Thursday, 17 September 2020

 ऑरगॅझम फिके पडत चाललेत 

किक अपंग होतीये 

अचानक एकाकी 

प्रॉमिथिअस पळून चाललाय 

त्याने लावलेल्या आगीतून 

स्क्रियाबीन मोडून पडलेला पियानो पाहतोय 

मेलेल्या सिम्फनीतून 


गुलाबांच्यातल्या भावविजा व्हिसा मिळवून पसार 

कोवळ्या आवाजांचे पालनपोषण कठीण असतं 

हे काय आपणाला ठाऊक न्हवतं ?


अडथळे फुटलेल्या ग्लासासारखे दुखवतायत 

सुरवात जखमांच्यापासून आणि शेवट रक्तसमर्थनात 


ग्रेस नसलेली काँग्रेस सर्व शरीरभर 


तीव्र शांततेचे स्फोट भाषा शोधतायत कि शिव्या ?


सगळं दफन झालेलं पुन्हा पुन्हा नव्या आरोपांची भाषा घेऊन 

नात्यांचे शेवट असे जीवघेणे का होतात ?


मुलायमता तर दोन्ही पार्ट्यांना हवी होती 

मग कठीण कठीणचे पालुपद का ?


सगळंच क्रुसिफाय केल्याशिवाय 

जिझस जन्मणार नाही 

ही श्रद्धा 

कि अंधश्रद्धा ?


रक्ताला वसाहत लागते 

नवे जीन्स तयार करण्यासाठी 

तुला माझ्यापासून मुक्त असलेले जीन्स हवे आहेत का ?


मग सांग कि तसं 


फुफुसं झिरो होत चाललेत प्रेमात 

वासना दर्जाहीन झालेत 


क्वालिटी सम्भोग होत नाहीयेत 


शरीर परत मागण्याचा हक्क जसा तुला आहे 

तसा मलाही 


शिळेपणाच्या धुळीत होणाऱ्या भेटी 

धुळवड कशा होतील 


धुडगूस हमखास लॉटरी लागणारे 

आताशा अनलकी झालेत 


आवश्यकता संबंधविच्छेदाची सूरी घेऊन समोरून येतीये 


मरताना माझा गळा मी गाता ठेवतोय 

एनी ऑब्जेक्शन ?

==============================

बर्फात अडकून राजहंस मेले 

लोक म्हणाले ते योग्य जागी गेले 

=========================


अध्यात्म पोलिटिकल पार्टीत उभं नसतं 

एव्हढी तुम्हाला अक्कल आहे 

हे मी गृहीत धरलंय 


तुम्हांलाच ह्याचं राजकीय भांडवल 

मला नामोहरण करण्यासाठी करायचं असेल तर 

तुम्ही ते करायला स्वतंत्र आहे 


जिथे अख्खा निसर्गच माणसाने राजकीय आणि आर्थिक बनवलाय 

तिथे मनुष्याला राजकीय बनवण्याचे कारखाने ऑन असणे अटळच 

तुमचा प्रॉब्लेम एकच 

माझी कॉस्मिक वीज तुम्ही तुमच्या पोलिटिकल कारखान्यात 

कैद करू शकणार नाही 


अराजकीय असणं आणि नि:राजकीय असणं ह्यातला फरक 

तुम्हाला युरोपात बसून कळणार नाही 


तेव्हा निहीलिस्टिक म्हणा हिंदुत्ववादी म्हणा शैववादी म्हणा 

मी त्याने बाद होणार नाही 


ब्रह्मांड नॉट आउट आहे 

तुम्ही नॉकआऊट करू शकणार नाही 


मी ब्रह्मांडाचा पार्टनर आहे 


बॉलिंग करत रहा 


जोवर ब्रह्मांड स्वतः मला रनआऊट करत नाही 

तोवर 


श्रीधर तिळवे नाईक 








Monday, 31 August 2020

सुशांतची आत्महत्या , उत्तराधुनिकता आणि सत्याचे तीन टप्पे श्रीधर तिळवे नाईक
उत्तराधुनिकतेची सुरवात झाली संरचनावादाने आणि त्याचे पहिले सिद्धांतन नित्शेचे होते त्याने सर्वच रचित असते हा सिद्धांत मांडला संरचनावादाने विशेषतः फर्डिनंड द सस्यूरने हा रचित सिद्धांत भाषेला लागू केला आणि क्लॉड लेवी स्ट्राउसने तो संपूर्ण समाजाला लागू केला सामाजिक संस्था ह्याही रचना म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या आणि इतिहासही !

