येईल
ज्या रस्त्यांवर तुम्ही मला एकटं सोडलं
ते सारे  रस्ते खांदयावर टाकून
मी तुमच्या पुढे मंझील म्हणून उभा असेन

तोवर सोसेन
हा एकांताचा  वडापाव
एकटेपणाचे कांदेपोहे
आणि आतड्यात मोक्षाची सतत चुका करणारी भूक
***

उच्चवर्णियांना विसर पडू देऊ नका
की ते उच्चवर्णीय आहेत
त्यांच्या मुलांना नातवांना हे कळवत रहा कि
ते उच्चवर्णीय आहेत

आणि मग म्हणा कि
ते कसे स्वतःला उच्चवर्णीय समजतात

हे चालू ठेवा पिढ्यान पिढ्या
उच्चवर्णियांना माणूस बनू देऊ नका
त्यांना तो अहंकार पुरवत रहा
कि ते उच्च आहेत

स्वतःच्या मुलांना शिकवत रहा
कि ते कसे  निच्च आहेत खालचे आहेत
आणि कसे वंचित

जणू असे सांगून त्यांचे प्रश्न सुटणार आहेत

त्यांना हा भ्रम पुरवा
आणि मग झोपेतही चालताना
त्यांना स्वतःची जात आठवत राहिली की
खुश व्हा

हे असंच चालू द्या
आकलनाचा दुष्काळ चालू ठेवत
आरक्षणाच्या काळ्या  छत्र्या पुरवत

स्वतःच्या गुडघ्यात स्वतःच्या हाताने   मेंदू मारून घेणे ह्याला म्हणतात.
***


आभाळात  रक्तरंजित तारा  चाललाय
हत्या म्यान करून  हत्यारा चाललाय

खुनाची बातमी होताच  खून संपतो
खून करण्याचा सातबारा चाललाय

डोळेही  पाहताना लाल होतात
पाण्यावरून रक्ताचा शहारा चाललाय

श्वासही अंतिम क्षणी उदास  बोलला
हा कोणता भोवताली वारा चाललाय

अफवेसारखे विरून  गेले सत्य इथे
खोट्या  प्रमाणांचा दरारा चाललाय.
***
नविन
तुमच्याजवळ स्विमिंग पूल होता
माझ्याजवळ नदी
तुमच्याजवळ बल्ब होते
माझ्याजवळ तारे
तुमच्याकडे काँक्रीट  होते
माझ्याजवळ जंगल
तुमच्याजवळ टीव्ही होता
माझ्याजवळ डोंगर

मग एकदिवस तुम्ही माझ्या गावात
फॅक्टरी घेऊन आला
आणि आता नदीत पोहचायला मासेही शिल्लक नाहीत
जंगल फक्त दाखवायपुरतं उरलंय
आणि डोंगर बोकडा पडून टीव्हीच्या स्क्रिनसारखा दिसायला लागलाय

हे बरंच आहे कि
आभाळ  तुमच्या नाही
म्हणूनच निदान शिल्लक  आहेत
आभाळात अव्वल तारे
पोटात अस्सल भूक
डोळ्यात निखळ आनंद

***

एक पशु आहे आत
वळवळणारा  तडफडणारा फळफळणारा

एक मनुष्य आहे त्वचेच्या सरफेसवर
आकांक्षणारा, योजणारा, मोजणारा

एक संन्यासी आहे अवयवात ठाणबंद
क्रियाळणारा, पारणारा, शिवणारा

संन्याशाला मनुष्य मारायचय
पशूला  संन्याशाला हाकलून  घायचय
मनुष्याला दोघातून वाट काढत चालत जात दोघांना वाचवायचंय

तिघेही एकमेकाशी आट्यापाट्या खेळतायत
कधी आटे ढिले करतायत
कधी पाट्या टाकतायत

मी त्यांना थांबवू शकत नाही
फक्त त्यांच्या मरणाची वाट पाहू शकतो

कविता हे माझं सायलेंट किलर वेपन आहे
जे जे हळूहळू
मर्डर ओपन करतय
तिघे जिवंत आहेत
आणि मी कविता लिहीत
मर्डर करतोय
अदृश्य
कोण मरतय ते ना मला माहीत ना कवितेला
मात्र जो मारतोय त्याला
शिवाचा आणि शवाचा मिक्स वास येतोय
नक्की.
***

जिथे पृथ्वीच हवेत लटकतीये
तिथे मातीचे पाय काय मागतोस ?

जमिनीवर असणे म्हणजे
गुरुत्वाकर्षणाने जखडलेलं  असणं

मी उडायची महत्वाकांक्षा असलेला इसम आहि

मला पंख नाहीत म्हणून  काय झालं
फुफ्फुसात हवा तर आहे

माझे श्वास पक्ष्याचे आहेत
***

उठा उठा नगरजनहो ओंकाराचा नाद उगवला
त्या बाजूची पृथ्वी झोपली ह्या बाजूने दिवस उठवला

म्हशी चालल्या कट्यावरती आचळांना दुधाचा पूर
कॅल्शीयमने भरून घ्या हो शुभ्रधवल जगण्याचा ऊर

पूजा मांडली पैलवानांनी दिलबहारला आली बहार
हनुमान तालीम झाली जागी घेऊन कंठी कुस्तीचा हार

अंबाबाईस शिवली किरणे पहाटेचा प्राजक्त उतरला
रंकाळ्याच्या पाण्यावरती हळददिव्यांचा प्रकाश पसरला

पंचगंगेचा हलला  नंदी आभाळातील पेलून शंकर
पार्वतीने केले धावते कुलुपामधले स्थीर किंकर

उठा उठा पहाट झाली म्हणा ओम नमो शिवाय
वृत्तीप्रमाणे ज्याच्या त्याच्या मोक्षाचा अपुल्या शोधा  उपाय
***

एक माणूस मरतो
तेव्हा मीही मरतो त्या माणसात

तुम्ही सांगता मृतांचे आकडे
आणि मरण पावतात
माझ्या काळजाचे  तेवढे तुकडे

दोन हात नाहीशे होतात तेव्हा
नाहीशी होते माझ्या हातातील थोडी जिंदादिली

आणि दोन कान एक नाक एक भीम नाहीशे होताना
सपाट करतात माझ्या काही पेशी
आणि देह जळतो तेव्हा जळते
माझ्या कवटीचे एक मंडल
जिच्यामुळे मी कदाचित उमललो असतो

एक माणूस मरतो तेव्हा
एक अंश माणुसकी मरते
आणि पृथ्वीवर जमते
एक हत्येची निमूट राख
आणि चिमूटभर धूळ
माणसाला उत्क्रांत केल्याच्या पश्चातापाची
***





























































Thursday, 11 January 2018

डेकॅथलॉन श्रीधर तिळवे नाईक
वेदनांना माझ्या अंत नाही
मी अद्याप बनलो संत नाही


Thursday, 4 January 2018

 श्रीवाहिनी रविवार 
सत्संग 
आरंभ 
Make every news sexy yaar 
And Sunita what r u doing go for make up
News reader must look  hotter than any item girl 

Who is going to fashion the news 

He has lost the touch with new make up style 

Oh Honey !

असंच राहिलं तर एक दिवस 
नागड्या बायकांना नाचवतील 
आन नाचता नाचता न्यूज द्यायला लावतील 
Sexy news माय फूट 

News Channel ह्या पेक्षा Brothel पाखडले 
आणि viewer !एकानं तर SMS पाठवला एका रात्रीचे 
दहा हजार देतो येतेस का ?
सगळ्यांच्या मनात हेच असतं 

मटात काम करताना  वाटायचं नुस्तं स्मार्ट असलं की झालं आता इथं आल्यावर कळतंय की नुसत्या स्मार्ट होण्याने काही भागत नाही हॉट पण असावं लागतं आणि दर अर्ध्या तासाला काही ना काही हॉट द्यावं लागतं 

लिपस्टिक सरळ  कर ! आणि चेहरा इतका प्लॅट नको ! World इज प्लॅट ठीकय पण world विषयी न्यूज देताना चेहरा इतका प्लॅट नको 

We are world honey so be sexy  be hot and start

नमस्कारश्रीवाहिनी साप्ताहिक चर्चेत आपले  स्वागत
आम्ही आमच्या काही व्यासंगी श्रोत्यांचे  ओपीनियन्स इथे दाखवतोय  
विषय : रचविहारी कांड 
दयेन्द्र पेठे : I hold that every channel is canceled by some other channel, so there is no point in viewing any of them

रचना : But channels are interesting and good entertainer 

संकेत : Now I come to know that what I am paying for that is actually paid to entertainment. 
दयेन्द्र : Why don't we discuss the Rachbihari's effect issue ? Is it parody or prank or mediatic stunt ?

मराठीत ह्या सगळ्याला एक उत्तम शब्द आहे बनवाबनवी ! सर्वात आश्चर्यकारक आहे  तो sheer impact तिची  achievement ! Everything is fair in news and views असे आता समजावे 
का ?

जयंत  : ह्या न्यूजमुळे ज्या D चॅनेलने  ही न्यूज दिली त्याच्या जाहिराती कमी झालेत. समाजात  विवेक शाबूत असल्याचे हे लक्षण नव्हे का ?

मंगेशजाहिरातीच्या आधारे समाजाचा विवेक मोजता येईल का ? विवेक मोजावा  का ? दर्शक कमी  झाल्याने कदाचित हे घडले असेल. ह्या न्यूजमुळे टी आर पी वादला असता तर जाहिराती वाढल्या असत्या तेव्हा ह्याचे श्रेय जाहिरात दारांना देण्यात अर्थ नाही. श्रेय नागरिकांचे आहे. त्यांनी हे चॅनेल बघणे कमी केले

जयसिंग : ह्या खोटी  बातमी तयार करणाऱ्या कांडामुळे माध्यमांना फार बनवाबनवी ह्यापुढे  चालणार नाही इतके तर कळलेच असेल  एका अर्थाने हा खोटेपणा खऱ्याला प्रमोट करेल

आल्हाद : माणसाला सत्य  का हवं असतं ?

अब्दुल्ला : प्रत्येक प्रेषितानंतर  शेकडो भोंदू प्रेषित अवतरतात आता पत्रकारितेतही भोंदू पत्रकार अवतरलेत त्याचा  थेट पुरावा म्हणजे हे बातमीकांड आहे. एकेकाळी ह्या देशाची स्वातंत्र्य चळवळ पत्रकार  वर्गाने चालवली होती आज त्यांचेच  वंशज त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन खोट्या मतमीची वळवळ उभी करतात हे लांच्छनास्पद होय एका अर्थानेबरेच  झाले मीडियाने लोकांचा जरा  ज्यादाच विश्वास  कमावला होता ह्यापुढे लोक मीडियावर  अतिविश्वास नव्हे तर संशयाला जागा ठेवत विश्वास ठेवतील

महेश : माझ्या मते खरा प्रश्न आहे की कसलीही खातरजमा करता चॅनेलने ही  न्यूज स्वीकारली कशी ? की न्यूज खात्री लायक ठरण्याची कोणतीच यंत्रणा ह्या चिन्हसृष्टीत नाही ? आणि जर अशी यंत्रणा अस्तित्वात नसेल तर मग चॅनेलचे आतापर्यंत उघडकीस आलेले असे खोटेपणाचे किती घोळ आम्ही दर्शकांनी पहिले आणि खरे मानून पचवले ? आणि सत्य जर असे मॅनेज केले जाऊ शकत असेल तर सामान्य माणसाने सत्यावर कसा विश्वास ठेवावा ? सत्याची कसोटी काय ? authority कोण ? ती ठरवणार कोण ? आम्ही सर्व मॅनेज केलेल्या सत्याच्या मागे धावणारी मेंढरे तर नाही आहोत ना ? इतिहास आणि वर्तमान ह्या दोन्ही गोष्टींना संशयाच्या गर्तेत फेकून देणारे हे कुणी कांडधारी आहेत त्यांना ह्या प्रकारात शिक्षा होणार आहे की नाही ?