ह्याला शह दिला तो विरचनावादाने हाही सिद्धांत देरिदाने प्रथम भाषिक सिद्धांत म्हणूनच मांडला सरंचनाची विरचना करून त्यातून सत्य शोधण्याचा हा खेळ होता ह्या खेळात अर्थ आणि सत्य सतत विचलित होत असतात हे गृहीतक होते

विज्ञानाने वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधता येते अशी जी मांडणी केली होती तिला हा छेद होता

१९७० नंतर विरचना इतकी टोकाला गेली कि मुळात सत्य नावाचे काही अस्तित्वात असते का असा प्रश्न निर्माण झाला आणि आपल्या हातात सत्य लागत नाही तर सत्याची रचिते आणि विरचिते हातात लागतात असा विचार पुढे येऊ लागला ह्या विचारांचे समकालीन निर्माण म्हणजे पोस्ट्रुथ एज

हा विचार भारतीय परंपरेला नवा नाही नागार्जुनने आणि शंकराचार्यानी असेच काही मांडले आहे आणि पुढे ह्यातून राशोमान सारखा चित्रपट निर्माण झाला आहे

सुशांतसिंगच्या धक्कादायक मृत्यूनंतर पोलिसांनी जे वैज्ञानिक पद्धत वापरून सत्य शोधतात असा विश्वास आहे
सुशांतसिंगने आत्महत्या केली हे सत्य शोधून सादर केले

पण अनेकांना हे पटले नाही आणि अनेकांची अनेक रचिते पुढे आली मीडिया सध्या रचिताला ऍडिक्ट झाला असल्याने  रोज एक नवे रचित तो सादर करत असतो सत्य शोधण्यापेक्षा सत्य रचणे ही मीडियाची आवश्यकता बनून गेली आहे साहजिकच रचितांचे एक वातावरण बनवले गेले प्रथम ही आत्महत्या आहे पण ह्या आत्महत्येचे कारण म्हणून
१ फिल्म इंडस्ट्रीतील आप्तवाद
२ रिया चक्रवर्ती

ही दोन प्रमुख कारणे पुढे आणली गेली ह्यामागे जेनुइन दुःख किती  , स्वतःच्या अपयशातून आलेली उद्विग्नता किती आणि सायकॉलॉजिकल कोव्हीड झाल्याने आलेली सुरसुरी आणि फुरफुरी किती हे सांगणे कठीण ! ही एक पोस्टमॉडर्न कंडिशन होती आणि तिच्यामागे नवीन आलेल्या चिन्हयुगीय मीडियाचा फार मोठा वाटा होता कुत्रं माणसावर मुतलं तर ती घटना पण माणूस कुत्र्यावर मुतला तर ती न्यूज ही मानसिकता असलेल्या काही पत्रकारांनी गेली काही वर्षे अशी कुत्र्यावर मुतणारी माणसे आणि घटना तयार करायला सुरवात केलीये कारण घटनेला टीआरपी मिळत नाही तर न्यूजला टीआरपी मिळतो हा त्यांना आलेला  अनुभव मिडीयाच्या बाहेर बसून टीका करणं फार सोपं प्रत्यक्षात मीडीया चालवणं फार अवघड पूर्वी घटनाच न्यूज असायची आता घटनेत बॉलिवूड टाकावं लागत नाहीतर ऑडियन्स मिळत नाही ह्याला मीडियाचं बॉलीवूडीकरण म्हणतात ह्या मेडिया बॉलिवूडचा सुपरस्टार अर्णब गोस्वामी ज्याला मनमोहन देसाईटाइप आपण काही केलं नाही तर चालणार नाही हे पक्के माहीत आहे तर नासिरुद्दीन शाह रावीशकुमार वा हिंदू जो  पॅरलल सिनेमात सुपरस्टार आहे आर्ट सिनेमा म्हणजे ह्यांच्याबाबाहेर राहून पोर्टल वा फेसबुक व्हाटसप वा लिंक वा ग्रुप  चालवणारे लोक ज्यांना आपलं पोर्टल आर्टिस्टिक बनवण्याऐवजी पॉप्युलर बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे अपवाद आहेत म्हणजे सुनील तांबे , कीर्तिकुमार शिंदे , येशू पाटील ,अक्षरनामा , वायर , जागल्या ,साधना , सारखे जेन्युईन लोक वा खाती  पण हे फार थोडे आहेत आणि बहुतेक डावे आहेत किंवा गांधीवादी

सुशांतच्या प्रकरणाचा आधारच बॉलिवूड असल्याने बॉलीवूडीकरण टोकाला पोहचले आहे ह्यात महेश भट ह्यांनी इस्लाम स्वीकारल्याने हिंदुत्ववादी त्यांच्याविरुद्ध आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीद्वारा त्यांना गोत्यात आणता आलं तर ते हिंदुत्ववाद्यांना हवं आहे महेश भट काय असावेत ह्याचा काल्पनिक अंदाज बांधून मी अडा हॉका बाना सुना ह्या कादंबरीत शंकर भट हे काल्पनिक पात्र मी समांतर नायक म्हणून तयार केले होते ते खरे वाटावे अशा हालचाली महेश भट ह्यांनी केल्याने त्यांच्या बोल्डनेसच्या मुसक्या बांधाव्यात असं अनेकांना वाटतं पाश्च्यात्त्य देशात मुलीचे चुम्बन घेणारा पुरुष टीकेला पात्र होणार नाही पण भारतात महेश भटानी हे केल्याने तो समाजशत्रू वाटणे हे स्वाभाविक आहे कारण चुंबन कामूकच असतं असा भारतीयांचा आग्रह आहे आणि ह्याबाबतचे वैज्ञानिक सत्य भारतीयांच्या बाजूने आहे गालावरची पप्पी कामुक नसते पण चुंबनाविषयी असं म्हणता येणार नाही मुलगी वयात येईपर्यंत चुंबन बापाचं प्रेम असू शकतं (ह्याचीही बापाकडून गॅरेंटी नाहीच ) पण मुलगी वयात आल्यानंतर चुंबन लैंगिकच बनतं त्यामुळे महेश भट सांस्कृतिक शत्रू वाटणे हे नैसर्गिक आहे रियाने सुशांतच्या घरून निघाल्यावर महेश भट ह्यांना फोन केल्याने व्हाटसप केल्याने महेश भटांना टार्गेट करणे सोपे झाले शेवटी मागचे हिशेब चुकते करायचेच होते ते ह्या निमित्ताने चुकते करण्याची संधी मिळाली साहजिकच  रिया चक्रवर्ती नावाचे शेपूट दाबले गेले . महेश भट हे बॉलिवूडमधले सर्वात हुशार व्यक्तिमत्व आहे मी एकेकाळी त्यांच्यासाठी चित्रपट लेखन करणार होतो आणि ती फिल्म आशुतोष गोवारीकर डिरेक्ट करणार होता आणि प्लस चॅनेलने १० कि १२ फिल्म्स बनवण्याचा जो घाट घातला होता त्यात ती फिल्म होती त्यावेळीही त्यांची बोल्ड मोरॅलीटी इंडस्ट्रीला झेपत न्हवती शेवटी ते रजनीश ह्यांचे शिष्य होते आजही परिस्थिती बदललीये असं वाटत नाही साहजिकच रिया चक्रवर्तीबरोबरचे त्यांचे फोटो ज्यातले अनेक मॉर्फ केलेले होते लोकांना कन्विन्सिंग वाटले ह्याला जोड मिळाली ती नंतर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाने एनएसडी आणि अंडरवर्ल्ड ह्यांच्यामुळे ह्यांची एंट्री झाली नासिरुद्दीन शाहची ऍक्टिंग तो ड्रग घेत असल्याने लय भारी होते अशी गैरसमजूत असलेल्या महामूर्खांनी ही लत अभिनेत्यांच्यात पसरवली संजय दत्तने तिला ग्लॅमर दिले इxxx  खानसारख्यांनी स्टॅबिलिटी मॉडेलिंगने तिचा महापूर निर्माण केला ह्यात सुशांतसिंग राजपूत सापडलाय अशा बातम्या कानावर येत होत्या आणि ह्या अंगाने रियावर आरोप होऊ लागले

ह्या  रचितांची खंडने करणे तिच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला असल्याने आवश्यक बनले आणि रिया चक्रवर्तीनें तिच्याविरुद्धच्या  रचितांची विरचना करणारी मुलाखत राजदीप सरदेसाई ह्यांना दिली ही एक अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी होती

रियाने सुशांतच्या ड्रग्ज सेवनाविषयीच्या अफवा  खऱ्या आहेत असं इन्डायरेक्ट सुचवल्याने ड्र्ग्जमाफिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिला टार्गेट करणार हे उघडच आहे ह्याचबरोबर तिने आप्तवादाला काही भावच दिला नाही फक्त काही इशारे केले त्यामुळे रियाच्या  विरचनेची विरचना करणे आवश्यक बनले हे सगळे प्रकरण म्हणजे ज्याला  देरिदाने संहितेतून संहिता तयार होणे टेक्सच्युअलायझेशन म्हंटले होते तसे होते संरचना मग विरचना मग त्या वीरचनेची विरचना ह्यातल्या काही वीररचना जोश और ज्वानीसे भरपूर तर काही ररचना र्रर्रर्र करणाऱ्या ऍक करणाऱ्या  !