बाळकृष्ण : मी खरं सांगू का 
काम ज्याने केले तो अभिनेता अव्वल  दर्जाचा आहे. त्याला आपण कर करतो हे माहीत होते का ? की त्याला काही वेगळेच सांगण्यात आले होते ? त्याला माहीत असेल तर मात्र त्यालाही शिक्षा व्हायला हवी  पण माहीत नसेल तर त्याला निर्दोष सोडावे. ह्या कांडाचा लेखक दिग्दर्शक                ह्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे 

राजकुमार : सर्वसाधारणपणे मीडियाच्या विरोधात काय बोलणार ? मीडिया ही समाजाची सावली आहे आणि ह्या जगात कुणीच स्वतःच्या सावलीवर उडी मारू शकत नाही

जतीन : मीडिया हा बाजारात उभा असलेला ईश्वर आहे किंवा ईश्वरात उभा असलेला सत्याचा बाजार आहे. त्याला ज्यांनी श्रद्धास्थान मानलं त्याच्या बुध्दीमत्तेविषयी मला संशय आहे. आपण मीडियाबाबत नास्तिक होणे ही मिडिआ दुरुस्त करण्याची पहिली अट  आहेतेव्हा प्रथम नास्तिक होऊया म्हणजे फसलो जाणार नाही

शरावती : मीडिया ही विषकंन्या आहे तिचे चुंबन घेता तिच्या सहवासात जितका भोग घेता येईल तितका घ्यावा तिचे सरफेस कल्चर हाताळावे आणि विषाचे खोल गुपीत आल्यापर्यंत पोहचणार नाही ह्याची काळजी घ्यावी

सुहास : असे असेल तर ह्या विषकन्येपासून मी वाचेन असा कंडोम कुठे आहे

श्रीधर : I am myself media I am myself  news 
           I am happy with myself who cares about your views ?

श्रीवाहिनी: So news only newses itself. But it's reliability should be checked by those who are not part of news. So we always need outsiders to make our interior true and proper placed. Otherwise appearance & it's effect can cheat anybody. In past, journalists were not media-educated but today then need computer literacy for professional effectivity. 
         Shreevahini doesn't  say that journalists need crash course in ethics & philosophy of ethics but they must learn to  be ethical and true in  their reporting. Otherwise their newsvalve will get transform in nuisance value. No news without truth. 
          ईश्वर सर्वत्र आहे त्यामुळे ईश्वराची सावली पडू शकत नाही सर्व धर्मांनी आपण इशेअरची सावली आहोत असे दाखवण्याची कितीही प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात ईश्वराची सावली पडणे शक्यच नाही त्यामुळे मंदिर मी मशीद असा वाद घालण्याऐवजी सरकारने ह्या जागी एक विज्ञानमंदिर उभे  करावे असे आवाहन वैज्ञानिक गुप्ता  ह्यांनी केले
         ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी कोणतीही वैज्ञानिक कसोटी उपलब्ध नसल्यानेच सरकार ह्या प्रश्नापुढे  हवालदिल झाले आहे असे ते  म्हणाले. काळानुक्रमाने जो आधी आला तो मालक अशी कसोटी लावली तर ती जागा हिंदूना द्यायला हवी तर आत्ता  जो त्या अवकाशांचा मालक आहे तोच  त्या जागेचा  मालक अशी अवकाशात्मक  कसोटी लावली तर ती जागा मुसलमानांना दयायला  हवी दुर्दैवाने ह्या दोन कसोट्या दोन धर्मांना ती जागा  द्यायला सांगत असल्याने त्या  दोघांचाही त्या जागी समान हक्क पोहचतो असे ते  म्हणाले. अशावेळी दोघांनीही ती जागा शहाणपणाने वाटून घेणे हाच खरा तोडगा आहे पण तो  मान्य करण्याच्या मन:स्थितीत  कोणीच दिसत नाही. अशावेळी लोकशाहीत सामूहिक मत मागवून निर्णय घेतला जातो. हिंदू  बहुसंख्य असल्याने तो निर्णय हिंदुच्या बाजूने लागणे  अटळ. मुस्लिमांना ते मान्य होणे कठीण मग करायचे काय तर दोघांनाही ती जागा देता शासनाने ती विज्ञानाला देऊन  टाकावी. ईश्वर सर्वत्रच आहे. त्यामुळे तो फक्त इथे मंदिर किंवा मशीद बांधल्यानेच खुश होईल असे मानण्याचे काहीच कारण नाही उलट हा  तोडगा स्वीकारून रक्तपात टाळल्यास तो  अधिक आनंदी  होईल असे ते  म्हणाले
                  गुप्ता ह्यांचा  हा तोडगा दोन्ही पक्षांनी अमान्य केला दोन्ही पक्ष म्हणाले "हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे " 
                 गुप्ता म्हणाले "मला वाटले हा ईश्वराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण सध्या कुठल्याच धर्माला ईश्वराच्या प्रतिष्ठेत रस नाही असे दिसते. ईश्वराची खरी प्रतिष्ठा माणसे मारण्यात नाही तर माणसे जगवण्यात आहे हे ह्या लोकांना जेवढ्या लवकर कळेल तेवढे बरे. माझ्या मते माणूस जगणाऱ्या हॉस्पिटलची बांधणी करणे हीच खरी ईश्वराची प्रतिष्ठा आहे आणि हे अनेकांचा बळी घेणारे प्रकरण मिटवण्याचा मार्गही आहे. "
                 एकंदरीत सध्या विज्ञानिकच ईश्वराची खरी प्रतिष्ठा सांभाळतायत हेच  खरे"
                  लोकायत संप्रदायाचे प्रमुख वीर लोकायती ह्यांनी जोपर्यंत ईश्वरावर आपली श्रद्धा आहे तोवर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणारच असे सांगितलेतरुणांनी नास्तिक तत्वज्ञान स्वीकारून त्याचा प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले
                  एकंदर आठवड्याच्या शेवटीही हा प्रश्न जिथे होता तिथेच आहे असे श्रीवाहिनी खेदाने नमूद करते

श्री खान ह्यांनी आज प्रिया नार्वेकर ह्या madness of sadness ह्यांचा बळी असल्याने  अभिनेत्यावर वाटेल तशी टीका  करत आहेत असे म्हंटले. त्या जे  काही म्हणतायत ती त्यांची private myth private fantacyland आहे अशी टीका त्यांनी केली
                 Illusionary, fragile आणि helpless अशी ही विचारसरणी आयुष्याच्या स्फटीकीकरणाऐवजी आयुष्याच्या विघटनीकरणावर भर देते असे ते म्हणाले. आनंद कशात आहे हे  कळाले नाही की माणसे अशी अघटित वागतात असे ते म्हणले
                प्रिया नार्वेकर ह्यांनी                        खान हे विनोदी बोलतात ह्याची मला कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया दिली
                त्या म्हणाल्या Logical Reason संपले की लोक Madness चा आश्रय टीका करण्यासाठी घेतात माझ्यात आनंद absent आहे हा खान ह्यांचा जावईशोध आहे असे त्या म्हणाल्या. ह्या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी म्हणून स्वतःचे एक रहस्य शोधून काढत असतो हे रहस्य तो अत्यंत सभ्यतेने जतन करतो पण समाजाला सांगत नाही. अभिनेत्यांची शोकांकिता अशी असते की त्यांना त्यांची अशी रहस्ये  जतन करायच्या ऐवजी त्यांचे मार्केटिंग करून प्रसिद्धी मिळवायची असते. हे लोक स्फटिकीकरणाविषयी बोलतात  पण प्रत्यक्षात त्यांच्याजवळ ज्याचा स्फटीक व्हावा असे काही नसतेच. दुसरी गोष्ट madness म्हणजे काय ? ह्या देशात १९४७ पूर्वी स्वातंत्र्य सैनिकांना mad म्हंटले जायाचे प्रत्यक्षात ती madness ची इंग्रजांनी sponsor करतायत का ? All meaning are impotent but humanity, sense of being human make those meaning strong and  creative. खान ह्यांना ते काही बोलतायत ह्याचा meaning तरी कळतोय का ? की हेही कुणा लेखकाने लिहून दिलेले डॉयलॉग आहेत ? मला  त्यांची dialogue डिलिवरी आयडली त्यात एक strong shallowness होता पण कमर्शियल चित्रपटात तो  अटळच  नाही  का ?
                    हा सगळा खेळ सत्ता कुणाची ह्या प्रज्ञाभोवती फिरतो माझा विरोध सर्व सत्ता अभिनेत्याच्या अभिनयात गदर होतीये त्याला आहे. पूर्वी foodgathering करायचे आता powergathering सुरु आहे आपण त्याच्यापुढे झुकायचे का ? आपली सत्त्येची भूक प्रत्यक्षात आपल्याला सात्त्येची गुलाम तर करत नाही ना ? आपण Mask सारख्या काल्पनिक गोष्टीला Real Power सप्लाय तर करत नाही ना ?
                    माझे प्रश्न मूलभूत आहेत 
                     त्याची उत्तरे ताबडतोब मिळावीत अशी माझी अपेक्षा नाही पण त्यांना madness नावाखाली कुणी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नये त्याने माझे काहीच बिघडणार नाही पण कलासंस्कृतिची उंची खुजी होईल
                प्रिया नार्वेकर ह्यांच्या ह्या वक्तव्याने अभिनेते इतर ह्यांच्या पेचदार संबंधावर काहीसा अधिक प्रकाश पडलाय असे श्रीवाहिनीला वाटते. It's kind of desubjecting of actor 
              हिरो कुणाचा ? ज्याने तू निर्माण केला त्या लेखकाचा ?
               की ज्याने तो सादर केला त्या अभिनेत्याचा ?
                नायक कोण 
                अभिनेता की लेखक ?

              भर गर्दी रोडवर चुंबन घेण्याच्या प्रकरणाला आज अनपेक्षित वळण लाभले. हे जोडपे श्री राव त्यांची पत्नी खेती आज स्वतःच पत्रकारांसमोर आले. त्यांच्या मुलाखतीची  ही झलक 

खेती : ह्या प्रकरणाला असे काही वळण लागेल असे वाटले नव्हते 
      :  पण हे का घडले ?
खेती : त्या दिवशी आम्ही खरेदी करत असतानाच ह्यांची आखतातिल नोकरी गेल्याचा फोन आला  हे इतके                मानसिक दृष्टा खचले कि केवळ  त्यांना  उभारी देण्यासाठी एका आवेगात ते माझ्याकडून घडले

     : तुमची डिग्निटी  सुटली असे नाही तुम्हाला वाटत ?

राव  : हा प्रश्न विचारून तुम्ही तुमची डिग्निटी सोडताच असे नाही वाटत ?

     : हो पण तुम्ही सार्वजनीक ठिकाणी 

राव : पण तुम्ही तर मिडिआत हा प्रश्न विचारतायत 

   : पण पत्रकारांना तुम्ही invite केलंत 

राव : पण आमच्यात जे झालं ते शूट करायला तुम्हाला आम्ही बोलावलं नव्हतं 

   : तो आमच्या सुटीचा भाग आहे

राव : खाजगी चुंबन चॅनेलाईज करेन ?

: ते सार्वजनीक होतं 

राव : ते सार्वजनिक जागी होतं आणि सार्वजनीक जागात अनेक गोष्टी होतात लोक संडासलाही बसतात ते शूट करता का ?

   : ती मजबुरी असते कीक असते 

राव : हा आवेग होता. तो सार्वजनिक करण्याचा कसलाही हक्क तुम्हाला नव्हता
     : तो गुन्हा होता 

रावमग एवढा  कायद्याचा कन्सर्न होता तर तुम्ही तो घडतानाच थांबवायला हवा होता ना ?

    : तुम्ही उद्या आग लागली तर पत्रकारांनी ती शूट करण्याऐवजी प्रथम विझवावी असे म्हणाल

राव : हो पण  आग विझवणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रथम आगच विझवायला हवी ना ! आम्ही टेररीस्ट नाही की कसं थांबवायचं असा विचार यावा. जे तेव्हा घडले ते थांबवणे तुम्हाला सहज शक्य करावे

   : पत्रकाराने फक्त शूट करावे 

राव : का ? तुम्ही नागरिक नाही आहात ?