रियाने  उपस्थित केलेला एक प्रश्न  सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तिने सुशांतला ब्लॉक केल्यावर काय घडले ? जोपर्यंत हे खर्रर्रखुर्रर्र सापडत नाही तोवर सर्व अफवा आहेत प्रश्न इतकाच आहे ह्यातून फाँल्स व्हिक्टीम बनवला जाणार कि खर्राखुर्रा शोधला जाणार ? आणि हा प्रश्न पोस्ट्रुथ आहे सत्य रचित असेल तर पुरावे रचून कुणालाही शिक्षा होणार कि खर्ऱ्याखुर्ऱ्या पुरावाच्या आधारे खरा आरोपी शोधला जाणार ?

माझा ह्या देशातल्या पोलीस आणि तत्सम इन्वेस्टीगेशन एजन्सीजवरचा विश्वास अजूनही उडालेला नाही असं रियाने सांगितले आहे मी तिच्याशी सहमत आहे

पोस्ट्रुथ एजमध्ये सत्य रचित असल्याने सत्य रचलं जातं आणि रचलेल्या सत्याच्या आधाराने सत्ता चालवण्याचा प्रयत्न असतो भारतात हे नवीन नाही  भारतात सर्वच ब्राम्हणधर्मी राजवटी ह्या पोस्ट्रुथ होत्याच मुळात धर्म ही संस्थाच पोस्ट्रुथ असते आणि मोक्ष ट्रुथ साहजिकच कुठलेही धर्मराज्य हे स्वभावतः पोस्ट्रुथ असते म्हणून तर सुरवातीच्या काळात शैव जैन बौद्ध दर्शन वा धम्म हा शब्द वापरत होते शिवाने दर्शन तर  महावीर बुद्धाने धम्म सांगितलाय धर्म न्हवे धम्माचा अर्थ मोक्षाकडे / कैवल्याकडे /निर्वाणाकडे घेऊन जाणारे दर्शन दुर्देवाने संस्कृतचे प्रभुत्व वाढत गेले तसे ह्यांच्या दर्शनाचाही /धम्माचाही धर्म बनवला गेला आपल्याकडच्या लोकांना हे अजूनही नीट कळत नाही त्यातून बरेच घोळ होतात आणि कधीकधी मुद्दामहून घातले जातात मला आशा आहे कि असे काही पोस्ट्रुथ घोळ ह्या प्रकरणात घातले जाणार नाहीत राजकीय क्रांत्या  आणि धर्मराज्ये सर्वात प्रथम स्वतःच्या अपत्यांना खातात फ्रेंच / कम्म्युनिस्ट क्रांतीतला नरसंहार आणि अलीकडे ज्यांनी सत्ता काँग्रेसकडून खेचून आणली ते भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान लोक ज्यात अडवाणी यशवंत सिन्हा  वैग्रे येतात ह्यांचे सध्याच्या सत्तेने चालवलेले हाल हे उत्तम उदाहरण आहेत हे सगळेच पायाचे बळी होते कि काय अशीही शंका आहे असे असेल तर पोस्ट ट्रुथ भारतातही ऑन झाले असे म्हणावे लागेल अशा पार्श्वभूमीवर असे काही नाही हे सिद्ध करण्याची सर्वोत्तम संधी ह्या प्रकरणात ह्या सरकारला आहे

माझा स्वतःचा उत्तराधुनिकतेवर विश्वास नाही त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीद्वारे सत्य शोधता येते असा माझा विश्वास आहे मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या आहे असा निर्वाळा दिला होता पण ह्याहून काही वेगळे सत्य असेल आणि वैज्ञानिक इन्वेस्टीगेशगनच्या आधारे ते सिद्ध करणारे पुरावे सादर केले जाणार असतील तर त्यांना स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे


सर्वाधिक जो नैतिक असतो
त्याच्यावर असतात सर्वाधिक कॅमेरे
शस्त्रासारखे रोखलेले

त्याची हत्या होणे गरजेचे असते
कारण तो भ्रष्ट आचाराला धोखा असतो
आणि त्याचे निर्मूलन भ्रष्टाचारी लोकांसाठी
जीवघेणी आवश्यकता असते

तो नैतिक टाचणी असतो
जी टोचत राहते
जिच्यामुळे आपले फुगे फुटतील
अशी फुगेवाल्यांना भीती असते

नैतिक माणूस नकोच असतो कुणाला
आणि म्हणूनच त्याच्या मरणाची सर्व वाट पहात असतात
आणि जेव्हा तो  मरत नाही लवकर
असे वाटते  तेव्हा  तो  मारला जातो
गांधींसारखा

नैतिक माणूस थोडाही चुकला कि
त्याची बातमी होते
मीडिया जणू काही आपण खूप नैतिकतेचे पुजारी आहोत
अशा थाटात त्याच्यावर तुटून पडतो

म्हणूनच नैतिक माणसाच्या नावाने
तो चुकला
अशा अफवा पसरत असतात
वारंवार सतत थकत
इतक्या कि
नैतिक माणसाला शेवटी बातम्या साईडलाईन करण्याचे
यंत्र बसवून घ्यावे लागते
किंवा तयार करावे लागतात

नैतिक माणसाची सगळ्या समाजालाच भीती का ?