   : हो पण प्रत्येक नागरिकाचा उपजीविका धर्म असतो तो त्याला सांभाळावा लागतो

राव : मग आम्ही जे केले तो विवाहधर्म कुटुंबधर्म होतो. पूर्वी अशा बातम्या फक्त घरी गेल्यावर किंवा ऑफिसमध्येच कळत पण आता  मोबाईल आलाय मग त्या मोबाईल होण्याचे काही सार्वजनिक  परिणाम होणार की नाहीत ? व्यक्तिवाद हा घरापुरता राहण्याचे दिवस संपले महाशय. त्या दिवशी मोबाईलवर जी बातमी  आली ती इतकी रचवणारी होती की हिने  त्या क्षणी मला मिठी मारुन माझा किस घेतला  नसता तर मला कदाचित हार्टअटॅक आला  असता. त्या चुंबनाने माझा जीव निदान आरोग्य वाचवले. सार्वजनिक ठिकाणी जीव वाचवणे वा आरोग्य  वाचवले. सार्वजनिक  ठिकाणी जीव वाचवणे वा आरोग्य वाचवणे हा गुन्हा आहे का ?
             राव ह्यांच्या ह्या वक्तव्याने ह्या प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली गेली आहे. मोबाईलमुळे वैयक्तिकता ही सार्वजनिक ठिकाणी कशी वावरायला लागलीये हे ह्या प्रकरणावरून स्पष्ट व्हावे. अशावेळी कायदे आणि समाज ह्यांनाही स्वतःत कालानुरूप बदल करून घ्यावे लागतील हे स्पष्ट आहे. ह्या प्रकरणातील सर्वात आनंददायक गोष्ट काही क्षणापुर्वीच आमच्या हाती लागली आहे. इन्फो चे मालीक रवी मूर्ती ह्यांनी पत्रकाराला ज्या तऱ्हेने राव ह्यांनी उत्तरे दिली त्यावरून त्यांची  बुद्धिमत्ता स्पष्टच दिसते हे मान्य  करून त्यांना आपल्या कंपनीत  नोकरी देऊ केली आहे. चुंबनाच्या चॅनेलाईज होण्यातून झालेली सर्वाधिक पॉझिटीव गोड गोष्ट असे आता ह्या प्रकरणाचे वर्णन करायला हरकत नाही
               श्री रवीबाबा आज  भक्तांना म्हणाले  की तिसरा डोळा आणि जिभेतली शांतता सर्व दंतकथा नाहिश्या करते दुर्दैवाने  आज आपण तिसरा डोळा आणि शांत जीभ ह्यांनाच दंतकथा बनवून टाकलय
               जीव  हा फक्त तहानलेला  आणि भुकेजलेला नाही त्याची भूक वा तहान ही फक्त अभावातून निर्माण होत नाही तर मुळात त्याच्या आता काम करण्याची हालचाल करण्याची उबळ  इतकी प्रचंड असते की त्यामुळे जीव activate होतो आणि हे activation त्याला तहानपूर्ती भुकपूर्तीसाठी ऍक्टीव करते थोडक्यात भूक, तहान आणि निकड ह्या फक्त अभावातून निर्माण होतात हा करून पाहण्याच्या भावातूनही त्या निर्माण होतात हा करून पाहण्याचा भाव आपण जागा करून  नीट उघडणे म्हणजे तिसरा डोळ फुटाणे होय. हा तिसरा डोळा सर्व दंत कथांचा भुगा करत जातो. ईश्वर ही दंतकथाही ह्या भुगा होण्याच्या प्रोसेसपासून वाचू शकत नाही तेव्हा तिसरा डोळा उघडा स्वतःच्या दंतकथांची राख रांगोळी करा आणि मग मुक्त व्हा
               भक्त म्हणाले, "जय बाबा !"
               श्याम देव श्याम शिंदे दोघांनीही ज्योतिष ही म्युझियममध्ये ठेवण्याची गोष्ट झालीये असे सांगितले "ज्या शास्त्रात विज्ञानाचा surface ही नीट उमटलेला नाही त्याने स्वतःला शास्त्र म्हणवूनच घेऊ नये " असे ते म्हणाले. "शासनाने लवकरात लवकर विधेयक तयार करून ते दाखल करून घावे " अशी त्यांनी मागणी केली
               श्री. भट ह्यांनी "सरकार हे काही विज्ञानाने विकत घेतलेले नाही  आणि जर विकत घेण्याची वेळ आली तर सरकारच विज्ञान विकत घेईल " असे सांगितले. ज्योतिषशास्त्राची वैज्ञानिकता वा अवैज्ञानिकता ठरवण्याच्या कसोट्या कोण ठरवणार अशी विचारणा त्यांनी केली. हायझेन बर्गने अनिश्चिततेचे तत्व सांगताना कण कसे वागतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे सांगितलेमाणूस हा तर त्या कनापेक्षा अनिश्चित आहे. अशावेळी तो कसा वागेल हे निश्चितपणे सांगणे कुठल्यही विज्ञानाला शक्य  नाही. पण म्हणून काही कुणी  विज्ञानावर बंदी घालण्याची मागणी करत नाही. बुद्धीवादाच्या मर्यादा स्पष्ट  होत असताना बुद्धीलाच  अंधश्रद्धेचे स्वरूप देणे घातक ठरेल. ज्योतिष हे १००% अचूक भविष्य सांगते असे कुणाचेच म्हणणे नाही. माणसाचे भविष्य सांगण्याच्या शक्यता ते शोधते. त्याला बंदी घालून तो शोधच संपवणे ही बुद्धीवादी हुकूमशाही आहे. आम्ही ही हुकूमशाही मुळीच घपवून घेणार नाही आणि शासनानेही ह्या हुकूमशाहीला बाळी पडू नये असे ते म्हणाले. माणसाला सापडलेल्या गोष्टीपेक्षा सापडलेल्या गोष्टी अद्याप असंख्य आहेत ह्याने भान ह्या दोन श्यामांनी बाळगावे असे ते म्हणाले
                सरकारकडून मात्र श्रीवाहिनीला काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. सरकार हेही सामान्य माणसा प्रमाणे ज्योतिषाला शरण गेलेले किंवा ज्योतिषाबाबत भांबावून गेलेले आहे असे दिसते
                मुळात विज्ञान कशाला म्हणायचे आणि रॅशनल म्हणजे काय हे सांगणे दिवसेनदिवस कठीण होते आहे असे दिसते
              आणि आता श्रीधर तिळवे ह्यांचे हे खास स्वगत 
श्रीधर तिळवे : All divine details are shattered 
                      All natural details are melting down like an ice.
                      All human details are deised like prostitutes clothes 
                      & All signs are becoming meaningless like नासलेले  दही 
                      So  where should we go ?
                      To postmodernism 
                       Or To truth 
                      Truth without details 
                      Detailess truth 
                      Truth containing all details 
                       I am not new Godman 
                       I am not young philosopher 
                       But I am free like Godman 
                       इतिहास मरावा अशी तर आपणा सर्वांचीच आंतरिक इच्छा आहे पण ज्या इतिहासाने आपणाला अस्तित्वात आणले त्याला मारायचे असे History is dead असं घोषित केल्याने इतिहास मरतो काउलट त्याने अमुक अमुक साली अमुक अमुक ह्यांनी History is dead अशी घोषणा दिली अशी विनोदी नोंद होते मग हा postmodernism is dead असा सात दिवसांचा रतीब कशासाठी ? की हाही एक नवा स्टंट आपल्या पिढीचा ? दिलवाले दुल्हनिया  ले जायेंगे ह्या आदित्य चोप्राच्या चित्रपटात नायक नायिकेला ती वळून मागे पाहिल तर तिचे आपल्यावर प्रेम आहे नाहीतर नाहीये असं एक फिल्मी पण वेडं लॉजिक लावतो आणि तीनवेळा पलट वेळी पलटते पळून पाहते. इतिहासाला मी असं तीन वेळा पलट म्हंटल म्हणून तो वळून बघून नंतर त्या नायकाची जशी नायिका कायमची होते तसा तो  माझा होईल ? मुळात मी त्याला प्रेमात पाडावं ? त्यापेक्षा तो  मेलाय असं  घोषित का करू नये ? फिल्मी पलटीपेक्षा फिलॉसॉफिकल डेथ जास्त अस्सल नव्हे का ? की फिलॉसाफी ही फिल्मपेक्षा खोल समजण्याचा हा elite डाव आहे ? आमच्या आधीची पिढी आता मेलेली बरी असे वाटणे कितपत हेल्दी आहे ? प्रत्येक क्षेत्रातली पिढी त्या त्या क्षेत्रात स्वतःचे सरकार चालवत असतेच आमच्या क्षेत्रातही आमच्या आधीची ही पिढी सरकार म्हणून ठिय्या  मांडून होतीच आणि प्रत्येक सरकार भ्रष्ट असते ह्या न्यायाने ह्याही पिढीचे त्या त्या क्षेत्रातले सरकार भ्रष्टच होते
              खरंतर  प्रत्येक क्षेत्रात खूप Renovation ची गरज  आहे. बांधकाम चालू आहे उत्तरार्ध त्यातून तर आली. पण ह्या Renovation मध्ये माझा किंवा प्रत्येकाचा Role काय ? माझ्या आसपास प्रत्येकजण ह्या renovation मध्ये placement करण्यात गुंतलाय काहींना ह्या placement ची इतकी घाई की त्यामुळे ह्यांच्या बजेटपेक्षा जागा कायम महाग 
               काही जणांचा सूर असा की आम्ही जुन्या पिढ्यांच्या आवाजात बोलतोय मला तर नेहमीच मी माझ्या आवाजात बोलतोय असा फील !
               प्रत्येक पिढीला आधीची पिढी उध्वस्त करायची असते. ही आधीच्या पिढीला खांदा देण्याची उर्मी इतकी तीव्र का ?
                Postmodernism & Nativism are dead ! petinitely dead ! पण त्यांना मारण्याची ही मरणघाई का? एकेकाळी माझा अमरत्वावर विश्वास होता हॉस्टेलवर असताना मी जेव्हा . डॉ. हॉ. का. बा. ना. सु. ना. लिहिली तेव्हा मी मराठी साहित्यात ह्या साहित्यकृतीमुळे अमर होणार असा माझा ठाम विश्वास होता पण जेव्हा बांधकाम चालू आहे वर केस झाली तेव्हा ती कादंबरी पोलिसांच्या हाती लागून नष्ट होऊ नये म्हणून मला जी धडपड करावी लागली तिला जिवंत आणि शाबूत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले त्यामुळे माझा अमरत्वावर विश्वास उडाला. माझी पिढी ही अमरत्वावर विश्वास उडालेली पिढी  आहे आणि ज्यांचा आज अमरत्वावर विश्वास आहे ते स्वतःला अमर ठेवण्यासाठी जी केविलवाणी धडपड करतायत ती धडपड त्यातले केवीलवाणेपण पहिले की वाटते ह्यापेक्षा मरण बरे निदान त्यात असे अपमानीत होणे तरी नाही सन्माननीय अमरत्वापेक्षा अपमानीत मरण कधीही परवडेल Outside your body there is murder waiting for you and inside your body suicide is waiting. death is endless. You can't conquer it. 
             पोस्टमॉडर्निझमचा मर्डर झालाय 
             की त्याने आत्महत्या केली 
             मला माहित नाही 
             पण तो मेलाय 
             हे मला नक्की ठाऊकय 
            अगदी सुरवातीपासून 
             
            मी आत्महत्या करणार नाही 
            निसर्गाने मला मृत्यू द्यावा 
             अशी माझी इच्छा आहे 
         
              Natural Death काय Death is always 
              Natural असं म्हणता येईल 
              पण ज्याने जन्म दिला 
              त्याच्या पोटात जाऊन मरणे योग्य नव्हे काय ?
              I am Nature 
              who is dying 
              ज्यांना मारायचे नसते ते क्रूर होतात 
              मृत्यू कौर्याला प्रवृत्त करतो  
              पण ज्यांना मरायचे असते 
              त्यांना मृत्यू मुलायम मृदू बनवतो 
              आपला मृत्यू बातमीदारांना, माणसांना कळतो 
              पण आपला मृत्यू निसर्गाला कळतो ?  
              आणि त्या विश्वाला ?
              स्वतःला ?
              मेल्याशिवाय हे कळत नाही 
              आणि मेल्यानंतर हे सांगता येत नाही 
             The End of knowledge 
              आपल्या जागी दुसरा कुणीच मारू शकत नाही 
              आणि मृत्युशिवायीची ही गोष्ट मला आवडते 
              No फेकाफेकी 
              आम्ही जागतिकीकरणाचं खुल्या दिल्यानं स्वागत केलं
             खोटं कशाला बोला 
             संगणक हा आम्हाला बाईपेक्षा जास्त sexy आकर्षक 
              वाटला होता नंतर मोबाईल तर ह्याहुनही महामादक
              हे एक आकर्षक पॅकेज होतं 
              त्याचं पॅकेज  डील मात्र स्पष्ट आणि नेमकं 
              कुणालाच माहित नव्हतं 
       
             एखाद्या गोष्टीला मुळे नसली की 
             माणसे ती गोष्ट आकर्षक  पॅकिंग करून तिचे मार्केटिंग करतात 
             त्यामुळे postmodernism विषयी 
             मी ती गोष्ट आकर्षक पॅकिंग करून तिचे मार्केटिंग करतात 
             त्यामुळे postmodernism विषयी 
             मी ती गोष्ट आकर्षक पॅकिंगमध्ये आली तरी 
             सावध होतो 
              