तो फक्त क्रुसिफाय झाल्यावरच त्याच्यावरती चर्चा का ?

वर्तमानात तो आपले आयुष्य बदलेल
अशी भीती वाटते का

मग बदला ना
होऊन जाऊ दे

एकदा हा अख्खा समाजच नैतिक करून बघूया

बघूया तरी खरोखर अनैतिकतेनेच सिस्टीम चालते
हे सत्य आहे का

चला
बदल घडवूया
स्वतःत आणि जगात

आतल्या भयावर मात करूया
जग बदलूया

चला बदल घडवूया
जग बदलूया

श्रीधर तिळवे नाईक

पहिला आनंदाश्रू उजव्या डोळ्यातून
आणि पहिला दुःखाश्रु डाव्या डोळ्यातून
येतो

म्हणूनच बहुदा डाव्यांना दुःख लवकर कळतं

आता मला कळतंय
मी चुकीच्या डोळ्याने तुला
डोळा मारायला नको होता






Wednesday, 5 August 2020

राममंदिर आणि मी

राममंदिर आंदोलन सुरु झालं तेव्हापासून माझा त्याबाबतचा प्रवास बदलत गेला आज पाहतो तेव्हा चार टप्पे स्पष्ट दिसतात
१ कट्टर विरोधाचा टप्पा
२ जहाल विरोधाचा टप्पा
३ मवाळ विरोधाचा टप्पा
४ आणि काही महिन्यापूर्वीचा पाठिंबा

माझ्या घऱात बहुजनवादी राजकारणाची परंपरा कित्येक शतकांची आहे त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे काँग्रेसला व फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आणि दाजीबा देसाई वा गोविंद पानसरेंचे (पानसरे आमच्या गल्लीतच रहात होते व अविनाश पानसरे माझा लहानपणचा मित्र होता ) काही काम असले कि शेकाप वा कम्म्युनिस्टांना पाठिंबा हे आमच्या घरात कायमच चालत आलेले !

पण १९८० साली माझ्या घरात प्रथम माझा भाऊ भारत बदलला मग दुसरा भाऊ भूषण व नंतर माझा भाचा जतीन तिघेही शिवसेना सैनिक बनले बाळासाहेब ठाकरे हे जणू ह्यांच्यासाठी देवच ह्यांच्यात मी एकटाच शैव उरलो आर्य संस्कृतीचा अभिमान हा भांडणाचा विषय झाला ह्या पार्श्वभूमीवर शाहबानो प्रकरण घडले आणि माझे वडीलही कधी न्हवे ते काँग्रेसवर दुसऱ्यांदा संतापले आणिबाणीनंतरची काँग्रेसची ही दुसरी मोठी चूक होती पहिली शिखांची हत्या होती ह्यावेळी रामजन्मभूमीचा प्रश्न पुन्हा आणला गेला माझे भाजपवाल्यांना सांगणे होते कि तुम्ही शहाबानो प्रकरणावरून आंदोलन करा पण ह्या प्रकरणावरून भाजपला  पाठिंबा मिळेना आणि नेमके ह्याचवेळी रामानंद सागरचे रामायण आले मी ह्या काळात राममंदिराच्या कट्टर विरोधात होतो कारण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला अयोध्येत सापडलेली इन्स्क्रिप्शन्स माहित होती आणि ही इन्स्क्रिप्शन्स गर्जून सांगत होती कि अयोध्येचा पूज्य देव हा शिव आहे नंतर सापडलेल्या इन्स्क्रिप्शन्समध्येही शिवच जास्त होता जर रामायण खरोखरच घडले असते तर अयोध्येत सुरवातीपासूनच रामाची पूजा केली गेली असती पण ज्या अर्थी असे न घडता तिथला मुख्य देव शिवच होता त्याअर्थी रामायण हे काल्पनिक असावे होते असा माझा युक्तिवाद होता ह्या काळात त्यामुळेच मी राम मंदिराला कट्टर विरोध करत होतो