             चिन्हसृष्टीकरण हे ज्ञानाचे स्वातंत्र्य आहे 
             ह्याची खात्रीच होती मला
            आणि माझ्या घरात पहिला M. A मीच 
            ज्ञानाची किंमत निरक्षरांना विचारा 

            शेती करणाऱ्यांना संगणकाचे जितके अप्रूप कौतुक 
            तितके संगणक नांगरणाऱ्यांना शेतीचे नाही 
             हीच तर ह्या देशाची खरी महाशोकांतिका 
             
            मी दोन्ही नांगरटी केल्या 
            आणि एकितही लाजलो नाही 
            आणि एकीलाही माजलो नाही 
  
            शेती करणारा मनुष्य postmodernist होऊच 
            शकत नाही 
            तो गांधीवादी होऊ शकतो 
            आता गांधी हेही postmodernist होते 
            असे म्हणणारे लोक आहेतच 
            पण खरे सांगू 
            असे लोक दोन्ही बाजूंनी अडाणी 
            केवळ विज्ञानाला विरोध म्हणजे postmodern का ?
            गांधींचा विज्ञान विरोध हा थोडासा Tactical 
            थोडासा मूर्खपणा 
            ह्यांचा विचित्र संगम होता 
             गांधींनी ब्रिटिशांच्या बरोबर अनेक गोष्टींची गल्लत केली 
             विज्ञान ही त्यातील एक 
             तर पोस्टमॉडर्निझम पण मरणार
             आणि मीही मरणार
             पण  माझ्या डोळ्यासमोर पोस्टमॉडर्निझम मेला तर अधिक बरं 
             
            म्हणजे ही माझी शेवटची इच्छा वगैरे 
            असं नाही 
             अजून चिक्कार जगायचय
             पण मरण येणार ह्याचं भान ठेवून 
  
            ते तसं विचित्र की 
            मला मी मरताना माझ्या मरणाचं ज्ञान होणार की नाही 
             हे मला माहित नाही 
             
             निर्वाणात हे असं  मरण वाट्याला येतं म्हणे 
              निर्वाण हा ह्या अर्थाने 
              मृत्यूचा जिवंतपणी लागलेला शोध असतो म्हणायचा 
              
             असा शोध कुणाला नकोय ?

            तर ह्या स्वगताचा शेवटचा शब्द हाच 
            निर्वाण 
            आणि कुणाला आधीक मोठा शब्द ऐकायचा असेल तर 
            महानिर्वाण !  
------------------------------------------------------------------------------------------------------------

FROM KITCHEN   FASHION SHOPPING - KITCHEN

चटकदार मेदवृद्धी करणारे खाण्याची चूक 

              चूक होतीये. पुन्हा तीच   हूतीये कळून सवरुन चूक होतीये सवयीने चूक होतीये  कळून सवरून चुकक होतीये सवयीने चूक होतीये सुधारायचा निश्चय करून चूक होतीये
             स्त्री समोर असून  चूक होतीये
             संगणक समोर असाताना चूक होतीये
             मोबाईल हातात असताना चूक होतीये
           
             शरीर फुगत  bedoul  बनत चाललय वजन वाढत वाढत पृथ्वीएवढं होत चाललय  बोटांना चष्मा लागलाय पायाला सूज आलीये
             पण चूक होतीये
              चूक जी माझे लिखाण डिस्टर्ब करत नाही - होतीये
              ही चूक कुणाकडे घेऊन जाऊन काही उपायोग नाही प्रत्येकाला तिच्याविषयी माहिती आहे पण ती दुरुस्त करण्याचे शहाणपण कोणीच उधार देऊ शकत नाही. स्पष्ट उमगतय की चूक चूक आहे पण चूक होण्याचे काही थांबत नाही
              शरीरभर चुकचुकाट पसरलाय
               पण तरीही  ती डोके काढते
              आणि काळजाचा ठोका चुकवत होते
              तिचे मूळ जिभेत आहेत पण ऐनवेळी हे कळूनही जीभ ही चूक डिमान्ड करते आणि ती होते. आसपास सतत त्या चुकीचा सप्लाय   दिसता रात्री दुपारी संध्याकाळी एटीम असल्या सारखी चूक खुली आपण कधी तिच्या आज येतो  ह्याची  वाट पहात आणि आपण कायम तिच्या दरवाज्याच्या शोधात  नाही मिळाला तर गेलाबाजार विडोच्या शोधात
               चूक फोनवर नोंदवता येते आणि आजकाल तिची फ्री होम डिलिवरीही मिळते.
               ही चूक माझा जीव घेणार हे मला स्पष्ट दिसतय आणि जीव  जणू तिच्यातच प्राण असल्यासारखा ती सातत्याने करत.

               मी चुकचुकतोय सतत चुकचुकतोय
               आणि  चूक
               रसरशीत स्वादाने
              डिफ़क मी इफ यू कॅन म्हणत
               माझ्या शहाणपणाचे कपडे काढतीये

                व्यभिचारातील स्त्रीविकृत अत्याचार  संपत चाललाय व्यभिचारातलं -ve सेक्स अपील खतम होत चाललंय Netonic platonicness जाळं वीणण्यापूर्वीच धाग्यात थकत चाललाय स्वातत्र्यांचा अर्थ शोधणारी त्वचा थकत चाललीये.
                The End ची पाटी पडत नाहीये म्हणून सिनेमाघरात सिनेमा सहन करणारे डोळे थकत चाललेत मि राईट मिसेस  राईटची भूमी चाचपणारी  भुमिका make believe चा खेळ कधी आटोपणार ह्याची  वाट  पाहतीये On and off corresponding curseponding होत चाललंय मी भाईंदर तू मीरारोड  एकमेकाचा कोर्स  एकमेकात  complete करूनही दुपारची half baked heat सापडतीये discourse मध्ये sexual video feed कितीकाळ  टिकवणार नात्याचा स्टॅमिना ? डोकं tilt करून करून split होतय तुझ्या authoritive voice च्या featureless noise मध्ये टेपिंग कोओर्डीनेट करणार  सॉफ्टवेअर  टॅपच होत नाहीये एक शुष्कपणा चालून  येतोय  बिजनेस कार्डचा  गेस्ट बहाणा करत curiosity ताजा ठेवणारा  तुझा ambivalence presumpturus monster बनत चाललाय. ब्लाईंड डेट्स नव्हत्या म्हणता म्हणता आता कळतय आपला आख्खा गेमच Blind years चा फॉलोअप  होता. उपाय नव्हता म्हणून तू फॉलोओनही दिलास आणि भाईंदरच्या खेळपट्टीवर दुसरी इनिंग सुरु केली  regular basis चा base टाळला नातं बोनाफाईड व्हावं म्हणून हाडाची कांड केली sudden passion wheels गरागरा फिरली तरी अचलतेचा screw उसवला नाही piece by piece illusions बोकाळली तरी adultery ची गेमऑलिम्पीक्स सदैव टाळली सतत alternative reasons दिली भेटीची प्रत्यक्षात तुला पाहायचा भेटलो तेव्हा Fun ही confuse करूनच अधूनमधून फ्युज काढत चेक केली तुझ्या intense electricity ची passionate धाव विराम जाणवला पण  हे राम म्हणालो नाही नेटाने परतवला नथुराम जो तुझ्याबरोबर रहात होता मला गोळ्या घालत आता फेडअप होतीये तुला पाहण्याआधी तुझा आवाज चाचपण्याची माझी लकब मला पाहून आश्चर्य वाटण्याचे दिवस तुझ्या चेहऱ्यात आता मावळत चाललेत ताजमहाल फेड होत चाललाय उरत चाललीये  कबर तुझा प्रॉब्लेम हाच की I am real माझा प्रॉब्लेम हाच की You are reality वास्तव सिनेमातील गाणी पुटपुटतय लिपस्टीक खरडून गाण्याचा फोलपणा articulate करतय
               तू त्यावर  मात करण्यासाठी deadline देतीयेस मी हसतोय pack up चा भुसा नाकात  घुसताना दुसरा कोणी असेल अगर नसेल मारण्यासाठी मर्डरच कशाला हवा आत्महत्याही चालू शकतेच की ! तू आत्महत्या निवड असं चुकवत कठोरता ताठखतीयेस.
              मी प्रथमच जमिनीवरून पाय पसरवत चालतोय आणि प्रथमच माझ्या एकाही पावलात आकाशाचा ना तणाव आहे ना बनाव
              एक अस्सल नूत छापत न छापत चाललाय क्षण
              आणि काळ बँकेबल हातांनी दरवाजा उघडत
              आम्हा दोघांना आत घेतोय.

हा take आहे की Tech आहे
हे काय टायगरतय आपल्या घरात
आणि Gone with the wind कुठल्या विंडोतून आली आहे

ही नेट टोटल की नेट टोटल ?
आणि ही वेटींग विंडो की वेटिंग विंडो
आणि हे gonna gotto
खोट्टा खोट्टा aint फेन्ट

तुझ्या हाताला अमेरिकन एम्बसीची वास यायला लागलाय

आता एक कोलंबस हुडक
स्पॉन्सर म्हणून
आणि  माझे हजारो क्षण आणि त्यांचे नेटिव फोटो काढ
पायाखाली चुरगळायला

विसाव्या शतकात चाललीयेस म्हणून काय झालं
तिथे पोहचून सेटल व्हायला
killer Instinct तर तोच हवा
तेव्हा चुरगाळ


हे लग्न नाहीये म्हणून हा divorce ही नाहीये
कायदा नाहीये
मग मध्ये फायदा होता काय ?
वायदा ? वायदाबाजार ?
आपल्या नात्यातलं काय संपलय
म्हणून आपण एकमेकापासून लपवत
एकमेकासाठी रडतोय
मिसफिट हातांची मिठी
पुरी होत नाहीये
जंगलांनी एकमेकासाठी छाटून घेतलं
बागा केल्या
आणि मग बागा झेपेनात म्हणून
जंगलाचा कायदा  आणून
एकमेकावर वाघसिंह सोडले

"वाघसिंह माझे सखे सोबती "
हा आपणा दोघांनाही आवडता धडा होता
होय ना ?
प्रथम शब्दात गुलाब भरले पाठवले
मग बुलेट्स भरल्या पाठवल्या
सारख्याच तीव्रतेनं
मग तझ्या माझ्यामध्ये ही तीव्रतेची झुंडशाही होती का ?

रडायचय तर रड Break Up ची performativity complete झाली पाहिजे Rituals सादर झाल्या  पाहिजेत
आपण Live In Relationship मध्ये होतो
असं सांगायचं
की लग्न केलं होतं असं सांगायचं ?
की die in relationship असं सांगायचं


Intellectually involve असं सांगायचं
की emotionally involve     "     "
की Physically        "        "             "       ?

ही टेम्पररी उदासी समजायची की
ही कायमची जखम समजायचं

बघूया
जगाकडं आणखी काय शिल्लक आहे का द्यायला

मी प्रेमात अधूनमधून माणूस झालो
माझा बुद्धत्वाचा चेहरा अधूनमधून फाटला

चमत्कार केले
पण त्यात आढळभावापेक्षा ढळभावच जास्त होता

आपण काहीही नंतरच्या answerable विषयी बोलत
नाही आहोत

हा divorce ही आत्ता आहे

इति आहे
शेवटचा बाय - लेगबाय
***

 COLLEGE 

एक
आहेस का तू नेक ?
दोन
बरोबर का लागतो टोन ?
तीन
विणता येते का वीण ?
चार
करता येते का  विचार ?
पाच
मिटवता येते का खाच ?
सहा
सौ बिल्लीयाँ खाके कहाँ चला  चुहा ?
सात
दाखवता येतो का हात ?
आठ
करता येते का सारे पाठ ?
नऊ
मोजता येतात का तुला भाऊ ?
दहा
बनवता येतो का तुला चहा ?
अकरा
भरवता येते का तुला जत्रा ?
बारा
पहाता येते का तुला तारा ?
तेरा
डालता येतो का तुला डेरा ?
चौदा
पटवता येतो का तुला सौदा ?
पंधरा
मोजता  येते का तुला धरा ?
सोळा
करता येतात  का पैसे गोळा ?
सतरा
सुगंधित करता येतो का धोतरा ?
एकोणीस
पटवता येते का कोणी मीस ?
वीस
घेता  येतो का पटदिशी किस ?
एकोणतीस
भेटला का तिचा बाप खवीस ?
एकोणचाळीस
भेट देतो का जुन्या चाळीस ?
एकोणपन्नास
सांगायला जवळ आहे का काही खास ?
एकावन्न
झाला नाहीस ना इतक्यात सन्न ?
एकोणसाठ
सिद्ध करता  येते का हे घट्ट की दाट ?
एकसष्ट
दाखवता  येतात का तुला दृष्ट?
एकोणसत्तर
लावलेस  कोणते बाबा उत्तर ?
एकोणऐंशी
जातोस का कधी स्वतःच्या वंशी ?
एकोणनव्वद
म्हणता येते का कुणाला देवाचे पद ?
एक्क्याणव
तू ससा आहेस की जिंकणारे कावस ?
शंभर
शंभरी भरली आता तुझाच आहे नंबर ?

                                                            SPORTS
Commentary 

1: मैदान कम्प्युटर स्क्रीनप्रमाणे चकाचक, हिरवे, ताजे शूटिंगसाठी सर्वथा योग्य डिजिटल कॅमेरे घेऊन तयात त्यांना काळाचा वध करत खेळ प्रक्षेपित करायचाय

२: एक मारेकरी हिरवा सुरा घेऊन कुणाला शोधतोय बरे
त्याच्या पायांना चंद्र चिकटलाय
ही फेविकॉलची एड तर नव्हे ?

३: टीम स्पीरिट वास्तववादी चित्रपटाइतकं लख्ख आहे

१: पडणारा पतंग डोळे मिचकावत पडतो आहे
त्याला पकडण्यासाठी सारी Z सिक्युरिटी पळते आहे

४: स्पेशालिस्ट दारू पिऊन स्पेशल  इफेक्ट घायला तयात आहेत

५: पाण्याची बॉटल की SMIRNOFF?

२: हे घोडा कागदावर  तरी वाघ  वाटतायत आशा आहे प्रत्यक्ष मैदानावर ते शेळी ठरणार नाहीत

७: च्यायला ही ब्रामधून बॉल उडवत कोण चाललीये ?

९: लेफ्ट स्टॅन्ड  झिंगून पडलाय त्याला जाग करा

८: माझ्याआधीच नववा कसा बोलला

६: पण तुही मला आडवा करून पुढे सरकलास गड्या

३: इंग्रजीत उभी असलेली बॅट तळपण्यास सज्ज  आहे तिला बॉल आहेत आणि स्टंप आहेत

४: एक कॉलेजकुमार कॅप घालून लाईन मारतो आहे त्याला रिस्पॉन्स देणारी कुमारिका लाजून लाल पडत चेंडूप्रमाणे स्वतःतून उसळते  आहे. तिचे रक्त पिसाळते आहे आणि हा तिने घेतलेला कीस कुमार भांबावून गेलेला ती  टुकुटुकु चुटुकते आहे.

१: जो जिंकेल त्याला टोयोटो गाडी अर्थात मॅन ऑफ द मॅच

२: जो पहिला सिक्स मारेल त्याला १०००  डॉलर

३: शतकवीराला I Pod

४:  सर्वाधिक छक्के मरणाऱ्यास Airtel Nokia Mobile

५:  लोक एकमेकात exchange होतायत हे मैदानावरच अभूतपूर्व दृश्य आहे

५: यजमान कॅप्टनने ढग फेकला आहे तो आपटून पाणी फुटले तर छापा आणि तो विरून गेला तर काढा ढग हवेत  उडवला गेलाय पाहुणा कॅप्टन पाहतोय - छापा

टॉप पाहुण्यांनी जिंकलाय छापा पडलाय - सर्वत्र पाणी

६: मैदानावरचं पाणी उपसताना ह्या ललना पुष्ट ढुंगण हलवत उन्नत उरोज उदात्त करत हास्यमस्करी करतायत ही लेडीज स्पेशल अफलातून आहे.

७: यजमान टीम फिल्डींग लावून सज्ज
सर्वांच्या प्रेयस्या व बायका नवस बोलतायत
सर्वांच्या आया प्रार्थना करतायत
सर्वांचे बाप बेस्टलक देतायत
आम्हा समालोचकांना कुणी कुत्राही विचारत नाहीये
समजत नाही हा लोच्या काय आहे
सर्वांच्या बहिणी हात जुळवतायत
कुणी खेडेगावातून आलय कुणी मुंबईतून
कॅप्टन मैदानाचं चुंबन घेतोय

८: माझ्या मागे एक रशियन मुलगी  अवेलेबल आहे.
माझ्या एजन्ट भावाची घासाघीस करतो आहे.

५: पेप्सी पीत सर्व जिप्सी होतायत
हा पेप्सी पिणाऱ्यांचा तांडा
अफलातून दिवस फरफरतोय

२: वारा वेगवान गोलंदाजाना मदत करेल
असे हवामान माझ्या कानात सांगते आहे

१: दहा ब्रॅण्डशी एकाचवेळी डीलिंग करत सचीन तेंडुलकर चेंडू हाताळतोय मंगेश घाडगावकराना त्याचा अभिमान आहे बाळासाहेब ठाकरेंना त्याचा अभिमान वाटतो आहे लता मंगेशकरांना  त्याचा अभिमान वाटतो आहे.

४: कॅप्टन आपली जर्सी गरागरा फिरवत तिची मजबुती चेक करतो आहे

२: पाहुण्याचे आघाडीवीर

३:    "        मधले वीर

६:    "         शेवटचे वीर

७ : स्कोरबोर्ड डोंगरासारखा दिसतो आहे त्यातून निघालेला वारा प्रत्येकाची टोपी उडवतो आहे.

९: काळजात INDIA आणि टेन्शन

२: मै हल्का होके आता हूँ

३: मीही तुतारी फुंकून येतो

४: मीही मोकळा होऊन येतो

१: सर्वांची नजर चार डोळे आणि दोन बॅटी

५: चणे  शेंगदाणे विकणारे लोक  आजकाल मैदानावरून  गायब होतायत

६: बल्ले बल्ले करत हा  पंजाब केसरी  इथे  कसली  बल्लेबाजी करतो आहे ?

७: खली अली ? खली बली ?

९: जो इथे येतोय तो झक मारतो आहे

१०:आणि हा षटकार उडत्या त  तबकडीप्रमाणे चढत  उतरतो आहे

२: वजन कमी झाल्यामुळे माझ्या बोलण्यात आत्मविश्वास येतो आहे.

३: जीवन दौडनेका नाम

४: पिठीची झीप खाली सरकताना आणि कॅमेरा बोंबलला

५:थर्ड अम्पायर पँटची झीप खाली वर करत टीव्ही पुन्हा पुन्हा टवकारतो आहे

१: भारतीय आघाडीवीर

२: भारतीय मध्यवीर

३: आणि ही विजयी रन

४: मैदानाची आय घालत प्रेक्षक धावतायत

१: सूर्य चेंडू गिळत मावळतोय

४: जो  तो मैदानातून निसटतोय जो पैसे देऊन आला  निसटतोय जो मॅन ऑफ द मॅच झाला निसटतोय जो बायकोला थाप मारून कॅमेऱ्यापासून स्वतःला वाचवत मॅच पहात होता निसटतोय आणि आता आम्हीही निसटतोय.

१: मैदान लाखोंना जमवणारे एकटे आहे.


              आपणाला एकत्र चांगलं वाटून किती दिवस उलटले पोरी माझी मॅच्युरिटीही क्रिमीनल वाटायला लागलीये तुला हा संसार म्हणजे एक सफेदपोश घरगुन्हा झालाय डबल ट्रबल बबल फुटत पण नाहीये आणि  त्याच्या आत राहताही येत नाहीये एक अगतिकता त्याच्या आत शिगोशीग ब्लेमगेमचा उदास थकवा पसरतोय हवेत डिस्क स्पेस मागतीये क्लीनअप टूल यूटिलिटीची फाईल दिलीटिंग होत चाललीये आपण  स्वावलंबी होत  चाललीये रिस्पॉन्सची चाल प्रतिसादाचा हा गोगलगाय स्पीड फास्ट करेल असा अक्सेस कुठून आणू ह्या विखुरुन पडलेल्या प्रेमाच्या डाटात ?
               एकमेकाला कोंडून कोंडून आपण आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या जागात बॅड सेक्टर्स डेवलप करतोय स्याडनेसच्या जमिनीवर फाईल  मिसप्लेस  झालेल्या  सापडतच नाहीयेत  एरर चेकिंग ऍबिलिटी गमावलेला तुझा हात माझ्यावर रोखतोय तुझी पाचही बोटं आणि मी ती माझ्यावर रोखलेत म्हणून संतापतोय.
              मी तुझ्या आयुष्याचा सत्यनाशच केलाय तर मी तुझ्या आयुष्यात काय करतोय ? तुझ्या इच्छेच्या टोकावर तणाव आहेत आणि काय  तू बनाव घडवून आणत बनावटतियेस काटकारस्थानाचा बबलगम बत्तीस दातांनी चघळत.
           ह्या थेंब थेंब साचून बेचव झालेल्या स्वादाच्या तळ्याला चवदार शेवट कशाला हवा ?
           टर्न ऑफ कर हा रिलेशनशिपचा कम्प्युटर तुला हवा असलेला  डाटा इतरत्र सेव करून आणि दे पाठवून हा रंगहिन स्वादहीन चोथा
           कॅन्सर गोळा करणाऱ्या मांसल गार्बेजमध्ये
           आयुष्य डिजिटल जगलो, मृत्यू तरी मानवी कर !

           तुझ्या बॉडीचा रिपल इफेक्ट ओसरतोय संभाषणाचा DNA ब्रेक होत तुकडतोय मी वाचतोय प्रत्येक तुकड्यातील जनेटीक कोड डोळस होत सगळे आयविटनेस मारतायत तुझ्या माझ्या प्रेमाचे ओरिजनल सिक्वेन्स सापडत नाहीयेत मूळकतींचे  रिकन्स्ट्रक्शन अप्लाय करू पाहणारी आठवणींची मेथडॉलॉजी मी बाराच्या भावात निघताना पाहतोय स्पर्शाचे Extremophile बॅक्टेरिया सॉईल बॅक्टेरियात धर्मांतर करतायत आणि स्वातःची चवदार चव बदलतायत टॉक्झिक वेस्ट जमा करत छातीवर.
            मी हळूहळू बनतोय वीषपुरुष ज्याने डंखोडंखी तुला पंखवले होते गिल्टचा इमोशनल डिलेमा डिप्लोमेटीक होऊन तुझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पोर्टेबल प्रेमाची शेवटी एव्हरेस्टवरची  टॉयलेट व्हावी ह्याहून काय असू शकतं आसक्तीचं अधःपतन ? तुझ्या हसण्याचेही मला दंतदुखी व्हावी ह्याला काय म्हणावे ओठांनी ? सुरवातीला वाटले हा टेनीस एल्बो आहे विश्रांतीने ठीक होईल पण बघता बघता कॅन्सर झाला एका नाराजीचा आणि काळजाचे ठोके खेळण्यापूर्वीच बॅण्डेज मागायला लागले आपल्या प्रेमाने एकमेकात दहशत पसरवेपर्यंत  आपण पोस्टपोन करत राहिलो वैताग आणि मग व्यभिचाराच्या मार्गाने निघून गेले निष्ठा वाहताना कापलेले बोट
           आता समोर आहे स्कीन कॅन्सर स्पॉन्सर करणारा रस्ता आणि गळ्यात अडकून पडलेली क्रीम
            मी किंचाळतोय
             "It's Over"
              आणि माझ्यावर चालून येतीये
              शांततेची सफेद प्रतिष्ठा
              जी निरोप घेताना आपण दोघांनीही सांभाळली होती
***
           
शेवटी मिळालं काय ?
यातना !
तुझ्या सेल्फओब्सेसड सर्कमस्टन्सेसचा सर्कमफरन्स कधीच सापडला नाही ह्या भोगवट्यात
पाय जळाले राईट कम्युनिकेशनच्या रॉंग किवर
जिने कुठलीच कुलपे कधी माझ्यासाठी उघडली नाहीत. वेळ अशी आलीये की आपण रिअल लाईफमध्ये काय  आहोत हे दाखवायला रिऍलिटी शोत भाग घ्यावा लागतोय यारा रिली रिली करत पोर्तुगीजमध्ये oi म्हण की इंग्लिशमध्ये Hello जिथे फोनच डेड  होऊन पडलाय कानपाळीत तिथे कुठल्या रुटनं न्ह्यायची ही रिलेशनशिपची बस ? जिथे  अटीट्युड एक्सजेंज होत नाहीयेत. जिथे जिथे गुडबायही संपलेल्या टूथपेस्टसारखे पोचे वाटतायत तिथे  ठेवणीतल्या स्माईलीज चेहऱ्यावर छापून अफोर्डेबल होणार आहे का हा निरोपाचा क्षण ?
               संताप असेल तर नको बोलू. इमेल आणि फिमेल फालतू ज्योक जाताना नकोत. तुझ्या आईची कायम ड्रेसिंग रूममध्ये वाट पाहणारी धकधक नको धडकन आणि तडकन अपग्रेड करणारा  किसिंगचा तो रोमॅन्टिक फिलरही नको मला कायम मागास समजणारा तुझा तो सामाजिक  माजही नको. मी एकाचवेळी सेक्सी आणि योगी दिसतो. आताही तसाच दिसत असेन.  ऍफ्लुएंट  सोसायटीतील काळीज अंतिमतः जिगोलो मागतं पुरुषाकडून तसंही राहणीमान त्यात चालत गेलं का  त्याचीही चर्चा  नको परफेक्ट मॅचिंग ही आयडिया की आयडियॉलॉजी ह्यावरही वाद नको तुझ्या हातावरून माझं  नशीब आता स्पॉन्सर होणार नाही ही मुक्ती की सजा तेही विचारू नको म्युच्युअल होमस्टोप संपुष्टात आणून मी बेघर होताना काय सोबत न्हेणारय मला माहीत नाही. अस्थेटिकली बोअर वाटायला लागलं आपल्याला एकमेकाच्या कंपनीत त्यामुळं 'ब्युटीफुली युवर्स '  ही नको.
             