पुढे अडवाणींची रथयात्रा झाली त्या काळावर मी एक कविताही लिहिली होती ह्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा बघून मी जहाल झालो बाबरी मस्जिद पडली माझ्या कादंबरीत ते प्रकरण आलेही होते मग मी ते उडवले कारण अभिजित देशपांडेंकडे प्रत्यक्षदर्शी अनुभव होते ते मला जास्त महत्वाचे वाटले

२०११ ला मी मवाळ झालो कारण खुद्द ओबीसींनीच राममंदिरला दिलेला पाठिंबा ज्यांच्या जीवावर शैवांचे राजकारण उभे होते तेच फिरल्यामुळे आपल्या जहाल भूमिकेला काहीही अर्थ उरलेला नाही असे माझ्या लक्ष्यात आले

आणि काही महिन्यापूर्वी मी पाठिंबा दिला कारण माझ्या सर्वच मुस्लिम मित्रांनी मला सांगितले कि राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे एका मशिदीच्या बदली शांतता असे त्यांचे कारण होते जे मला पटले

माझ्या ह्या चारी अवस्थांवर कविता येत राहिल्या म्हणजे ऑक्टोबर १९८९(चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा  ) , वास्तू , रावण (ह्या दोन्ही स्त्रीवाहिनीत ) दंगा (कव्ही ) वैग्रे


आता राममंदिराचा शिलान्यास झाला आहे आमच्या पिढीचे तारुण्य ह्या प्रश्नात वाहून गेले कमावले काय तर एक मंदिर त्याने समाजात नेमका काय फरक पडतो हे आगामी काळात हळूहळू कळेल

श्रीधर तिळवे नाईक




धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम   श्रीधर तिळवे

आधुनिक युगात औद्योगिकता सेट झाल्यावर जे चमत्कार पूर्वी देव करायचे ते तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष करून दाखवायला सुरवात केली औद्योगिकता झेपणाऱ्या लोकांनी ईश्वर सोडला नाही खरा पण बर्ट्रांड रसेलने ह्या लोकांचे सगळे युक्तिवाद व्हाय आय एम नॉट ख्रिश्चन ह्या नावाचा एक ग्रंथ लिहून खोडून काढले गॉड इज डेड म्हणणाऱ्या फ्रेडरिक नित्शेने सुरु केलेल्या प्रतिसृष्टीय  नास्तिकवादाचे हे पुढचे पाऊल होते भारतीय संस्कृतीतील तिसऱ्या उपसंस्कृतीला म्हणजेच ज्युडायिक धर्मांना हा धक्का होता मात्र आपल्या आर्य शैव बांधवांच्याप्रमाणे त्यांनीही हा धक्का पचवला मात्र स्टॅलीन माओच्या आधुनिक राजवटीत झालेले अत्याचार पुढे आले आणि धर्ममुक्त राजवटी  किती नृशंस होऊ शकतात ते जगाला कळाले ह्यातून साम्यवादी धर्ममुक्त चळवळींना चांगलाच सेट बॅक बसला आणि संपूर्ण युरोप बॅकस्टेजवर गेला ह्यातूनच १९५० पासून धर्माची उत्तराधुनिक मांडणी सुरु झाली ह्याचा एक फायदा भारताला झाला आतापर्यंतचे ओरिएंटॅलिस्ट वैदिक ब्राम्हण व वैष्णव धर्मात अडकून होते साठोत्तरी ओरिएंटॅलिस्ट लोकांनी भारतातल्या स्थानिक धर्मांचा व पंथाचा अभ्यास सुरु केला ह्यातूनच वारकरी आणि खंडोबा ज्योतिबा ह्यांच्या अभ्यासाची प्रथा सुरु झाली व तिने मराठी साहित्याला देशी पाठबळ पुरवले 

ह्याला प्रतिक्रिया म्हणून मार्गी संस्कृतीत १९६० नंतर साहजिकच आजच्या काळातील मार्गी धर्माची मांडणी कशी करावी ह्या दिशेने मंथन  सुरु झाले अणि भारतात ओशो रजनीश हयांनी जगातल्या सर्व धार्मिक मार्गी परंपरा नव्याने मांडल्या प्राचीन मार्गी संहितामधून  आधुनिक संहिता निर्माण करण्याचा हा प्रयत्न मस्त होता नवीन पिढीला ह्या निमित्ताने आपल्या मार्गी परंपरेची नव्याने ओळख झाली साठोत्तरीच्या ऍडव्हान्स मार्गी धार्मिकतेचे प्रतीक म्हणजे ओशो रजनीश होय 