काळाच्या समुद्रात  बॉन्ट्रान्सप्लान्ट
स्वकमाईच्या  इनव्हीजीबल फ्लडची फडा
टॉर्चरच्या  कलरफुल टोर्चेस
 लवइंजीनचं ऑईलस्लॅशिंग
नजरेची पॉवरप्लॅशर्स
रक्तातलं सेक्सस्टिम्युलेशन
काळजाचे साईडइफेक्ट मेंदूवर मारणारे प्रोग्राम

सगळं कसं कडी घालून चिडीचूप्प आहे
त्यांना बोलतं करणारा  कुठलाही डंखतमाशा आता नको

मला हे घर सायलेन्ट मोडवर ठेवून
तुझ्यातून शांततापूर्ण मावळात
मवाळ जाऊ दे.

***

SONGS AND POEMS 

मुंबईत सजतोय अमेरिकन मॉल ब्राउन
लंडनमध्ये अंडी घालतय चायनाटाऊन

अमेरिकन  सिनेटर बसवतोय हनुमानाची कोनशिला
जापानीजना घाबरवतोय रोज रात्री ड्रॅक्युला

उत्तर कोरीया टाईल करतोय जर्मन टाईल
श्रीलंकेत वॉलवर ब्रिटिश स्टाईल

सिडनीला लटकतायत स्पॅनिश झुंबरं
इंडोनेशियाच्या धाब्यावर अरेबियन अंबरं

विखुरून पडलंय म्हणेतोवर जग झालं एक
गाणं म्हणून झालं आता दे माझा चेक
-----------------------------------------------------------------------------------------------------


माणसांच्या गर्दीश टनावारी गर्लिश सौन्दर्ये बुडतायत कुणाला काय पडलय बिल्डींगासुद्धा जंगलावर फेकून मरणारं हे शहर  स्वतःला कुलूप घालून स्वतःला घरपण देणारी माणसे - सर्वत्र - एकमेकाच्या कड्या वाजवत ओवरकॉनवर्झेशनपाशी अडलेली !
           दिव्यातही भुताटंकी रस्त्याच्या उजाड त्वचेवर तकतकीत बागुलबुवा अंग बरसे भिगे सावरिया अंग बरसे
 छत्रीआड कुत्री
आयुष्यात खाजगी झालेले चेहरे नाकावर रक्तपिपासू डास बसल्यासारखे
 श्वसन चालू श्वास नाक्यावर चक्कर टाकायला आल्या सारखे
पायांची घडी घालून ह्या सुटकेसमध्ये ते ठेवून  उडता आले असते तर किती बरं झालं असतं ?
पावले पिंजणारा  थकवा
घामाची द्रवीड घनचक्कर अंगभर.

           हा ओला  शर्ट घेऊन ट्रेनमध्ये चढण्याची सक्ती
प्रत्येक स्टेशनवर आपल्या कपड्यासाठी आपल्या नावाने एक लॉकर हवा साला !
साडेसातची भायंदर फास्ट !
फास्टींग काऊच !
प्रत्येक ग्रुपची पिल्लावळ एकमेकासाठी सीट राखून
आपण एकांतात उभे
संडासपुढे आणि बाकापुढे सारख्याच इन्टेनसिटीनं वाट पाहत.

          इतक्या दुःखी आसमंतातही हसणारी मुलगी कोलगेट गर्ल
आपणच असे का घरगळते ?
कवितेची  केशवसुती काळजात कापडं धुतीये आणि आपण वाळत घालायला दोरी नाही  म्हणून ह्या गर्दीत
उदास तणावाचे टोकदार  नीब सोसत अनरायटेबल

            रेल्वेत लटकता लटकता कविता लिहिता आली पाहिजे
           भर  डब्यात पोरीचा कीस घेता घेता कविता लिहिता आली पाहिजे
            ह्या गर्दीत पादता पादता कविता लिहिता आली पाहिजे.
           ह्या मुंबईत मरता मरता कविता लिहिता  आली पाहिजे.
***

An interaction with new post 80 borned Generation 

What's Life ?

Life is like an internet You only download it
then mould it accourding to  yourself and just
perform with ti an internet

cutting and posting ?

No man downloading, moulding and performing

For whom


For fucking audience without audience life is impossible man
Their input is necessary for moulding and  performing


For whom/

For fucking audience without audience life is impossible man
Their input is necessary for moulding. Otherwise you only
perform which is downloaded Got man ?

What do a think about Post-  60

What Post- 60 ? Was it real ? I don't know  man

Gautam Budhdha ?

I had laughing Buddha but he couldn't bring luck
Is Gautam Buddha is more luckier than laughing Buddha ?

I think it's error on  page
May be Who  cares  ?

You have been authoured by Maya of fetishness

What Maya ! I think Vivek Oberoi is going to play the character of Maya Dadas Vivek is hot he will play this bloody gangster very sexily.

Do you know Marx

You mean marks in exam or Mark Taylor kind of sportsman. No ? At lease I am not pseudo- Let me confess I don't know this bloody bastard

He was an economist

Oh ! Can he give me an advice about investment
Oh ! He is dead : Everybody is going to die yaar !
Death ! what a real  thing ! Everything can be pretended, faked but death ? Impossible man !

It's your way of seeing ?
Experiencing ! Seeing is बच्चोंका खेल  kids only see kind of T.V. Mature people experience it

But experience can be weaved to fool you.

You mean ! That's art yaar! I like artistes. Life  is a mission to fool everybody around you and win the truth  which is powerful. It sounds intuk Na ? What's it's hurboversion ?

Hurboversion ?
             
Simple way to say same thing said by a too muck intuck ! It's upscaling yaar !

What can I ask you now

Nice Question

But there is nothing nice about question

I said your question is nice

Oh! So what's next

You mean next fucking

No! I mean what you are going to do after this interview

Is it over ! I thought you are just started it.

Timebound. We always give more time to viewers for  their independent thinking.

But who need it yaar ! & if somebody wants some time to thing he will just leave the channel off ! Anyway every empire controls the citizen through this time ! Prison is the most naked version of time owned by state !

See you !

Fuck you man !

Regular Internet 

Chat
Ramdeo : God  is the surfaceful root
                 Probably
                 All other is Surface

Me          : If today is the text
                  I can write it

Priya  :     What are you talking ?
                 
S:             Where from you talking ?

Me:         Talking ?  Chating
S:             Any Difference ?
Me 3 :      Anoyumity is the most interesting thing about conversations on the internet, Ramdeo Is  it fake name ?
Ramdeo : There is no fake since life is all where authentic !
Priya : hey ! Are you talking with two people ?
Me : There- in- editing room multiplication of conversationist
Priya : Oh ! Neighbors ? Buiseness neighbors ?
Me:     featureless language without social class, ethnic origin, economic ground.
S:        What's your age ?
Me 2 : 60 or 16 or 1600 or I am sixteen going on sixty-een
S: rubbish !
Me : NAME ?
S: NAMELESS SHAHANE
Ram : God is ......
me2: maharashtrian ?
S: Are you Maharashtrian ? Shy ?
Priya: Accentless Neighbors ? Or I'm confused !
me : Multicoding
Priya : Kunashi boltoyas Mama Dnyanda mami paratli  ka ?
me: kuna  ekashi kuna ekishi
me 3: electonic dicsussion is destroying face-to-face one
S: Equality in communication Because Nobody is afraid nobody misses the  chance Even shy one speak what he intends i mean
me2: I am missing
Ram : I is missing
Me2 : ing ing God
S: God is ing ?
Me: You are Just............. I want to fuck you
S: Shut Up -
Me2: Is  it possible to shout on internet ?
S: I am leaving
Ram : You must leave surface to find the root.

***

मोबाईला ! मोबाईला !

।। एकशेएकवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
कवितेत तुमचं काहीच खाजगी रहात नाही
किंबहुना ज्यांना खाजगी व्यक्त करायची खाज असते
तेच कवी  होतात

We all need good workshops
Make it Impactful

शुगरफॅक्टरी नका खोलू यार

राया,
नका घालवू वाया
इश्काची उमर
ओसरून  जाईल नाहीतर
कम्प्युटरवरचा पोर्नोग्राफीक भर
अय्या भर का थर भर का थर भर का थर
जी जी जी जी
राया राया
सांगा हिला -  सोड मांजा ढीला
कवी हा रंगीला जी जी जी

मोबाईल बोलतायत
आणि कविता कवीमधून उठून
मोबाईल पीठात स्थलांतर करतायत


।। एकशेदोनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
                 अनेक तोंडानी बहुमुखी गीतेची  अनेकार्थी शपथ घेत अवतारांच्या detextual context मध्ये नक्कल करत त्या concept ची जी स्वतःच original नव्हती जिच्यात organs च्या टंचाईने काळ व्यापला होता आणि organic chemistry ने अवकाश आणि वाक्यप्रकाश त्यांची निळी स्टील कलर्ड बॉडी  पहात
त्यांना भाषा तोंडासाठी मदत करतायत
ज्या जिभांनी
ज्यांनी सिरीयस गेस करत करत
चेस केला
सरफेस

मोबाईल  बोलतायत
आणि something foreign
कानाहारी
सर्वत्र
माझे कान मोडून ते कधी खायाला मिळतात
ह्याची
वाट पाहतय
***

।। एकशेतीनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
केमीकली
क्रोनॉलॉजीकली
बॉयलॉजीकली
जो लोच्या झालाय
त्याचा पाठलाग करत

एक ऑरा पसरतोय
पण तो माझा की मोबाईलचा
कळत नाही

Defective happiness unhold seduction of my skin forced rapesystem in blood

काय काय सहन करायच ?

मी अजून ओरिजनल कविताही पुरी केलेली नाही
आणि लोक मोबाईलवरून
माझ्याकडे तिचा  करेक्ट वर्जन मागतायत.

***








।। एकशचारवा की एकशेचौथा शेवट ।।

मोबाईल बोलतायत

ग्लोबिश ऍण्ड बुशीबुशी
टोटली मिसफिट
टोटली मिसप्लेसड

मी अमेरिकेच्या  अध्यक्षाला फाट्यावर मारतोय
आणि लोक
हा कोणता नवा फाटा म्हणून
माझ्याशी माझा काटा काढत
मोबाईल बोलतायत

।। एकशेपाचवा शेवट ।।

मोबाईल बोलतायत
त्यांना वाटतं की हे नवं कुरुक्ष्रेत्र आहे
मला समजत नाही
त्यांना वर्तमान कसं खेचायचं ?