राजनीशांच्यामुळे अनेकांना जे कृष्णमूर्तींच्या आधुनिक  ज्ञानप्रधान मोक्षतेचे जे आकर्षणे होते ते  संपले वं ओशोंचा अराजकी  उत्तराधुनिक धर्म सेटल झाला भारतीय पुन्हा एकदा मोक्षाकडून मार्गी धर्माकडे सरकले हे परंपरेचे कमबॅक होते ह्याचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते साहित्यिकही कुलवृत्तांत हिंदू लिहू लागले आपण परंपरेत लिहितो ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट बनली आणि चौथ्या नवतेच्या क्रांतिकारकांचा ९० टक्के वेळ परंपरेशी झगडण्यात जाऊ लागला

अस्तित्ववादाचे दोन जनक होते एक होता किर्केगार्द जो ईश्वर तर्कशुद्ध नसल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणत होता तर दुसरा नित्शे गॉड इज डेड म्हणत होता भारतीयांनी किर्केगार्द निवडला त्यामुळे इल्लोजिकल विचार करणाऱ्या ब्राम्हणांच्या झुंडशाहीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पुरोगामी ब्राम्हण आदर गमावू लागले घरात होणाऱ्या कर्मकांडांना गोतावळ्यात  प्रसिद्धी मिळायला लागली १२ व्या शतकातला बंगाली वैश्यांचा सत्यनारायण आपली पूजा भारतभरातल्या सर्व आणि अर्थात मराठी ऑफिसेसमध्येही मिरवू लागला भक्तिवेदांत मुंबईकर बनला


हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि ओशो रजनीशांच्या मृत्यूनंतरच भाजप पक्कड बसवू शकला कारण रजनीशांच्यामुळे परंपरा उत्तरआधुनिकतेकडे सरकत होती पण कर्मठ बनत न्हवती तिला पायबंद घातला तो अमेरिकेतल्या कर्मठ ख्रिश्चनांनी रजनीशपूरम हे एका पोस्टमॉडर्न सिटीचं स्वप्न होतं जे व्हॅटिकन सिटीनं उध्वस्त केलं कारण रजनीशांनी जिझसला मोक्ष मिळाला न्हवता किंबहुना त्याला तो माहीतच न्हवता असं स्पष्ट विधान केलं त्यांनी आतापर्यंत जिझसवर दिलेल्या व्याख्यानांच्या हे विरुद्ध होतं वास्तविक ज्युडायिक धर्माला मोक्ष ही संकल्पनाच माहित नाही तरीही आपल्याकडच्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने उगाच नसलेल्या गोष्टी सांगून सर्वधर्मसमभावाचा खोटा इतिहास रचला हा इतिहास भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक होता आणि काँग्रेसी अजेंड्याला साजेसा होता तो भारतभर पसरला

प्रत्यक्षात भारतात धर्म स्पष्टपणे  आर्य , शैव आणि ज्युडायिक अशा प्रकारात वाटले गेले होते ह्याशिवाय जमाती श्रद्धा होत्याच सर्वधर्मसमभावाला धर्म सम लागतात युरोपमध्ये शैव वा  आर्य नसल्याने तिथे असे सम होते  भारतातही प्राचीन काळात असे सम होते कारण विषम आले न्हवते विषम आले जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला ह्या मुस्लिम व  ज्युडायिक राजवटीत ज्युडाइक धर्मांनी धर्मांतर घडवून आपली लोकसंख्या आर्य व शैवांच्या इकवल केली त्यामुळे सर्वधर्मसमभाव हलायला लागला त्याला पर्याय म्हणून धार्मिक सहिष्णुतेचा उद्घोष सुरु झाला अकबर शिवाजी हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक बनले


दुर्देवाने औरंगजेबाच्या कारकिर्दीत धर्मसहिष्णुता पूर्ण हलली आणि पुढे उत्तरपेशवाईत ती रसातळाला गेली

आज अवस्था अशी आहे कि  सर्वधर्म सम हा पोकळपणा आहे आर्य सूर धर्म वर्ण जात मानतात अलीकडे विदेशी सर्व्हेत एन आर आय लोकांच्यातही वर्णजातिव्यवस्था अजूनही पाळली जात असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत हे खरे असतील तर मग शिकून आपल्या धार्मिक धारणा बदलत नाहीत हा निष्कर्ष घट्ट होईल शैव असुर आर्य ज्युडायिक वर्णजातिव्यवस्था मानत नाहीत पण अलीकडे त्यांनाही ही बाधा झालेली दिसते लिंगायत धर्मात वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे पण सुदैवाने अजूनही पुरोगामीपणा सम्पलेला नाही ब्राम्हण वैष्णव हिंदू व शैव बौद्ध ह्यांना समान मानणं म्हणजे गोळवलकर आणि आंबेडकर ह्यांना समान मानणं आहे आर्य आणि शैव मोक्ष मानतात ज्युडायिक मानत नाहीत मग हे धर्म समान होणार कसे ?