१००+५ = १०५
ते गणितात अडकलेत

एक spelling queen मला वारंवार
crossroad वर बोलवतीये
आणि एकता कपूरच्या सोप आवाजात
सल्ला  देतीये
k बेटा k
Lucky k
महाभारत हीट झालं कारण
महर्षी व्यासांनी रणभूमीला k ह्या अल्फाबेटवरून
सुरु होणारं Kurukshetra  हे नाव दिलं

मी विचारतोय
पण  मग k फॉर कौरव विजयी व्हायला हवे होते
ती म्हणतीये
पण k for Krishna पांडवांकडे होता ना
मी विचारतोय
पण मग k फॉर Karna कौरवाकडे होता त्याचं काय
ती म्हणतीये
म्हणून तर k फॉर Krishna ने
k फॉर Kapatnitine मारले

k कडे कपट पाहिजे कुटील पाहिजे
म्हणजे ते विजयी होते

ती मोबाईलवर बोलतीये
मी मोबाईलवर बोलतोय
आणि मोबाईल बोलतायत
k फॉर Kolhapuri आवाजात क क क करत

।। एकशेसातवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

दूर शब्दापासून काहीसे
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

काहीसे दूर शब्दापासून
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

दूर काहीसे शब्दापासून
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

काहीसे शब्दापासून दूर
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

दूर काहीसे शब्दापासून
एकमेकापासून शब्दांच्या अंतरावर राहून

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दाच्या अंतरावर राहून एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
राहून अंतरावर शब्दांच्या एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून अंतरावर शब्दांच्या राहून

शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून अंतरावर राहून शब्दाच्या

शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून राहून अंतरावर शब्दाच्या

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या राहून अंतरावर एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या अंतरावर एकमेकापासून राहून

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दाच्या राहून  एकमेकापासून अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या एकमेकापासून अंतरावर राहून

शब्दांपासून काहीसे दूर
शब्दांच्या एकमेकापासून राहून अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
राहून अंतरावर एकमेकापासून शब्दाच्या

शब्दांपासून काहीसे दूर
राहून शब्दांच्या एकमेकापासून  अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
राहून शब्दांच्या  अंतरावर एकमेकापासून


शब्दांपासून काहीसे दूर
राहून  अंतरावर एकमेकापासून शब्दांच्या
  


शब्दांपासून काहीसे दूर
राहून  अंतरावर शब्दांच्या एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
राहून एकमेकापासून  शब्दांच्या अंतरावर

शब्दांपासून काहीसे दूर
राहून एकमेकापासून अंतरावर शब्दांच्या

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर राहून एकमेकापासून  शब्दांच्या

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर एकमेकापासून राहून शब्दांच्या

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर एकमेकापासून शब्दांच्या राहून

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर  शब्दांच्या राहून एकमेकापासून

शब्दांपासून काहीसे दूर
अंतरावर  शब्दांच्या एकमेकापासून राहून


शब्दांपासून काहीसे दूर
एकमेकापासून अंतरावर  शब्दांच्या  राहून
                      Unending
                       Tending towards/ infinity
                       > or immeasurable or Zero or One
                       > or beyond my accountability

।। एकशेआठवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
Language time कधी expired होतीये
ह्याची वाट पहात

।। एकशेनववा शेवट ।।
THE END

पाटी टाकली ना ? मग कविता संपली असं समजा !
सिनेमाला अशी पाटी पडली की  सिनेमा  संपला
म्हणून निमूट उठता  ना ?
मग कवितेला सिनेमाचा न्याय का नाही ?
तर
THE END
चालू लागा
कुणाचा मोबाईल  वाजला बरे
च्यायला ! इथेही मोबाईल बोलतायत !

।।एकशेदहावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि कवी कविता लिहितोय

कविला मोबाइलवरच्या कवितेचा शेवट
काय करावा  ते सुचत नाहीये
कवी शेवटामागून शेवट लिहितोय
आणि कविता आहे की
स्वतःचा  शेवट सापडू  देत  नाहीये

कवी वाचकांकडे  चाललाय
कदाचित वाचक हाच कवितेचा शेवट आहे

।। एकशेअकरावा शेवट ।।
वाचकहो
शेवटी  आलोच
शेवटी तुमच्यापर्यंत तुमच्यापाशी यावंच लागलं
मग काय करूया  ?  कवितेचा शेवट तर झाला पाहिजे ना ? मला तर जे सुचले ते सारे शेवट मी लिहिले आणखीही काही लिहिले असते पण  ते लिहिल्यानंतर तरी कवितेचा शेवट झाला असता का की प्रत्येक शेवट हा केवळ शक्यता असल्याने कविता अपुरीच राहिली असती  ? असो. तर तुम्हाला काय वाटतं ? मी शेवट काय करावा ? किंवा लिहिलेल्या शेवटांपैकी कोणता निवडावा ?

एक काम करा वाटलं तर आता कळवा किंवा थांबा
विचार  करा आणि कळवा
माझे मोबाईल नंबर आहेत ९८९२२२९७३०-  ९८२४५००००२ह्यातील एक फेक आहे ते  उघडच आहे पण  कवितेत मोबाईल अनेकवचनी आहे ना म्हणून दुसरा  ऑडीशन टाकला मोबाईल बोलतायत ना ? मग ! मोबाईल बोलतोय असं असतं तर एकच  दिला असता असो तर पहिला अस्सल आहे दुसरा फेक आहे तेव्हा पहिल्यावर कळवा किंवा टाईमपास करायचा असेल तर दोन्हीवर शेवटी हेही  मोबाईल  बोलके आहेत त्यामुळे ते बोलतायत हे सांगायला  नकोच - तेव्हा
                                माझेही मोबाईल बोलतायत
(ह्या शेवटात कुणाला काही भर घालायची असेल तर ती खुशाल घालावी त्यासाठी कवीच्या अनुमतीची गरज नाही मात्र जो कोणी भर घालेल त्याने त्या भरीखाली स्वतःचे खरे  नाव  व पत्ता जोडावा)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

        आरश्याबद्दल माहीत नसलेलं कुत्रं आरश्यातल्या कुत्र्यावर दुसरं कुत्रं समजून भूंकतय. मी कुत्र्यातला माझा जन्म आठवत तुझ्याविषयीच्या माझ्यातील कल्पनात
         हे  किती विचित्र आहे मला माझे मागील जन्म आठवतायत  आणि तुझं काहीही आठवत नाही शिवायकी तुझा चेहरा आलिशा चिनॉयसारखा दिसतो. जेव्हा चिनॉय पडद्यावर दिसते तेव्हा  मला तू आठवतेस
         खरंतर जिच्याबरोबर आपण झोपलो ती आख्खी आठवायला हवी पण माझी ही गृहतिकल्पना खरी होत नाहीये फिक्शनने भारावलेल्या ह्या काळात आरसा पुरवणारं पाणी आटत चाललय आणि तू तर बिसलरी पाण्यासारखी कधीच आर्टिफिशियल क्लीन नव्हतीस कुठलीच क्वीन क्लीन नसतेच म्हणून तर तुला क्लीन चिटचा हव्यास स्वतःच्या पायात वाकून पाहण्याच धैर्य तुझ्या प्रवासात कधीच नव्हतं म्हणून  त्यानं शोधली स्कॅण्डल्सची सॅण्डलस आणि सिंड्रेलाच्या अलेक्झांड्रियाज
          नुकताच हात वाळवून नशीब निघून गेलंय रेषावर जखम होती तिथे हळद सापडलीय तुझ्याशी रत होणार ते रक्त कुठं गायब झालंय लोकांना वाटतय की ही हार्टअटॅकपासून सुटका आहे आणि मला माहीत आहे की माझ्या जखमा  कविता ओलांडतायत.
         खरंतर खूप असंबद्ध वाटतय तुझी योनीही आठवत नाहीये जिच्यावर मी स्वार झालो तिचं इतकं विस्मरण? मग आपलं प्रेम म्हणजे होतं तरी काय ? शब्दांची शारीरिक निष्पत्री ? भाषेची मांसल उत्पत्ती ? चिन्हांच्या रक्तवाफा ह्या फक्त भूलथापा होत्या काय ?
         खूप निघून आलोय तुझ्यापासून दूर - डिस्टन्स कॉलही पुकारत नाहीत तुझ्या श्वासगर्भ सुवासाचे लोकल फुलांच्या बागा तुझ्या ओठातील पाकळ्यांचे स्मरणपत्र लिहित नाहीत
          मी स्वतःच चकीत आहे ह्या विसराळू जिद्दीला पाहून तू मेलीयेस आणि  माझ्या हाताला तुझ्या खुनाचा वासदेखील नाहीये माझ्या हातांची  पाठपोट बोटे पश्चातापाची किंवा  विरह दुःखाची वाट पाहतायत  आणि  माझ्या त्रयस्थ तळहातावर उमलतोय फरफरत तळवाटा जो विचारतोय
    "अश्रू म्हणजे काय श्रीधर
       और ये कम्बख्त "आह " किस चिडीया का नाम है ?"
        तो उडून  जाऊ नये म्हणून त्याच्यावर कोणता पेपरवेट ठेवू ?
***
       
           तू अमेरिकेत निघून चाललीयेस हे तसं बरंच की ! अपयशात उजाड झालेला हात का पत्करावा  बोर्डात मेरिटमध्ये झळकलेल्या हाताने माझा काळजाचा पापुद्राही न चाळता तू वाचत बसलीस माझ्या टॅलेन्टमध्ये तुझ्या यशाची इन्शुअरंस स्कीम सिक्युरिटीला तनमधन अर्पण करणारा दर्पण तुला हवा होता आणि माझ्या काचेवर तर पारा चढला तो फक्त रागाचाच ह्या आरश्यात तू तुझ्या डोळ्यात चाललेलं बुद्धिबळ पाहणार होतीस हे कधीच कळंल नाही माझ्या अधूर्त बुद्धीला माझ्या मित्रांचाही वापर तू शाह म्हणून केलीस आणि मला  चेक देता देता स्वतःच मेट झालीस
        कारणमीमांसेचे खोदकाम आता काय कामाचे ?
         तू बाईच अशी जीला ashtoprahar   स्वार्थ ग्रासलेला स्त्रीमुक्तीचे  लांबलचक गाभारे देवत्व भरत नाहीत बाईत ज्यांना सत्ता सत्ता खेळायचंच त्यांना स्त्रीमुक्तीही एस्क्युज म्हणून वापरता येते आता तर तू म्हणतीयेस की तुझ्या पोटातलं पोरही माझं नव्हतं. आता हे कुठलं राजकारण बाई ? की नवा बॉयफ्रेंड मिळाला म्हणून जुन्याचं न झालेलं पोरही नाकारायचं ? आता काय मी तारखांचा हिशेब मांडून स्वतःलाच तारे  दाखवू ? की तुझा बॉयफ्रेंड मूळचा माझा मित्र म्हणून त्याच्यावर स्टॅबिंगचा आरोप ठेवू ? चाकाकतं ते सारं सोनं नसतं तसं चकाकता तो सुराही नसतो.
          वारामागून वार करत तू कुणाला जखमी करतीयेस ?  स्वतःला  की मला ? अनऍडजेस्टेबल टेबल  अनबेअरेबल बेअरींग अनऍडप्लेबल ऑप्शनस घेऊन कुठे जाणार आहेत हे झंझावती पाय ? त्यांचा अंतिम मुक्काम काय ?
          कधी कधी फार दया येते बघ
          सुईवर नाक अंथरून त्यात नथ घालू पाहणाऱ्या बाई विषयी आणखी काय वाटू शकतं ?
           तुझे तुझसे है वफाकी उम्मीद
           और तू नही जानती वफा क्या है ?
आता मी काय म्हणू ?
           या इलाही ये माजरा क्या है?
शिवशक्तीचं लोणचं घालून आपण कधीच ठेवून दिलं ते नजरेआडच्या बरणीत कविता काय अशा जगता येतात का ? शब्दांचं काय फुलले तर  फुलते भाजले तर पापड