वस्तुस्थिती अशी आहे कि जगात सर्वधर्मविषमभावच जास्त आहे आणि सामान्य माणसाला तो कळतो पण अंगभूत सहिष्णुतेकडे सर्वांचा कल असल्याने लोक एकत्र नांदत असतात मुद्दा सर्वधर्मसहिष्णुतेचा असतो  सर्वधर्मसमभावाचा न्हवे अकबर रणजित शिवाजी हे सर्वधर्मसहिष्णुवादी होते पण बाकीचे न्हवते आणि बाकीचे ९९ टक्के आहेत ह्यातील अकबराची जी दुर्दशा मौलवींनी केली ती इस्लामविषयी जास्त बोलते शेवटी अकबर नास्तिक झाला म्हणून त्याला मरण्यासाठी कैदेत टाकले आणि तो नास्तिक म्हणूनच कैदखान्यात मेला ह्याउलट धर्मसहिष्णुवादी राजवट शिवाजीनंतर संभाजीने आणि पहिल्या बाजीरावापर्यत टिकली होती बाजीराव मस्तानी विवाहाने सर्व समीकरणे फिरवली वास्तविक मस्तानी आणि तिचा मुलगा ह्यांचे धर्मांतर घडवून हा प्रश्न सहज सोडवता आला असता पण हिंदू ब्राम्हणधर्मात धर्मांतराची प्रथा नसल्याने हे घडू शकले नाही कुणाला आपल्या धर्मात घ्यायचे नाही आणि कुणी गेला तर त्याला आत घ्यायचे नाही ही हिंदू ब्राम्हणांची  मानसिकता आहे शैवांनी नेहमीच ह्याला कडकडून विरोध केला आहे म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजवटीत नेताजी पालकरचे पुन्हा शैविकरण होऊ शकते जे धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले तेच धाडस पहिल्या बाजीरावाने दाखवायला हवे होते त्याने इतिहास बदलला असता पण पहिल्या बाजीरावाने धाडस दाखवले नाही आणि इतिहास उलटा फिरला मनुस्मृती आणि धर्मशास्त्र राज्यकारभारात घुसले

अनेक लोक अध्यात्मिकतेची ग्वाही देता असतात पण अध्यात्मिकता ही धर्मापेक्षा उंच गोष्ट आहे तिथे सर्वच एका ईश्वराची लेकरे होतात पण धर्मात प्रत्येकाचा ईश्वर वेगळा म्हणून तर त्यांना देव आणि देवता  म्हणतात गॉड आणि गॉडेसेस कुणाचा एक कुणाचा अनेक ईश्वर सर्व देवदेवतांचा अंत आहे आणि मोक्ष ईश्वराचा अंत आहे त्या पातळीवरून राज्यशासन चालवायला सर्वानांच मोक्षकुं आणि मुमुक्षु बनवावं लागतं आणि ही दुर्मिळ परिस्थिती असते दारू पिणारे लोकसुद्धा सोमेलिअर परीक्षा पास झाल्यावरच तज्ज्ञ मानतात पण धर्माची गोष्ट आली कि सर्वच तज्ञ हिंदू लोक तर कुठल्याही गोष्टीच अधःपतन घडवण्यात वाकबगार अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा श्रद्धेय होतात आणि विठ्ठलाला जातात

ईश्वराला सुद्धा ह्यांनी देवळात बंदिस्त केला जो  मूळ अर्थाने विश्वाचा प्राण होता हिंदूंना धार्मिक बनायचं नसत म्हणून ते अध्यात्मिक व सिद्ध बुद्ध लोकांची पूजा करत बसतात शंकर महावीर बुद्ध ह्यांची एकदा पूजा सुरु केली त्यांना देव बनवलं कि मग त्यांनी सांगितलेले यमनियम किंवा पंचव्रते किंवा पंचशील पाळायची गरजच भासत नाही आपण अशाच लोकांच्यात वावरत असतो आणि  अशा लोकांच्यासाठी धर्ममुक्तता अशक्यच बनत जाते आणि म्हणून धर्मनिरपेक्षता फळफळते 

साधना करू न इच्छिणाऱ्या लोकांच्या समूहाचीही धर्मनिरपेक्षता गरज बनते मी माझी प्रॉपर्टी सांभाळतो तू तुझी प्रॉपर्टी सांभाळ असाच हा करार असतो आणि प्रॉपर्टी रिलिजियस असते


श्रीधर तिळवे नाईक