तुझ्या आयुष्यात आलेल्या पुरुषापैकी एकाला तरी तू धड समजून घेतलंस काय ? की बुद्धी बुद्धी खेळत इमोशनल  पिपासा रचलीस अश्रूप्रधान मीमांसेत ? एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे..... चरित्राची चेन की चैन ? मग सतत बैचेनीची आत्मपरेड कशाला ? की सिडक्शनचा तोही आमंत्रित करणारा अंतिम देखावा? शेवटचा पण The End ची पाटी न पडणारा ? तुला कॅमेऱ्यात कधीच टीपली नाही मी. एक आख्खी हजारभर पानांनी कादंबरी लिहिली होती पण तिच्याविषयी साधा उच्चारही मला कधी करावासा वाटला नाही तू मत्सरशीलच ह्याची  पानोपान खात्री कानोकान खबर  इतक्या अविश्वासानीशी मी तुझ्यावर प्रेमच केलं कविता लिहिणाऱ्या हातांनी काठ  कधी माठ झाले तर कधी उतू गेले कंटाळा आला तरी टाळा लावला नाही भाकरी शिळी झाली तरी पुरणपोळी समोर असतानाही तीच खाल्ली.
      मी इमानदार  राहिलो आणि असमर्थ श्वान समजलीस माझ्या निष्ठेची प्रखरता एका आर्टिफिशीयल झगमगटापुढे फिकी पाडून तू निघून गेलीस एका गौरकाय डिमारकडे आणि मी हायहॅलो करत सोसत राहिलो पृथ्वी ची अंधेरी ठासून मारणारी एक विचित्रवियी प्रकाशकळ तू  काय करतीयेस हे तुला पक्कं माहित होतं तुझ्या पलायनाच्या खाणाखुणा तीव्र करता  येतील अश्या सर्व संध्या तू साधुमुखाने खुबीदारपणे वापरल्यास प्रसंगी जनावरही झालीस माझ्या  कानात नखं खुपसताना नेलपॉलीश लावता लावता
       तुझ्या संतापाचे  असंख्य चावे माझ्या अंगभर ठणकतायत तुझा राग शांत व्हावा  म्हणून मीरारोड स्टेशनवर एवढ्याने कंठलेल्या रात्री आता अंगावर येत नाहीत उदास करतात मी एकदाच प्रेम केलं आणि ते एका लायकी नसलेल्या बाईवर केलं.
      हा साक्षात्कार आहे की संताप ?
       हा विवेक आहे  आत्मप्रतारणा ?
      लोक येडझव्यासारखे काहीही बोलतात  प्रेमाबाबत ! प्रेम नसतंच. ते नाहीयेस. असतात त्या फक्त सोयी आणि गैरसो वापर  आणि गैरवापर
       दोन माणसे एकमेकाबरोबर राहून एकमेकाला बदलू  शकत  नाहीत तर हा समाज काय डोंबल बदलणार ? आपण कुणाला फसवतोय ? स्वतःला की इतरांना ?
       शरीर सुद्धा  लाच म्हणून देणारे लोक आणि क्षण एका भाड्यापोटी एक रात्र वाटणारे रक्त आपण सर्व काय लायकीचे लोक आहोत ? ज्ञानेश्वर तुकारामाचं नाव घेण्याची तरी लायकी आपल्या वागण्यात आहे का ? झ्याटूकभर तृष्णात शरीराचं थोटूक करणारे आपले  सिगरेटी चरसी हात.
      चल जाऊ दे झालं ते बरंच झालं माझ्या हातावरून एक बदक  उडालं तू म्हणालीस "हा राजहंस माझा " आणि मग तुला  कळालं हा पांढरा पोपट आहे.
      तुझ्या तळहातावरून एक घार उडाली मी म्हणालो "ही गरुडीण माझी " आणि  मग मला कळालं ही तर काळी पोपटीण आहे
       शेवटी आपलाही सफ्रेम पोपटच झाला
       बिनमाहितीच्या पिंजऱ्यात
       राणीच्या कॉस्मॉपॉलिटिन  बागेत
       उडता उडता
***

झल्लाळ होताना ओरखडे उमटले सही  करताना गायब झाले चेक  अफ़रातफरीत आख्खा बँक वटवली गेली अकौंऊंट पहायला गेलो तर आपले नाव पूर्ण गायब फक्त कवी अशी कागदोपत्री नोंद तुझ्या दिलेनादान काळजात- बाकी उरलेलं मरा हुआ कौआ ये आशिकका जनाजा है धूम से निकले
वर्ना लाश पिघलकर खुदा बन जायेगी
रुह ढुंढते  ढुंढते हो गयी सुबह
रातभर बदन चकमा  देता रहा

ये नही रंजीश की दिल टूट गया
रंजीश यही रही कम्बख्त तेरे सामने बिखरा नही

हे उद्घाटन ही घाट न घातलेली  नदी घातक पाणी आणि चातक वाणी राणी नसणाऱ्या पत्यांनी  काय  गुलाम घेऊन आयुष्यभर हिंडायचे दिवस असे गेगुजरे

ह्या आपाधापीत यावी तुझी वेड लावणारी आठवण ? तुझी ?
शहरभर माझ्या प्रेमाची  होर्डींग आणि आज स्वप्नात तू - चारचारदा !मला वाटलं विसरलोय तुला निश्चित शेवटच्या भेटीत नसलेला मुक्काम एकत्र केला आपण सफर जगलो नाही आपण पाय जगलो पाया जगलो छत नसलेल्या घरात छातीठोक प्रेम केल फोफश्या कातर वेळात नंतर सोयीस्कर  रित्या कुठल्याच मुलाखातीत माझं नाव नव्हतं तुझ्या आशिकांच्या यादीत मी कुणी नव्हतोच तुझ्यासाठी हे तू कुणाला सांगत होतीस ? स्वतःला ? मला ?  आईला ? की तुझ्या नेक्स्ट आशिकाला ?

फसवणूकीचा पापखेळ निष्पापपणे खेळणारे तुझे फलंदाजी हात त्यांना प्रत्येक मॅच फिक्स  लागायची आणि मी तर पल टू पल जगणारा कलंदर संत माझे पाप हेच की मी तू सांगितलेला जादूनामा लिहिला नाही. चल ! मार कल्टी ! गिल्टी ! गिल्टी !गिल्टी ! गलतीका नतीजा क्या ? अंगभर फसांद नराची मांदीला साद मादीची नराला साद.
वाद घालतानाही केलं प्रेम
फुलस्टॉप दिला रिकाम्या स्टेशनवर
अमेरिकेला चाललेल्या इंडियन  बये
हा अखेरचा  दंण्डवत न गण्डवता

तुझ्या पावलांना स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याखाली फ्रीडम मिळो
जळतायत हात तुला पहात हातोहात जुळवताना
विलग विलग अलग अलग कुठल्या डिवोर्सचा ड्रेससोर्स कळतो ह्या कातडीला ही अंधेरी ट्रेन चर्चगेटहून सुटलेली मीरारोड झालेली विरारात विराण
आरसा फुटतोय प्रत्येक तुकड्यात तुझं नाक
माझ्या काळजात श्वास घेणारं
***

FACE TO FACE 
फेस टू फेस टू डेथ 
उडत चाललेलं वय
उडत चाललेली त्वचेची चकचकी
उडत चाललेला  स्टॅमिना

प्रत्येक गोष्ट उडत चाललेली
आणि आपण पश्चातापदग्ध
की आयुष्यात कधीच उडता आले नाही

कित्येक गोष्टी आपल्याविषयीच्या
आपल्यातून इतरांतून उडत होत्या

स्मृति, गॉसिप्स, इमेजिस
आणि तरीही आपण विमनस्क
की आयुष्यात कधीच उडता आले नाही

आयुष्यभर आपण उडतच होतो
तुकड्यातुकड्यात
माणसांत झाडांत प्राण्यांत
आणि तरीही आपण उदास
की आयुष्यात कधीच उडता आले नाही

आता हा शेवटचा क्षण जवळ येतोय
आणि आपण संपूर्ण उडून जाणार आहोत
हे कळून चावरेकावरे

आता कळतय
की  आयुष्य ही बसून राहण्याची शिक्षा होती

आता कळतय की
हे कळणे
हीच उडून जाण्याची आद्य अट आहे
मी उडतोय
"मी"च उडत चाललाय

डेथबेडवरून
मला मरावंच लागणार आहे
म्हणून मला मरायचं नाहीये

मी लग्न करावं का
म्हणजे मी माझ्या मुलात अमर होईन ?
की माझे क्लोन मी जन्माला घालून अमर व्हावे ?

क्लोन माझ्या बजेटमध्ये बसत नाहीत
मुलं माझ्या बजेटमध्ये बसत नाहीत

मग म्या गरिबाने करावे काय ?

कविता लिहून अमर होता आले असते 
तर किती बरे झाले असते

कवितेत बायलॉजिककल काहीच उतरत नाही
कविता अमर होण्याच्या संदर्भात
पुरेशी बायोडेटेड नाहीये

मी बघता बघता आऊटडेटेड होत चाललोय
मी - जो टाईमलेस होण्याची स्वप्ने पहात होता
Biocomputer हो
माझी expirydate मला कळवा
मारताना माझं दारिद्र्य आणि ही कविता
नीट सोबत घेऊन मरावं म्हणतोय

आणि हो
इंटरनेटवरची ही सगळी जाळी
शेवटच्या क्षणी मला दिसतील
अशी ठेवा
एकांताशी लढताना ती सोबत होती
आता शेवटच्या एकांतिक एकांतात 
ती माझ्या सोबत असू देत

हा शेवटचा श्वास
हने हवेच्या महाजालाने पुरवलेला  !
क्रॅप ! बाय ! Please, don't use slow time craft !
निर्जलिक ! बाय ! Oh death, क्लिक मी  आऊट ऑफ लाईफ !
क्लक !

थोडं आध्यात्मिक 
                 फेकून दिलेला संन्यास पुन्हा दारात हजर सौ बिल्लीया खाके शेखचिल्ली शेवटी चिलीमला कंटाळत जागा होतोय त्या झाडावर ज्याच्या फांदीचा मूलभूत रंग भगवा आहे पाचोळा बायकांच्या शरीराचा बायका नागड्या केल्या रे केल्या की वाजायला सुरु वसंताचा डिमडिम वाजण्याआधीच फुलांच्या शक्यतेतून घुमजाव अनबेलेबल वॉरंन्ट मिळालेला सेक्स अचानक बेलेबल होईल हे कुठल्या अलबेल्या मौसमधुळीत पाहिलं होतं आपल्या ऑसम डोळ्यांनी ? ऑटम आणि आयटम दोन्हीतही बॉम्ब पाहणारे आपले सेक्सबॉम्ब त्वचेचे बोंबील तळतानाही आपण बोंब ऐकली ती मादक कानांनी लोक म्हणाले लिंगपिसाट आहेस पण आपण म्हणालो ज्यांना साधत नाहीत ते नीतिसाधू बनतात ह्या पोकळ हिंदू समाजशाहीत आपल्याला साधतं आणि पोरी साधन बनायला आणि बनवायला तयार आपल्या छातीवर आपण नेहमीच उघडे टाकले ना हरकत प्रमाणपत्र जिथे वफादार राहिलो तिथे फेफे उडाली जिथे निष्ठेची गॅरन्टी दिली नाही तिथे मिळाली व्यभिचारी रात्र आपली  प्रामाणिकता कुठल्या बाईने कधी कबूलच केली नाही त्याला आपण काय करणार  ? तशी तर आपल्यालाही पत्नीव्रताची साखळी आवडलीही असती कदाचित पण आपली तकदीर अशी गांडू जिथे एकनिष्ठता वाहिली ती आपल्याला पांडू समजून चुकलो पत्नीव्रत आऊट ऑफ डेट डेटिंगचा डेटॉल घेऊन मग हिंडलो प्रत्येक परवडेबल बेसिनवर आणि लिहीत राहिलो तो सीन ज्याचा एन्ड आपल्याला माहित होता.
             आता अनिश्चित होत चाललेल्या ह्या मँच मध्ये ना त्या कॅचची प्रतिक्षा आहे ना क्लिनबोल्डचा इंतजार पोरी येतायत पण आपल्यालाच चढत नाहीये झिंग लगबग लगबग चालणं आता मॉडेलत नाही आपल्या काळजात स्तनांचे उभार घनभार देत नाहीत कुठल्याच नाकातील नथ उतरवून वाटत नाही तिच्यातून आता तीर मरावासा
          ह्या क्षणभंगुर सफाचोट सुखाचा हा का कंटाळा ? त्वचेत बुडून जाणाऱ्या नाकाला का पडत नाही नकली श्वास कापण्याचा मोह ? अनंताचा निर्वाणाचा मोह संपला असं डिक्लेरेशन दिल्यानंतर हे कसलं रिनोवेशन होतंय आपल्या बॉडीमॉलमध्ये ? कुठं आग लागलीये आणि त्यात काय काय जळतय ?
        ह्या  सिटीनं शिकवलेली ऍडलटरीची शिट्टी आता का वाजत नाहीये आपल्या तोंडातून ? हा ब्रम्हचर्याचा पलंग कुठल्या मलंगा कडून मांडला जातोय आपल्या भणंग लिंगात ? यम नियम प्राणायाम आसन  धारणा ध्यान एकेक पैलू शरीर उजळतोय आणि राजयोगाचा आत्मज हिरा नखशिखांत गायब आपला भोग ही आपली एकटिंग होती काय ? "तुझं मूळचं पाणी संन्यासाचं आहे " हे तर आपल्या आजोबानं दहाव्या वर्षीचं बजावलं होतं तरीही मग आपण भोगपालटी का घेतली ? समोर एक सुंदर स्त्री नागवी उभी आणि आपण देहाच्या गावाचेच नाही असे दाखवत तिच्या बॉडीतील आज्ञाचक्र चाचपत.
         आता समूळ विच्छेदाच्या शवविच्छेदनात न्यावं का आपण  आपलं हे नव्यानं परतलेलं शैशव ?
          झाडांनो पुन्हा वाजू लागल्या त्याच कालातीत तेच्या सूक्ष्म झांजा
         कदाचित मीही पाऊस पडून गेल्यानंतर होईन तुमच्यासारखा चित्तथरारक हिरवा.
***